✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :-  २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्ल्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शिवस्मारकाच्या कामाला स्थगितीनंतर शिवस्मारक समितीची तातडीची बैठक सुरू* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - सीबीआयच्या नव्या संचालकांच्या निवडीसाठी 24 जानेवारी रोजी निवड समितीची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या कार्यकारी संचालकपदी विशाखा मुळे यांच्या पुनर्नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने दिली मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : नांदेडात शिक्षणाची वारी कालपासून प्रारंभ, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : नऊ दिवसांनी हायकोर्टमध्ये काही मागण्या मान्य झाल्याने बेस्ट कामगाराचा संप मिटला, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत 893 बेस्टच्या बस रस्त्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने 17 वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *सुचित्रा सेन*     बंगाली व हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्म १७ जानेवारी १९३१ रोजी झाला. सौंदर्य आणि उच्च दर्जाचा अभिनयाच्या त्या सम्राज्ञी होत्या. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले. सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मुनमुन सेन आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल रिया सेन या सुचित्रा सेन यांच्या नात आणि मुनमुन सेन यांच्या कन्या आहेत.सुचित्रा सेन यांनी उत्तमकुमार यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना १९७२ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. सारे चतुर हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट होता. तर देवदास हा त्यांचा हिंदीतील पहिला चित्रपट होता. त्यांनी बंगालीतील देवदास चित्रपटात केलेली पारोची भूमिका विशेष गाजली होती. विशेष म्हणजे आतंरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली होती. विदेशात सन्मान झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होती. त्यांची आंधी चित्रपटामधील इंदिरा गांधी यांची भूमिका ऐतिहासिक ठरली होती. मात्र रामकृष्ण मिशनच्या कार्यासाठी त्यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' केव्हा सुरू झाली ?*          १९५६ *२) कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप होतो ?*         प्लाझमोडियम *३) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची आणि फळांची उत्पादकता वाढवतात ?*            गॅमा *४) मानवी रक्ताचा पीएच किती आहे ?*          ७.५ *५) १९३२ मध्ये न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?*              प्रा.चॅडविक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जयप्रकाश भैरवाड ● शेखर घुंगरवार ● शरद दळवी ● सचिन पाटील पार्डीकर ● धम्मपाल कांबळे ● यश चेलमेल ● राम घंटे ● मन्मथ भुरे ● माधव गडमवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हातच सोडून* लोक हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतात आहे त्यात आनंद मानायचा तर आश्रू ढाळत जगतात        पळत्या मागे लागल्यास आश्रुच ढाळावे लागतील आनंदी क्षणही दु:खाचे म्हणून गिळावे लागतील    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान* *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चाकी चली गुपाल की, सब जग पीसा झार रुरा सब्द कबीर का, डारा पात उखार ।      परमात्म्याच्या चलत्या चक्रात जगातील समस्त माणसे भरडून काढली जात आहेत. सर्व माणसे माया मोहात गुरफटून संभ्रमित अवस्थेत जगत आहेत. आसक्तीने त्यांना असे जखडून टाकले आहे की नियतीच्या चक्रात रगडून त्यांचं  पिठ होत आहे जणू . मोठमोठ्या राजा महाराजांचं वैभव देखील पानांच्या बंगल्यासारखं क्षणार्भात भूईसपाट होवून गेलं आहे. काल भिकारी असणारा आज वैभवात असू शकतो. आजचा श्रीमंत उद्या कवडीमोलाचाही ठरू शकतो. हे सारं ज्याच्या त्याच्या कर्मगतीवर किवा नियतीच्या मनावर अवलंबून आहे. बर्‍याचदा  नियती एखाद्याची खूपच कठीण चाचणी घेत असते. खरं तर अंधार्‍या किर्र रात्रीला भयंकर काळोख भिती दाखवित असला तरी पहाटेपर्यंत हिंमतीनं  टिकायला हवं ! मग पुढे लख्खं प्रकाशाचं अधिराज्य असणार आहे.  महात्मा कबीर म्हणतात की, सत्य व वास्तव खूपच बलशाली आहे. ते लबाडी व चमकोगिरीच्या पुढे थोडं  धुसर भासेलही परंतु चिकित्सेचा हलका वाराही असत्याच्या वांझाड ढगांना पळता भुई थोडी करतो आणि सत्याच्या विवेकाच्या प्रकाशापुदं लबाडी पुरती गारद झालेली असते. माया मोहाने निर्माण केलेली भ्रमिष्ट अवस्था नाहिशी होईल. सत्य मार्ग कठीण असल्याने त्याच्यावरुन चालताना थोडी दमछाक जरूर होईल , फसगत करणारा , चकवा देवून रानभुल करून उरी फोडणारा किवा बदनमी करणारा हा मार्ग नक्कीच नाही.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चार भिंतींच्या आत कुढत बसण्यापेक्षा थोडं बाहेर या.हे जग खरंच किती सुंदर आहे.तुम्ही जे पाहिले नाही ते तुम्हाला पहायला मिळेल.जीवनाची अनेक रंग, अनेक ढंग पहायला मिळतील.प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शैलीत जगताना दिसेल.कुणाच्या चेहरा हसलेला,कुणाचा रुसलेला,कुणाचा चिंतेचा,कुणाचा घामाने माखलेला तर कुणाचा जीवनाला त्रस्त असलेला पहायला मिळेल.जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल.नक्कीच तुमच्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे सुंदर उत्तर सुद्धा मिळेल.आपल्या जगण्याच्या शैलीत बदल होईल.तुमचे असलेले दु:ख सहज दूर होण्यास मदत होईल.मनावरचा ताणही कमी होईल.तुमच्या नकारात्मक जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल होईल.मग तुम्हीच म्हणायला लागाल.एकांतात एकाकी जीवन जगण्यापेक्षा बाहेरच्या जगाकडे पाहून आपणही आनंदाने जीवन जगू शकते.जशी लोकांकडे जगण्याची वेगळी कला आहे तशी आपल्याही अवगत करता येईल.आपणही इतरांसारखे हसून खेळून कधी आनंदाने तर कधी कष्टाने जीवन जगू असे वाटायला लागेल.मग आपल्यालाच वाटायला लागेल की,चार भिंतींच्या आत स्वत:ला कोंडून घेऊन जीवाची घालमेल न करता मुक्तपणे बाहेरच्या जगाकडे पाहत पाहत जीवन चांगले जगता येऊ शकते असा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आनंदाने जगण्यासाठी एक आनंदाचा दीर्घ श्वास घेण्यास उत्सुक व्हाल.मग तुमच्या जीवनाचे खरे रहस्य काय आहे हे नक्कीच उलगडेल.माणसे जोडा-मनही जोडा,माणसे जोडा- मैत्री वाढवा आणि माणसे जोडा आयष्य वाढवा असे तुमच्या जीवनाचे सूत्रच बनेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद....९४२१८३९५९०. 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *मंडई - Boarding* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *भावस्पर्श* सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, शामराव :- तू का रडत आहेस बाळ ? मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........ शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). शामराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे.  शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??  शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जी भावना स्पर्श करते तेच भावस्पर्श आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment