✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *राष्ट्रीय युवक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा. इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी. 💥 जन्म :- १५९८ - जिजाबाई, छत्रपती शिवाजी राजांची आई. १८६३ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न. १९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक. १९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार. १९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ. 💥 मृत्यू :-  १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त. १९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक. २००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : विदर्भ राज्य निर्माण यात्रा घाटंजीत दाखल, स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीचा लढा तीव्र करण्यासाठी अॅड. वामनराव चटप आणि राम नेवलेंच्या नेतृत्वात मोर्चा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *महिला अंतराळवीर गगनयान मोहिमेचा भाग असतील- इस्रोप्रमुख के. सिवन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आलोक वर्मांनी दिलेले अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रभारी संचालक एम. नागेश्वर राव यांच्याकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात राम रहिमसह चार जण दोषी; सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात; कसोटी विजयामुळे भारतीय संघात संचारला उत्साह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *राकेश शर्मा* हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते. पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  डिसेंबरमध्ये इराणमधील कोणत्या बंदराचे उद्घाटन झाले?* 👉    चाबहार *२)  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉  रोहित पवार *३)  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची स्थापना कोणत्या झाली?* 👉    १९३२              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुधाकर थडके, देगलूर ● कन्हैया भांडारकर, गोंदिया ● रत्नाकर जोशी, जिंतूर ● सुरेश गभाले ● भारत राठोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकल्प* नवे वर्ष आले की नवे संकल्प केल्या जातात नव्या संकल्प सिद्धीच्या घोषणा दिल्या जातात संकल्प सिद्धीस न्यायची गोष्ट मनात पक्की पाहिजे मनातच संकल्प सिद्धीची खुण गाठ नक्की पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील  दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया  आत्मशुद्धीकडे नेणारी असते.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून  व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात  पण त्याकरिता मुखवटे उतरवून  माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....*                                     *" कुछ इस तरह मैने*          *जिंदगी को आसान कर दिया,*                     *किसी से मांग ली माफी,*           *किसी को माफ कर दिया !"*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही. म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *धारदार - Sharpened* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मातृभक्त लक्ष्मणदेव* एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment