✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत, उत्तरायण भारत* 💥 ठळक घडामोडी :-  १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :-  १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागपूर : हक्क असलेल्या स्त्री साहित्यिक कायम संमेलनाच्या अध्यक्ष पदापासून वंचित राहिल्या, मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. अरुण ढेरे यांची खंत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी आज ओरीसा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध योजनाचें उद्धाटन होणार आहे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : आजपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे, हेल्मेट न घातल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे शिक्षा होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा आरक्षणाला स्थगिती नाही; राज्य सरकारला हायकोर्टाकडून मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 बद्दलच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली संमती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बदली खेळाडू म्हणून संघात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *खाशाबा जाधव* खाशाबा जाधव हे देशातील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू होते.१९५२ सालातल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. सातारा जिल्हय़ामधील कराड तालुक्यातील गोळेश्‍वर या खेडेगावात १५ जानेवारी १९२६ रोजी खाशाबा जाधव यांचा जन्म झाला. ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे कनिष्ठ पुत्र होते. खाशाबा यांनी वयाच्या आठव्या वर्षी त्या भागातील प्रसिद्ध चॅम्पियनला २ मिनिटात लोळवले होते. खाशाबा यांनी १९४0-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढे त्यांनी त्यांचे लक्ष कुस्तिकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले. १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी यांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. पुढे १९५२ साली त्यांना कास्य पदक मिळाले. पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंम्पिक पदक ठरले. १९५५ मध्ये ते सब इंस्पेक्टर या हुद्दय़ावर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलिस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलिस कमिशनर या हुद्दय़ावरून नवृत्त झाले. परंतु, पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे जीवन गरिबीतच गेले. अखेर १९८४ साली त्यांचे एका रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादीँक शुभेच्छा... *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कोणत्या जिवाणुमुळे दुधाचे दही होते ?* लॅक्टोबॅसिलिस *२) सिस्मोग्राफने काय मोजले जाते ?* भूकंपाची तीव्रता *३) सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?* मध्य प्रदेश *४) महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?* रायपूर *५) 'इच वन टीच वन' हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?*              प्रौढ शिक्षण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  साईनाथ अन्नमवार, नांदेड ●  नामदेव हिंगणे ●  सलीम शेख ●  बौद्धप्रिय धडेकर ●  व्ही. एम. पाटील ●  बालाजी ईबीतदार ●  एकनाथ पावडे ●  दत्ता बेलूरवाड ●  कोमल ए. रोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "तिळगुळ " हेवेदावे विसरू सारे चला तिळगुळ देऊ अनोखा हा आनंद आपण सारे घेऊ दिल्या घेतल्याने आनंद बघाच कसा वाढतो चिमूटभर तिळगुळ माणूस माणूस जोडतो मकरसंक्रातीच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *दुस-याचं सुख पाहून सुखी होणारी आणि दुस-याचं दु:खं पाहून दु:खी होणारी माणसं सतत आनंदी वृत्तीनं जगतात. इतरांच्या सुखात आपलं सुख पाहण्यासाठी आपल्याजवळ मोठं अंत:करण असावं लागतं. माणसाच्या ठायीच्या ज्ञानापेक्षा कल्पकतेला आधिक महत्व असतं. कल्पनेला वास्तवतेचे पंख लाभले की, किती सुंदर काम होते याचं उत्तम उदाहरण आहे ताजमहाल! शहाजहानच्या मनात ताजमहालाची कल्पना आली आणि गड्यागवंड्यांच्या बोटांतून सफल साकारली. कलाकारांची पाच बोटं म्हणजे सुंदर महाकाव्यच असतं. कारण त्यातूनच अवीट सौंदर्याची निर्मिती होते. माणसाच्या जीवनातील खरी सौंदर्यप्रसाधनं कोणती ? शांतवृत्ती, उदार स्वभाव, सोशिकता, नम्रता, आचाराची शुद्धता आणि मानवतेचे प्रेम हीच खरी आपल्या आत्म्याची सौंदर्यप्रसाधनं.* *मानवी जीवन महान असल्यानं आपण आपल्या इच्छा-आकांक्षाही महान ठेवल्या पाहिजेत. यासाठी प्राप्त परिस्थितीचे दास होण्यापेक्षा स्वामी होण्यात आनंद असतो. एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तरी काय ? तो आपला दृढ संकल्प सिद्धिप्रत घेऊन जातो. एकदा सिकंदरला एकानं विचारलं की, 'तुम्ही हे जग कसं जिंकलं?' त्यावर सिकंदर म्हणाला, 'अनिश्चित नीतीचा त्याग केल्यामुळे मी विजयी झालो.' आत्मनियंत्रण आणि आत्मसंयम हे तर यशप्राप्तीचे दोन धवल स्तंभच आहेत.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ● •• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धरती करते एक पग, करते समुद्रा फाल हातों पर्वत तौलते, ते भी खाये काल । सारांश जगी ज्याचा जन्म झाला .त्याला मृत्यूने गिळंकृत केले आहे. हे महात्मा कबीर आपल्या उपदेशपर अमृतवचनातून माया मोहाच्या बंधनात गुरफटलेल्या मानव प्राण्यास मृत्यूची जाणीव करून देताना सांगतात. वामनाची महत्ती सांगताना पुराण कर्त्यानं लिहून ठेवलंय की वामनानं एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. हनुमानाने जन्मत:च एका उड्डाणात सूर्याला जेरीला आणले. सृष्टीच ज्याच्यावर अवलंबून आहे. त्यालाच गिळंकृत करायला निघाल्यामुळे, आता आपलं कसं होणार ? म्हणून सूर्य हनुमानापुढे निस्तेज पडला. आता आपलं कसं होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. याच हनुमानाने एकाच उड्डाणात समुद्र ओलांडला. कृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत तोलून धरला आणि सृष्टीला वाचविले. अशा महा पराक्रमी वीरांनाही काळाने सोडलेले नाही. तिथं सामान्य जीवांचं काय चालणार आहे ! नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया । काळाची ही उडी पावेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप । या तुकोबांच्या ओळी किती समर्पक आहेत . जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे . माणूस कितीही महापराक्रमी असला किवा त्याने संपूर्ण जगाला ओरबाडून संपत्तीचा मुबलक साठा केला तरी त्याचे मरण अटळ आहे. जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे बोलही याचीच प्रचिती देतात. म्हणून माणसानं माणसासारखं वागून मानव जन्म सार्थक करावा. जीवनात समाधान प्राप्त करावं . कोण जाणे कोणत्या क्षणी आपल्याला काळाचं बोलावणं येईल आणि आपली खेळी संपुष्टात येईल !     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सत्य स्वीकारा,सत्य आचरणात आणा आणि सत्याच्याच मार्गाने मार्गक्रमण करा हेच तुमच्या स्वाभिमानाने,निर्भिडपणे जगण्याचे आणि यशस्वी जीवन जगण्याचे खरे मंत्र आणि तंत्र आहे.तुम्ही स्वीकारलेला मार्ग आज जरी अवघड असला तरी जीवनभर आनंद आणि समाधान देणारा आहे.इतरांना हे सुरवातीला अनुकरण करायला अवघड वाटेल पण कालांतराने नक्कीच ते स्वीकारतील तुमचे अनुयायी बनतील.कोणत्याही कठीण प्रसंगी तुम्ही स्वीकारलेले सत्याचे जीवन चांगली दिशा दाखवून समृद्ध करु शकतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कंजूष - Stinginess* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मोठेपणाचे सोंग* एका गावी एक कंजूष परीट राहात होता. तो दिवसा आपल्या गाढवाकडून भरपूर काम करून घेई, पण त्याला चारापाणी घालताना मात्र हात आखडता घेई. अखेर त्याने एका वाघाचे कातडे मिळविले. ते कातडे तो त्या गाढवाच्या अंगावर चपखलपणे बसवी आणि रात्रीच्या वेळी त्याला दुस याच्या शेतात सोडून देई. त्यामुळे त्या नकली वाघाला खरे समजून शेतातील झोपड्यांमध्ये राहणारे, पिकांचे पहारेकरी घाबरून आपापल्या झोपड्यांची दारे बंद करून घेऊन आत बसत. असे होऊ लागल्याने त्या गाढवाला रात्रभर शेतातले धान्याचे रोप भरपूर खायला मिळे. पहाट होताच तो परीट त्याला घरी घेऊन जाई व त्याच्या अंगावरचे कातडे काढून ठेवी. त्या नकली वाघाची अशा त हेने बरेच दिवस चंगळ झाली आणि त्याची प्रकृतीही सुधारू लागली. पण एके रात्री तो नित्याप्रमाणे शेतात चरत असता, त्याला कुठूनतरी गाढविणीचे ओरडणे ऐकू आले. त्याबरोबर तिच्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी, वाघाच्या कातड्यातले ते गाढवही आपल्या भसाड्या आवाजात 'आँऽ आँऽ आँऽ' असे ओरडू लागले. त्यामुळे त्याचे खरे रूप उघडे झाले आणि शेताच्या रखवालदारांनी काठ्यांचा बेदम मार देऊन त्याला ठार केले. तात्पर्यः मोठेपणाचे सोंग केले त्यामुळे जीवावर बेतले *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment