✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/t7SH2Cenvt1nYvnb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_वनसंवर्धन दिन_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील २०५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: विस्डेनतर्फे कपिल देव यांची विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवडून* *१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.**१९८६ :जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.**१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ - २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.**१९८२: 'इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.**१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.**१९२७: मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३: कृष्णा तात्याराव ठाकरे -- लेखक दिग्दर्शक**१९९०: युझवेंद्र चहल -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१०९०: अविनाश अरुणा जगदेव -- लेखक* *१९८३: भरत शेषराव कांबळे -- कवी**१९८०: रमजान मुल्ला -- कवी ,लेखक* *१९७६: ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू**१९७३: हिमेश रेशमिया -- भारतीय संगीतकार, गायक व चित्रपट अभिनेता**१९७०: अलका संजय कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६३: प्रा. डॉ. शोभा इंद्रभान रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९६१: मिलिंद गुणाजी --भारतीय अभिनेता, मॉडेल, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता,लेखक**१९५६: लक्ष्मण मारुती गायकवाड -- प्रसिद्ध मराठी कादंबरीकार* *१९५५: मो. ज. मुठाळ --सुप्रसिद्ध कवी, लेखक**१९५५: रंजना देशमुख -- मराठी अभिनेत्री (मृत्यू: ३ मार्च २००० )**१९५३: ग्रॅहम गूच -- माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू**१९४८: डॉ. जया द्वादशीवार -- स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासक, संवेदनशील लेखिका, वक्त्या ( मृत्यू: २० मार्च २०१७ )**१९४७: डॉ. गिरीश गांधी -- ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष,पूर्व विधायक**१९४७: डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ**१९४२: प्रा. डॉ. विवेक गोखले -- जेष्ठ विचारवंत,लेखक* *१९३८: हरिहर शाहुदेव ठोसर -- विख्यात भारतीय पुराभिलेखविद व इतिहासकार (मृत्यू: २२ मे २००५ )**१९३७: विजया चिटणीस- मराठी भाषातज्ज्ञ, अध्यापनतज्ज्ञ,लेखिका (मृत्यू: २४ जुलै १९८४ )**१९३३: सुमा चिटणीस -- एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या माजी कुलगुरू तथा लेखिका**१९३२: यशवंत कृष्णाजी रांजणकर-- मराठीतील पत्रकार,कादंबरीकार,नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक (मृत्यू: १५ जून २०२० )**१९२७: धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका(मृत्यू: १ जून, २०१४ )**१९०६: चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१ )**१९०३: चिंतामण यशवंत मराठे -- कथालेखक नाटककार (मृत्यू: ४ जुलै १९७९ )**१८८८: पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी -- ज्ञानेश्वर वाड:मयाचे भाष्यकार, लेखक, अनुवादक (मृत्यू: १३ जानेवारी १९५७ )**१८८६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६ )**१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२ )**१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्‌दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० )*🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१६: सईद हैदर "एस. एच." रझा -- भारतीय चित्रकार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२ )**२०१२: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४ )**२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२ )**१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त एक रचना*... लोकमान्य टिळक ...*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, खा. वर्षा गायकवाड यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात शिक्षण विभागाची मोठी कारवाई, 29 बोगस शाळा केल्या बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना पोलिसांनी केली अटक; दुबई विमानतळावरच घेतले ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा धुमधडाका:​जनजीवन विस्कळीत, कोयना धरणाच्या पाणी पातळीत 7 टीएमसीने वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचे 7 खेळाडू करणार श्रीलंकेत पदार्पण, भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 27 जुलैपासून सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. ---- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) झाडाची वय हे झाडाच्या तनावर असलेल्या रिंगाच्या संख्येच्या आधारावर काढले जाते या पद्धतीला काय म्हणतात ?२) केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत ?३) QR CODE चा full form काय आहे ?४) 'तरुण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'सेमिनरी हिल्स' हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) डेंड्रोक्रोनोलॉजी २) धर्मेंद्र प्रधान ३) Quick response Code ४) जवान, युवक ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उदयकुमार शिल्लारे, तंत्रस्नेही शिक्षाक, धर्माबाद👤 अलका कुलकर्णी, साहित्यिक👤 जितेंद्र पाटील मनूरकर, धर्माबाद👤 आनंदराव पाटील, तेलंगणा ओबीसी व्हॉईस प्रेसिडेंट, म्हैसा👤 विकास पाटील👤 शंकर बोईनवाड, येवती👤 लक्ष्मण मलगिरे👤 वैभव पाटील👤 प्रदीप दळवी👤 संतोष सुवर्णकार, धानोरा खु. धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कहना था सो कह चला अब कछु कहा न जाय।एक आया दूजा गया दरिया लहर समाय ॥ 22 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हत्तीसारखा बलाढ्य प्राणी जेव्हा, रस्त्यानी शांतपणे जात असतो तरी त्याच्यावर कुत्रे भुंकत असतात. तरीही हत्ती चालणे बंद करत नाही आणि कोणाकडे लक्षही देत नाही. भलेही तो शरीराने बलाढ्य असेल तरी त्यापेक्षा त्याच्यात खूप मोठे गुण आहे म्हणून तो, त्या गुणांची कदर करुन आपल्या मार्गाने जात असतो. आपण सुद्धा त्या बलाढ्य असलेल्या हत्ती प्राण्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment