✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/qBfvPj2V9rSFjXVw/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९३: ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९२: ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर**१९८०: सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.**१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.**१९५२: फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई**१९३५: जगात ’पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: कॉन्जेनिगे दिलहारा फर्नडो -- श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९७२: अजय आर्थर देसाई -- कवी* *१९६३: विजया भालचंद्र गोरे -- कवयित्री तथा निवृत्त न्यायाधीश**१९६३: सुशांत रे -- हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील अभिनेता (मृत्यू: ८ मार्च २००४ )**१९६१: हर्षा भोगले -- भारतीय क्रिकेट समालोचक आणि पत्रकार* *१९६१: स्मिता सतीश दोशी -- कवयित्री, लेखिका**१९६०: देविदास भावराव फुलारी -- प्रसिद्ध कवी , लेखक* *१९५९: शुभांगी कुलकर्णी -- भारतीय माजी क्रिकेटपटू* *१९५५: रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू**१९५४: विष्णू श्रावण भेंडारकर -- कवी, लेखक* *१९५४: स्नेहलता विलास जोशी -- लेखिका**१९४६: इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू**१९३८: डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणा संदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.**१९३५: प्रा. सु. ग. शेवडे --भारताचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते,प्रवचनकार**१९३५: रमेश मुधोळकर -- बालसाहित्यकार व चित्रकार (मृत्यू: १३ मार्च २०१६ )* *१९३१: प्रेमानंद वासुदेव मडकईकर -- लेखक* *१९३१: मधुकर सुदामा पाटील. -- समीक्षक**१९३०: प्रा.रुपराव पांडुरंग पाजणकर-- समीक्षक, संपादक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९९१ )* *१९२८: अन्वर फर्रुखाबादी -- कव्वालीचे गीतकार(मृत्यू: २९ जून २०११)**१९०८: गोपाळ कृष्ण विनायक चिरमुले-- लेखक* *१९०२: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४ )**१८९६: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (मृत्यू: ६ जानेवारी १९८१ )**१८२७: मंगल पांडे – क्रांतिकारक (मृत्यू: ८ एप्रिल १८५७ )*🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: रजत मुखर्जी--भारतीयचित्रपट दिग्दर्शक**२०१८: गोपालदास नीरज -- गीतकार, कवी व हिंदी लेखक (जन्म : ४ जानेवारी १९२५ )**२०१७: उमा भेंडे -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९४५)**१९९३: गिरीलाल जैन -- भारतीय पत्रकार(जन्म : १९२४ )**१९६८: प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८ )**१९६५: सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ मार्च १८७५ )**१८८२: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१ )**१३०९: संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सेमी इंग्रजीची समस्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कलाकाराचे सांगितीक क्षेत्रातील योगदान हे चिरकाल टिकते - संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी 1958 अर्ज, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती, तरुणांना रोजगार सक्षम बनवण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक, राज्यातील शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याच्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा - पर्यटनमंत्री गिरीश महाजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने दिला रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिवसेना ठाकरे गटाला आता देणगी घेता येणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड, सुर्यकुमार यादव T20 संघाचा कर्णधार, संघामध्ये मराठमोळ्या श्रेयस अय्यरचं कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घोळाणा फुटल्यास काय करावे ?* 📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तस्त्रावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या सोबती असलेला अंतराळवीर कोण ?२) उडीसातील १२ व्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे, भांडाराचे दरवाजे किती वर्षानंतर उघडण्यात आले ?३) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' जाहीर केली आहे ?४) 'डोळे' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) केंद्र सरकारने कोणता दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे ? *उत्तरे :-* १) बझ ऑल्ड्रिन २) ४६ वर्षे ३) महाराष्ट्र ४) चक्षू, अक्ष, नयन, नेत्र, लोचन ५) २५ जून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गजानन शिराळे👤 श्रीनिवास मुरके, नांदेड👤 माधव रेड्डी👤 मनोज बडे, स्वयं उद्योगी, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु को कीजे बंदगी कोटि-कोटि प्रणाम ।किट ना जाने भृंग को वह ( गुरु ) कर लीजिए आप सामान ॥ 14॥अर्थ – गुरु को बंदगी कीजिये करोड़ो बार प्रणाम कीजिये , क्यूंकि गुरू ही ऐसे दानी दाता  है जो शब्द रूपी ज्ञान से अपने शिष्य को अपने जैसे बना लेते है , उसी प्रकार जैसे एक कीट को भृंगी अपने शब्द से अपने जैसा बना देता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणुसकी मध्ये खरी श्रेष्ठता असेल म्हणूनच होऊन गेलेल्या थोर महाविभूंतीनी. माणुसकीचे महत्व जाणून तिला जास्त महत्व दिले आहे. म्हणून आपणही त्यांच्या विचारांना आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. व माणुसकी धर्माची जाणीव ठेवून तिचे महत्व इतरांना ही सांगावे आजच्या घडिला अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाघा प्रमाणे स्वतःला ओळखा*स्वामी विवेकानंद आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असलेली ही गोष्ट. एकदा एका जंगला मध्ये एक वाघच पिल्लू वाघिणी पासून हरवले आणि मेंढ्यांच्या कळपात जावून मिसळले. हळू हळू ते पिल्लू त्या कळपातच वाढू लागले आणि तिथेच मोठे झाले. ते पिलू मेंढ्या प्रमाणेच गवत खायचे, बे बे करायचे, आणि भीती वाटली कि पळून जायचे. त्याच्या सुदैवाने एक दिवस त्याची दुसऱ्या वाघाशी भेट झाली तेव्हा त्याला कळले की तो एक शक्तिशाली वाघ आहे. आणि सर्व त्याला भितात मग मीच का असा आहे, तेव्हा पासून त्याचे बे बे करणे, गवत खाणे, भीतीने पळून जाणे बंद झाले.*तात्पर्य* - स्वतःला ओळखा, प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड शक्ती आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment