✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/my-students-my-valentine.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *जागतिक 'पेपर बॅग' दिवस (Paper Bag Day)* ⭕ *_ या वर्षातील १९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'टिळक पुरस्कार’ जाहीर**१९९९: ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.**१९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.**१९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८५: पी. एन. भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना**१९७९: किरिबातीला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.**१९६१: मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.**१९३५: ’प्रभात’ चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.**१९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.**१७९९: रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:मलाला युसूफझाई-- पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती* *१९९५: अक्षया नाईक -- मराठी मालिकेतील अभिनेत्री**१९८९: निलेश दिगंबर तुरके -- लेखक**१९७४: परविन दाबास -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक* *१९७२: जयश्री संजय सातोकर -- कवयित्री, लेखिका* *१९६७: मीना घोडके -- लेखिका**१९६५: संजय मांजरेकर – क्रिकेटपटू**१९६२: शत्रुघ्न कुसंबे -- कवी* *१९५९: प्रा. डॉ. शेषराव नत्थुजी जुडे -- लेखक**१९५८: प्रा. आशालता कांबळे-- कवयित्री, लेखिका* *१९५४: सुलक्षणा पंडित--- भारतीय पार्श्वगायिका, अभिनेत्री* *१९५२: शंकर किसन तांबे -- लेखक* *१९५०: विकास सबनीस -- ज्येष्ठ व्यंगचित्रकार (मृत्यू: २८ डिसेंबर २०१९)**१९४८: उपेंद्र दाते -- मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणारे गायक, नट* *१९४७: सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी -- मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री**१९४५: डॉ. अंजली दामोदरराव टाकळीकर -- कवयित्री* *१९३९: धुंडिराज कहाळेकर -- लेखक कवी**१९३०: वसंत राशिनकर -- प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: ७ जानेवारी २०१५ )**१९२२: मनोहर कल्लावार-- लेखक* *१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८ )**१९२०: वसंत गोविंद देशमुख -- लेखक (मृत्यू:१ एप्रिल १९८४ )**१९१३: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)**१९१०: गोविंद रामचंद्र दोडके -- लघु निबंधकार (मृत्यू: १३ जानेवारी १९६३ )**१९०९: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६ )**१८९६: देविदास लक्ष्मण महाजन-- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक (मृत्यू:३ एप्रिल १९६७ )**१८८९: केशव गणेश आठल्ये (केशवबुवा)-- लेखक व प्रवचनकार**१८६४: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६ )**१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३ )**१८५४: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२ )**१८१७: हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२ )*⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ •••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: सुशीलकुमार चढ्ढा तथा हुल्लड मुरादाबादी -- हिंदी हास्यकवी(जन्म:२९ मे १९४२)**२०१३: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२० )**२०१२: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८ )**१९९९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म:२०जुलै १९२९ )**१९९४: वसंत साठे -- हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार (जन्म: १० ऑगस्ट १९१६)**१६६०: बाजी प्रभू देशपांडे (जन्म: १६१५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी हेच माझे दैवत*शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे शिक्षक, फळा, शाळेची इमारत, मैदान आणि किलबिल आवाजात नाचणारी विद्यार्थी. विद्यार्थ्याशिवाय कोणतीच शाळा शोभून दिसत नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी यांचे अतूट असे नाते असते. शाळेत सर्वात पहिल्यांदा कोण येत असेल तर तो म्हणजे विद्यार्थी. काही विद्यार्थी तर शाळेला च आपले घर केलेलं असते त्यामुळे ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत येणार, गडकरीही उपस्थित राहणार; लोकसभा निकालानंतर पहिलाच दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र हा कृषी क्रांतीचा जनक, सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'रिपाइं'ला विधानसभेच्या 12 जागा द्या, क्रिमिलेयर मर्यादा 8 लाखांहून 12 लाख करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांविना भारताचा इतिहास अधुरा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन; विधानसभेत आमदारांना केले मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटपटू सुरेश देवभक्त यांचे निधन, वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; वसईचा पहिला रणजीपटू काळाच्या पडद्याआड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० फॉरमॅटसाठी टीम इंडियाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर; ODI साठी के एल राहुल नवा कर्णधार - बीसीसीआयचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेसर* 📙 लेसर या प्रकाशकिरणांभोवती एक गूढ वलय सामान्य माणसाच्या मनात असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लेसरचा वापर अगदी मर्यादित होता; पण आज मात्र तो अगदी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या वस्तूच्या वेष्टनावरची किंमत, पुस्तकाचा क्रमांक किंवा क्रेडिट कार्डवरची माहिती वाचण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. एवढेच काय, पण बाजारात नवीन आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क स्टिरिओमध्येही लेसरच वापरलेला असतो. डोळे व लेसर यांचे तर अतूट असे समीकरण होण्याइतका डोळ्यांच्या आजारात लेसरचा वापर वाढत आहे. त्यामानाने मेंदूतील कर्करोगात लेसर वापरणे अजून तितकेसे सुलभ झालेले नाही. हा वापर करताना लेसरचा एक महत्त्वाचा गुण वापरला जातो, तो म्हणजे लेसरच्या लहरी ठराविक वेगाने, ठरावीक काळाने एका मागोमाग अत्यंत सुसंघटितपणे वाहत असतात. नेमक्या जागी पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे तितक्या लहान व्यासाचे लेसरचे किरण सोडता येतात व हे किरण अन्य प्रकाशाप्रमाणे पसरत नाहीत. एकाच तरंगलांबीच्या विद्युतचुंबकीय लहरी लेसरमध्ये असतात. त्यामुळे लेसरचा रंगही ज्या उद्गमातून लेसर निर्माण केला जाईल, त्यावर अवलंबून असतो. पण एका वेळी एकच रंग असतो. लेसर हे नाव नसून तो एक शोर्टफॉर्म आहे. लेझर (LASER) म्हणजे 'लाइट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन'.लेसरच्या निर्मितीचे सध्या विविध प्रकार वापरले जातात. काहींमध्ये क्र्वार्ट्झचा वापर केला जातो, तर काहींमध्ये हवाबंद नळीतील इलेक्ट्रोड काही विशिष्ट वायूंमध्ये काम करतात. हेलियम, निऑन, कार्बन डायॉक्साइड यांचा वापर या ट्यूबमध्ये केला जातो. दोन इलेक्ट्रोड्समध्ये उच्चदाबाचा विजेचा प्रवाह खेळवल्यावर लेसर निर्माण करण्यासाठी वापरलेल्या द्रव्यातील अणुंना जी ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यातून प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. दिलेली विद्युतऊर्जा बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशकिरणांची एक साखळी प्रक्रियाच या द्रव्यात सुरू होते. या नळीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोरच्या दोन आरशांतुन हे प्रकाशकिरण पुन्हापुन्हा पर परावर्तित होत असल्याने ही साखळीप्रक्रिया वाढतच जाते. या अारशांपैकी एका आरशाला ठेवलेल्या पाहिजे त्या व्यासाच्या छिद्रातुन लेसर बीम वा झोत नळीच्या बाहेर टाकला जातो. प्रत्येक अणूतून बाहेर पडणारे किरण हे एकाच तरंग लांबीचे असल्याने बाहेर पडणारा झोतही तसाच असतो. प्रकाशाचा झोत सलग जोडायचा की पुंजक्या पुंजक्यात, हे लेसरच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून ठेवता येते. बाहेर पडणाऱ्या सर्व किरणांचा संघटितपणा (coherence) हा लेसरला नेहमीच्या प्रकाशापेक्षा वेगळा ठरवतो. लेसरची वैशिष्टय़े या गुणधर्मातूनच संभवतात.लेसर किरणांचा विनाशक व उपयोगी असा दोन्ही प्रकारे भरपूर वापर केला गेला आहे. अनेक प्रकारची लष्करी अस्त्रे, आयुधे, विमाने लेसरचा वापर करतात, तर अनेक अत्याधुनिक कारखाने अत्यंत काटेकोरपणे कापाकापी वा जोडाजोडीसाठीही लेसरच वापरतात. डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल निखळले असता ते पुन्हा चिकटवण्यासाठी लेसरचा वापर केला जातो. विविध कथा, सिनेमा व विज्ञान गोष्टींत मात्र लेसर काल्पनिक बंदुकीचा मुक्त वापर आढळतो. कसलाही आवाज न करणारी, पण पाहिजे त्याचा बळी घेणारी ही बंदूकच लेसरबद्दलचे गूढवलय सर्वांच्या मनात वाढत जाते.लेसरबद्दल एक विशेष बाब म्हणजे १९१७ साली आइन्स्टाइन यांनी या स्वरूपाचे किरण निर्माण होऊन त्यांचा वापर करता येईल, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी १९६० साल उजाडले. थियोडोर मेमन यांनी पहिला लेसर त्या वर्षी वापरात आणला. त्यानंतरही अनेक वर्षांनंतर म्हणजे १९७५ सालच्या आसपास वैद्यकीय क्षेत्रात प्रगत देशात त्याचा वापर सुरू झाला. भारतात प्रमुख शहरात १९९० सालापासून लेसरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. प्रामुख्याने ते डोळ्यांच्या बाबतीत असतात.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार. --- दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या २८ सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे ?२) जागतिक लिंगभाव विषमता निर्देशांक अहवालानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?३) कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?४) 'टंचाई' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?*उत्तरे :-* १) नीरज चोप्रा २) १२९ वा ३) रोशनी नादर मल्होत्रा ४) कमतरता ५) महाराष्ट्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हरिहर धुतमल, पत्रकार, लोहा👤 शिल्पा जोशी, साहित्यिक, मुंबई👤 प्रवीण दाभाडे पाटील, साहित्यिक, कन्नड👤 अविनाश पांडे👤 नंदकुमार कौठेकर, शिक्षक, बिलोली👤 नागेश पडकुटलावार👤 अभिजित राजपूत👤 दादाराव जाधव👤 साईनाथ पाटील गादगे नागणीकर👤 दिनेश वाढवणकर👤 माधव उमरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात समंदर की मसी करूँ लेखनी सब बनराई।धरती सब कागद करूँ तापर गुरु गुण लिखा न जाय॥9॥अर्थ – सातो  समुन्द्र को स्याही बनाऊ , सारे पेड़ पौधों को कलम बनाऊ , और पूरी पृथ्वी को कागज बनाऊ फिर भी गुरु का गुण गान नहीं लिखा जा सकता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कान भरणे तसेच घास भरवणे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. घास भरविल्याने एखाद्याची भूक मिटत असते सोबतच पुण्य सुद्धा प्राप्त होत असतो. आणि कान भरल्याने एखाद्याचे जीवन उद्धस्त तर होतोच सोबतच त्या केलेल्या कृत्याने विविध विकारचे आजार वाढत असतात. असे ऐकण्यात आले आहे. त्यांच्या विचाराचा मान ठेवून एखाद्याचे भले होईल असेच कार्य करावे जेणेकरून त्याचा फायदा होईल. व केलेल्या कार्यातून आपल्याला समाधान मिळेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *❃ सचोटी ❃*       *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’    *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment