✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oNGVfYuXNUHctWJ9/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील १८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्‍नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५: ’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५: ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२: अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४: आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९५०: इस्रायेलच्या क्‍वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३: किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११: व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रा. डॉ. आनंद अहिरे -- कवी, लेखक* *१९८५: राहुल गोविंद निकम -- कवी , लेखक**१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८: मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८: प्रा. डॉ. कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७७: प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे-- देश-विदेशात लोककला पोहोचवणारे**१९७६: मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३: डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३: गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९७२: सुरेखा शेषराव बोरकर --- लेखिका**१९६६: प्रा. डॉ. बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३: लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२: डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक, संपादक* *१९६०: प्रा. डॉ. प्रभावती वाल्मीकराव विहिरे -- कवयित्री, लेखिका**१९५८: अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७: अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७: पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: डॉ.कैलास शंकरराव कमोद -- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४: जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० )**१९४९: पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६: राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष (मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२० )**१९४३: बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर -- सूचिकार, संपादक (मृत्यू: १३ जानेवारी १९७९ )**१९२९: रोहिणी गवाणकर -- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक , लेखिका* *१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ८ आक्टोबर २०१२ )**१९२०: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६ )**१९१६: के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१० )**१९१२: दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे--- पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू: ६ ऑगस्ट १९८३ )**१८८२: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७ )*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: तुळशी परब-- कवी (जन्म: ३० सप्टेंबर १९४१ )**२००५: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४ )**१९९६: चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म: ९ जून १९०६ )* *१९४५: विष्णुपंत गोविंद दामले -- भारतीय प्रॉडक्शन डिझायनर, सिनेमॅटोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि ध्वनी अभियंता (जन्म: १४ ऑक्टोबर१८८२ )**१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रिया देशांच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जातीय जनगणना झाली तर आरक्षणाचा प्रश्न सुटेल – खासदार अमोल कोल्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यावर घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिव्य दर्शन; सासवड मुक्कामानंतर पालखी पंढरपूरकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायाग, वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह 65 ब्रह्मवृंदांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप, CM शिंदे म्हणाले- निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर ! टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देऊन गौरवण्यात येणार, शिंदे सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅**************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं सुंदर विचारांची असतात, ती अंधारातही चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे ?२) कोणत्या संघाने महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम केला आहे ?३) कोणता देश पशुधन कार्बन उत्सर्जनावर टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?४) 'ज्येष्ठ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतः भोवती कडे असणारा ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) विश्वनाथन आनंद, भारत २) भारत ( ६०३ धावा, द. आफ्रिका विरुध्द ) ३) डेन्मार्क ४) मोठा, वरिष्ठ ५) शनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, आलूर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 डॉ. मनोज तानुरकर, स्वाक्षरी तज्ञ, धर्माबाद👤 मारोती कदम, स्तंभलेखक, नांदेड👤 विजयप्रकाश पाटील गाडीवान👤 नागनाथ भत्ते, मोबाईल टीचर, धर्माबाद👤 चक्रधर ढगे पाटील, बिलोली👤 सुभाष कुलकर्णी👤 गणपत बडूरकर, मा. शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी कदम👤 अनिल गायकांबळे👤 किशन कवडे👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, हिंगोली👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 फारुख शेख👤 नरेश शिलारवार, धर्माबाद👤 गिरीश कहाळेकर, नांदेड👤 अजय चव्हाण👤 रमेश अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 अशोक पाटील👤 राजरेड्डी बोमनवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसा फेको,तमाशा देखो या प्रकारची म्हण समाजात प्रचलीत आहे. कदाचित हे, खरे असावे म्हणूनच आजही अनेकांच्या मुखातून नेहमीच ऐकायला मिळत असते. जीवन जगत असताना आवश्यक ठिकाणी पैशाने व्यवहार सुध्दा करावा लागतो. पण प्रत्येक ठिकाणी किंवा काही मिळविण्यासाठी पैसे देणे, घेणे आवश्यक असते का. .? एकदा हाच प्रश्न आपल्या मनाला विचारून बघावा. अनेकदा याच प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडून योग्य मिळेलच असेही नाही त्यासाठी स्वतः च्या मनाला विचारून बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाहय देखावा आणि सौंदर्य*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.*तात्पर्य*-बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment