✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ *राष्ट्रीय हातमाग उद्योग दिन* ◆ *स्वातंत्र्य दिन - कोट दि आयव्होर* ◆ *मुक्ती दिन - टर्क्स व कैकोस द्वीप* ● १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले. ● १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध. 💥 जन्म :- ●१९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ. ●१९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक. 💥 *मृत्यू* :- ●१९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद, पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर, सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कराडमध्ये जमावबंदी तर साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत करण्यात आले मंजूर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीत झाले निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात, पहिल्याच दिवशी 'शिवस्वराज्य' यात्रेत गटबाजीचं राजकारण असल्याचं चित्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानापाठोपाठ 362 चौरस मीटरचा आणखी एक भूखंड आंदण, महापालिका सुधार समितीचं शिक्कामोर्तब* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीनगर - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली जम्मू-काश्मीरचे राज्यपाल व्ही. पी. मलिक यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच कायम राहणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. काही प्रसारमाध्यमांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची सल्लागार समिती शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हातमाग दिवस* ज्याचे काम त्या॑नी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी ,चांभारानी चपला शिवाव्यात ,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुनब्यानी शेती करावी,  साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे . मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे ......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌎 *पृथ्वीवर एकूण किती पाणी आहे ?* 🌎 ऊर्जेच्या बाबतीत विज्ञान आपल्याला सांगतं की ती कायमस्वरूपी आहे. तिचा नाशही होत नाही की ती निर्माणही केली जाऊ शकत नाही. फक्त तिचं स्वरूप तेवढं बदलत राहतं. जगातल्या पाण्याच्या साठ्याबाबतही तेच म्हणता येईल. तोही कायमस्वरूपी आहे. तो नव्यानं निर्माण केला जाऊ शकत नाही की त्याचा नाशही होत नाही. फक्त त्याचं स्वरूप बदलत राहतं; आणि हे सतत बदलत असतं. त्यामुळे जगात पाण्याचं एक चक्र निर्माण झालेलं आहे. ते या धरतीवर सजीवसृष्टी तगून राहायला मदत करत आहे. हा साठा किती आहे याचा विचार केला तर भोवंडून जायला होतं. धरतीवर भूभागापेक्षा जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. जगात एकूण १२६ कोटी अब्ज लिटर पाणी आहे. म्हणजेच कितीतरी आहे. यातला जवळजवळ ७० टक्के हिस्सा महासागरांमध्ये आहे. ध्रुवप्रदेश तसंच उंचावरच्या हिमनद्यांमध्ये गोठलेल्या स्वरूपातही पुष्कळ पाणी आहे. तरीही आपण नेहमी पाण्याची चणचण आहे, टंचाई आहे, पाणी कपात करावी लागणार आहे, असं का ऐकत असतो ? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, या एकूण पाण्यापैकी केवळ ३ टक्के पाणीच गोडं आहे. म्हणजेच साडेतीन चार कोटी अब्ज पाणी गोडं आहे. तेही पुष्कळ आहे; पण गोडं आहे याचा अर्थ ते सरळंच पिण्यायोग्य आहे असं नाही. कारण आपण हे नदी, तलाव यांच्यामधलं गोडं पाणी सतत प्रदूषित करत असतो, त्यामुळे ते पिण्यायोग्य राहत नाही. निसर्ग हे प्रदूषित पाणी परत शुद्ध करून पिण्यायोग्य कर करतच असतो. त्यालाच आपण जलचक्र म्हणतो. म्हणजे या पाण्याची वाफ होऊन ती आकाशात जाते. ती परत पावसाच्या रूपात शुद्ध पाणी होऊन जमिनीवर येते; पण हे पावसाचं पाणीही आपण व्यवस्थित साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. जे साठवलं जातं तेही निष्काळजीपणे वापरून परत प्रदूषित करत असतो. केवळ निसर्गावर अवलंबून न राहता हे प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करण्याचे खंबीर उपाय आपण करत नाही. ते केल्यास पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा साठा वाढेल. निसर्गानं जेवढं गोडं पाणी उपलब्ध करून दिलं आहे तेवढेही आपण परत पूर्ण केलं तरी आपली पाण्याची गरज नीट भागू शकेल. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Prayer is the voice of faith.* *( प्रार्थना हे श्रद्धेचा आवाज आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गंगा नदीचा उगम कोठे झाला ?* गंगोत्री 2) *महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?* सिंधुदुर्ग 3) *एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?* सुरेंद्र चव्हाण 4) *तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* नंदूरबार 5) *उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?* लखनऊ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास मस्के, साहित्यिक ●  दत्ता डांगे, प्रकाशक ●  मनोज रापतवार ●  रवींद्र चातरमल ●  सिद्धार्थ शिरसे ●  मोहन हडोळे ●  मंगेश पेटेकर ●  सतीश कदम ● तुकडेदास धुमलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने  जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🏻🏻 *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुद्धीला व्यवहाराची जोड हवी* पाणिनि हे संस्कृतचे महान व्याकरणकार. २००० वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्तिविषयी शिकवीत होते. त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले.पण 'व्याघ्र' या शब्दाची व्युत्पत्ति शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. *'व्या जीघ्रति इती व्याघ्रः'* म्हणजे वास घेत चालतो तो वाघ........पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment