✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/195w54qqWj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 इतिहासातील घटना:• १८१५ – वॉटरलूची लढाई झाली. नेपोलियन बोनापार्टचा पराभव झाला व युरोपातील त्याचे वर्चस्व संपुष्टात आले.• १९४० – दुसरे महायुद्ध: ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी "We shall fight on the beaches..." ही प्रसिद्ध भाषणमालिका सुरू केली.• १९४६ – डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ‘गोवा मुक्ती आंदोलनाची’ सुरुवात केली.• १९७२ – ब्रिटिश योजनेनुसार बांगलादेश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनू शकला नाही.🎂 जन्मदिवस / जन्म:• १९४२ – पॉल मॅकार्टनी, प्रसिद्ध इंग्लिश गायक, बीटल्स बँडचे सदस्य.• १९५३ – जॉर्ज गॅल्वे, ब्रिटिश राजकारणी.• १९७६ – ब्लेक शेल्टन, अमेरिकन काउण्ट्री गायक.⚰️ मृत्यू:• १९२८ – रूपलाल बिस्वास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९९९ – डेसमंड ल्लुएलिन, ब्रिटिश अभिनेते (James Bond मालिकेतील Q).🗓️ विशेष दिवस :• सेशेल्स – संविधान दिवस• ऑटिस्टिक प्राईड डे (Autistic Pride Day) – ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या आत्मगौरवाचा आणि विविधतेचा सन्मान करण्याचा दिवस.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांना शाळा प्रवेश देण्यापूर्वी ......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीत घडणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे दर्शन, अत्याधुनिक संग्रहलायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प G-7 परिषद अर्ध्यावर सोडली, इस्त्रायल-इराण संघर्षामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरजवळच्या 18 गावांची महाराष्ट्रात चर्चा! एका निर्णयामुळे राज्य सरकार टेन्शनमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यस्तरीय जाहिरात एजन्सी फेडरेशन कार्यकारिणीची बिनविरोध निवड:अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार, सदस्यपदी नगरचे राजेंद्र म्याना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सून MP-गुजरातेत दाखल, 19 राज्यांत पावसाचा इशारा:UP आणि बिहारसह 4 राज्यांत वीज कोसळून 19 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये पोहोचले, खलिस्तान समर्थकांनी आक्षेपार्ह फोटो दाखवले, घोषणाबाजी केली; भारतीय समर्थक रस्त्यावर उतरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड महिला संघाच्या अनुभवी कर्णधार सोफी डिवाइनने आयसीसी 2025 महिला वनडे वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर हरणे, साहित्यिक व शिक्षक, वसमत 👤 अनंत राजेश्वर उत्तरवार, शिक्षक, माहूर 👤 केदार पाटील ढगे, बिलोली👤 मेहताब शेख 👤 भीमराव रुद्रावाड 👤 गजानन सुरकार👤 जयदीप वाघमारे 👤 व्यंकटराव वारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*असे काय आहे ? ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलनकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तके शस्त्रांचे काम करतात. - सिसरो*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून 'इंग्रजी' हा एक पाठ्यविषय म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) कावीळ ( पिलिया ) हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?४) 'नदीची सुरुवात होते ती जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ? *उत्तरे :-* १) जून २००० २) साइप्रस ३) यकृत ( लिव्हर ) ४) उगम ५) सोनार तंत्रज्ञान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल.पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते.पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धरीला पंढरीचा चोर*धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ४ ||जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही.अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण,खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते.ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"पवित्र जल"कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्ला मसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment