✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1f5m3XXEuj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१६ जून हा वर्षातील १६७ वा दिवस आहे🚩 महत्त्वाच्या घटना - २०१३: उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. या आपत्तीत किमान ६,००० लोकांचा मृत्यू झाला. ही २००४ च्या सुनामीनंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते.१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर लोकमान्य टिळक यांची सुटका झाली.१९०३: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना झाली.१९६३: व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेनं अंतराळात जाणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवला.२०१०: भूतानने तंबाखूवर संपूर्ण बंदी घातली.🚩 जन्म :- १९५०: मिथुन चक्रवर्ती – प्रसिद्ध भारतीय अभिनेते.१९६८: अरविंद केजरीवाल – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक.१९९४: आर्या आंबेकर – गायिका.१९२०: हेमंत कुमार – गायक, संगीतकार व निर्माते.१९३६: अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी.🚩 मृत्यू :-२०१५: चार्ल्स कोरिया – प्रसिद्ध भारतीय आर्किटेक्ट२०२०: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी१९२५: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील कायदे पंडितसंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेच्या व्यथा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इंद्रायणी दुर्घटना - मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एअर इंडियाचा मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात ! अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला देणार प्रत्येकी 25 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए अखेर जुळले; राजकोटमध्ये होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 48 तास महत्त्वाचे; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान; कोकण, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - तेलंगणा सीमेलगत बासर येथे श्री सरस्वती देवस्थान आहे. या ठिकाणी दर्शनाला गेलेल्या 5 भाविकांचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *NEET-UG चा निकाल जाहीर, राजस्थाचा महेश कुमार पहिला तर महाराष्ट्राचा कृष्णाग जोशी तिसरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने हरवून जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पापनवार, मा. शिक्षक, नांदेड 👤 डॉ. मंगेशकुमार आंबीलवादे, छत्रपती संभाजीनगर 👤 अनिल हिस्सल, शिक्षक, जळगाव 👤 गोविंद नलावाड, शिक्षक, देगलूर 👤 विजयकुमार भोले 👤 कार्तिक स्वामी 👤 ज्योती पाटील 👤 गजानन गडपवार 👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे 👤 ज्ञानेश्वर चिखले 👤 दत्तारेड्डी सुरुकुटवार, आरोग्य विभाग, धर्माबाद 👤 माधव गैनवार, धर्माबाद 👤 अशोक चेपटे👤 ऋषिकेश भंडारे येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*अशी कोणती जागा आहे ?**जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही* *जंगल आहे पण झाडी नाही*आणि *शहर आहे पण पाणी नाही*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणाऱ्यास ईश्वर योग्य फळ देतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब कोणत्या संघाने पटकावला ?२) आंबट फळातून कोणता व्हिटॅमिन मिळतो ?३) सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करताना मुख्य घटक कोणते ?४) 'दुसऱ्यावर उपकार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'आंबेडकर ए लाइफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) दक्षिण आफ्रिका २) व्हिटॅमिन 'सी' ३) पेशी संरचना, जीवनपद्धती, उत्पादकता ४) परोपकारी ५) शशी थरूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 गुडमार (बेडकीचा पाला) खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही ? (गुडमार ही एक वनस्पती आहे) 📕साखर किंवा पेढा खाऊन नंतर चहा पिऊन पहा. काय म्हणता हा प्रयोग तुम्ही केला आहे ? असे असेल तर नक्कीच तुम्ही तो परत करणार नाही! कारण चहा अगोड लागतो. दुसरी एक गंमत सांगते... काही खेड्यांमध्ये एक प्रथा आढळते. साप चावलेल्या माणसाला मिरची किंवा कडूनिंबाचा पाला खायला देतात. त्या माणसाने जर मिरचीची चव तिखट वा कडूनिंबाची कडू सांगितली, तर तो बरा होणार असे मानतात व जर चव नाही असे तो म्हणाला, तर तो मरणार असे मानतात. ह्याबद्दल आता माहिती घेऊ.जिभेमुळे आपल्याला चव कळते. चव कळण्यासाठी जिभेवर स्वादांकूर असतात. या स्वादांकुरावर एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात जरी ठेवला तरी आपल्याला चव कळते. जिभेच्या कडांना पाठीमागच्या बाजूस व शेंडयाला कडू, तुरट, आंबट, गोड, खारट अशा चवी वेगवेगळ्या प्रमाणात समजतात. स्वादांकुराचे कार्य व्यवस्थित चालले तरच चव समजते.गुडमार ही एक वनस्पती आहे. तिचा पाला खाल्ल्यानंतर मोड चव कळणाऱ्या वादांकुरावर परिणाम होतोच हे स्वादांकूर त्यांचे कार्य करू शकत नाहीत. साहजिकच गुडमार खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाही. विषारी सापाच्या विषाचा स्वादांकुरांतून चवीची संवेदना मेंदूपर्यंत वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम झाल्याने काही विशिष्ट प्रकारचे साप चावल्यास तिखट, कडू चव कळत नाही. म्हणजे वर सांगितलेल्या खेड्यातील प्रथेत हे वैज्ञानिक तथ्य आहे. पण चव कळत नाही म्हणजे माणूस मरणार, असे मानणे योग्य नाही. सापाच्या विषावरील प्रतिद्रव्य दिल्यास व इतर उपचार मिळाल्यास साप चावलेली व्यक्ती वाचू शकते.काही वेळा स्वादांकुरांचे कार्य काही प्रमाणात कमी होते किंवा आपण खाल्लेल्या पदार्थामुळे त्यांच्या जाणिवाबोथट होतात. याचे उदाहरण म्हणजे तिखटाचा दुसरा घास पहिल्या घासापेक्षा कमी तिखट लागतो व साखर खाऊन चहा पिल्यास चहा अगोड लागतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव माझा विठू सावळामाळ त्याची माझिया गळा….. || धृ ||विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ ||साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…. || २ ||भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतोरांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसेंदिवस माणसाचे वय वाढत जाते. तसतसे त्याच्यात बदल आलेला दिसून येतो. पण, वाढत्या वयाबरोबरच किंवा परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ज्यांचे सकारात्मक विचार बदलत नाही हीच खऱ्या अर्थाने त्याच्यांकडे असलेली संपत्ती असते. अशा संपत्तीचा कधीही अंत होत नाही. म्हणून आपल्यासोबत कोणी कसेही वागले तरी चालेल पण,आपण मात्र आपल्यात असलेल्या मौल्यवान संपत्तीला कायमस्वरूपी जपावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कार एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे . तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल . तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे . तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले " हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली . नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला " तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. " तो चपाती घेऊन गेला . तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला " आई , मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे. हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.🙏 *तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेले चांगलं कर्म तुमच्याकडे परत येत.*🙏🌹 तात्पर्य :- *चांगल्या कर्माचा परतावा नेहमी चांगलाच मिळतो* 🙏•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment