✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/195w54qqWj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 इतिहासातील घटना:• १८१५ – वॉटरलूची लढाई झाली. नेपोलियन बोनापार्टचा पराभव झाला व युरोपातील त्याचे वर्चस्व संपुष्टात आले.• १९४० – दुसरे महायुद्ध: ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी "We shall fight on the beaches..." ही प्रसिद्ध भाषणमालिका सुरू केली.• १९४६ – डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ‘गोवा मुक्ती आंदोलनाची’ सुरुवात केली.• १९७२ – ब्रिटिश योजनेनुसार बांगलादेश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनू शकला नाही.🎂 जन्मदिवस / जन्म:• १९४२ – पॉल मॅकार्टनी, प्रसिद्ध इंग्लिश गायक, बीटल्स बँडचे सदस्य.• १९५३ – जॉर्ज गॅल्वे, ब्रिटिश राजकारणी.• १९७६ – ब्लेक शेल्टन, अमेरिकन काउण्ट्री गायक.⚰️ मृत्यू:• १९२८ – रूपलाल बिस्वास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९९९ – डेसमंड ल्लुएलिन, ब्रिटिश अभिनेते (James Bond मालिकेतील Q).🗓️ विशेष दिवस :• सेशेल्स – संविधान दिवस• ऑटिस्टिक प्राईड डे (Autistic Pride Day) – ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या आत्मगौरवाचा आणि विविधतेचा सन्मान करण्याचा दिवस.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांना शाळा प्रवेश देण्यापूर्वी ......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीत घडणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे दर्शन, अत्याधुनिक संग्रहलायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प G-7 परिषद अर्ध्यावर सोडली, इस्त्रायल-इराण संघर्षामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरजवळच्या 18 गावांची महाराष्ट्रात चर्चा! एका निर्णयामुळे राज्य सरकार टेन्शनमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यस्तरीय जाहिरात एजन्सी फेडरेशन कार्यकारिणीची बिनविरोध निवड:अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार, सदस्यपदी नगरचे राजेंद्र म्याना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सून MP-गुजरातेत दाखल, 19 राज्यांत पावसाचा इशारा:UP आणि बिहारसह 4 राज्यांत वीज कोसळून 19 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये पोहोचले, खलिस्तान समर्थकांनी आक्षेपार्ह फोटो दाखवले, घोषणाबाजी केली; भारतीय समर्थक रस्त्यावर उतरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड महिला संघाच्या अनुभवी कर्णधार सोफी डिवाइनने आयसीसी 2025 महिला वनडे वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर हरणे, साहित्यिक व शिक्षक, वसमत 👤 अनंत राजेश्वर उत्तरवार, शिक्षक, माहूर 👤 केदार पाटील ढगे, बिलोली👤 मेहताब शेख 👤 भीमराव रुद्रावाड 👤 गजानन सुरकार👤 जयदीप वाघमारे 👤 व्यंकटराव वारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*असे काय आहे ? ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलनकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तके शस्त्रांचे काम करतात. - सिसरो*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून 'इंग्रजी' हा एक पाठ्यविषय म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) कावीळ ( पिलिया ) हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?४) 'नदीची सुरुवात होते ती जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ? *उत्तरे :-* १) जून २००० २) साइप्रस ३) यकृत ( लिव्हर ) ४) उगम ५) सोनार तंत्रज्ञान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल.पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते.पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धरीला पंढरीचा चोर*धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ४ ||जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही.अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण,खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते.ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"पवित्र जल"कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्ला मसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जून 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bq8ydyuvM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्त्वाच्या घटना:1631 – मुमताज महलचा मृत्यू झाला. तिच्या स्मरणार्थ बादशहा शाहजहानने ताजमहाल बांधले.1885 – 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' अमेरिकेला भेट देण्यासाठी फ्रान्समधून रवाना करण्यात आली.1944 – आइसलँड देशाने डेनमार्कपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.1972 – वॉटरगेट प्रकरणाची सुरुवात: अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात चोरी🎂 जन्मदिवस / जयंती:1867 – बार्बरा मॅकक्लिंटॉक, अमेरिकन जेनेटिसिस्ट व नोबेल पुरस्कार विजेती.1898 – मो. दा. हातकणंगलेकर, मराठी साहित्यिक, चरित्रकार.1936 – के. नारायणन कुरूप, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त.1943 – निवृत्ती इंदुरीकर, मराठी कीर्तनकार व प्रवचनकार.1980 – वीनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू🕯️ मृत्यू:1631 – मुमताज महल, मुघल सम्राज्ञी.1996 – राजेश खन्ना यांची चित्रपट "आनंद" मधील सहकलाकार उत्पल दत्त यांचे निधन.📜 इतर माहिती:हा दिवस आइसलँडचा प्रजासत्ताक दिवस (National Day of Iceland) म्हणून साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेला चाललो आम्ही*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गडचिरोली - आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लातूरमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका घोड्याला दयामरण; प्रशासन सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य बँकेचे सी-सॉक सेंटर देशात अव्वल, नाबार्ड कडून गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विद्यार्थ्यांनी शॉर्टकट न वापरता मेहनतीने जीवन यशस्वी करावे:महात्मा फुले महाविद्यालयात आ. यावलकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय खेळाडू जखमी, BCCI कडून बदली खेळाडूची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आकाश रेड्डी येताळकर, युवा नेते, धर्माबाद👤 धनंजय गुडसुरकर, साहित्यिक, लातूर 👤 गजानन पाटील👤 गणेश गुंडेवार👤 आप्पा यलकटवार👤 दिग्विजय चव्हाण पाटील👤 लालूभाई शंकरोड, धर्माबाद 👤 गणपत कल्हाळे👤 भास्कर भेदेकर चिटमोगरेकर👤 साईबाबा बनसोडे, आरोग्य विभाग, नांदेड 👤 प्रवीण जावळे👤 अक्तर शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 02*असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो ?**सांगा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नकाशा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही करण्याची प्रेरणा होते, तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हवाई सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?२) मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?३) पाकिस्तानपासून बांगलादेशाची निर्मिती कोणत्या भारतीय प्रधानमंत्र्यानी केली ?४) 'धान्य साठवण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कवकांच्या पोषण पद्धतीला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) ४८ वा २) ५२ दात ३) इंदिरा गांधी ४) कोठार ५) मृतोपजीवी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 कच्चे मांस खाल्ल्यास काय होते ?📕आदिमानव शिकार करायचा. सुरुवातीच्या काळात तो कच्चे मांस खायचा. आजही जगात काही भागात अत्यंत मागासलेल्या अशा आदिवासी जमातीमध्ये कच्चे मांस खाण्याची प्रथा आढळून येते. जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार मानव चवीचवीने, विविध प्रकारे शिजवून/भाजून मांस खाऊ लागला. आज तर मांसाचे पदार्थ बहुतांश सर्वच हॉटेलांमध्ये उपलब्ध असतात व खवैय्ये या पदार्थावर हात मारताना दिसतात.कच्चे मांस खाल्ल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे शिजवणे-भाजणे यामुळे अन्न पचायला सोपे होते. मसाल्यांच्या वापरामुळे ते चविष्ट बनते. अर्थात याहून महत्त्वाचे म्हणजे कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला टेपवर्म किंवा टेपकृमींचा संसर्ग होऊ शकतो. टिनिया सोलीयम टिनीया सजायनाटा, ट्रिचिनॅलीस स्पायरॅलीस आणि फॅस्की ओला हेपॅटीका अशी या टेपकृमींची नावे आहेत. याखेरीज कच्चे मांस खाल्ल्याने अँथ्रक्स, अॅक्टीनोमायकोसीस (एक बुरशीजन्य रोग), प्राण्यांचा क्षयरोग तसेच अन्नविषबाधा इ. रोगही आपल्याला होऊ शकतात.आजकाल मुद्दाम तर कच्चे मांस कोणी खाणार नाही. पण हॉटेलमध्ये किंवा खूप लोक एकत्र जेवत असतील तशा ठिकाणी (खानावळ, लग्नाच्या मेजवान्या वगैरे) घाईगर्दीने मांस शिजवले जाण्याची शक्यता असते किंवा मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्यासाठी रोगट जनावरांचे मांस वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मांस खाणाऱ्यांनी त्यांना अशा प्रकारे त्रास होणार नाही याची खात्री करणे आवश्यक ठरते. सर्वात चांगला उपाय म्हणजे एकतर घरीच मांसाहार करणे आणि अनोळखी किंवा खात्री नसेल त्या ठिकाणी मांसाहार टाळणे. अन्यथा आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• माणूस जसा रंग आणि रूपाने वेगळा दिसतो. तसेच त्याचे विचार, राहणीमान , बोलीभाषा , खाद्यपदार्थ हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून एखाद्याच्या रूपाकडे बघून किंवा त्याच्या बोलीभाषेकडे बघून त्याला नाव ठेवू नये. कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. रंग, रूप, राहणीमान जरी वेगळे असतील तरी शेवटी तो एक मानव आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_दुसरी बाजू_*ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत पहाटे समुद्र किनारी फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक व्यक्ती महिलेच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे आणि जवळच एक मदिराची बाटलीसुद्धा ठेवलेली होती. संतांना वाटले की, हे किती पापी मनूष्य आहेत. सकाळीच मदिरा सेवन करून अशा अवस्थेत पडलेले आहेत. यांना एवढेसुद्धा भान नाही की एका सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागावे. विचार करून संत पुढे निघाले. थोड पुढे गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती समुद्रात बुडत असल्याचे दिसले. संतांना त्याची मदत करायची होती पण त्यांना पोहता येत नव्हते. म्हणून हताश होऊन ते किनाऱ्यावरच उभे राहिले. तितक्यात महिलेच्या मांडिवर डोके ठेऊन झोपलेला व्यक्ती उठला आणि समुद्रात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.यावर संत विचारात पडले की आता या व्यक्तीला काय बोलू. याने तर एका माणसाचे प्राण वाचवून खूप मोठे पूण्य केले आहे. संत लगेच त्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याला विचारले की आपण कोण आहात आणि येथे काय करताय?यावर त्या व्यक्तीने सांगितले की, गुरूजी मी एक मच्छीमार आहे. बऱ्याच दिवसांपासून समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलो होतो, आज सकाळीच किनाऱ्यावर परत आलो आहे. महिलेकडे बघून तो म्हणाला की ती माझी *आई* आहे आणि मला घरी नेण्यासाठी आली आहे. घरात भांडी नसल्यामुळे तीने मदिराच्या बाटलीत पानी भरून आणले. लांबच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो म्हणून किनाऱ्यावर *आई* च्या मांडीवर डोके ठेवून झोपलो होतो.हे ऐकून संताच्या डोळ्यात पाणी आले, त्यांना वाटले मी अत्यंत वाईट विचार करत होतो. समोर पाहिले ते सत्य मानून त्यांच्याविषयी वाईट विचार करत होतो. पण वास्तविकता मात्र वेगळीच आहे.*तात्पर्य*कोणतीही गोष्ट आपण बघत असतो ती दिसते तशी नसते, त्याची एक दूसरी बाजू असते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत आपले मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार करावा. *सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत जायला पाहिजे.* नाहीतर आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते....•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1f5m3XXEuj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१६ जून हा वर्षातील १६७ वा दिवस आहे🚩 महत्त्वाच्या घटना - २०१३: उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. या आपत्तीत किमान ६,००० लोकांचा मृत्यू झाला. ही २००४ च्या सुनामीनंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते.१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर लोकमान्य टिळक यांची सुटका झाली.१९०३: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना झाली.१९६३: व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेनं अंतराळात जाणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवला.२०१०: भूतानने तंबाखूवर संपूर्ण बंदी घातली.🚩 जन्म :- १९५०: मिथुन चक्रवर्ती – प्रसिद्ध भारतीय अभिनेते.१९६८: अरविंद केजरीवाल – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक.१९९४: आर्या आंबेकर – गायिका.१९२०: हेमंत कुमार – गायक, संगीतकार व निर्माते.१९३६: अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी.🚩 मृत्यू :-२०१५: चार्ल्स कोरिया – प्रसिद्ध भारतीय आर्किटेक्ट२०२०: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी१९२५: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील कायदे पंडितसंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेच्या व्यथा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इंद्रायणी दुर्घटना - मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एअर इंडियाचा मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात ! अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला देणार प्रत्येकी 25 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए अखेर जुळले; राजकोटमध्ये होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 48 तास महत्त्वाचे; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान; कोकण, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - तेलंगणा सीमेलगत बासर येथे श्री सरस्वती देवस्थान आहे. या ठिकाणी दर्शनाला गेलेल्या 5 भाविकांचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *NEET-UG चा निकाल जाहीर, राजस्थाचा महेश कुमार पहिला तर महाराष्ट्राचा कृष्णाग जोशी तिसरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने हरवून जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पापनवार, मा. शिक्षक, नांदेड 👤 डॉ. मंगेशकुमार आंबीलवादे, छत्रपती संभाजीनगर 👤 अनिल हिस्सल, शिक्षक, जळगाव 👤 गोविंद नलावाड, शिक्षक, देगलूर 👤 विजयकुमार भोले 👤 कार्तिक स्वामी 👤 ज्योती पाटील 👤 गजानन गडपवार 👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे 👤 ज्ञानेश्वर चिखले 👤 दत्तारेड्डी सुरुकुटवार, आरोग्य विभाग, धर्माबाद 👤 माधव गैनवार, धर्माबाद 👤 अशोक चेपटे👤 ऋषिकेश भंडारे येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*अशी कोणती जागा आहे ?**जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही* *जंगल आहे पण झाडी नाही*आणि *शहर आहे पण पाणी नाही*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणाऱ्यास ईश्वर योग्य फळ देतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब कोणत्या संघाने पटकावला ?२) आंबट फळातून कोणता व्हिटॅमिन मिळतो ?३) सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करताना मुख्य घटक कोणते ?४) 'दुसऱ्यावर उपकार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'आंबेडकर ए लाइफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) दक्षिण आफ्रिका २) व्हिटॅमिन 'सी' ३) पेशी संरचना, जीवनपद्धती, उत्पादकता ४) परोपकारी ५) शशी थरूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 गुडमार (बेडकीचा पाला) खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही ? (गुडमार ही एक वनस्पती आहे) 📕साखर किंवा पेढा खाऊन नंतर चहा पिऊन पहा. काय म्हणता हा प्रयोग तुम्ही केला आहे ? असे असेल तर नक्कीच तुम्ही तो परत करणार नाही! कारण चहा अगोड लागतो. दुसरी एक गंमत सांगते... काही खेड्यांमध्ये एक प्रथा आढळते. साप चावलेल्या माणसाला मिरची किंवा कडूनिंबाचा पाला खायला देतात. त्या माणसाने जर मिरचीची चव तिखट वा कडूनिंबाची कडू सांगितली, तर तो बरा होणार असे मानतात व जर चव नाही असे तो म्हणाला, तर तो मरणार असे मानतात. ह्याबद्दल आता माहिती घेऊ.जिभेमुळे आपल्याला चव कळते. चव कळण्यासाठी जिभेवर स्वादांकूर असतात. या स्वादांकुरावर एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात जरी ठेवला तरी आपल्याला चव कळते. जिभेच्या कडांना पाठीमागच्या बाजूस व शेंडयाला कडू, तुरट, आंबट, गोड, खारट अशा चवी वेगवेगळ्या प्रमाणात समजतात. स्वादांकुराचे कार्य व्यवस्थित चालले तरच चव समजते.गुडमार ही एक वनस्पती आहे. तिचा पाला खाल्ल्यानंतर मोड चव कळणाऱ्या वादांकुरावर परिणाम होतोच हे स्वादांकूर त्यांचे कार्य करू शकत नाहीत. साहजिकच गुडमार खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाही. विषारी सापाच्या विषाचा स्वादांकुरांतून चवीची संवेदना मेंदूपर्यंत वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम झाल्याने काही विशिष्ट प्रकारचे साप चावल्यास तिखट, कडू चव कळत नाही. म्हणजे वर सांगितलेल्या खेड्यातील प्रथेत हे वैज्ञानिक तथ्य आहे. पण चव कळत नाही म्हणजे माणूस मरणार, असे मानणे योग्य नाही. सापाच्या विषावरील प्रतिद्रव्य दिल्यास व इतर उपचार मिळाल्यास साप चावलेली व्यक्ती वाचू शकते.काही वेळा स्वादांकुरांचे कार्य काही प्रमाणात कमी होते किंवा आपण खाल्लेल्या पदार्थामुळे त्यांच्या जाणिवाबोथट होतात. याचे उदाहरण म्हणजे तिखटाचा दुसरा घास पहिल्या घासापेक्षा कमी तिखट लागतो व साखर खाऊन चहा पिल्यास चहा अगोड लागतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव माझा विठू सावळामाळ त्याची माझिया गळा….. || धृ ||विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ ||साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…. || २ ||भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतोरांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसेंदिवस माणसाचे वय वाढत जाते. तसतसे त्याच्यात बदल आलेला दिसून येतो. पण, वाढत्या वयाबरोबरच किंवा परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ज्यांचे सकारात्मक विचार बदलत नाही हीच खऱ्या अर्थाने त्याच्यांकडे असलेली संपत्ती असते. अशा संपत्तीचा कधीही अंत होत नाही. म्हणून आपल्यासोबत कोणी कसेही वागले तरी चालेल पण,आपण मात्र आपल्यात असलेल्या मौल्यवान संपत्तीला कायमस्वरूपी जपावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कार एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे . तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल . तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे . तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले " हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली . नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला " तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. " तो चपाती घेऊन गेला . तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला " आई , मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे. हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.🙏 *तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेले चांगलं कर्म तुमच्याकडे परत येत.*🙏🌹 तात्पर्य :- *चांगल्या कर्माचा परतावा नेहमी चांगलाच मिळतो* 🙏•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)