✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Q771Lzsni1kyuKUB/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💢 *_आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••••💢 *_ या वर्षातील २२६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.**१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन ’कौमी तराना’ हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.**१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.**१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.* 💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: नेहा खान -- भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री**१९९५: प्रभाकर देविदास दुर्गे -- लेखक**१९९०: अमृता कदम नारायणकर -- लेखिका, कवयित्री* *१९८८: माधव श्रीकांत किल्लेदार -- लेखक**१९७६: मनोहर विश्वनाथ इनामदार --- कवी, लेखक**१९६३: अनिता राज खुराना-- भारतीय अभिनेत्री**१९६३: श्रीदेवी -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०१८ )**१९६१: डॉ.अलका संजय इंदापवार -- लेखिका* *१९६१: प्रा. नंदकुमार कुलथे -- प्रसिद्ध लेखक**१९६१: महेश आनंद -- भारतीय अभिनेता, नर्तक आणि मार्शल आर्टिस्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध (मृत्यू: ९ फेब्रुवारी २०१९ )**१९५६: रामदास गायधने -- कवी, लेखक**१९५३: डॉ. विजया शशिकांत फडणीस -- मानसतज्ञ/समुपदेशक, लेखिका* *१९५२: फादर वेन्सी डिमेलो एस. जे. - कवी, लेखक* *१९५२: प्रज्ञा रत्नाकर मराठे -- कवयित्री**१९३९: डॉ. अनिल गुलाबचंद गांधी -- कुशल सर्जन, प्रसिद्ध लेखक* *१९३८: प्रा. डॉ. राम घोडे -- लेखक* *१९३६: वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री**१९३२: उषा सदाशिव दातार -- प्रसिद्ध लेखिका**१९२६: फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष**१९१५: माधव श्रीपाद सातवळेकर -- सुप्रसिद्घ महाराष्ट्रीय चित्रकार व महाराष्ट्र शासनाचे भूतपूर्व कलासंचालक(मृत्यू: १६ जानेवारी २००६ )**१९१३: चंद्रकांत मांडरे -- प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व लेखक (मृत्यू: १७ फेब्रुवारी २००१ )**१९०६: विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० आक्टोबर १९९८ )**१८९९: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २९ एप्रिल १९८० )**१८९८: प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,पटकथालेखक आणि वक्ते (मृत्यू: १३ जून १९६९ )**१८९६:कृष्णराव व्यंकटेश गजेंद्रगडकर-- अनुवादक (मृत्यू:१९८१)**१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. (मृत्यू: ५ मे १९१८ )**१८८८: जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (मृत्यू: १४ जून १९४६ )**१८५४: वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी -- दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक (मृत्यू: २४ जून १९१४ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: जयवंत नाडकर्णी -- ज्येष्ठ नाट्यकर्मी* *२०१८: सोमनाथ चटर्जी -- भारतीय राजकारणी, माजी लोकसभा अध्यक्ष (जन्म: २५ जुलै १९२९ )**२०००: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (जन्म: ३ एप्रिल १९६५ )**१९८८: गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक (जन्म: २ एप्रिल १९०७ )**१९८०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (जन्म:१२ एप्रिल १९१० )**१९७७: पारुल घोष -- भारतीय पार्श्वगायिका (जन्म: १९१५)**१९६३: शांताराम विष्णू आवळसकर -- मराठी लेखक (जन्म: ९ नोव्हेंबर १९०७ )* *१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.(जन्म: १२ मे १८२० )**१९४६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १८६६ )**१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१ )**१९१७: एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० मे १८६० )**१७९५: महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. (जन्म: ३१ मे १७२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार बदला ; देश बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार, शिक्षण विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोखले इन्स्टिट्यूटची लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - शरद पवारांची ग्वाही ; विश्वास पाटलांच्या 'अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर' पुस्तकाचे प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळांचं आव्हान स्वीकारण्याची चिन्हं,मनोज जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय 29 ऑगस्ट रोजी जाहीर करणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा पुन्हा ठिय्या; आझाद मैदानात उतरला लाखोंचा समुदाय!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कापशी रोड गावच्या सरपंच वेणूताई उमाळे यांना निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सप्टेंबरमध्ये बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा, दोन कसोटी व तीन T20 सामने होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 काही जण रंगाने गोरे, तर काही जण काळे का असतात ? 📕माणसाच्या रंगावर काही अवलंबून नसते. हे खरे असले, तरी काळ्या रंगाच्या लोकांना गोन्या व्यक्ती सुंदर वाटत असतात; तर गोऱ्या व्यक्तींना काळे लोक तरतरीत. स्मार्ट वाटत असतात. एकूण काय स्वत जवळ जे आहे. त्यापेक्षा दुसऱ्याकडचे जास्त आवडणे हा माणसाचा स्वभाव आहे. पण काहीजण गोरे का असतात आणि काही जण काळे का असतात, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विशेषतः एकाच आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन मुलांचे रंगही वेगळे असतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. असे का ते आता समजून घेऊ.त्वचेची रचना दोन घरांमध्ये असते. यातला वरचा किंवा बाहेरचा घर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच थरांनी बनलेला असतो. यापैकी सर्वात खालच्या पेशीथरातून पेशी सतत निर्माण होत असतात व त्या हळूहळू वर सरकतात. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा मज्जातंतू नसतात. पोषण आणि संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या बराबर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनीन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीपासून संप्रेरकाच्या नियंत्रणाखाली या द्रव्याची निर्मिती होत असते. मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री पुरुष भेद, वय इ. विविध गोष्टींवर अवलंबून असते. आणि या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्यामुळे निग्रोची मुले सामान्यत: काळ्या रंगाची असतात. ऊन्हात काम करणारे लोक काळवंडतात, तर शरीराच्या ज्या भागाला ऊन लागत नाही तो भाग इतर भागांपेक्षा उजळ दिसतो. लहान मुले वयस्कर लोकांपेक्षा जास्त गोरी दिसतात. “आमचा राहूल लहानपणी फारच गोरापान होता हो, आताच काळवंडलाय...'' असं तुमची आई म्हणते ते खरेच असते! अर्थात त्वचेचा रंग मुख्यत्वे मेलॅनीनमुळे ठरत असला, तरीही इतर दोन रंगद्रव्येही महत्त्वाची असतात. एक म्हणजे त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य कॅरोटीन आणि दुसरे म्हणजे त्वचेच्या रक्तप्रवाहातील हिमोग्लोबीन हे रक्तद्रव्य. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, आपला रंग मेलॅनीन, कॅरोटीन व हिमोग्लोबीन या तीन द्रव्यांवरून ठरतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानसंग्रह करण्याचे प्रबळ साधन म्हणजे वाचन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पी. आर. श्रीजेश यांनी नुकतेच हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत ?२) डॉ. मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे ?३) पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येणार आहे ?४) 'दुर्दशा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव कोणते ? *उत्तरे :-* १) केरळ २) बांगलादेश ३) वाढवण ४) दुरवस्था, दुःस्थिती ५) हिवरे बाजार, अहमदनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुयोग पेनकर, CFO विद्यालांकर क्लासेस, मुंबई👤 डॉ. प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी, बिलोली👤 चंद्रकांत पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, धर्माबाद👤 योगेश येवतीकर, धर्माबाद👤 नरेंद्र रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 गणेश धाकतोडे👤 नागेश गुर्जलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जब मै था तब हरी नहीं अब हरी है मै नाहीं।सब अधियारा मिट गया जब दीपक देखा माहि ॥ 42 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांची लायकी काढणारी व्यक्ती, स्वतः मधील लायकी संधी मिळेल तेव्हा, तेव्हा आपली योग्यता दाखविण्याचा प्रयत्न करत असते. कदाचित त्याकडे भरपूर वेळ असू शकते. पण,जी व्यक्ती कोणाचीही लायकी काढत नाही किंवा कोणतेही भेदभाव करत नाही ती व्यक्ती किती लायक असते हे अनेकांना तर काय निसर्गाला सुद्धा माहीत असते. म्हणून कोणाचीही लायकी काढण्यात वेळ वाया घालवू नये. आपण माणूस प्राणी आहोत निदान एवढे तरी विसरु नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *❃  एकाग्रता  ❃*         *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.         *_🌀तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment