✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/RVC9ihzERVQ3Ywfr/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_ या वर्षातील २३७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९६६: रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले**१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.**१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.**१६०८: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: दीप्ती भगवान शर्मा -- भारतीय महिला क्रिकेटपटू**१९७७: नागराज पोपटराव मंजुळे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी**१९७६: हंसराज मधुकर देसाई -- बालकवी* *१९७४: बिपिन सिध्देश्वरराव देशपांडे -- लेखक, पत्रकार* *१९६९: मुकेश तिवारी -- भारतीय अभिनेता**१९६६: बापू सोपानराव दासरी -- कवी, लेखक**१९६२: सुरेश मारोतराव चोपणे- लेखक, कवी* *१९५७: अनिल गोविंद मुनघाटे -- लेखक, कवी**१९५४: सतीश कुलकर्णी -- मराठी चित्रपट निर्माते**१९५१: अनुराधा अरुण नेरुरकर -- कवयित्री, लेखिका* *१९४७: प्रा. डॉ. लक्ष्मण माधवराव शिवणेकर -- प्रसिद्ध कवी, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक, संपादक* *१९४७: पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक**१९४७: प्रा. डॉ. अनिल नागेश सहस्रबुद्धे -- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९४४: संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू: २४ जून १९९७ )**१९३२: रावसाहेब गणपराव जाधव – मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी, माजी संमेलनाध्यक्ष (मृत्यू: २७ मे २०१६ )**१९२९: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४ )**१९२४: जनार्दन अमृत जोशी -- कवी, लेखक**१९२३: होमी नुसेरवानजी सेठना -- भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि रासायनिक अभियंता (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१० )**१९२१: नामदेव लक्ष्मण व्हटकर - प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार**१९१८: सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू:ज्ञ२३ फेब्रुवारी २००४ )**१९१७: पं. बसवराज राजगुरू -- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक (मृत्यू: २१ जुलै १९९१ )**१९०८: शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१ )**१८९३: कृष्णचंद्र डे -- भारतीय संगीतकार, संगीतकार, गायक, अभिनेता (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६२ )**१८८८: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (मृत्यू: ८ मार्च १९५७ )**१८८०: बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या शिकलेल्या नसतानाही त्यांच्यापाशी जीवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१ )**१८७२: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.(मृत्यू: १४ आक्टोबर १९४७ )**१८३३: नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६ )*🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सीमा देव-- मराठी अभिनेत्री (जन्म: २७ मार्च १९४२)**२०२२: प्रभाकर गणपतराव तल्लारवार -- कवी,लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर१९३५ )**२०१९: अरुण जेटली -- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री (जन्म: २८ डिसेंबर १९५२ )**२०१८: विजय चव्हाण -- मराठी रंगभूमीवरचे कलाकार (जन्म: २ मे१९५५ )**२०१६: अनुराधा शशिकांत वैद्य -- कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, ललित लेख, सदर असे लेखनाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले (जन्म: ९ जुलै १९४४ )**२००६: यज्ञेश्वर माधव कस्तुरे (यज्ञेश्वरशास्त्री) -- वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक(जन्म: ३ मार्च १९०८ )* *२०००: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८ )**१९९३: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२ )**१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुवाबाजीला वेळेवर ओळखा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं केलं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपूर येथे 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या टप्पा-2 चे आयोजन:50 लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार थेट रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण:प्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागेवर निवडणूक लढणार - राज ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रधानमंत्री जनजाती आदिवासीन्याय महा अभियान 10 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात कुणाचाही रस नाही - शरद पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यदायी सवयी*निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे यावर खूप चर्चा होते पण काही तज्ज्ञांनी आरोग्याच्या अशा दहा सवयी सांगितल्या आहेत की, ज्या अंगी बाणवायला सोप्या आहेत आणि परिणामकारक आहेत. या सवयी म्हणजे जीवन पद्धतीतला बदल आहे. उदा. अन्न नीट चावून खा. असे खाण्याने ते पचनास सुलभ होते. आपली पचनाची क्रिया पोटातच होते असे नाही. ती दातांपासून सुरू होत असते. या आहार तज्ञांनी साखर आणि मीठ यांना पांढरी विषे म्हटले आहे. ती विषे असली तरीही त्यांना खाण्यातून बाद करता येत नाही. साखर बरीच बाद करता येते पण मीठ बाद न करता त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. कारण साखरेने मधुमेह बळावतो आणि मिठाने रक्तदाब वाढतो. हे दोन विकार अनेक विकारांच्या मुळाशी असतात आणि ते कायमचे कधीच दुरुस्त होत नाहीत.चहाच्या बाबतीतही हे तज्ज्ञ असाच इशारा देतात पण चहा बाद करता येत नाही. आपला नेहमीचा चहा नाकारून आपण ग्रीन टी प्राशन करू शकतो. त्यात अनेक रोगप्रतिबंधक गुण आहेत. दूध हे आपण निरोगी समजतो पण त्याच्या बाबतही हे लोक इशारा देत आहेत. पाणी हे तर आपण पीतच असतो पण ते किती आणि कधी प्राशन करतो याला फार महत्त्व आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे. जेवताना किंवा काहीही खाताना पाणी पिऊ नये. खाणे संपल्यावर ४५ मिनिटे किंवा जमल्यास एक तास पाणी पिणे टाळावे. विशेषत: पोट सुटलेल्या लोकांना ही सवय फार उपयोगी पडते. नेहमी प्रवास करणारांनी रोजचा व्यायाम चुकवू नये. प्रवासात खाण्याच्या वेळा चुकवू नयेत. घरून निघताना जेवून निघावे.बैठी कामे करणारांनी आपल्या कामातला वेळ काढून जमेल तसा व्यायाम करावा. हात पाय हलवावेत. पायांना ताण द्यावा. संगणकावर नजर लावावी लागत असेल तर अधुन मधून झाडांकडे पहावे. एकदाच जास्त न खाता चार पाच वेळा थोडे थोडे खावे आणि प्रत्येक खाण्यानंतर निदान दहा मिनिटे तरी चालावे. इतर व्यायामाला वेळ मिळत नसला तरी हे चालणेच निदान पाऊण तासाचे होते आणि फिटनेस टिकतो. शेवटची सूचना म्हणजे झोप. लवकर झोपावे आणि लवकर उठावे पण झोपेची वेळ नीट निवडावी. रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दोन तासांचे अंतर असावे. असे केल्याने झोप चांगली लागते. अन्यथा पोटात अन्न पचलेले नसते आणि ते आपल्याला शांत झोपू देत नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पालकांनी दिलेले संस्कार हे मुलांचे जीवन सुंदर बनवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा भारतीय व्यक्ती कोण आहे ?२) युक्रेन या देशाची राजधानी कोणती ?३) महात्मा फुले यांनी पहिली शाळा केव्हा व कोठे काढली ?४) 'नवनीत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताचा राष्ट्रीय ग्रंथ कोणता ? *उत्तरे :-* १) विराट कोहली ( २७१ मिलियन ) २) कीव ३) १८४८ ( भिडेवाडा, पुणे ) ४) लोणी ५) भारतीय संविधान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्याम ठाणेदार, स्तंभलेखक, पुणे👤 सावित्री कांबळे, शिक्षिका तथा साहित्यिका, पुणे👤 श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार,👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद👤 गोपाळ ऐनवाले, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 भाऊराव शिंदे, धर्माबाद👤 संजय पाटील, पुणे👤 रमेश भोसले, नांदेड👤 सुनील बावसकर👤 मारोती बोंबले, बिलोली👤 ऋषिकेश शिंदे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या घरात असलेल्या प्रत्येक निर्जीव वस्तूंसोबत आपली माया जुळलेली असते. व त्या वस्तू विषयी आपुलकी निर्माण होत असते.पण, एखाद्या वेळी चालताना चुकून पाय दुसरीकडे पडल्यावर मात्र जीव लावलेल्या त्याच वस्तूंपासून इजा होण्याची शक्यता असते. आणि मग त्या वस्तूंचा राग यायला लागतो. म्हणून कोणतेही काम करताना आपले लक्ष पूर्णपणे त्याच कामाकडे असले पाहिजे. तेव्हाच ठरवलेल्या लक्षापर्यत जाण्याचा मार्ग मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मन माणसाचे अन डोके...*    एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाचीघ सर्व कामे ते करू लागले.         *_तात्पर्य_ ::~*माकड हे मानवी मेंदूचे प्रतिक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचांरानी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहिल. परंतू त्याला काही काम नसेल तर ,ते नकारात्मक विचार करू लागेल,हिंसक होईल, भरकटेल.  त्यामूळेच म्हटले जाते की,रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment