✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/u5i7VDgSY7y6EN5t/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟩 *_ऑगस्ट क्रांतिदिन_* 🟩🟩 *_जागतिक आदिवासी दिन_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••🟩 *_ या वर्षातील २२२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगता समारंभा निमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२: ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५: भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९९०: ओंकार राऊत -- भारतीय अभिनेता* *१९८३: व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर -- कवी, लेखक* *१९८०: सुहास खामकर -- जागतिक कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू* *१९७८: आबिद मन्सूर शेख--- गझलकार**१९७५: महेश बाबू -- दक्षिणात्य चित्रपटातील आघाडीचा अभिनेता**१९७०: अजय बाळकृष्ण कांडर -- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९७०: अपर्णा संत -- गायिका**१९६९: विवेक मुशरन -- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८: गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार (मृत्यू: १३ जानेवारी २०२४ )**१९६७: डॉ. वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६: गोविंद पाटील -- कवी**१९६६: अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९६२: उस्ताद तौफिक कुरेशी -- भारतीय शास्त्रीय संगीतकार, तालवादक**१९५९: मेधा आलकरी -- लेखिका, अनुवादक**१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४: प्रा. बाबुराव दत्तात्रय गायकवाड -- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९५२: समीर खक्कर-- चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते (मृत्यू: १५ मार्च २०२३ )**१९४९: प्रा. रवीचंद्र माधवराव हडसनकर -- कवी, गीतकार, लेखक**१९४७: रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६: सावनकुमार टाक -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार (मृत्यू: २५ऑगस्ट२०२२ )**१९३३: मनोहर श्याम जोशी -- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: ३० मार्च २००६ )**१९२०: कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ३० जून १९९९ )**१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२ )**१८९०: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू: ४ आक्टोबर १९२१ )**१८१९: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: ९ऑगस्ट१९०१ )**१७७६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६ )**१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: हरी रामचंद्र नरके -- मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते (जन्म: १ जून १९६३ )**२०२२: प्रदीप पटवर्धन --लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९५८ )**२०१९: प्रा. राम कोलारकर -- साहित्यिक आणि संपादक (जन्म:२३ जून १९३७ )**२०१७: प्रा. शांताराम पवार -- चित्रकार, कवी (जन्म: १७ ऑगस्ट १९३६ )**२००२: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८ )**१८९२: वामन शिवराम आपटे -- कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक (जन्म: १ जानेवारी १८५८ )**१९७६: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४ )**१९०१: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागपंचमी सणानिमित्त एक रचनाआपल्या डोळ्याला दिसला कुठे सापदचकून सारेच म्हणतात बाप रे बाप !.................. पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ केले सादर, विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर,  रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घरकुल ​​​​​​​योजनेतून लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची रक्कम द्या, खासदार नीलेश लंके यांची मागणी; घर बांधण्याचा खर्च महागल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात झिकाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण; सहा गर्भवती महिलांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार जाहीर, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकताना स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* *************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील सापडलेल्या नवीन वनस्पतीला कोणते नाव देण्यात आले आहे ?२) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?३) अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?४) 'दिन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ? *उत्तरे :-* १) सेरोपेजिया शिवरायीना २) उपराष्ट्रपती ३) ९ ऑगस्ट १९४५ ४) दिवस, वासर, अह ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 शिवा अंबुलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनुरकर, शिक्षाक तथा साहित्यिक, उमरी👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 विलास पाटील करखेलीकर👤 बुधभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 नवाब पाशा शेख, गटसाधन केंद्र, बिलोली👤 गणेश पांचाळ👤 बालाजी तेलंग👤 विलास पानसरे👤 सुशीलकुमार भालके👤 विनायक कुंटेवाड👤 ऋषिकेश जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहम अग्नि निशि दिन जरे गुरु सोचा है मान ।ताको यम नेवता दियो होहु हमार मेहमान ॥ 39 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचे भले होते तर कोणामुळे कोणाचे जीवन उद्धस्त होते. त्यात असणारे सुद्धा माणसेच असतात. फरक एवढेच की, प्रत्येकांची विचारसरणी ही वेगवेगळी प्रकारची असते.म्हणून आपल्यामुळे एखाद्याचे जीवन उद्धस्त होणार नाही या प्रकारची विचारसरणी तसेच वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करावा. भलेही त्यातून काहीच मिळत नसेल तरी जे काही मिळत असते ते, कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💐 *अच्छा सोचें अच्छा ही होगा*💐 एक राजा की केवल एक टाँग और एक आँख थी। इसके बावज़ूद राजा बहुत बहादुर और बुद्धिमान होने के कारण न केवल अपने राज्य वरन दूसरे राज्यों में भी लोकप्रिय था। एक दिन राजा ने अपनी तस्वीर बनवाने का विचार किया।फिर क्या था, देश विदेश से सुविख्यात चित्रकारों को बुलवाया गया। राजा ने उन सभी से अपनी सुन्दर तस्वीर बनाने के लिए आग्रह किया। सभी चित्रकार सोचने लगे, कि राजा तो एक टाँग और एक आँख से विकलांग है फिर उसकी तस्वीर को बहुत सुन्दर कैसे बनाया जा सकता है? *"असम्भव!"*और यदि तस्वीर सुन्दर नहीं बनी तो राजा गुस्सा होकर दंड देगा।यही सोचकर सभी चित्रकारों ने तस्वीर बनाने से कोई न कोई बहाना बनाते हुए इन्कार कर दिया।तभी पीछे से एक चित्रकार ने अपना हाथ खड़ा किया और बोला,"मैं आपकी बहुत सुन्दर तस्वीर बनाऊँगा जो आपको निश्चय ही पसंद आएगी।" राजा ने भी उसे तुरन्त स्वीकृति दे दी।अब चित्रकार जल्दी से राजा की आज्ञा लेकर तस्वीर बनाने में जुट गया।काफी देर बाद उसने एक तस्वीर बना दी जिसे देखकर राजा बहुत प्रसन्न हुआ और सभी चित्रकारों ने अपने दातों तले उंगली दबा ली। चित्रकार ने एक ऐसी तस्वीर बनायी जिसमें राजा एक टाँग मोड़कर जमीन पर बैठा एक आँख बंद करअपने शिकार पर निशाना लगा रहा है।राजा यह देखकर बहुत प्रसन्न हुआ कि उस चित्रकार ने राजा की कमजोरियों को छिपा कर कितनी चतुराई से सुन्दर तस्वीर बनाई है। राजा ने उसे ढेर सारा इनाम देकर सम्मान से विदा किया।~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment