लेख...... स्त्री शिक्षण संत तुकडोजी महाराज म्हणतात - “ प्रल्हादाची कयाधु आई l छत्रपतीची जिजाबाई कौशल्या, देवकी आदीसर्वाही l वंदिल्या ग्रंथी" अशाप्रकारे माँसाहेबजिजाऊ मुळे शिवछत्रपती घडले. यशोदे मुळे श्रीकृष्ण घडले, या सर्व माता प्रमाणेच कार्य करण्यासाठी स्त्री शिक्षण महत्त्वाचे आहे. कुटुंबामध्ये स्त्री प्रथम मुलगी, नंतर पत्नी आणि नंतर माता अशा तीन महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असते. या सर्व भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, मुलांच्या संगोपनासोबतच संवर्धनाचे आणि कुटुंबाच्या विकासाचे कार्य पार पाडण्यासाठी स्त्रियांना शिक्षण मिळणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. असे म्हणतात, ' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी' या जगाचा उद्धार करायवयाचा असेल तर तर प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत असत, ' मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे. परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे. म्हणून तिला शिक्षण घेणे आवश्यक आहे. स्त्री ह्या कोणतीही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात म्हणूनच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्वतःच्या कुटुंबापासून तर राष्ट्रव्यापी व संघटनेपर्यंत कृषी कार्यापासून ते संशोधन कार्य पर्यंत अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषा बरोबरीने कार्य करत आहे.असे प्रत्ययास येते. म्हणूनच मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण असते. स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment