वेदना बळीराजाचा 'जय जवान जय किसान' ही घोषणा फक्त शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी घोषणाच राहिली आहे. भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जातच वाढतो आणि मृत्यूनंतरही आपल्या मुलाबाळांवर कर्जाचा बोझा ठेवून जातो. अशा या माझ्या शेतकरी राजाच्या वेदना किती दुःखदायक आहे. ग्रामीण भागातील जीवनात तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेती ही सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कधी बरे कधी वाईट दिवस पहावे लागतात. निसर्गावरच जीवन अवलंबून आहे. "घणाचे घाव घालावे, गळावा घाम अंगाचा, यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा" या दोन ओळीतच श्रमाचे महत्त्व दडलेले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझा शेतकरी राजा मेहनत करतो आहे. मुलं चांगली शिकावी, मोठी व्हावी, मुलांनी मोठी शेती घ्यावी आधुनिक उपकरणाचा वापर करावा त्यांना चांगली नोकरी लागावी असे स्वप्न उराशी बाळगतो आहे.आणि त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहते!!! ?? त्याच्या जीवनात अनेक अनेक अडचणी येतात हलाखीची परिस्थिती निर्माण होते. वेळेवर पाऊस पडत नाही पावसाची वाट बघावी लागते. एखाद्या वेळी पाऊस जास्त आला तर सारे वाहून जाते पाऊस नाही आला तर दुष्काळ पडतो. अशा अनेक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत माझा शेतकरी राजा कष्ट करून सर्वांचे पोट भरतो. धन्य धन्य ह्या उभ्या जगाचा पोशिंद्यास.... 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment