*🌷जीवन विचार*🌷 *〰〰〰〰〰〰〰️* http://www.pramilasenkude.blogspot.com *जीवनाचा खरा अर्थ समजण्यासाठी जीवनाची परिभाषा समजणे आवश्यक आहे. कारण जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ आहे , पयोधी आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय जलधी असत नाही. हे सर्वकाही हास्यमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य* *आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.* *जीवनात अनेक संकटे येतात, अनंत आव्हाने निर्माण होतात. अनंत आव्हानांना, संकटांना प्रदीर्घपणे सामोर जाऊन संघर्ष करणे व साहसाने त्याच्या कसोटीत उतरणे म्हणजेच जीवन होय.* *जीवन म्हणजे श्रम आहे, सत्कर्म आहे,प्रेम आहे.* *म्हणूनच माणसाच्या जीवनाचं सारं दोनच शब्दात सांगता येईल.* *' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो.* *हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे ' हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं.* 〰〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *✍शब्दांकन /संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड.

No comments:

Post a Comment