*गुरुमाऊली चिञकाव्य स्पर्धा* *कविता - बंध मैत्रीचे* बंध मैत्रीचे असतात असे पडत्या पाऊसात छञी धरून गप्पा करतात एकमेकांशी आनंदाने दिलखुलास मनभरुन मैत्रीच्या नात्यास नसतो जातीपातीचा कसलाही गंध, तिथे असतो फक्त मायेचा प्रेमाचा ओलाव्याचा सुगंध बंध मैत्रीचे असतात खरे निस्वार्थी आणि प्रेमळ मनातील गुपितं उघड करुन सांगणारे नाते निर्मळ बंध मैत्रीचे बेधुंद असते वादळ वाऱ्यातला झोका नाते असते ते रक्ता पलीकडचे नसतो तिथे कसलाही धोका मैत्री म्हणजे आनंदाचा झरा, आनंदाने गगनास भिडणारा दोन मनास जोडणारा तो असतो सांकव खरा मैत्री म्हणजे जीवास जीव देणारा मायेचा जीवन धागा असले दूर कितीतरी परी काळजात असते त्यांच्या जागा मैत्रीचा बंधनाचे नाते अतुट अंतःकरणातील तो असतो एक कप्पा, जिथं होतात मनमोकळ्या वाटेतही गप्पा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.*

No comments:

Post a Comment