✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ 💥 मृत्यू :- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम पुरस्कार जाहीर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुखापतीमुळे भारतीय संघातून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/JZdD67V Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१). *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सी.पी.आय.चे विस्तारित रूप काय ?* कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया *२) 'आर्य समाज' चे स्थापना वर्ष कोणते ?* १८७५ *३) जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात राहतात ?* १६ % *४) सिक्किमची राजधानी कोणती ?* गंगटोक *५) गुजरातमध्ये किती जिल्हे आहेत ?* गंगटोक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नंदकिशोर पाटील आगळे ● सारंग भंडारे ● पवन धावनी ● विजय सातपुते *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कावेबाजी* लबाडांचा गोड बोलून विघातक कावा असतो आम्ही खुपच चांगले असा त्यांचा दावा असतो लबाडांची कावेबाजी उघड होत असते कितीही लपवा ती लपल्या जात नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खलील जिब्रान म्हणतात,'शिल्पकार व चित्रकार यांच्या कामापेक्षा एखाद्या शेतक-याचे, सामान्य कामगाराचे काम श्रेष्ठ दर्जाचे असते.' जीवन म्हणजे खरोखर अंधार. भर उन्हांत काम करणारा शेतकरी, धडधडत्या यंत्राबरोबर काम करणारा कामगार, धगधगत्या भट्टीजवळ काम करणारा मजूर आणि सीमेवर जीव धोक्यात घालणारा सैनिक ही कामातून केल्या जाणा-या अत्युच्च त्यागाची उदाहरणे. तुम्ही काम करता तेव्हा स्वत:ला स्वत:शी, इतरांशी आणि देवाशी जोडत असता. एखाद्या हमालाच्या अंगातून वाहणा-या घामाच्या धारा पाहिल्या की रक्ताचे पाणी करणे काय असते हे संवेदनशिल मनाला सहज कळते. पण कष्टाच्या भाकरीवर फार थोड्यांची श्रद्धा आहे.* *शेक्सपिअरच्या एका नाटकात काॅरिन नावाचा साधाभोळा मेंढपाळ भेटतो. तो म्हणतो.. मी खरा श्रमकर्ता, कष्टकरी आहे. माझी भाकरी मी मिळवतो. माझे कपडेही मीच बनवतो. मी कुणाची निंदा करत नाही. कुणाच्या आनंदाचा हेवा करत नाही. इतर लोकांच्या चांगल्या गोष्टी पाहून मला आनंद होतो. माझे दु:ख मी माझ्याशी ठेवतो. माझ्या जीवनात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेळ्यामेंढ्या चरताना पाहणं आणि त्या कोकरांना दूध पिताना पाहणं. काॅरिनच्या जीवनाची साधीसुधी संकल्पना पाहून माणसं जगू लागली तर आपल्या जीवनात कित्येक प्रश्न निर्माण होणार नाहीत. एक साधा मेंढपाळ एवढ्या नैतिक उंचीवरून बोलू शकतो तर शिकल्या सवरलेल्यांनी कोणत्या उंचीवरून बोलले, वागले पाहिजे हे सांगितलेच पाहिजे असे नाही.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह । जिसको कुछ नही चाहिए वह शहनशाह । अर्थ महात्मा कबीरांनी मानवाच्या कधीही न संपणार्‍या अपेक्षांवर मार्मिकपणे प्रकाश टाकला आहे. कितीही घाव बसले तरी मानवी मनाची हाव काही संपणारी नाही. जो गरीब आहे. त्याला श्रीमंचीचं वेड लागतं . ज्या वस्तू त्याच्याकडे नाहीत. त्या मिळविण्यासाठी त्याची जमेल त्या मार्गानं श्रीमंत होण्याची धडपड चालूच असते. जर ती श्रीमंती चुकीच्य मार्गाने मिळवीलेली असेल तर ती लाभेल का ? टिकेल का ? मनात शंकांचं मोहाळ भुणभुणायला लागतं. मिळालेल्यापेक्षा आणखी जास्तीचं वाढं-दिडं करण्याची धडपड. आहे ते टिकविण्यासाठीची चिंता. असा मजेदार जीवनसंघर्ष करताना माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सर्व वैभव जवळ असूनही त्याचा उपभोग त्याला घेताच येत नाही. केवळ भारवाहकाचं काम निमुटपणे तो करीत राहातो.अगोदर उपाशीपोटी राहून सारं कमावलं. आता ते पचत नाही म्हणून मन मारून पोटाला उपाशी ठेवावं लागतं ! असा विचित्र जगणारा पृथ्वी तलावर माणूस हाच एकमेव प्राणी असावा. बर एवढं गाढव ओझं ओढून शेवटी रिकामंच निर्वाण ! जमव जमव जमवण्याच्या नादात जगणं जगायचं राहूनंच गेलं ! अशी खंत घेवून जगण्यात काय हशील बरे ! ज्याच्याकडे काहीही नाही तोच माणूस खरा खूश आहे. त्याला कोणती चिंता सतावत नाही. नाहीच तर हरवायची भीती नाही. मनाला विरक्त करता आलं की समाधानाशी मस्त मितृत्व होतं. मनानं श्रीमंत असणाराच खरा राजा असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही.असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते.खंत वाटून घ्यायचेही कारण नाही.पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते.इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये.ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते.पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही.इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा.अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल.इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही.आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मुल घडवताना.... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खरच संस्कार म्हणजे नक्की काय? योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार? आपली कथा त्या कस्तुरी मृगासारखी तर झाली नाही ना? म्हणजे स्वतःकडे कस्तुरी असूनही त्याची जाणीव मात्र आपल्याला नाही. संस्कार शोधायला गेल्यावर, हाती नक्की काय लागतं हे मोठ प्रश्नचिन्ह आहे गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिष्याची परीक्षा रामानुजाचार्य शठकोप स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोप स्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?’’ रामानुज नम्रपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोप स्वामींनी विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’ यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.’’ ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment