✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/11/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *बालदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. १९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला. 💥 जन्म :- १८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान १९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. १९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. 💥 मृत्यू :- १९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार. १९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका शेतकऱ्यांना, राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे पीक विम्यासाठी विमा कंपन्यांची नकारघंटा, शेतकरी संकटात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई, पुणे, नाशिकसह ठाण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी, अनेकांच्या इच्छा जागृत तर नवी मुंबई आणि औरंगाबादचं महापौरपद महिलांसाठी राखीव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटकातील 17 पक्षबदलू आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पोटनिवडणूक लढवता येणार, विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आता सरन्यायाधीशांचं कार्यालयही माहिती अधिकाराच्या कक्षेत, दिल्ली हायकोर्टाचा 2010 चा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राष्ट्रपती राजवटीचा 100 व्या नाट्यसंमेलनाला फटका, सरकार आणि सांस्कृतिक मंत्री नसल्याने संमेलन लांबणीवर पडण्याची चिन्ह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या फाईल्सची बांधाबांध, सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक जारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराने आयसीसीच्या वन डे क्रमवारीत फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• आजपासून महाराष्ट्रात द्वितीय शैक्षणिक सत्रास प्रारंभ, वीस दिवसाच्या दिवाळी सुट्टीनंतर पुन्हा शाळेत मुलांचा किलबिलाट सुरू सर्वाना द्वितीय शैक्षणिक वर्षाच्या फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून मन:पूर्वक शुभेच्छा ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू*   http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.html वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. _चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_ लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रांजणवाडी म्हणजे काय ?* 📙 रांजणवाडी होण्याचा अनुभव आपण कधी ना कधी तरी घेतलेला असतोच. 'काहीतरी चोरून खाल्ल्यावर रांजणवाडी होते बरं का !' असंही कोणी आपल्याला गमतीने म्हटलेले असते. रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार आहे. पापण्यांच्या मुळाशी पू साठायला लागून हा रोग होतो. आपल्या पापण्यांच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. त्यांना 'झीज' ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथीचे तोंड बंद होऊन आता ग्रंथीतील स्राव साठून त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या ठिकाणी पूर साठावयास लागतो. पापणी लाल, सोडलेली दिसते. डोळ्यांची उघडझाप करताना दुखते. स्पर्शाने वेदना होतात यालाच रांजणवाडी असे आपण म्हणतो. रांजणवाडी पिकल्यावर आपोआप फुटते व पू निघून गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास गरम पाण्यात कपडा बुडवून त्याने शिकल्याने रांजणवाडी एक दोन दिवसांत जिरू शकते. जिरली नाही तर तरी पिकण्यासाठी शेकल्याने मदत होते व ती लवकर फुगून फुटते. सुजेच्या सुरुवातीस पू निघण्यासाठी पापणी दाबून प्रयत्न करू नये. त्यामुळे कधी कधी तेथील जंतुसंसर्ग रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये नेला जाऊन मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो. शेकणे या उपायांसोबतच आणखी एक उपाय घरच्या घरी करता येतो. लसणाच्या पाकळीचा रस सकाळ संध्याकाळ दोन दिवस लावला तर रांजणवाडी जिरते. वारंवार रांजणवाडी होणे हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणार्‍या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादे वेळी त्यांना मधुमेहही झालेला असू शकतो. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'बालक दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 14 नोव्हेंबर 2) *भारतीय पक्षीनिरीक्षण शास्त्राचे पितामह कोणाला म्हटले जाते ?* डॉ. सलीम अली 3) *'द फॉल ऑफ स्परो' हे आत्मचरित्र कोणाचे ?* डॉ. सलीम अली 4) *33 वे राज्य पक्षीमित्र संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे ?* रेवदंडा ( रायगड ) 5) *महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?* डॉ. जयंत वडतकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 सुहास चटने 👤 सुभाष चंदने 👤 शीतल चौगुले 👤 खंडू सोळंखे 👤 योगेश पाटील बादलगावकर 👤 विनोद पांचाळ 👤 मोहन लंगडापुरे 👤 भारत शेळके 👤 रितेश जाधव 👤 निखिल थोरमोठे 👤 विजय सदानंद 👤 सुनील नामेवार 👤 वसंत यशवंतकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ?  हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,*          *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।*           *बळेविण शक्ती। बोलू नये॥* *या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.* *संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती  बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!*   ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●••               🌼🌼🌼🌼🌼🌼       *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आज परिस्थिती खूपच विदारक झाली आहे.* *माणस भेटणं, मिळवणं आणि* *जुळवणे कठीण होऊन बसलंय.* *करणार तरी काय?* ????? *काही शब्द आठवतात----* *आर्त मी मारीन हाक* *वारा मुरळी धाडीन* *झाड हिरवा नेसून शालू* *त्याला भुरळ पाडीन।* *कोणी केली माझी कळ* *मन त्याचे का गढूळ।।* *मानवाने खरच अनेक क्षेत्रात खूप* *प्रचंड प्रगती केली पण काही* *गोष्टी खटकताय त्या मांडत आहे.* *माणूस मोठ्या फ्लॅट मध्ये ब्लॉक झाला अन भौतिक वर्तुळातच लॉक* *झाला.* *आता इमारती खूप उंच गेल्या पण वृत्ती संकुचित झाली.* *जिकडे पहावे तिकडे रस्ते रुंदीकरण चालू पण दृष्टिकोन मात्र अरुंद.* *घरे भली मोठी दिसतात मात्र त्यात तू,मै और वो बस.* *सुख-सुविधा अपार पण उपभोगायला वेळ नाही.पदव्यांचा ढीग झाला पण* *शहाणपण कुठे दिसत नाही.* *ज्ञानाच भांडार भरलंय पण वागण्या, बोलण्याच भान नाही.* *औषधोपचार खूप मोठा पण तंदुरुस्ती अजिबात नाही.मद्य-धूम्रपान भरपूर प्रमाणात पण आनंद क्वचितच.* *रात्र रात्र जागरण पण वाचन हरवले.* *दिवसभर टी.व्ही.,मोबाईल वर पण खेळ लुप्त झाला.* *चॅटिंग खूप चालते पण जिव्हाळा हरवला.चरितार्थ सगळे चालवितात मात्र जीवन जगायला शिकले नाही.* *मालमत्तेची रोज वाढ होते पण मूल्ये कमी कमी होत चालली.* *अंतराळात पोहचलो पण शेजाऱ्याला विसरत चाललो.* *अवकाश जिंकून घेतले पण अंतरंगातील चलबिचल ओळखू शकत नाही.पाणी शुद्ध पितो पण* *आत्मा तसाच राहतो.धावपळ खूप चालली पण क्षणभर विसावा नाही.* *बघा या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याशी कुठं जुळतात का , की* *यांचा आणि आपला काही संबंध नाही असं वाटत.मनाला चटका* *बसला आणि परिस्थिती लक्षात घेऊन लिहिलं.यात कुठे कमी* *पडत असाल तर वेळीच भर घाला.जीवनात भरभराट होईल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• क्षणाचे किती मोल असते हे आपल्याला कधी कळतच नाही.जेव्हा कळते तेव्हा तो क्षण आपल्या हातून निसटून गेलेला असतो.मग आपण पश्चातापात पडतो.पश्चातापात पडण्यापेक्षा येणारा प्रत्येक क्षण आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो आणि तो आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा देतो.हे लक्षात ठेऊन आपल्या आनंदी जीवनाला दुःखी करण्यापेक्षा तो क्षण आनंदात कसा घालवता येईल यासाठी प्रयत्न करायला शिकले पाहिजे.हीच तर खरी कसोटी आपल्या जीवनाची आहे.आपण कर्तव्यदक्ष रहायला शिकले पाहिजे.आपल्यातला आळशीपणा आणि कामचुकारपणा टाळायला शिकले पाहिजे.येणारा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे हे समजून घ्यायला हवे. एका क्षणाने काय होतं नाही.वेळेवर रेल्वेस्थानकावर पोहोचलो नाही तर रेल्वे आपल्यासमोरुन निघून जाते.क्षणाचा विचार केला नाहीतर एखादा क्षण असा आपल्यासमोर येतो की,आपण गाडीला ब्रेक नाही लावले तर होत्याचे नव्हते ही होऊ शकते.एखादा क्षण अपघातात सापडलेल्या व्यक्तीला हाॅस्पिटलमध्ये नेण्यासाठी विलंब केला तर प्राणही जाऊ शकेल.ह्या सगळ्या घटना क्षणातच होत असतात आणि घडतही असतात.आपण विलंब करणे, दुर्लक्ष करणे किंवा आळस करणे हे किती आपल्याला महागात पडते याची जाणीव ठेवायला हवी.आपले जीवन अनमोल आहे आणि या अनमोल जीवनासाठी क्षण किती महत्त्वाचे हे जर आपल्याला समजायला लागले तर या आणि अन्य घटनांना वेळीच पायबंद घालता येऊ शकतो.त्यासाठी कोणत्याही क्षणी सतर्क राहणे आणि जीवन आनंदमय जगणे यातच खरे आपल्या जीवनाचे मोल अन्यथा जीवनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃🦋 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोळ्याने राजाला धडा शिकवला* एकदा दोन राज्यात युद्ध झाल. त्यात एका राजाचा पराभव झाला .पराभुत राजा शोध घेत होता .त्यांनी त्या राजाला ठार मारायचे होते, म्हणून तो राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला .आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याच्या धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरी सरपटणारा एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. तो सरपटत भिंतीवर चढायचा. असे बऱ्याचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही राजाने विचार केला. हा सरपटणारा छोटा प्राणीसुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझा प्रयत्न का बरे सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्यांनी आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रु बरोबर युद्ध केले. अखेरीस त्यांनी लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धङा शिकविले,हेत्याच्या कायम लक्षात राहिला. *तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते.*              *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment