✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/06/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले,४ ठार. १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला 💥 जन्म :- १९०९ - गुरू गोपीनाथ, शास्त्रीय नर्तक. १९२७ - कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अरविंद केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ; दिल्लीतील गरीब विद्यार्थ्यांना मिळणार १०० टक्के शिष्यवृत्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *१९७२ नंतर कोणत्याही एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब ; नौदलाने 21 दिवस घेतला शोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मालवणी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विदर्भ व मराठवाड्यात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा विश्वास राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्णधार राणी रामपाल अंक ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह, विराट कोहलीला मिळणार विश्रांती; बीसीसीआयचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सुंदर* https://storymirror.com/read/story/marathi/e8iw53kn/sundr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आधुनिक मानवाचा उदय केव्हा झाला ?* 📙 वैज्ञानिक भाषेत आधुनिक मानवाचं नाव होमो सेपियन्स असं आहे. पण हा आधुनिक मानव एकाएकी अकस्मात जन्माला आला नाही. डार्विननं सांगितल्याप्रमाणे वानर प्रजातींपासून हळूहळू उत्क्रांती होत होत त्याचा उदय झाला. म्हणून होमो या प्रजातीच्याही काही जाती आधुनिक मानवाच्या आधी उदयाला येऊन अस्ताला गेल्या. त्यांचेही पूर्वसुरी होमिनिड या नावानं आणि त्यांचेही पूर्वज होमोनाॅइड या नावाने ओळखले जातात. आफ्रिकेच्या जंगलात राहणारे होमिनाॅईड प्रजातीचे वानर साधारण ५० ते ८० लाख वर्षांपूर्वी वावरत होते. त्या कालखंडात पडलेल्या दुष्काळापोटी तिथल्या वनराजीला ग्रहण लागलं. त्यामुळे झाडांवर राहणाऱ्या या वानरांना आपलं बस्तान दुसरीकडे तर हलवावं लागलंच, पण अन्नाच्या शोधासाठी तसंच वास्तव्यासाठीही झाडांचा आश्रय सोडून जमिनीवर उतरावं लागलं. आफ्रिकेतल्याच सॅव्हॅन्ना या गवताळ जंगलांमध्ये ज्यांनी आश्रय घेतला, त्या वानरांचे वंश टिकून राहिले. ही वानरं दिवसा जमिनीवर उतरून अन्नाचा शोध घेत, पण रात्र झाली की परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामी परतत. जमिनीवरचं मिळालेलं अन्न परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामस्थळी हलवायचं तर ते पुढच्या दोन पायांमध्ये म्हणजेच हातांमध्ये धरून आणावं लागे. ते करण्याची क्षमता ज्यांनी मिळवली त्या जातींना तगून राहण्यास मदत झाली. त्यातूनच हळूहळू दोन पायांवर उभे राहणारे नवीन होमिनिड प्राणी उदयाला आले. हे मानवसदृश असले तरी त्यांनी वानरजातीचे गुणधर्म संपूर्णपणे त्यागलेले नव्हते. झाडांचा आश्रय त्यांनी संपूर्ण सोडलेला नव्हता. या प्रजातीतही उत्क्रांती होत गेली. आणि त्यातूनच पहिले होमो प्रजातीतले प्राणी उदयाला आले. यांना होमो हॅबिलिस म्हणतात. पुढचे दोन पाय म्हणजेच हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा अधिकाधिक उपयोग करायला हे प्राणी शिकले होते. ते काही आयुधं आणि अस्त्रं बनवून त्यांचा वापर शिकारीसाठी किंवा घरटं खोदण्यासाठी करायला शिकले होते. पण अजूनही ते संपूर्णपणे दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. थोडे डगमगत होते. शिवाय त्यांचा मेंदूचाही फारसा विकास झालेला नव्हता. ही झाली १५ ते ३० लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर उदयाला आले ते होमो इरेक्ट्स. हे दोन पायांवर ताठ उभे राहू शकत होते. त्यांच्या मेंदूचीही चांगलीच वाढ झाली होती. परंतु ते अजूनही वन्य प्राण्यांप्रमाणे गुहांमध्ये राहून गोळा करून आणलेल्या कंदमुळांवर व शिकार करून आणलेल्या मांसावर गुजराण करत होते. अग्नीचा शोधही त्यांनी लावला होता. त्यांची आयुधंही जास्त प्रभावी होती. त्यांचीच उत्क्रांती होत होमो सेपियन्स म्हणजे बुद्धिमान होमोचा किंवा आधुनिक मानवाचा उदय झाला. त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास झाला होता. बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळे शेती किंवा सांस्कृतिक विकास यांचाही प्रवाह सुरू झाला होता. होमो सेपियन्सचा उदय साधारण ३५००० ते १०००० वर्षांपूर्वी झाला यावर सर्वांचंच एकमत आहे. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवन चैनीची वस्तु नसुन कर्तव्याची भूमी आहे *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात गरीब देश कोणता ?* भूतान 2) *नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?* काठमांडू 3) *भारतात 'चारमिनार' कोठे आहे ?* हैदराबाद 4) *रशिया या देशाची राजधानी कोणती ?* मास्को 5) *भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.निर्मला सीतारमन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सचिन रेनगुंटवार ●  कल्पना डेव्हिड बनसोड ●  कवी अनिल रेड्डी ●  सदानंद कोडगळे ●  लक्ष्मण सुरकार ●  संदीप शंभरकर ●  लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी ●  रवी गंगाधर भोरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थीवृत्ती* एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.' तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment