✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16AvUagYLb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९: ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८: झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: केतकी माटेगांवकर --- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८४: भावेश दत्ताराम लोंढे -- कवी**१९८३: अजिनाथ रावसाहेब सासवडे -- लेखक**१९८१: इंद्रजित गणपत घुले -- कवी, लेखक, संपादक, अनुवादक**१९७८: साईप्रसाद गुंडेवार -- भारतीय अभिनेता आणि मॉडेल (मृत्यू: १० मे २०२० )**१९७७: नामदेव भोसले -- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४: प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. सोमनाथ महादेव दडस -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५: सूरज आर. बडजात्या -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते* *१९६२: प्रा. प्रकाश जनार्दन कस्तुरे -- लेखक, वक्ते**१९६०: जयंत पवार --- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू: २९ ऑगस्ट २०२१ )**१९५६: सुभाष शांताराम जैन -- कवी, लेखक पत्रकार, छायाचित्रकार**१९५५: सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२: परशुराम खुणे -- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०: नयना आपटे -- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९: विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६: रघुनाथ कृष्ण जोशी -- सुलेखनकार, डिझायनर, कवी आणि शिक्षक (मृत्यू: २० एप्रिल २००८ )**१९३५: प्रा.चंद्रकुमार नलगे -- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू: ३१ जानेवारी २००४ )**१९२२: सुलोचना भीमराव खेडगीकर -- लेखिका (मृत्यू: १८ मार्च २००४ )* *१९२०: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू: ४ मार्च १९९५ )**१९२०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू: २ ऑगस्ट २०१० )**१९१०: रामचंद्र अनंत काळेले -- कवी, काव्य समीक्षक (मृत्यू: १२ जून १९८१ )**१९०८: न्या.राम केशव रानडे -- लेखक, विचारवंत,प्रवचनकार( मृत्यू: ३० ऑगस्ट १९८५)**१९०६: पहारी सन्याल -- भारतीय अभिनेता आणि गायक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८: कमला गोपाळ देशपांडे -- संस्थापक (मृत्यू: ८ जुलै १९६५ )**१८९०: नारायण केशव भागवत -- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक, लेखक (मृत्यू: २० एप्रिल १९६२ह)**१८५७: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १८९४ )**१८५७: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१ )**१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू: १२ एप्रिल १९०६ )**१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: लक्ष्मण देशपांडे –’वर्‍हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३ )**२०००: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**२०००: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३ )**१९८२: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म: ५ डिसेंबर १८९४ )**१९५८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्‍न (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ )**१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म: ११ एप्रिल १८६९ )**१९२५: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६ )**१८२७: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नांदेड जिल्ह्याची महती सांगणारी कविता*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत, दिल्ली मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवळकरांच्या भाषणाला मोदी-पवारांची दाद, तर मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवारांकडून मोदींचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *समास, जोड्या जुळवा ते निबंध, जालन्यातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट; महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छाया कदमची आणखी एक गगनझेप! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील 10 लाख लाभार्थ्यांना मंजूर निधीचे पहिल्या हप्त्याचे वाटप होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मोदी सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत लवकरच ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख शाहरुख👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*उंचच उंच बर्फाच्या राशी**देशाचे करतो सदैव रक्षण**वनौषधींचे आगर आहे**पर्यावरणाचे करतो संरक्षण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - नदी••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो ?२) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे ?३) दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण ?४) 'हताश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणता ? *उत्तरे :-* १) कॅसोवरी पक्षी ( Cassowary bird ) २) छत्रपती संभाजी महाराज ३) रेखा गुप्ता ४) निराश ५) डेन्मार्क*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची  बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥ श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥ ऐसें भाग्य मज देसी कवणें काळीं । होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥ वदनीं तुझें नाम वसे निरंतर । राखीन त्यांचे द्वार थोर आशा ॥४॥ येतां जातां मज करिती सावधान । वदनीं कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥  ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रकारे आपण, आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो त्याच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही. मनाची स्वच्छता अशीच निर्मळ, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे. जेथे स्वछता चांगली असते तेथे प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते व गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव आपुलकी वाटत असते. आज अशाच सकारात्मक विचाराची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☸️ *_जागतिक मातृभाषा दिन_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील ५२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला**१९५१: नेपाळ बंडखोराविरुध्द भारत व नेपाळची संयुक्त लढाई सुरू झाली**१९२५: ’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.**१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.**१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.**१८४२: जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.*☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: अमितराज सावंत -- मुंबईतील मराठी संगीतकार आणि गायक**१९७८: मुरलीधर ईश्वरदासजी खोटेले -- झाडी बोलीचे कवी, लेखक* *१९७७: स्मिता बन्सल -- चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री**१९६७: डॉ. मनोज केशवराव फडणीस -- लेखक* *१९६४: प्रा. डॉ. तनुजा नाफडे -- संगीततज्ज्ञ, लेखिका* *१९५९: हर्षा हरिष वाघमारे -- कवयित्री* *१९५१: प्रा. डॉ. शशिकांत लोखंडे -- लेखक, समीक्षक**१९५०: विजयराव दामोदर रुम --- लेखक, सामाजिक कार्यकर्ते* *१९५०: मीना वांगीकर -- मराठी-कन्‍नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०१५ )**१९४५: अनिरुद्ध अनंत कुलकर्णी -- लेखक* *१९४५: डॉ.मधुकर केशव वर्तक -- लेखक, संपादक* *१९४२: डॉ.भगवान रंगनाथ कोठेकर -- लेखक* *१९४२: जयश्री गडकर – प्रसिद्ध अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८ )**१९३७: सुलभा अरविंद देशपांडे --- हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री (मृत्यू: ४ जून २०१६ )**१९३३: रा. रा. जांभेकर -- लेखक**१९३१: वसंत दामोदर कुलकर्णी -- मराठी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, संपादक* *१९२१: विद्याधर भास्कर उजगरे -- लेखक* *१९११: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू: ११ जानेवारी १९९७ )**१८९९: सूर्यकांत त्रिपाठी "निराला" -- प्रसिद्ध भारतीय कवी, कादंबरीकार, निबंधकार आणि कथा-लेखक (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१ )**१८९८: बाळकृष्ण रामचंद्र मोडक -- लेखक, 'मुलांचे मासिक'कार (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९० )**१८९४: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू: १ जानेवारी १९५५ )**१८७५: जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७ )**१७९९: परशुराम बल्लाळ गोडबोले -- संस्कृत पंडित व मराठी लेखक (मृत्यू: ३ सप्टेंबर १८७४)* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: राजकुमार बडजात्या --चित्रपट निर्माते, राजश्री प्रोडक्शन चे प्रमुख( जन्म: १४ मे १९४१)**२०१९: श्रीधर माडगूळकर -- ग.दि. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक (जन्म: ६ फेब्रुवारी १९४७ )**१९९८: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म: १९ डिसेंबर १९१९ )**१९९४: त्र्यंबक कृष्णराव टोपे -- भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक शिक्षण तज्ञ मुंबई विद्यापीठाची माजी कुलगुरू (जन्म: २८ फेब्रुवारी १९१४)**१९९१: नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म: ४ जून १९३६ )**१९८४: मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव -- श्रेष्ठ रशियन लेखक, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २४ मे १९०५ )**१९७०: विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर -- मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (जन्म: १५ मे १८९२)**१९७७: रामचंद्र श्रीपाद जोग – विख्यात साहित्य समीक्षक, कवी व विचारवंत (जन्म: १५ मे १९०३ )**१९७५: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: १८ सप्टेंबर १९१२ )**१९६५: ’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म: १९ मे १९२५ )**१८२९: चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम कडून हार्दीक शुभेच्छा .........!.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या शालांत परीक्षेला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रेखा गुप्ता यांनी स्वीकारला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनास आजपासून होणार प्रारंभ, हे संमेलन 23 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात जिंकले तब्बल 7 पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, शिमलामध्ये तापमान 3 अंशांपर्यंत घसरले, दिल्लीत पाऊस, 23 राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा; मध्य प्रदेशात ढगाळ हवामान, राजस्थानच्या 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताचा विजय, मोहंमद शमी वनडेमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि शुभमन गिलचे आठवे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, धर्माबाद👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ👤 डॅनियल ग्राहम्बल, शिक्षक, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 02*स्वच्छ ठेवा हो तुम्ही मला**तहान तुमची मी भागवते**थांबत नाही कोठेच कधी**सतत मी वाहत असते*मी कोण .........?उत्तर उद्याच्या पोस्ट मध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - वृक्ष / वनस्पती / झाड••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात सुंदर देश कोणता ?२) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश कोणता ?३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत आदेश जारी करणारे पहिले राज्य कोणते ?४) 'स्त्री' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? *उत्तरे :-* १) न्युझीलंड २) सुदान ३) कर्नाटक ४) महिला, वनिता, नारी, ललना, कामिनी ५) ज्ञानेश कुमार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अ‍ॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे (उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥ संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥ दुरोनियां देखें गरुडाचें वारिकें । गोपाळा सारिखें चतुर्भुज ॥३॥ नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरीं । ऋणि करुनि करीं घेई मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो पर्यंत माणूस  जिवंत असतो तो पर्यंत एकमेकांना  आनंदाने , मिठी मारणे, हाताला , हात मिळवणे, सोबत मिळून, मिसळून खाणे, पिणे होत असते.पण, एकदा का त्या माणसाचा मृत्यू झाला की, लगेच   त्यापासून पाच हात दूर रहाताना दिसतात. एवढेच नाही तर...त्या मृत शरिराला स्पर्श केल्यावर विटाळ मानून आंघोळ करून घेतात. तर कोणी साधं स्पर्श सुद्धा करत नाही.  भलेही माणसाचे जीवन कितीही सुंदर असले तरी ते क्षणभंगुर आहे. म्हणून अति माजू नये व गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला  ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌏 *_जागतिक सामाजिक न्याय दिवस_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९: भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७: अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८: शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१ :पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रणाली शैलेश चव्हाटे -- कवयित्री, लेखिका* *१९७८: रचना -- लेखिका, कवयित्री* *१९७६: रोहन सुनील गावस्कर -- भारतीय क्रिकेटपटू**१९६९: विजय अर्जुन सावंत -- कवी, लेखक**१९६६: प्रदीप निवृत्तीनाथ कुलकर्णी -- लेखक**१९६३: नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२: मीना शेट्टे-संभू -- लेखिका, संपादिका* *१९५७: प्रा. बसवराज कोरे -- ज्येष्ठ लेखक**१९५६: अन्नू कपूर -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५: लखनसिंह कटरे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२: डॉ. रा. गो. चवरे -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९५१: गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१: प्रा. माधव थोरात -- कवी* *१९३७: सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८: आबाजी नारायण पेडणेकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू: ११ ऑगस्ट २००४ )**१९०४: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू: १८ डिसेंबर १९८० )**१८४४: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६ )* 🌏 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: बेला बोस - भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री (जन्म: १८ एप्रिल १९४१ )**२०१५: गोविंद पानसरे -- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते (जन्म: २४ नोव्हेंबर १९३३ )**२०१२: डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३ )**२००७: डॉ. किशोर शांताबाई काळे --- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म: १ जून १९६८ )**२००१: इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९ )**१९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक (जन्म: १ ऑगस्ट १९२९ )**१९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४: केशव नारायण काळे --- मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(जन्म: २४ एप्रिल १९०४ )**१९५८: हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर -- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय (जन्म: १५ मार्च, १८६८ )**१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म: ६ सप्टेंबर १८८९ )**१९१०: ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म: १८४६ )**१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन च्या समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेतील 10 लाख लाभार्थी बँकेच्या खात्याशी आधार लिंक नसल्याने वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी, येत्या आठ दिवसात फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता बँकेत जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, विविध ठिकाणी रक्तदान व अन्नदान करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदतवाढ; पुण्यात 25 लाख वाहनांना बदलावी लागणार नंबर प्लेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन, ते मुंबई निवड संघाचे सदस्य ही होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावाने केला पराभव, आज भारत विरुद्ध बांगलादेशचा होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागेश शेवाळकर, जेष्ठ साहित्यिक, पुणे👤 नागेश काळे, लातूर👤 उत्तम कानिंदे, शिक्षक तथा निवेदक, किनवट👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 विशाल खांडरे👤 व्यंकटेश रोंटे👤 साहेबराव पाटील कदम👤 संतोष कामगोंडे👤 दिलीप लिंगमपल्ले👤 शिरीष गिरी, शिक्षक, बीड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*मी आहे प्राणवायूचा साठा**अन्नधान्याची देतो रास**तोडू नका हो मला कोणी**उपयोगी पडतो मी हमखास*मी कोण ..........?संकलन व लेखन - नंदा परदेशीजि.प. शाळा बळसाणे जि. धुळेउत्तर - Whatsapp Status वर••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गांडूळ श्वसन कोणत्या अवयवामार्फत करते ?२) गांडूळाला शेतकऱ्याचा काय म्हणतात ?३) गांडूळपासून तयार होणाऱ्या खताला काय म्हणतात ?४) गांडूळाला इंग्रजीत काय म्हणतात ?५) गांडूळाच्या शरीरातून स्रवणाऱ्या स्त्रवास स्वच्छ करून एकत्र साठवलेल्या पाण्याला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) त्वचा २) मित्र ३) गांडूळ खत ४) Earthworm ५) गांडूळपाणी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕷 *कोळी जाळं कसं विणतात ?* 🕷🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸कोळ्यांच्या पोटात काही ग्रंथी असतात. त्यातून एक दाट स्राव सतत पाझरत असतो. या स्रावापासून ते रेशमासारखे धागे बनवतात. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या वरच्या भागात दुसरा एक अवयव असतो. तो त्या स्त्रावाचा धागा तयार करण्याचं काम करतो. या अवयवाला अनेक छिद्रं असतात. या छिद्रांचा व्यास अतिशय लहान असल्यामुळे त्यातून जेव्हा हा स्राव बाहेर पाझरतो तेव्हा त्याचं रूपांतर अतिशय बारीक एखाद्या धाग्याच्या जाडीइतकाच प्रवाह तयार होतो. जोपर्यंत हा प्रवाह कोळ्याच्या शरीरात असतो तोपर्यंत तो द्रवरूप असतो; पण शरीराबाहेर पडून त्याला हवेचा स्पर्श होताच तो घनरूप धारण करतो. त्यामुळे शरीरातून बाहेर पडता पडता त्या स्रावाचा धागा बनतो आणि त्याची लांबी सतत वाढत जाते. हा धागा अशा रितीनं शरीरातून बाहेर पडत असतानाच कोळी वर्तुळाकार रिंगणातून फिरत राहतो, त्यामुळे तो धागाही त्याच्या पाठोपाठ त्या परिघात फिरतो व त्याचं एक वर्तुळ तयार होतं. हा धागा चिकट असल्यामुळे ज्या पृष्ठभागावर तो पडतो तिथं चिकटून बसतो. तसंच जेव्हा ती वर्तुळातली फेरी पूर्ण होते तेव्हा ती टोकं एकमेकांना चिकटून त्या धाग्यांचं रिंगण तयार होतं. त्यानंतर त्याबाहेरचं वर्तुळ विणलं जातं. ही दोन वर्तुळं मग आडव्या धाग्यांनी एक एकमेकांना जोडली जातात. हळूहळू त्याचं जाळं आकार घेऊ लागतं.कोळी तयार करत असलेले हे रेशीम धागेही तीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यातला चिकट धागा तो जाळ्यातली रिंगणं विणण्यासाठी तसंच माशी वैगेरे कीटकांना पकडण्यासाठी आणि त्यांचा चट्टामट्टा करेपर्यंत त्यांना जखडून ठेवण्यासाठी वापरतो. या रिंगणांना जोडणारे छत्रीच्या किंवा सायकलीच्या चाकांमधल्या काड्यांसारखे जे आडवे धागे असतात ते दुसऱ्या प्रकारच्या चिकट नसलेल्या धाग्यांपासून बनलेले असतात. आणखीही एका प्रकारचं रेशीम कोळी आपल्या कोषासाठी वापरतात. या जाळ्यांचेही विविध प्रकार आहेत. आपल्याला नेहमी दिसणारं षटकोनी प्रकारचं जाळं हा जास्तीत जास्त विणला जाणारा प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारचं जाळं एखाद्या नरसाळ्यासारखं असतं. त्याच्या रुंद तोंडात शिरलेली कीटक त्याच्या नळीकडून ओढला जातो आणि खाली टपून बसलेल्या कोळ्याच्या 'ताटात' अलगद पडतो. तिसऱ्या प्रकारचं जाळं पाण्याखाली राहणारे कोळी विणतात. त्याचं वरचं तोंडच तेवढं आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतं. बाकीचा भाग पाण्याखालीच असतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥ मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥ वदनीं तुझें नाम होतांचि खंडणा । शतखंडरसना होइल माझी ॥३॥ सांवळें सुंदर रूप तुझें दृष्टी । न देख्तां उन्मळती नेत्र माझे ॥४॥ तुज परतें साध्य आणिक साधन । साधक माझें मन होईल भ्रान्त ॥५॥ नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ । झणीं माझा अंत पाहसी देवा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे.चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिकवण*एका बागेच्या दारात बरीच वर्षे एक भिकारी बसत असे. वयोमानानुसार तो आता वृद्ध झाला होता. शरीराला कुष्ठरोगाने ग्रासले होते. अनेक रोग-व्याधींनी त्याचे शरीर पोखरले होते. तरीही तो तेथेच बसत होता. नित्यनियमाने भीक मागत होता. त्या गावच्या राजपुत्राने त्याला कित्येक वर्षे तिथे बसलेले पाहिलेले होते. पण, आता या अवस्थेत त्याला पाहून राजपुत्राला प्रश्न पडे की, 'हा या अवस्थेत का जगतो आहे ? जगण्याची इतकी लालसा का असावी याला ? अखेर एके दिवशी त्याने हा प्रश्न त्या वृद्ध भिकाऱ्याला विचारला. तो भिकारी म्हणाला, "अरे, हाच प्रश्न मी वारंवार परमेश्वराला करतो आहे की, का जगवतोस मला या अवस्थेत ? लवकर नेत का नाहीस ? कदाचित मला वाटतं, त्याने मला मुद्दाम या अवस्थेतही जगवलं असावं. मला पाहून इतरांना कळावं की, आज जरी ते सुखरूप, धडधाकट असले तरी, त्यांची वृद्धापकाळी अशी अवस्था होऊ शकेल. मला पाहून साऱ्यांनी बोध घ्यावा. असा कदाचित परमेश्वराचा हेतू असेल."* तात्पर्य : आयते खाल्याने मोक्षप्राप्ती नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18chfeVSDb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🫧 *_ या वर्षातील ४९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान**१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.* *१९६५: ’गांबिया’ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना* 🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अनुपमा ईश्वरन -- भारतीय अभिनेत्री**१९७०: राणी गुणाजी -- भारतीय मराठी अभिनेत्री* *१९६६: साजिद नाडियादवाला -- भारतीय चित्रपट निर्माता**१९६५: मुग्धा चिटणीस -- मराठी चित्रपट अभिनेत्री व कथाकथनकार(मृत्यू: १० एप्रिल १९९६)**१९६६: पुष्पा साळवे -- कवयित्री, लेखिका**१९६२: तुळशीराम दयाराम मापारी -- कवी**१९६०: स्वाती कर्वे -- लेखिका**१९५१: सूर्यकांत व्यंकप्पा धिवारे -- कवी**१९५०: ज्योती मोहन पुजारी --- ज्येष्ठ लेखिका**१९४९: अरुणकुमार निवृत्ती यादव -- कवी, लेखक**१९४८: डॉ. प्रतिभा जयंत काणेकर -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादिका* *१९३९: सीताराम रामचंद्र रायकर -- लेखक* *१९३८: अशोक सीताराम चिटणीस -- ज्येष्ठ साहित्यिक, संपादक* *१९३१: रामदास शांताराम कामत -- संगीत नाटकांत काम करणारे मराठी गायक नाट्य‍अभिनेते आणि संगीततज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी २०२२ )**१९२७: मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ ’खय्याम’ – भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: १९ ऑगस्ट २०१९ )**१९२६: नलिनी जयवंत – अभिनेत्री (मृत्यू: २० डिसेंबर २०१० )**१९२२: डॉ. शकुंतला रघुनाथ लिमये -- लेखिका* *१९१९: हरिश्चंद्र लचके -- मराठी नियतकालिकांमधून व्यंगचित्रे रेखाटणारे चित्रकार (मृत्यू: २४ जुलै २००७ )* *१९११: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (मृत्यू: २९ जून २००० )**१८९८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८ )**१८९४: रफी अहमद किडवाई -- भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९५४ )**१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९ )**१८८२: यादव माधव काळे उपाख्य अण्णासाहेब काळे --- विदर्भाचे महान इतिहासकार (मृत्यू: ११ मार्च१९४० )**१८७९: किसन फागुजी बनसोडे -- स्वातंत्र्यपूर्व भारतातील दलित चळवळीचे नेते (मृत्यू: १० ऑक्टोबर १९४६ )**१८७१: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (मृत्यू: २२ ऑक्टोबर  १९३३ )**१८६०: नारायण लक्ष्मण फडके -- मिल्स,व स्पेन्सर यांच्या ग्रंथाचे अनुवादक (मृत्यू: सप्टेंबर १९२० )**१८३६: रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ )**१८२३: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार,समाजसुधारक व इतिहासकार.त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. (मृत्यू: ९ ऑक्टोबर  १८९२ )**१७४५: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ मार्च १८२७ )**१४८६: योगी चैतन्य महाप्रभू (मृत्यू: १५ जून १५३४ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे एक भारतीय गायक (जन्म: १९ ऑगस्ट १९०८ )**२०१४: अशोक चंदनमल जैन -- मराठी पत्रकार व लेखक (जन्म: ११ एप्रिल १९४४ )**१९९४: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(जन्म: २२ ऑगस्ट १९३५ )**१९९२: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (जन्म: २१ ऑगस्ट १९१० )**१९६७: जे.रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणूबॉम्बचे जनक (जन्म: २२ एप्रिल १९०४ )**१५६४: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (जन्म: ६ मार्च १४७५ )**१४०५: तैमूरलंग – मंगोल सरदार (जन्म: ९ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला परिक्षेवर काही बोलू .....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त, रात्री उशिरा निर्णय, नव्या कायद्यानुसार सरन्यायाधीशांना वगळून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री चा 20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर होणार शपथविधी *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणूकीत वाढ करण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागाची उत्तम कामगिरी - वित्तमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचं प्रकाशन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पीएम-आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उमाकांत ओमनवार, नांदेड👤 सुवर्णा पाटील👤 निशांत कसबे👤 लक्ष्मीकांत डेबेकर👤 गणेश पाटील👤 सोमेश्वर तांबोळी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बी रघुनाथ - भगवान रघुनाथ कुलकर्णी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'* मध्ये नोंद झालेली *जगातली सर्वात महाग गायीचे नाव* काय आहे ?२) आंध्रप्रदेशमधील ओंगोल जातीची गाय ब्राझीलमध्ये किती रुपयांना विकली गेली ?३) 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष कोण होते ?४) 'गाय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) "एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करू शकतो", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) वियातिना - १९ २) ४१ कोटी ३) केसरी पाटील ४) धेनू, गो, गोमाता ५) रविंद्रनाथ टागोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 रोपांची मुळं खालच्या दिशेनं, तर खोडं वरच्या दिशेनं का वाढतात? 📒आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर एक पिकलेलं फळ पडलं, अशी आख्यायिका आहे. डोक्याला आलेल्या झिणझिण्या थांबवता थांबवता न्यूटननं विचार करायला सुरुवात केली होती. त्यातूनच या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षणाचं बल कार्यरत असल्याची जाणीव झाली, त्या बलामुळंच मग, वर हवेत फेकलेली कोणतीही वस्तू परत जमिनीकडे ओढली जाते, हेही समजून आलं. याला अर्थात अपवाद आहेत. हलकी असलेली पाण्याची वाफ वरच्या दिशेनं उडून जाते. हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या वायूनं भरलेला फुगाही वर वर उडत जातो; पण केवळ हलक्या असलेल्या वस्तूच अशा वर वर गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत वरच्या दिशेनं उडत जाताना दिसतात, खरोखरीच त्या वस्तू त्या बलावर मात करतात, की त्यांचं हे वरच्या दिशेनं उडणंही गुरुत्वाकर्षणाच्या बलाचीच किमया आहे?पक्षी मात्र सहजगत्या आकाशात विहरताना दिसतात. त्यांना हे गुरुत्वाकर्षणाचं बल खालच्या दिशेनं ओढत नाही का? की आपले पंख फडफडवत त्या बलावर मात करण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे? जेव्हा आपण विमानं तयार करायला लागलो आणि त्याच्यात बसून आकाशात झेप घ्यायला लागलो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्याच मदतीनं आकाशात उड्डाण कसं करायचं, हेही समजून आलं. तर मग जेव्हा जमिनीत पेरलेल्या बीजाला प्रथम मुळं आणि नंतर अंकुर फुटतात तेव्हा त्यांची वाढ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी होते, याचाही विचार याच अनुषंगानं करायला हवा. मुळं जमिनीत खोलवर जाऊ पाहतात, तर अंकुर आणि त्यातून पुढं तयार होणारी खोडं मात्र वरच्या दिशेनंच वाटचाल करताना दिसतात. बीज पेरल्यानंतर त्याला पुरेसं पाणी मिळालं, त्याची वाढ होऊ लागली, की त्याला प्रथम मुळं फुटतात. त्या मुळांमध्ये असलेल्या संप्रेरकांच्या प्रभावापोटी ती गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा वेध घेऊ लागतात. या गुणधर्माला जिओट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळं मग ज्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते त्या दिशेनं मुळं वाटचाल करू लागतात.दुसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरांमध्ये वेगळी संप्रेरकं कार्यरत असतात. ती प्रकाशाला प्रतिसाद देतात. साहजिकच ती इवलीशी रोपं ज्या दिशेला प्रकाश असतो त्या दिशेकडे झेपावतात. या गुणधर्माला फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळे मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीकडे दुर्लक्ष करत वरच्या दिशेनं वाटचाल करणं त्या अंकुरांना आणि त्यांचीच वाढ होत उदयाला येणाऱ्या खोडांना शक्य होतं.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥ हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥ कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥ नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वृक्षसेवेतून समृद्धी*एका गावात एक विधवा महिला आणि तिचा जगत नावाचा मुलगा राहत होते. त्यांच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड होते. जगत आईच्या सांगण्यावरून त्या झाडाला रोज पाणी देत असे. त्याच्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवत असे. एकदा जगत आजारी पडला तरी त्याने झाडाला पाणी देण्याचे व स्वच्छतेचे काम चालूच ठेवले.आजारपणातही हा मुलगा आपली सेवा करत आहे हे पाहून पिंपळवृक्षात निवास करणा-या एका देवतेला खूप समाधान वाटले. जगत जवळ येताच देवता त्याच्याशी बोलू लागली," हे मुला मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालो आहे. तुला जो काही वर पाहिजे आहे तो मागून घे." जगत म्हणाला," हे वृक्षदेवते, मी तुमची सेवा काही मिळवायची अपेक्षा ठेवून करत नाही. तुमच्यामुळे आम्हाला स्वच्छ हवा, सावली आणि लाकूड मिळते. आमच्या जीवनाचा तूच एकमेव आधार आहेस. मला काहीही नको." यावर वृक्षदेवतेने त्याला काहीतरी मागण्याचा हट्टच धरला. तेव्हा जगतने झाडाखाली पडलेली पाने नेण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपळदेवतेने त्याला अनुमती दिली. जगतने पाने गोळा केली व घरी आणून एका कोप-यात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा तो व त्याची आई उठून पाहतात तर काय पिंपळाची सगळी पाने सोन्याच्या पानात बदलली होती. जगतने वृक्षदेवतेचे आभार मानले.तात्पर्य – निरपेक्षबुद्धीने सेवा केल्यास आपल्याला फळ निश्चितच मिळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२: नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४: दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७: ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२: राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.*🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: प्रफुल्ल अंदुरकर -- कवी* *१९७५: प्रसाद ओक -- प्रसिद्ध अभिनेता, लेखक, कवी* *१९६८: विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६५: सदानंद कदम -- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३: सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका, अनुवादक**१९६१: संजीव वसंत वेलणकर -- लेखक, सोशल मीडियावर दैनंदिन लेखन* *१९६०: डॉ. सुनील सावंत -- कवी, लेखक**१९५७: हेमंत श्रीराम देशपांडे -- लेखक**१९५७: प्रफुल्ल मनोहरभाई पटेल -- माजी केंद्रीय मंत्री**१९५४: कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव -- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०: प्रा. जयंतकुमार गणपतराव बंड -- लेखक, संपादक* *१९५०: प्रा. उद्धव निंबा महाजन -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४६: अशोक सिंह परदेशी -- कवी**१९४३: डॉ.रूपचंद निखाडे -- लेखक**१९४२: अनुराधा कृष्णराव गुरव -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, शैक्षणिक विचारवंत (मृत्यू: ३० मे २०२० )**१९४०: गजानन जानोजी बागडे -- कवी (मृत्यू: १ सप्टेंबर २०१२ )**१९३६: फातिमा झकेरिया -- मुंबई टाईम्सच्या संपादिका (मृत्यू: ६ एप्रिल २०२१)**१९३५: रवी टंडन -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू: ११ फेब्रुवारी २०२२ )* *१९३२: सुहासिनी इर्लेकर --- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू: २८ऑगस्ट २०१० )**१९१८: कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२: सीताराम गणपतराव मनाठकर -- कवी ( मृत्यू: मे १९४९ )**१९०२: प्रभाकर वासुदेव बापट -- समीक्षक (मृत्यू: २६ जुलै १९४४ )**१८७४: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६ )**१८५४: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२ )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चंद्रकांत मांडरे --- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म: १३ ऑगस्ट १९१३ )**१९९५: प्रा. पां. कृ. सावळापूरकर -- जुन्या पिढितील संशोधक, विचारवंत (जन्म: १ जुलै १९०७ )* *१९९४: चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३ जून १९२९ )**१९९१: कृष्णाबाई हरी मोटे -- कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८८:कर्पूरी ठाकुर -- बिहारचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८६: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५ )**१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१० )**१८८३: वासुदेव बळवंत फडके -- राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ )**१८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होणार ? आजच्या बैठकीत ठरणार ! उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12 वाजता होणार शपथविधी सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्लीत NCR सह उत्तर भागात पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर; मृतांच्या कुटुंबियांना सरकार देणार 10 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा तडाखा, महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढणार, IMD ने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेत बदल होणार ? दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थींच्या हयातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार, उत्पन्नाबाबत प्राप्तीकर विभागाकडून घेणार माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबी; कोलकातामधील ईडन गार्डनवर 25 मे रोजी अंतिम सामना, 2 महिने रंगणार थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण ए. एडके👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दया पवार - दगडू मारुती पवार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी म्हणजे काय ?२) पक्ष्यांच्या शरीराचं तापमान साधारणपणे किती सेंटिग्रेड असते ?३) "पक्षी म्हणजे परिस्थितीकीचा ( Ecology ) लिटमस कागद आहेत", असे कोण म्हणाले होते ?४) जगात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ?५) नैसर्गिक विविधतेमुळे भारतात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ? *उत्तरे :-* १) पिसं असलेला द्विपाद होय. २) ३८° ते ४४° ३) रॉजर टोरी पीटरसन ४) ८,६०० जाती ५) १,२५० जाती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का ?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा    विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना    या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना      प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात.    एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो.    गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते.      आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.      एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं.      ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन.      एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो.        हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा विष्णुदास म्हणतात जगीं । नाहीं माझें अंगीं प्रेमभाव ॥१॥ तेणें थोर लाज वाटे पंढरिराया । ये माझ्य ह्रदया एक वेळां ॥२॥ द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायीं । अनुभव नाहीं स्वरूपाचा ॥३॥ देखावेखीं बैसें संतांचे संगतीं । नाहीं माझे चित्तीं ध्यान तुझें ॥४॥ साकारलें रूप तैं दिसे चर्मचक्षु । परी नाहीं वोळखी केवळ मनें ॥५॥ नामा म्हणे माझा उजळ करींज माथा । भेटी देउनी संतां निरवीं मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते.तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15cDHcX5yz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील ४६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सुब्रहण्यम यांनी सूत्रे हाती घेतली* *१९६०: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती.८०,००० भारतीय,ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.**१९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.**१९३२: पुण्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालय सुरू झाले**१८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर -- कवी**१९८२: सुरेश निंबाजी येरमुरे -- कवी**१९८२: सचिन आत्माराम पाटील-होळकर -- कृषितज्ज्ञ, लेखक* *१९७२: किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी -- पत्रकार, लेखक* *१९६७: रमेश परसराम बोपचे -- कवी**१९६७: संजीव शंकरराव अहिरे -- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक, कवी* *१९६४: आशुतोष गोवारीकर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता* *१९५९: मानसी मोहन जोशी -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५९: कलानंद जाधव (पुंजाराव दताराव जाधव) -- कवी, बालगीतकार, लेखक* *१९५६: हरीश भिमाणी -- भारतीय व्हॉइसओव्हर कलाकार, लेखक आणि निवेदक**१९५६: विनायक महादेव गोविलकर -- जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ, व्याख्याते, लेखक* *१९५६: डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५६: रामराव अनिरुद्ध झुंजारे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९५४: राजेंद्र गजानन साळोखे -- लेखक* *१९५४: प्रा.गणपत अंबादास उगले -- विचारवंत तथा साहित्यिक(मृत्यू: १९ जुलै २०२४)**१९५३: दत्तात्रय कडू लोहार -- कवी**१९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ – ज्येष्ठ साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४ )**१९४७: श्रीधर शंकरराव खंडापूरकर -- कवी, लेखक**१९४७: रणधीर राज कपूर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक* *१९४६: महादेवराव नथुजी घाटुर्ले -- विदर्भातील कवी, लेखक**१९२८: शांता हरी निसळ -- ज्येष्ठ संगितसमिक्षक, कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: ७ मे २०१३ )**१९१८: वसंत कृष्ण जोशी -- संस्थापक संपादक-‘दक्षता’मासिक, लोकप्रिय पोलीस तपास कथाकार(मृत्यू: २० डिसेंबर २००४ )**१९१७: गोविंद रामचंद्र आफळे -- मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार(मृत्यू: १ नोव्हेंबर १९८८ )**१८९६: रामचंद्र नारायण वेलिंगकर -- ज्ञानेश्वरी शब्दकोशाचे कर्ते**१८७५: जनार्दन सखाराम करंदीकर -- केसरी या वृत्तपत्राचे संपादक, लेखक (मृत्यू: १२ मार्च १९५९ )**१८२४: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू: २६ जुलै १८९१ )**१७१०: लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० मे १७७४ )**_१७३९: थोर मानवतावादी संत श्री.सेवालाल महाराज -- जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये सुवर्णकूप्पा येथे,आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.(मृत्यू: ४ डिसेंबर १८०६ )_**१५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी १६४२ )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: कविता चौधरी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती आणि लेखिका(जन्म : १९५६ )**२०२०: राजा मयेकर -- मराठी अभिनेते (जन्म: १९३०)**२०२०: विनायक जोशी -- मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे गायक (जन्म: ११ मे १९६१ )**२०१८: मनोहर मारोतीराव तल्हार -- प्रसिद्ध मराठी लेखक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३२ )**२०१०: श्रीराम पांडुरंग कामत -- ज्येष्ठ विश्व चरित्रकोशकार (मृत्यू: १७ मे १९३४ )**२००८: मनोरमा -- बॉलीवूडमधील भारतीय अभिनेत्री (जन्म: १६ ऑगस्ट १९२६ )**१९८८: रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८ )* *१९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष* *१९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म: १९०२ )**१९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४ )**१८६९: मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भूक म्हणजे .......?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथील महाकुंभात सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 50 कोटी भाविकांचे गंगेत स्नान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *RTE अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी 1 लाख 1 हजार 916 जणांची निवड, 85 हजार बालकांचे अर्ज प्रतिक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ * महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत 10 नोव्हेंबर2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल प्रसिद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना पीफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार, सिनेमा कालानुरूप बदलतो, त्यासोबत चालावे लागते, शुभा खोटे यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 54 सुवर्ण पदकासह एकूण सर्वाधिक 201 पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक नेते, बिलोली 👤 जना निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबुराव बोधनकर , सहशिक्षक, बिलोली👤 किरण गौड , धर्माबाद 👤 घनश्याम नानम, डाक घर, धर्माबाद 👤 रमेश सोनकांबळे 👤 गुलाब जाधव👤 रमेश पाटील कदम 👤 अविनाश सातपुते 👤 गोविंद टेकूलवार, करखेली👤 प्रल्हाद घोरबांड, कवी व गो सेवक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मामा वरेरकर - भार्गव विट्ठल वरेरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यासात येणारे यश हे दैवी देणगीचे किंवा चमत्कारांचे नसून कष्टाने साध्य होणारे यश असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?२) प्रदूषणावर नियंत्रण व कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने जगात क्लीन एनर्जीचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो ?३) कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?४) 'सिंह' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच भारतातील कोणत्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) लोणार २) फ्रान्स ३) इंग्लंड ४) वनराज, केसरी, मृगेंद्र ५) मणिपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙 घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.‘सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥ जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥ श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें । तीं तुज भूषणें सुखें मानूं ॥३॥ काय हानि जाली सांगा मजपाशीं । उद्धारा जगासी नामा म्हणे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात सुख, समृद्धी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नसते तसेच प्रत्येकाला दु:ख नसेलच असेही नाही. सुख आणि दु:ख हे, मानवी जीवनाशी कायम जुळून राहतात.तेव्हाच कुठेतरी कोणाचे दु:ख बघून डोळे भरून येतात.आणि सुख असते तेव्हा क्षणभर आराम सुद्धा मिळत नाही हेही सत्य आहे. म्हणून सुखात असताना कोणाचे मन दुखेल अशा कोणत्याही शब्दात बोलू नये व दु:ख असेल तर रडत बसू नये.कारण, पुढची वाटचाल स्वतःलाच करावी लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌟 *_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६: पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* 🌟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील -- कवयित्री* *१९६८: भाग्यश्री देसाई -- कवयित्री, अभिनेत्री, निर्माती**१९६५: सय्यद अल्लाउद्दीन अमिनुद्दीन -- प्रसिद्ध लेखक**१९६२: विजय कोपरकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१: डॉ. माधुरी हेमंत वाघ -- कवयित्री, लेखिका**१९६१: मोहनीश बहल -- हिंदी चित्रपटातील अभिनेता**१९६०: कल्पना दिलीप मापूसकर -- कवयित्री**१९५९: प्रा. डॉ. सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५८: संजीव खांडेकर -- मराठी लेखक, कवी**१९५३: अलका सुरेशराव कुलकर्णी -- कथा लेखिका**१९५२: सुषमा स्वराज -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ६ ऑगस्ट २०१९ )**१९५१: ज्योती प्रमोद गोडबोले -- कथा लेखिका**१९५०: कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे -- माजी सहकार राज्य मंत्री, सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट २०१८ )**१९३३: मधुकर रामदास सोनार -- कवी, कथाकार (मृत्यू: १५ सप्टेंबर २००४ )**१९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ )**१९३०: वृंदा रघुनाथ लिमये -- कवयित्री, लेखिका* *१९२६: डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५: मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १४  ऑक्टोबर२०१३ )**१९२२: प्रभाकर श्रीधर नेरूरकर -- ललित लेखक (मृत्यू: २९ जून १९९८ )**१९१८: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित (मृत्यू: १९ ऑगस्ट २०२० )**१९१६: संजीवनी मराठे – प्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २००० )**१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६ )**१४८३: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३० )* 🌟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: शमीम अहमद खान -- सतारवादक आणि संगीतकार (जन्म:१० सप्टेंबर १९३८)**१९९४: यशवंत नरसिंह केळकर -- कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७५: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर१८८१ )**१९७५: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७ )**१९७४: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म: १ जानेवारी १९०० )**१७५५: रघुजी भोसले -- नागपूर भोसले घरातील एक शूर सेनापती (जन्म: १६९५)**१४०५: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *शतदा प्रेम करावे .....!*प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसवण्याची पडताळणी केली सुरू, माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाकडे पाठविला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुलढण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केली नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कवयित्री अनिता माने यांना रंगत-संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते सन्मान; काव्यातून अभिव्यक्तीची उर्मी जपण्याचे कार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10 हजार मिळणार, आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत दुकान बंद करण्याचा ग्रामस्थांकडून कठोर आचारसंहिता लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पी. सावळाराम - निवृत्ती रावजी पाटील*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो, तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो. - सुदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाळवंटाचा जहाज'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती सभा होतात ?३) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ?४) 'संग्राम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कमळ हे फूल कशाचे प्रतीक आहे ? *उत्तरे :-* १) उंट २) बारा ३) ३ - ० ने ४) युद्ध, समर, संगर, लढाई ५) पवित्रता*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥ काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥ एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती. आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~