✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/195w54qqWj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 इतिहासातील घटना:• १८१५ – वॉटरलूची लढाई झाली. नेपोलियन बोनापार्टचा पराभव झाला व युरोपातील त्याचे वर्चस्व संपुष्टात आले.• १९४० – दुसरे महायुद्ध: ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी "We shall fight on the beaches..." ही प्रसिद्ध भाषणमालिका सुरू केली.• १९४६ – डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ‘गोवा मुक्ती आंदोलनाची’ सुरुवात केली.• १९७२ – ब्रिटिश योजनेनुसार बांगलादेश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनू शकला नाही.🎂 जन्मदिवस / जन्म:• १९४२ – पॉल मॅकार्टनी, प्रसिद्ध इंग्लिश गायक, बीटल्स बँडचे सदस्य.• १९५३ – जॉर्ज गॅल्वे, ब्रिटिश राजकारणी.• १९७६ – ब्लेक शेल्टन, अमेरिकन काउण्ट्री गायक.⚰️ मृत्यू:• १९२८ – रूपलाल बिस्वास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९९९ – डेसमंड ल्लुएलिन, ब्रिटिश अभिनेते (James Bond मालिकेतील Q).🗓️ विशेष दिवस :• सेशेल्स – संविधान दिवस• ऑटिस्टिक प्राईड डे (Autistic Pride Day) – ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या आत्मगौरवाचा आणि विविधतेचा सन्मान करण्याचा दिवस.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांना शाळा प्रवेश देण्यापूर्वी ......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीत घडणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे दर्शन, अत्याधुनिक संग्रहलायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प G-7 परिषद अर्ध्यावर सोडली, इस्त्रायल-इराण संघर्षामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरजवळच्या 18 गावांची महाराष्ट्रात चर्चा! एका निर्णयामुळे राज्य सरकार टेन्शनमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यस्तरीय जाहिरात एजन्सी फेडरेशन कार्यकारिणीची बिनविरोध निवड:अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार, सदस्यपदी नगरचे राजेंद्र म्याना‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सून MP-गुजरातेत दाखल, 19 राज्यांत पावसाचा इशारा:UP आणि बिहारसह 4 राज्यांत वीज कोसळून 19 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये पोहोचले, खलिस्तान समर्थकांनी आक्षेपार्ह फोटो दाखवले, घोषणाबाजी केली; भारतीय समर्थक रस्त्यावर उतरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड महिला संघाच्या अनुभवी कर्णधार सोफी डिवाइनने आयसीसी 2025 महिला वनडे वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर हरणे, साहित्यिक व शिक्षक, वसमत 👤 अनंत राजेश्वर उत्तरवार, शिक्षक, माहूर 👤 केदार पाटील ढगे, बिलोली👤 मेहताब शेख 👤 भीमराव रुद्रावाड 👤 गजानन सुरकार👤 जयदीप वाघमारे 👤 व्यंकटराव वारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*असे काय आहे ? ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलनकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तके शस्त्रांचे काम करतात. - सिसरो*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून 'इंग्रजी' हा एक पाठ्यविषय म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) कावीळ ( पिलिया ) हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?४) 'नदीची सुरुवात होते ती जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ? *उत्तरे :-* १) जून २००० २) साइप्रस ३) यकृत ( लिव्हर ) ४) उगम ५) सोनार तंत्रज्ञान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल.पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते.पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धरीला पंढरीचा चोर*धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ४ ||जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही.अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण,खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते.ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"पवित्र जल"कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्ला मसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जून 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bq8ydyuvM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्त्वाच्या घटना:1631 – मुमताज महलचा मृत्यू झाला. तिच्या स्मरणार्थ बादशहा शाहजहानने ताजमहाल बांधले.1885 – 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' अमेरिकेला भेट देण्यासाठी फ्रान्समधून रवाना करण्यात आली.1944 – आइसलँड देशाने डेनमार्कपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.1972 – वॉटरगेट प्रकरणाची सुरुवात: अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात चोरी🎂 जन्मदिवस / जयंती:1867 – बार्बरा मॅकक्लिंटॉक, अमेरिकन जेनेटिसिस्ट व नोबेल पुरस्कार विजेती.1898 – मो. दा. हातकणंगलेकर, मराठी साहित्यिक, चरित्रकार.1936 – के. नारायणन कुरूप, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त.1943 – निवृत्ती इंदुरीकर, मराठी कीर्तनकार व प्रवचनकार.1980 – वीनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू🕯️ मृत्यू:1631 – मुमताज महल, मुघल सम्राज्ञी.1996 – राजेश खन्ना यांची चित्रपट "आनंद" मधील सहकलाकार उत्पल दत्त यांचे निधन.📜 इतर माहिती:हा दिवस आइसलँडचा प्रजासत्ताक दिवस (National Day of Iceland) म्हणून साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेला चाललो आम्ही*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गडचिरोली - आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लातूरमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका घोड्याला दयामरण; प्रशासन सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य बँकेचे सी-सॉक सेंटर देशात अव्वल, नाबार्ड कडून गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विद्यार्थ्यांनी शॉर्टकट न वापरता मेहनतीने जीवन यशस्वी करावे:महात्मा फुले महाविद्यालयात आ. यावलकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय खेळाडू जखमी, BCCI कडून बदली खेळाडूची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आकाश रेड्डी येताळकर, युवा नेते, धर्माबाद👤 धनंजय गुडसुरकर, साहित्यिक, लातूर 👤 गजानन पाटील👤 गणेश गुंडेवार👤 आप्पा यलकटवार👤 दिग्विजय चव्हाण पाटील👤 लालूभाई शंकरोड, धर्माबाद 👤 गणपत कल्हाळे👤 भास्कर भेदेकर चिटमोगरेकर👤 साईबाबा बनसोडे, आरोग्य विभाग, नांदेड 👤 प्रवीण जावळे👤 अक्तर शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 02*असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो ?**सांगा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नकाशा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही करण्याची प्रेरणा होते, तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हवाई सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?२) मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?३) पाकिस्तानपासून बांगलादेशाची निर्मिती कोणत्या भारतीय प्रधानमंत्र्यानी केली ?४) 'धान्य साठवण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कवकांच्या पोषण पद्धतीला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) ४८ वा २) ५२ दात ३) इंदिरा गांधी ४) कोठार ५) मृतोपजीवी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 कच्चे मांस खाल्ल्यास काय होते ?📕आदिमानव शिकार करायचा. सुरुवातीच्या काळात तो कच्चे मांस खायचा. आजही जगात काही भागात अत्यंत मागासलेल्या अशा आदिवासी जमातीमध्ये कच्चे मांस खाण्याची प्रथा आढळून येते. जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार मानव चवीचवीने, विविध प्रकारे शिजवून/भाजून मांस खाऊ लागला. आज तर मांसाचे पदार्थ बहुतांश सर्वच हॉटेलांमध्ये उपलब्ध असतात व खवैय्ये या पदार्थावर हात मारताना दिसतात.कच्चे मांस खाल्ल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे शिजवणे-भाजणे यामुळे अन्न पचायला सोपे होते. मसाल्यांच्या वापरामुळे ते चविष्ट बनते. अर्थात याहून महत्त्वाचे म्हणजे कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला टेपवर्म किंवा टेपकृमींचा संसर्ग होऊ शकतो. टिनिया सोलीयम टिनीया सजायनाटा, ट्रिचिनॅलीस स्पायरॅलीस आणि फॅस्की ओला हेपॅटीका अशी या टेपकृमींची नावे आहेत. याखेरीज कच्चे मांस खाल्ल्याने अँथ्रक्स, अॅक्टीनोमायकोसीस (एक बुरशीजन्य रोग), प्राण्यांचा क्षयरोग तसेच अन्नविषबाधा इ. रोगही आपल्याला होऊ शकतात.आजकाल मुद्दाम तर कच्चे मांस कोणी खाणार नाही. पण हॉटेलमध्ये किंवा खूप लोक एकत्र जेवत असतील तशा ठिकाणी (खानावळ, लग्नाच्या मेजवान्या वगैरे) घाईगर्दीने मांस शिजवले जाण्याची शक्यता असते किंवा मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्यासाठी रोगट जनावरांचे मांस वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मांस खाणाऱ्यांनी त्यांना अशा प्रकारे त्रास होणार नाही याची खात्री करणे आवश्यक ठरते. सर्वात चांगला उपाय म्हणजे एकतर घरीच मांसाहार करणे आणि अनोळखी किंवा खात्री नसेल त्या ठिकाणी मांसाहार टाळणे. अन्यथा आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• माणूस जसा रंग आणि रूपाने वेगळा दिसतो. तसेच त्याचे विचार, राहणीमान , बोलीभाषा , खाद्यपदार्थ हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून एखाद्याच्या रूपाकडे बघून किंवा त्याच्या बोलीभाषेकडे बघून त्याला नाव ठेवू नये. कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. रंग, रूप, राहणीमान जरी वेगळे असतील तरी शेवटी तो एक मानव आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_दुसरी बाजू_*ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत पहाटे समुद्र किनारी फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक व्यक्ती महिलेच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे आणि जवळच एक मदिराची बाटलीसुद्धा ठेवलेली होती. संतांना वाटले की, हे किती पापी मनूष्य आहेत. सकाळीच मदिरा सेवन करून अशा अवस्थेत पडलेले आहेत. यांना एवढेसुद्धा भान नाही की एका सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागावे. विचार करून संत पुढे निघाले. थोड पुढे गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती समुद्रात बुडत असल्याचे दिसले. संतांना त्याची मदत करायची होती पण त्यांना पोहता येत नव्हते. म्हणून हताश होऊन ते किनाऱ्यावरच उभे राहिले. तितक्यात महिलेच्या मांडिवर डोके ठेऊन झोपलेला व्यक्ती उठला आणि समुद्रात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.यावर संत विचारात पडले की आता या व्यक्तीला काय बोलू. याने तर एका माणसाचे प्राण वाचवून खूप मोठे पूण्य केले आहे. संत लगेच त्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याला विचारले की आपण कोण आहात आणि येथे काय करताय?यावर त्या व्यक्तीने सांगितले की, गुरूजी मी एक मच्छीमार आहे. बऱ्याच दिवसांपासून समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलो होतो, आज सकाळीच किनाऱ्यावर परत आलो आहे. महिलेकडे बघून तो म्हणाला की ती माझी *आई* आहे आणि मला घरी नेण्यासाठी आली आहे. घरात भांडी नसल्यामुळे तीने मदिराच्या बाटलीत पानी भरून आणले. लांबच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो म्हणून किनाऱ्यावर *आई* च्या मांडीवर डोके ठेवून झोपलो होतो.हे ऐकून संताच्या डोळ्यात पाणी आले, त्यांना वाटले मी अत्यंत वाईट विचार करत होतो. समोर पाहिले ते सत्य मानून त्यांच्याविषयी वाईट विचार करत होतो. पण वास्तविकता मात्र वेगळीच आहे.*तात्पर्य*कोणतीही गोष्ट आपण बघत असतो ती दिसते तशी नसते, त्याची एक दूसरी बाजू असते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत आपले मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार करावा. *सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत जायला पाहिजे.* नाहीतर आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते....•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1f5m3XXEuj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१६ जून हा वर्षातील १६७ वा दिवस आहे🚩 महत्त्वाच्या घटना - २०१३: उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. या आपत्तीत किमान ६,००० लोकांचा मृत्यू झाला. ही २००४ च्या सुनामीनंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते.१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर लोकमान्य टिळक यांची सुटका झाली.१९०३: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना झाली.१९६३: व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेनं अंतराळात जाणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवला.२०१०: भूतानने तंबाखूवर संपूर्ण बंदी घातली.🚩 जन्म :- १९५०: मिथुन चक्रवर्ती – प्रसिद्ध भारतीय अभिनेते.१९६८: अरविंद केजरीवाल – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक.१९९४: आर्या आंबेकर – गायिका.१९२०: हेमंत कुमार – गायक, संगीतकार व निर्माते.१९३६: अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी.🚩 मृत्यू :-२०१५: चार्ल्स कोरिया – प्रसिद्ध भारतीय आर्किटेक्ट२०२०: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी१९२५: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील कायदे पंडितसंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेच्या व्यथा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इंद्रायणी दुर्घटना - मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एअर इंडियाचा मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात ! अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला देणार प्रत्येकी 25 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए अखेर जुळले; राजकोटमध्ये होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 48 तास महत्त्वाचे; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान; कोकण, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - तेलंगणा सीमेलगत बासर येथे श्री सरस्वती देवस्थान आहे. या ठिकाणी दर्शनाला गेलेल्या 5 भाविकांचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *NEET-UG चा निकाल जाहीर, राजस्थाचा महेश कुमार पहिला तर महाराष्ट्राचा कृष्णाग जोशी तिसरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने हरवून जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पापनवार, मा. शिक्षक, नांदेड 👤 डॉ. मंगेशकुमार आंबीलवादे, छत्रपती संभाजीनगर 👤 अनिल हिस्सल, शिक्षक, जळगाव 👤 गोविंद नलावाड, शिक्षक, देगलूर 👤 विजयकुमार भोले 👤 कार्तिक स्वामी 👤 ज्योती पाटील 👤 गजानन गडपवार 👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे 👤 ज्ञानेश्वर चिखले 👤 दत्तारेड्डी सुरुकुटवार, आरोग्य विभाग, धर्माबाद 👤 माधव गैनवार, धर्माबाद 👤 अशोक चेपटे👤 ऋषिकेश भंडारे येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*अशी कोणती जागा आहे ?**जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही* *जंगल आहे पण झाडी नाही*आणि *शहर आहे पण पाणी नाही*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणाऱ्यास ईश्वर योग्य फळ देतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब कोणत्या संघाने पटकावला ?२) आंबट फळातून कोणता व्हिटॅमिन मिळतो ?३) सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करताना मुख्य घटक कोणते ?४) 'दुसऱ्यावर उपकार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'आंबेडकर ए लाइफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) दक्षिण आफ्रिका २) व्हिटॅमिन 'सी' ३) पेशी संरचना, जीवनपद्धती, उत्पादकता ४) परोपकारी ५) शशी थरूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 गुडमार (बेडकीचा पाला) खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही ? (गुडमार ही एक वनस्पती आहे) 📕साखर किंवा पेढा खाऊन नंतर चहा पिऊन पहा. काय म्हणता हा प्रयोग तुम्ही केला आहे ? असे असेल तर नक्कीच तुम्ही तो परत करणार नाही! कारण चहा अगोड लागतो. दुसरी एक गंमत सांगते... काही खेड्यांमध्ये एक प्रथा आढळते. साप चावलेल्या माणसाला मिरची किंवा कडूनिंबाचा पाला खायला देतात. त्या माणसाने जर मिरचीची चव तिखट वा कडूनिंबाची कडू सांगितली, तर तो बरा होणार असे मानतात व जर चव नाही असे तो म्हणाला, तर तो मरणार असे मानतात. ह्याबद्दल आता माहिती घेऊ.जिभेमुळे आपल्याला चव कळते. चव कळण्यासाठी जिभेवर स्वादांकूर असतात. या स्वादांकुरावर एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात जरी ठेवला तरी आपल्याला चव कळते. जिभेच्या कडांना पाठीमागच्या बाजूस व शेंडयाला कडू, तुरट, आंबट, गोड, खारट अशा चवी वेगवेगळ्या प्रमाणात समजतात. स्वादांकुराचे कार्य व्यवस्थित चालले तरच चव समजते.गुडमार ही एक वनस्पती आहे. तिचा पाला खाल्ल्यानंतर मोड चव कळणाऱ्या वादांकुरावर परिणाम होतोच हे स्वादांकूर त्यांचे कार्य करू शकत नाहीत. साहजिकच गुडमार खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाही. विषारी सापाच्या विषाचा स्वादांकुरांतून चवीची संवेदना मेंदूपर्यंत वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम झाल्याने काही विशिष्ट प्रकारचे साप चावल्यास तिखट, कडू चव कळत नाही. म्हणजे वर सांगितलेल्या खेड्यातील प्रथेत हे वैज्ञानिक तथ्य आहे. पण चव कळत नाही म्हणजे माणूस मरणार, असे मानणे योग्य नाही. सापाच्या विषावरील प्रतिद्रव्य दिल्यास व इतर उपचार मिळाल्यास साप चावलेली व्यक्ती वाचू शकते.काही वेळा स्वादांकुरांचे कार्य काही प्रमाणात कमी होते किंवा आपण खाल्लेल्या पदार्थामुळे त्यांच्या जाणिवाबोथट होतात. याचे उदाहरण म्हणजे तिखटाचा दुसरा घास पहिल्या घासापेक्षा कमी तिखट लागतो व साखर खाऊन चहा पिल्यास चहा अगोड लागतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव माझा विठू सावळामाळ त्याची माझिया गळा….. || धृ ||विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ ||साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…. || २ ||भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतोरांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसेंदिवस माणसाचे वय वाढत जाते. तसतसे त्याच्यात बदल आलेला दिसून येतो. पण, वाढत्या वयाबरोबरच किंवा परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ज्यांचे सकारात्मक विचार बदलत नाही हीच खऱ्या अर्थाने त्याच्यांकडे असलेली संपत्ती असते. अशा संपत्तीचा कधीही अंत होत नाही. म्हणून आपल्यासोबत कोणी कसेही वागले तरी चालेल पण,आपण मात्र आपल्यात असलेल्या मौल्यवान संपत्तीला कायमस्वरूपी जपावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कार एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे . तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल . तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे . तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले " हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली . नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला " तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. " तो चपाती घेऊन गेला . तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला " आई , मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे. हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.🙏 *तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेले चांगलं कर्म तुमच्याकडे परत येत.*🙏🌹 तात्पर्य :- *चांगल्या कर्माचा परतावा नेहमी चांगलाच मिळतो* 🙏•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 एप्रिल 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/07.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील १२० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना:१९२५)**२००७: दिलीप कुमार यांना फाळके रत्न पुरस्कार**१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९९५: ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.**१९७७: ९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष,संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.**१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.**१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.**१६५७: शिवाजी महाराजांनीमोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला केले*🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: रोहित शर्मा – प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार**१९७०: पुष्कर श्रोत्री -- चित्रपट अभिनेते, सूत्रसंचालक**१९७०: सुवर्णा व्यंकट मुळजकर -- कवयित्री**१९६७: जयंत कमलाकर झामरे -- लेखक**१९६४: इयान अँड्र्यू हीली -- ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६१: दिवाकर शेजवळ -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५८: अरुण शेवते -- मराठी भाषेतील साहित्यिक, संपादक व प्रकाशक**१९५५: प्रदीप सरकार -- बॉलीवूडमध्ये काम करणारे भारतीय लेखक आणि दिग्दर्शक (मृत्यू: २४ मार्च २०२३ )**१९५०: डॉ. ह. ना.जगताप -- प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक* *१९५०: प्रा.अर्जुन बळीराम जाधव -- प्रसिद्ध लेखक**१९४८: डॉ. श्रीराम वसंत गीत -- संशोधक, लेखक**१९२६: श्रीनिवास खळे – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू: २ सप्टेंबर २०११ )**१९२४: रामचंद्र सोवनी -- जीवशास्त्रज्ञ,विज्ञान लेखक (मृत्यू: १ मे २००७ )**१९१०: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९८३ )**१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’(मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८ )**१८७०: धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४ )**१८४३: रामचंद्र भिकाजी गुंजीकर --- मराठी ग्रंथकार आणि संपादक (मृत्यू: १८ जून १९०१ )**१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ(मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: ऋषी कपूर- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते(जन्म: ४ सप्टेंबर १९५२ )**२०१२: अचला सचदेव -- भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: ३ मे १९२० )**२०१०: डॉ. रमेश शास्त्री -- गीतकार (जन्म: २ ऑगस्ट १९३५)**२००३: वसंत पोतदार – मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ )**२००१: श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक,गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म: २१ ऑगस्ट १९२४ )**१९४५: नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म: २० एप्रिल १८८९ )**१९१३: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - गडचिरोली*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र देशातील पहिले स्वतंत्र शिप बिल्डिंग धोरण जाहीर करणारे राज्य; जहाज बांधणीमध्ये मोठी क्रांती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 71 जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्नटोल माफी ते पीक विमा योजना बाबत घेतले 11 महत्त्वाचे निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कलाविश्वात शोककळा ! प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते प्रकाश भेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये द्यावे लागतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - कोलकताने दिल्लीला 14 धावाने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. अर्चना नागोराव येवतीकर, धर्माबाद👤 गजानन काठेवाड, PSI, नांदेड 👤 शिवाजी भाटापूरकर 👤 श्रीकांत चैनपूरकर 👤 रविकुमार कमलाकर👤 अभिजित नाईनवाड 👤 ओम कांबळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 51*दिसतोय पाण्यासारखा रंग माझा लाल**प्रत्येक प्राण्यात आहे माझा संचार**घेतले आहे स्वतःला चार गटात वाटून**पुढे चालवितो जीवन प्राणवायू मिसळून**जर कराल मला दान**तर वाचवाल इतरांचे प्राण**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सूर्यफूल ~~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक माधव तनमुदले, सिद्धार्थ शिरसे, बालाजी पाटील चिरलीकर, सौ. लिना सुपारे, उज्वला इंगळे, दीपश्री वाणी, हरिदास रामदिनवार, श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, अनिकेत सायबलू, भाग्यश्री बाभळीकर, संगीता दरबस्तेवार, प्रतिक उकले, लालन्ना गुडलावार, अर्चना नंदगावकर, संगय्या शिवराज होनगुंटे, सुरेश द्रोपतवारमनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरी विद्या तीच की ; जिच्यामुळे आपण आपल्या आत्म्याला, स्वतःला, ईश्वराला आणि सत्याला ओळखू शकतो. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बीग बेन नावाचे प्रसिध्द मनोरा कोणत्या देशात आहे?२) ई मेल चा अर्थ काय आहे ?३) राष्ट्रीय भाला फेक दिवस केंव्हा असतो?४) "जय जिनेंद्र" या एका अभिवादनाचा अर्थ काय?५) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केंव्हा झाली आहे?*उत्तरे :-* १) इंग्लंड २) इलेक्ट्रॉनिक मेल . ३) ७ ऑगस्ट. ४) तीर्थंकारास नमस्कार. ५) 14 ऑगस्ट 1962*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 ************************'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे.फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया नोळखतां ॥४॥आलों मी संसारीं गुंतलों व्यापारीं । आझूनि कां श्रीहरि नोळखली ॥५॥सहस्र अपराध जरी म्यांरे केले । तारिलें विठ्ठलें म्हणे नामा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसेंदिवस माणसाचे वय वाढत जाते. तसतसे त्याच्यात बदल आलेला दिसून येतो. पण, वाढत्या वयाबरोबरच किंवा परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ज्यांचे सकारात्मक विचार बदलत नाही हीच खऱ्या अर्थाने त्याच्यांकडे असलेली संपत्ती असते. अशा संपत्तीचा कधीही अंत होत नाही. म्हणून आपल्यासोबत कोणी कसेही वागले तरी चालेल पण,आपण मात्र आपल्यात असलेल्या मौल्यवान संपत्तीला कायमस्वरूपी जपावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••• *मुंगी आणि टोळा*एकदा एक हिरवळीत मुंगी आणि टोळा राहत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मुंगी दररोज सकाळी उठून अन्न गोळा करत असे. ती आपल्या घरट्यात धान्याचे कण, लहानसे अन्न साठवायची. ती फार कष्ट करून दिवसभर अन्न साठवायची. पण टोळा मात्र दिवसभर गाणी गात बसायचा. तो मुंगीला हसून म्हणायचा, “अगं, तू इतकी मेहनत का करतेस ? उन्हाळा आहे, मजा कर ! नाच, गा, मोकळा वेळ घालव !”मुंगी म्हणायची, “आपण आता मेहनत केली नाही, तर पावसाळ्यात उपासमारीची वेळ येईल. अन्न साठवणे गरजेचे आहे.”टोळा हसत राहिला आणि मजा करत राहिला. काही महिन्यांनी पावसाळा आला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. टोळ्याला अन्न मिळेना. त्याला उपासमारीची वेळ आली. शेवटी तो मुंगीच्या घराकडे गेला आणि मदत मागितली. मुंगी म्हणाली, “मी मेहनत केली, म्हणून आज माझ्याकडे अन्न आहे. तू वेळ वाया घालवलीस.”तात्पर्य : "मेहनत करणाऱ्याचे नेहमी चांगले भविष्य असते, तर आळशीपणा संकटात टाकतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/05.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧿 *_आंतरराष्ट्रीय नृत्य दिन_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ११९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: मध्यप्रदेशमध्ये मलखांबाला राज्य खेळाचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* *१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.**१९४५: दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली**१९३३: ’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: प्रियदर्शन जाधव -- मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक* *१९७९: आशिष नेहरा -- भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज तथा प्रशिक्षक**१९७२:तुषार जोशी-- कवी* *१९७१: आनंद भाटे -- किराणा घराण्याचे भारतीय शास्त्रीय गायक**१९७०: स्वानंद किरकिरे -- मराठी व हिंदीतील गीतकार, गायक तसेच लेखक* *१९७०: आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू**१९६६: फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज**१९६५: हेमंत मधुकर डांगे -- प्रसिद्ध कवी,गझलकार, लेखक* *१९६३: डॉ.सुधीर राजाराम देवरे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, संपादक, अहिराणी भाषा संशोधक**१९५७: दीपक शिर्के -- भारतीय अभिनेता* *१९५२: माधुरी बळवंत पुरंदरे --भाषांतरकार, चरित्रकार, संपादक, नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान* *१९५०: अनिलकुमार तुळशीरामपंत काटकर -- लेखक**१९४६: अजित जोगी -- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: २९ मे २०२० )* *१९४६: रवींद्र वसंत गुर्जर -- ज्येष्ठ साहित्यिक, मराठी अनुवादक-लेखक* *१९४६: पं. प्रदीप नाटेकर -- ज्येष्ठ गायक**१९४३: चंद्रकांत मेहेंदळे -- नव्या रंगकर्मींना मार्गदर्शन करणारे, अनेक नाट्य स्पर्धांसाठी परीक्षण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी (मृत्यू: ३० मे २०२० )**१९३६: झुबिन मेहता – भारतीय संगीतकार**१९२४: पुरुषोत्तम रामचंद्र बेहरे -- मराठी लेखक, संपादक**१९१५: सीताराम किसन उके -- भक्ती गीते (मृत्यू: ६ जून १९५० )**१९११: अनंत हरी लिमये -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९७४ )**१९१०: अरविंद गंगाधर मंगरूळकर --- संपादक, संशोधक, समीक्षक (मृत्यू: २७ मे १९८६ )**१९०१: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (मृत्यू: ७ जानेवारी १९८९ )**१८६७: डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (मृत्यू: ७ एप्रिल १९३५ )**१८४८: राजा रवि वर्मा – भारतीय चित्रकार आणि कलाकार (मृत्यू:२ ऑक्टोबर १९०६)* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: इरफान खान - चित्रपट अभिनेता (जन्म: ७ जानेवारी १९६७ )**२००६: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८ )**१९९९: मोहन वसंत गोखले -- मराठी अभिनेते-दिग्दर्शक (जन्म: ७ नोव्हेंबर १९५३ )**१९८०: श्रीकृष्ण केशव क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१ )**१९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १८९९ )**१९६०: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी.हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (जन्म: ८ डिसेंबर १८९७ )**१९४५: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म: ७ ऑक्टोबर १९०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - धाराशिव*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : शेखर कपूर, अजित कुमार, नंदामुरी बालाकृष्ण यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील किनारी राज्याची मत्स्य व्यवसाय परिषद संपन्न, मासेमारी क्षेत्रातील सुधारणा व गुंतवणूक वाढणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीतील वृद्धांसाठी मोफत उपचार, 70+ वयाच्या लोकांना 10 लाख रुपयांपर्यंत उपचार; 5 लाख रुपयांचा विमा देखील उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ST महामंडळाची श्वेतपत्रिका, मेडिक्लेम योजना, हॉटेल थांब्यासाठी नवं धोरण; परिवहन मंत्र्यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे शंकर महादेवन अन् सोनाली कुलकर्णीं ठरले ब्रँड ॲम्बेसिडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 : वैभव सूर्यवंशीच्या दमदार शतका मुळे राजस्थानचा गुजरातवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नीलम गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका, पुणे 👤 राजू गजरे👤 मनोजसिंग चव्हाण, पत्रकार 👤 पांडुरंग डोबडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 50*माझ्यात बघा सूर्याचा आकार**त्यामध्ये मिळतील बिया हजार**खायला येतो पक्षाचा थवा**रंगाने आहे केसरी पिवळा**सूर्याचे करतो पहिले दर्शन**खाऊन होईल मेदांचे पोषण**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मधमाशी~~~~~~~~~~~~~~~~ विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, अर्चना नंदगावकर, संतोष कासराळीकर, कवी दत्ताहरी कदम, सुरेश द्रोपतवार, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, लालन्ना गुडलावार, माधव तनमुदले, भाग्यश्री बाभळीकर, संगीता दरबस्तेवार, सिद्धार्थ शिरसे, बालाजी पाटील चिरलीकर, सौ. लिना सुपारे, उज्वला इंगळे, मनिषा जोशी, हरिदास रामदिनवारमनःपूर्वक अभिनंदन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मातेच्या ममतेचा एक बिंदूही अमृताच्या समुद्रापेक्षा मधुर असतो. - जयशंकर प्रसाद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ मधील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब कोणी पटकावला ?२) पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला ?३) ज्योतिबांना सावित्री कोणत्या नावाने हाक मारीत असे ?४) 'खूप मोठा विस्तार असलेले' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिले बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) डेमी मूर, अमेरिकन हॉलीवुड अभिनेत्री, वय ६२ वर्षे २) पहिले बाजीराव पेशवा ( सन १७३६ ) ३) शेठजी ४) विस्तीर्ण, ऐसपैस ५) विसाजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक नृत्य दिवस निमित्ताने लेख**नाचता येईना अंगण वाकडं......*नृत्य कोणाला आवडत नाही ? लहानांपासून थोरापर्यंत सर्वानाच नृत्य आवडते. व्यायामाचा सर्वांगसुंदर प्रकार म्हणजे नृत्य. नृत्य केल्याने आपल्या शरीराच्या सर्वच अवयवाची नकळत हालचाल होते आणि त्यातून आपल्या शरीराची जडणघडण देखील होते. नृत्य करण्यासाठी त्याला संगीताची जोड असावी लागते त्याशिवाय नृत्य करण्यात काही मजा नसते. कुठून तरी बँडचा आवाज कानावर पडला की आपले पाय थिरकायला लागतात. एखादे संगीत ज्यात नृत्य आहे ते ऐकायला मिळाले की मनातून वाटतं की जरा नाचावं. काहीजण मनसोक्त नाचतात तर काहीजण नाचण्यासाठी संकोचतात. प्रत्येकजण मनसोक्त कुठे नाचतो ? तर ते एखाद्या लग्न कार्यात किंवा मिरवणुकीत. त्याठिकाणी कोणाच्याही मनाची पर्वा न करता बेधुंदपणे नाचल्या जाते. मेरे यार की शादी है म्हणत मित्राच्या लग्नात पहिल्यांदा नाचणारे अनेकजण असतात. उत्सवाच्या मिरवणुकीत देखील पहिल्यांदा नाचणारे अनेकजण सहभागी होतात. लाजणारे आणि मनात जराशी शंका बाळगणारे मंडळी घरात एकटे असतांना दारं खिडक्या बंद करून आपल्या आवडत्या गाण्यावर मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतात. लहान मुलं नाचताना पाहून घरातील सर्वानाच विशेष आनंद होतो. मग ते बाळ नुसते हातपाय हलवले तरी बरं वाटतं. प्रत्येक राज्याची, प्रांताची, धर्माची विशेष अशी पारंपरिक नृत्यकला असते. आदिवासी लोकांची नृत्यकला एक वेगळी प्रकारची असते. गुजरातचा गरबा नृत्य संपूर्ण देशात विशेष करून प्रसिद्ध आहे. तर पंजाबचा पंजाबी नृत्य म्हटले की कानावर ऐकू येतो एक शब्द हाडीप्पा. दक्षिणेत विविध प्रकारचे नृत्य विशेष आकर्षण निर्माण करणारे मनोरंजक आहेत. महाराष्ट्र मध्ये लावणीचा नृत्य प्रकार विशेष करून प्रसिद्ध आहे. जुने मराठी चित्रपट म्हटले त्यात लावणी असणारच. त्याच सोबत आपल्या राज्यात कोळी नृत्य देखील खूप प्रसिद्ध आहे. फक्त नृत्याच्या जोरावर पुढे आलेले कलाकार म्हणून आपण अनेक कलाकारांना ओळखतो त्यात विशेष करून मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, प्रभुदेवा, चिरंजीवी. यांची नृत्याची शैली आकर्षक आणि सर्वांपेक्षा भिन्न आहे म्हणूनच ते आपले नृत्य जपून आहेत. अभिनेत्रीला नृत्य आल्याशिवाय सिनेमा करता येत नाही. तरीदेखील काही ठळक अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्यावर अनेकांना फिदा केले त्यात हेलन केलर, मीनाकुमारी, हेमामलिनी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय असे अनेक नावाची लांबलचक यादी तयार करता येऊ शकेल. आपल्या जीवनात जरासे आनंद मिळवायचे असेल तर मनमुराद नृत्य करता यायला हवं. ज्याप्रकारे बाथरूम सिंगर असतात तसे बेडरूम डान्सर देखील व्हायला पाहिजे. उगीच मला नाचता येत नाही म्हणून नाक मुरडण्यात काही अर्थ नाही. नाचण्यासाठी काही लोकं शिकवणी देखील लावतात. अवश्य लावायला पाहिजे. कोणतेही ज्ञान गुरू शिवाय मिळत नाही. क्रमशः- नासा येवतीकर, धर्माबाद9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी । वासनेची बेडी पडाली पाथीं ॥१॥सोडवण करा आलेनो संसारा । शरण जा उदारा विछोबासी ॥२॥लटकी माया देवी गर्भवासीं गोंवी । नरक भोगवी नानायोनी ॥३॥नामा ह्मणे तुह्मी विचारावें मनीं । सोयरा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गाने प्रत्येकालाच तोंड नावाची अनमोल संपत्ती दिली आहे. त्या संपत्तीचा योग्य रितीने वापर केला तर ती संपत्ती अजरामर होऊन जाते. अन् चुकूनही एक शब्द जरी तिच्यातून बाहेर पडल्यावर एखाद्याचे मन तर दुखतोच पण, त्याचे परिणाम सुद्धा स्वतःला ही तेवढेच भोगावे लागतात. म्हणून म्हणतात की, तोंड सांभाळून बोलावे.कदाचित हे खरे असावे म्हणून कोणासोबत किंवा कोणाच्या बाबतीत बोलताना जरा विचार करून बोलावा.कारण चांगले बोलण्याने आपलेही वाईट होणार नाही. अन् नको त्या शब्दात बोलल्याने आपलाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सन्मान होणार नाही. कारण ऐकणारे प्रत्येक माणसं बुध्दीहीन नसतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वीर प्रताप आणि स्वावलंबन*प्राचीन भारतात, एका दूरच्या राज्यात प्रताप नावाचा एक तरुण रहात होता. त्याचा जन्म एका सरदाराच्या घरात झाला होता, त्यामुळे सर्व सुखसोयी त्याला मिळाल्या होत्या. पण प्रतापला नेहमीच वाटायचं की यश म्हणजे केवळ वडिलांची पदवी नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वावर मिळालेली प्रतिष्ठा असते.एक दिवस, राज्यावर शत्रूंचा हल्ला झाला. राजा आणि सर्व सरदार रणांगणावर गेले. प्रतापही युद्धात गेला, पण अपघाताने तो एका दूर डोंगराळ भागात हरवला. जवळ न सैनिक होते, न शस्त्रं. फक्त त्याचा धीर होता.अशा कठीण परिस्थितीत प्रतापने स्वतः ठरवलं — "मी इथेच थांबून मदतीची वाट पाहणार नाही. माझ्या बुद्धीने आणि श्रमाने स्वतःच मार्ग शोधेन."त्याने डोंगरातली झाडं वापरून साधी शस्त्रं तयार केली. स्थानिक लोकांना एकत्र करून, त्यांना युद्धाचं शिक्षण दिलं. काही महिन्यांतच प्रतापने एक छोटी पण शिस्तबद्ध सेना उभी केली. जेव्हा राजाला शत्रूंशी झुंजताना अडचण आली, तेव्हा प्रताप आणि त्याच्या सेनेने अचानक युद्धभूमीत प्रवेश केला आणि विजय मिळवून दिला.राजा फारच प्रभावित झाला आणि सगळ्यांसमोर प्रतापचं कौतुक केलं."हा तरुण राजपुत्र आहे, पण त्याचं खरं सामर्थ्य आहे — स्वतःच्या श्रमावर, बुद्धीवर आणि धैर्यावर उभं राहणं," राजा म्हणाला, प्रतापने सर्वांना एक शिकवण दिली - "स्वावलंबन म्हणजे संकटांतही हार न मानता स्वतः मार्ग तयार करणं !"•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 एप्रिल 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/04.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪻 *_ या वर्षातील ११८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪻 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪻••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: ब्रम्हा या सुपरसैनिक क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी* *१९६९: चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.**१९२०: अझरबैजानचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.**१९१६: होम रुल लीगची स्थापना*🪻 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪻••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: डॉ. सुनीता सावरकर -- लेखिका**१९८१: सुजाता वसंत घाटगे -- लेखिका, कवयित्री**१९८०: श्याम राघोजी माळी -- कवी, गीतकार**१९७९: शर्मन जोशी -- भारतीय अभिनेता**१९७५: सुवर्णा अनिल पाटुकले -- प्रसिद्ध कवयित्री* *१९६८: अँडी फ्लॉवर – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू**१९६१: प्रा. रसिका विठ्ठल देशमुख -- लेखिका आहारतज्ज्ञ**१९५६: पंडीत नयन घोष -- भारतीय तबला आणि सतार वादक**१९५४: उषाकिरण सुन्हेरसिंह आत्राम -- प्रसिद्ध कवयित्री, कथाकार, बालगीतकार**१९५०: स्मिता जोशी- जोहरे -- कवयित्री**१९४९: गीतांजली अविनाश जोशी -- लेखिका, कवयित्री, संपादिका**१९४९: विठ्ठल बुधाजी लांजेवार -- ६व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कवी, लेखक**१९४२: माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटर**१९३७: सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष (मृत्यू: ३० डिसेंबर २००६ )**१९३१: मधू मंगेश कर्णिक – सुप्रसिद्ध मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक,६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष**१९२९: भानू अथैया -- भारतीय पोशाख डिझाइनर आणि चित्रकार(मृत्यू: १५ ऑक्टोबर २०२० )**१९२८: वसंत नरहर फेणे -- कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: ६ मार्च २०१८ )**१९०६: भवानीशंकर श्रीधर पंडित -- कवी, समीक्षक (मृत्यू: २१ जानेवारी १९७८ )**१९००: विष्णू प्रभाकर लिमये -- लेखक (मृत्यू: २८ मार्च १९८४ )**१७५८: जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८३१ )* 🪻 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सलीम घौस -- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेते, नाट्य दिग्दर्शक आणि मार्शल आर्टिस्ट (जन्म: १० जानेवारी १९५२ )**२०२१: शेखर ताम्हाणे -- नाट्यलेखक (जन्म:१७ जानेवारी १९५३ )**२०१५: शांता भास्कर बिंबा मोडक -- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका (जन्म: १ एप्रिल १९१९ )**१९९८: रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (जन्म: २० जून १९३९ )**१९९२: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (जन्म: ९ ऑगस्ट १९०९ )**१९८९: पिंचू कपूर -- भारतीय अभिनेता (जन्म: १९२७ )**१९४५: बेनिटो मुसोलिनी -- इटलीचा हुकूमशहा (जन्म: २९ जुलै १८८३ )**१७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. (जन्म: १८ ऑगस्ट १७०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - छत्रपती संभाजीनगर*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पीडित कुटुंबांना न्याय मिळेल आणि दोषींना व कट रचविणाऱ्याना कडवं प्रत्युत्तर दिलं जाईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- एकही व्यक्ती बेघर राहणार नाही; केंद्र आणखी १० लाख घरांना देणार मान्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पैठण : जायकवाडी धरण निर्मितीला पुढील वर्षी 24 फेब्रुवारीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासन व राज्य शासनाने ‘ड्रीप टू’ योजनेअंतर्गत धरणाचे पुनरुज्जीवन, या कामासाठी ७८ कोटी रुपये निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळे उभारण्यास व विमानतळाच्या विस्तारीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भिवंडीत आगडोंब, चार मजली इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यांना हवामान विभागाचा पावसाचा ऑरेंज अलर्ट.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाचा दमदार विजय, कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध विजयी सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश गोधने, शिक्षक, नांदेड 👤 रवींद्र जांबकर 👤 नामदेव पांचाळ 👤 गंगाधर तिपनोड, चिरली, बिलोली 👤 विवेक बैसकर 👤 गोविंद राखेवार 👤 गौतम वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 49*मी उडते थाटात, सुंदर फुलांच्या घाटात**घर माझे षटकोनी, भरले त्यात गोड पाणी**इवले इवले पंख, स्पर्श करता मारेल डंख**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - घोडा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम उपाय नाही. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणता असा एकमेव अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही ?२) छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणत्या दोन प्रधानांना सोडून बाकी सर्वांना प्रसंग पडल्यास मोहिमेवर जावे लागे ?३) सत्यशोधक समाजाच्या संदेशाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी कोणते साप्ताहिक सुरू करण्यात आले ?४) 'खूप आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) ज्या विकारांमध्ये शारीरिक व मानसिक वाढ होत नाही त्या विकारास काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) मध २) पंडितराव व न्यायाधीश ३) दिनबंधू ४) दीर्घायू, दीर्घायुषी ५) क्रेटिनिजम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎 आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे.पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे. तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥गारुडयाचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संप्तार दिसे खरा ॥३॥नामा म्हणे तेथें कांहीं नसे बरें । क्षणाचें हें सर्व खरें आहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• माणूस जसा रंग आणि रूपाने वेगळा दिसतो. तसेच त्याचे विचार, राहणीमान, बोलीभाषा, खाद्यपदार्थ हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून एखाद्याच्या रूपाकडे बघून किंवा त्याच्या बोलीभाषेकडे बघून त्याला नाव ठेवू नये. कोणती वेळ कशी येईल ? हे सांगता येत नाही. रंग, रूप, राहणीमान जरी वेगळे असतील तरी शेवटी तो एक मानव आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुडत्याला काठीचा आधार*एकदा काही व्यापारी समुद्रातून प्रवास करत होते. अचानक वादळ उठलं. त्यांची नौका भरकटली आणि बुडायला लागली. व्यापाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तेवढ्यात समोरून त्यांना एक छोटी नौका येताना दिसली. ती नौका फार मोठी नव्हती, पण तिने व्यापाऱ्यांना एक एक करून वाचवलं. सर्व व्यापारी सुखरूप किनाऱ्यावर पोचले. तात्पर्य - संकटात एखादी छोटी नौका देखील "बुडत्याला काठीचा आधार" ठरते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/03-ahmadnagar.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ११६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.**१९९५: आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर किताब मिळवला.हा किताब मिळवणारी निशा ही सर्वात लहान खेळाडू ठरली.**१९८९: बांगलादेशमधे एका भयंकर चक्रीवादळाने माजवलेल्या हाहा:कारात सुमारे १,३०० लोक ठार,१२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले**१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणूभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. हा (तोपर्यंतचा) सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यानंतरचा मोठा अपघात जपानमधील फुकुशिमा दाई इची अणूभट्टीत २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर झाला.**१९७३: अजित नाथ रे यांनी भारताचे १४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश उदयास आला.**१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले**१९५६: मध्य प्रदेशातील नेपानगर कागद कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन**१९३३: नाझी जर्मनीच्या ‘गेस्टापो‘ या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.* 🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: प्रा. डॉ. अरुण ठोके -- लेखक, समीक्षक* *१९७६: नागोराव सा.येवतीकर -- प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी, शिक्षक**१९७३: श्यामसुंदर मिरजकर -- मराठीतील लेखक, कवी**१९७२: विद्या बयास-ठाकूर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६६: किरण नामदेव भिंगारदेवे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६१: नंदिनी सुधीर थत्ते -- प्रसिद्ध लेखिका**१९५९: भारती बिर्जे-डीग्गीकर -- प्रसिद्ध कवयित्री**१९५३: मौशुमी चटर्जी – प्रसिद्ध अभिनेत्री**१९५२: डॉ. उषा खंदारे -- प्रसिद्ध लेखिका**१९५२: पुरुषोत्तम बेर्डे -- मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक**१९५२: प्रा. डॉ हरिश्चंद्र गणपत थोरात --ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक व विचारवंत**१९५१: टी. एन. परदेशी -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा निवृत्त अभियंता**१९४८: कुमुदिनी श्रीधर फेगडे -- लेखिका* *१९४८: डी. बी. जगत्पुरिया -- प्रख्यात कवी, समीक्षक, वरिष्ठ पत्रकार, वक्ता* *१९४५: सुनंदा सुरेश साठे -- जेष्ठ रंगकर्मी, नाटककार* *१९४४: विद्याधर म्हैसाळकर -- प्रसिध्द लेखक**१९४२: मिनो मुमताज -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०२१ )**१९४०: प्रा. डॉ. श्रीराम देविदास चौधरी -- लेखक* *१९२७: हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये -- भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १ जानेवारी २०१७ )**१९०३: सखाराम जगन्नाथ भागवत -- विचारवंत, लेखक (मृत्यू: ८ जानेवारी १९७३ )**१८९७: नितीन बोस - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक (मृत्यू: १४ एप्रिल १९८६ )**१५६४: विल्यम शेक्सपियर -- इंग्रजी नाटककार, कवी आणि अभिनेता(मृत्यू: २३ एप्रिल १६१६ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: उत्तम बंडू तुपे -- ज्येष्ठ लेखक 'झुलवा'कार (जन्म : १ जानेवारी १९४२ )**१९९९: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान,कम्युनिस्ट नेते (जन्म: २० जून १९२० )**१९८७: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ )**१९७६: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – प्रसिद्ध साहित्यिक(जन्म: ८ मार्च १९३० )**१९७५: कृष्णाजी केशव कोल्हटकर --- ग्रंथकार,योग व वेदान्त अभ्यासक(जन्म: १४ जानेवारी १८८३ )**१९२०: श्रीनिवास रामानुजन – प्रसिद्ध थोर भारतीय गणिती (जन्म: २२ डिसेंबर १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - अहिल्यानगर*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक, 24 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा सुरु.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *NEET पेपर लीकचा मास्टरमाइंड संजीव मुखियाला अटक:पाटण्यातील एका फ्लॅटमध्ये लपला होता; 3 लाखांचे होते इनाम, 11 महिने फरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेची लाट अन् पावसाचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ना. सा. येवतीकर, संयोजक फ्रेश मॉर्निंग बुलेटिन, स्तंभलेखक 👤 प्रदीप खपाटे बन्नाळीकर 👤 महेश शितोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 48*शक्तीशाली वेगवान चपळ प्राणी* *बसत नाही कधीच जमिनीवर खाली* *पाळीव सस्तन आहे शाकाहारी* *जात आहे माझी एक काठेवाडी* *सवय आहे मला उभ्यानेच झोपण्याची**स्वारी आहे मी राजे महाराजे सैनिकांची**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सिंह ~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, संगय्या शिवराज होनगुंटे, बालाजी पाटील चिरलीकर, नवीन आरगुलवार, उज्वला इंगळे, प्रथमेश येवतीकर, सुरेश द्रोपतवार, माधव तनमुदले, कवी दत्ताहरी कदम, , सौ. लिना सुपारे, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, लालन्ना गुडलावार, सविता अवतिरक, अनिकेत सायबलू, प्रतिक उकले, सुनिता भुरे, सिद्धार्थ शिरसे मनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिंधू जल करार कोणत्या दोन देशात झाला ?२) भारत व पाकिस्तान या देशातील सिंधू जल करार केव्हा झाला ?३) जागतिक मलेरिया दिवस २०२५ ची थीम काय आहे ?४) 'कैदी ठेवण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या संस्थेनुसार २०२४ साठी 'जगातील टॉप स्मार्ट सिटी' कोणती ? *उत्तरे :-* १) भारत व पाकिस्तान २) सप्टेंबर १९६०, कराची ३) मलेरिया आपल्यासोबत संपतो, पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जागृत करा ४) कारागृह, बंदिशाळा, तुरुंग ५) झ्युरिक, स्वित्झर्लंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पर्वत कसे निर्माण झाले ?* 📙 टेकडी, डोंगर, शिखरे व पर्वत या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. सपाटीच्या मधील एखादा उंचवटा म्हणजे टेकडी बनते. वालुकामय प्रदेशात अनेक टेकड्या असतात. खडकाळ प्रदेशातील जास्त उंच भागातही टेकड्या असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जर लाव्हारस एकाच मुखाभोवती साठला गेला तर हळूहळू उंच डोंगर बनू लागतो. क्वचित हा उद्रेक फार मोठा असेल, तर मैलोगणती पसरलेले डोंगरांचे स्वरूप असू शकते; पण शिखरे व पर्वत ही संज्ञा मात्र उंचच्या उंच पसरलेल्या पर्वतराजींनाच सहसा लावली जाते. याखेरीज पठार स्वरूपातही काही वेळा डोंगर आढळतात. ज्यावेळी एखादी भूगर्भीय हालचाल थोड्याच मर्यादेत खालीवर होऊन थांबते, तेव्हा ही अनाकलनीय पठारे तयार होतात. पाचगणीचे टेबललँडचे पठार हे असेच. तिबेटचे पठार याचीच फार मोठी आवृत्ती म्हणावी लागेल.जगातील खऱ्या पर्वतांत मोजक्यांचा समावेश होतो. सर्वात उंच, सर्वात लांबवर पसरलेली, सर्वात जास्त उंच शिखरे असलेली पर्वतराजी म्हणजे हिमालय काराकोरमची. याशिवाय आल्प्स, अँडीज व रॉकी या तीन पर्वतराजी या प्रकारात मोडतात. आंतरखंडीय भूकवचाच्या सरकण्याच्या प्रक्रियेत सरकणारा एक भूखंड (भारत) स्थिर भूखंडावर (आशिया) आदळला. हळूहळू जामीन वर उचलली गेली. त्यातून हिमालय पर्वत निर्माण झाला. अन्य पर्वतही असेच निर्माण झाले आहेत. चारही ठिकाणी ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पर्वतराजींची उंची हळूहळू वाढतच आहे.लाव्हारसाच्या उद्भवातून निर्माण होणारे पर्वत म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, जपानमधील फुजी, हवाईमधील मोनाक्रिआ ही प्रसिद्ध उदाहरणे. मोनाक्रिआबद्दल तर असे म्हणता येईल की, हा पाण्याखाली समुद्राच्या तळाशी सहा हजार मीटर खोल सुरू होतो व पाण्यावर चार हजार दोनशे पाच मीटर उंच आहे. उंची समुद्रसपाटीच्या वर मोजली जाते, अन्यथा याचीच उंची दहा हजार मीटरची भरावी. या प्रकारच्या पर्वतांचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाय असे एकच शिखर व तेथून दूरवर पसरत गेलेला खडबडीत उतार. या उतारावर काही घळी आढळतात. पण त्या खूपच उथळ असतात.पर्वतांचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील हवामान. पर्जन्यमान व वनराई. अफाट उंचीमुळे पावसाचे ढग अडतात. मोजक्या भागात खूप पाऊस पडतो. तो वेगाने वाहून जाताना स्वतःबरोबर खडकांचे कण व माती धुपून नेतो. या उलट दुसऱ्या बाजूला म्हणजे वाऱ्यांच्या उलट दिशेला उजाड वातावरण राहते. अल्प पर्जन्यमानाने हा भाग दुष्काळी बनतो. हिमालयामुळे अडणारे मान्सूनचे वारे गंगायमुना खोरे समृद्ध करतात, तर तिबेटचा पश्चिमेचा भाग अल्प पावसाचा, उजाडच ठेवतात. पर्वतांची उंची वाढते, तसे तापमान कमी होत जाते. एक वेळ अशी येते की त्या उंचीला सहसा शून्याच्या आसपास तापमान राहते. मग कायम ही शिखरे बर्फाच्छादित राहू लागतात. मग कितीही उष्ण प्रदेशात असली तरीही ही अवस्था कायम राहते. सहा ते सात हजार मीटरदरम्यान ही बर्फाची रेषा कायम बदलत राहते. यावरचे सर्वच भाग पूर्णतः उजाड असतात. वनस्पती व प्राणीजीवन या उंचीवर राहु शकत नाही.दोन पर्वतांमधील घळींमध्ये मात्र हिरवीगार जंगले, नद्यांचे प्रवाह व त्यांच्या आसपास मानवी वस्ती जगभर आढळते. मुख्यतः गुरे पाळणे, थोडीफार शेती, मेंढीपालन या जोडीला अलीकडच्या काळात वाढत चाललेला पर्यटन व्यवसाय हे या डोंगरखोऱ्यातील मुख्य जीवित साधन. भारतातील उत्तमोत्तम अशी पर्यटन स्थळे हिमालयाच्या कुशीत विसावलेली आहेत. अफाट उंचीवरून दूरवरचा दिसणारा निसर्गरम्य परिसर न्याहाळत मजेत वेळ घालवण्यापेक्षा दुसरा पर्यटनाचा आनंद तो कोणता ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते, कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो.पण, आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई-वडिलांचे संस्कार*एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्‍कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते.त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहात बसला होता .ब-याच वेळाने शेजारी घरी परत आला त्‍याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्‍याच्‍या शेजारी सफरचंदे असताणही तो त्‍यांना खात नाही.त्‍या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्‍याने त्‍यांना हात लावला नाही.शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला .शेजाऱ्यांनी त्याला विचारले,”तुला सफरचंद आवडतात ना, मग तरी तू एक ही सफरचंद का खाल्‍ले नाहीस” मुलगा म्‍हणाला,” इथेच कोणीच नव्‍हते, मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते,मला कोणीच पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला पाहात होतो.म्हणून मी खले नाही मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला.तो म्‍हणाला,”आपला आत्‍मा आपण काय करतो ते पाहात असतो, आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोलयाचे फार अवघड आहे.तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्‍यात योग्‍य दिशेने वाटचाल करतात . मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांच्या संस्कारचा दोष येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~