बोध कथा (bodhakatha)
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Ef7A8HTBq/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 240 वा दिवस 🚩 ठळक घटना :-• १८४५: अमेरिकन लोकप्रिय विज्ञान मासिक 'सायंटिफिक अमेरिकन'चा पहिला अंक प्रकाशित झाला. • १९१६: पहिले महायुद्ध – इटलीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले (रोमानियावरही आक्रमण केले गेले). • १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनमध्ये शस्त्रसंधी करार झाला. • १९३७: टोयोटा मोटर्स स्वतंत्र कंपनी म्हणून स्थापन झाली. • १९९०: इराकने कुवेतला आपलाच प्रांत असल्याचे जाहीर केले. 🎂 जन्म :-• १७४९: योहान वोल्फगाँग फॉन ग्यॉटे – जर्मन महाकवी व लेखक. • १८९६: रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी – प्रसिद्ध उर्दू शायर. • १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद (मामा पेंडसे). • १९१८: राम कदम – मराठी चित्रपटांचा प्रसिद्ध संगीतकार. • १९२८: एम. जी. के. मेनन (भारतीय पदार्थवैज्ञानिक); तसेच उस्ताद विलायत खाँ (सतारवादक). • १९३४: सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा. • १९३८: पॉल मार्टिन – कॅनडाचे पंतप्रधान. • १९५४: रवी कंबुर – भारतीय-इंग्रिश अर्थशास्त्रज्ञ. • १९६५: सातोशी ताजीरी – पोकेमॉनचे निर्माता. • १९६६: प्रिया दत्त – समाजसेवक व माजी खासदार. • १९६१: दीपक तिजोरी – अभिनेते आणि दिग्दर्शक. • १९८३: लसिथ मलिंगा – श्रीलंका क्रिकेटपटू. 🌹 स्मृतिदिन• १६६७: जयपूरचे राजा मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. • १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन. • २००१: व्यंकटेश माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार यांचे निधन.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी सिनेमा आज आणि उद्या*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गणपती बाप्पाचे महाराष्ट्रात वाजत-गाजत स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन, देशावरील संकट दूर व्हावेत असे मुख्यमंत्र्यांचे बाप्पाकडे साकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नझुल जमिनींच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ, नागपूर-अमरावती विभागात १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत योजना सुरू राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन 40 टक्के वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून 500 कोटींची तरतूद - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पीएम स्वनिधी योजनेला मुदतवाढ, 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय, 7332 कोटींचा खर्च येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगेंना 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटी शर्ती सह परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मूमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे 8 जणांचा मृत्यू; 22 जवानांची सुटका, मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील परिस्थिती गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचे स्टार क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची लवकरच होणार फिटनेस टेस्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश घुले, शिक्षक तथा साहित्यिक 👤 D. S. P. पाटील, साहित्यिक, सोलापूर 👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली 👤 सुनिता महाडिक, शिक्षिका, मुंबई 👤 संजय बंटी पाटील, बाळापूर, धर्माबाद 👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद 👤 गजानन वासमवार 👤 अशोक मामीडवार 👤 साईनाथ गोणारकर 👤 तिरुपती अंगरोड 👤 आनंद आवरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 62*असे काय आहे, जे आपल्या जवळच असते पण क्षणात जगभर फिरून येते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बटाटा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पूर्वानुभवाच्या मदतीने जीवनातील पुढील प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारत गर्भाशयमुख कर्करोगाच्या बाबतीत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे ?२) सोवियत संघातून युक्रेन कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला आहे ?३) भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा किती किमी आहे ?४) 'स्वतःबद्दल अभिमान नसलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'भारताचे उद्यान' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) चौथ्या २) सन १९९१ ३) ४,०९६ किमी ४) स्वाभिमानशून्य ५) बेंगलोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोरेश्वर गणपती (मूळ विनायक)*• स्थान : मोरेगाव, ता. बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र).• नदी : करहे नदीच्या काठी मोरेगाव वसलेले आहे.• अष्टविनायकांमध्ये प्रथम क्रमांक : मोरेश्वर गणपतीला "मूळ विनायक" असेही म्हणतात. कारण अष्टविनायक यात्रेची सुरुवात व शेवट मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने करायची प्रथा आहे.*इतिहास व महत्त्व*• मोरेश्वर गणपतीचे मंदिर 14 व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते.• मंदिराचे जीर्णोद्धार चिमाजीअप्पांनी (बाजीराव पेशव्यांचे बंधू) व इतर पेशव्यांनी केला होता.• गणपतीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे.• मूर्तीची दोन सोंडे व चार हात आहेत.• येथेच गणेशाने सिंधुरासुराचा वध करून लोकांना त्रासातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.*मंदिराची वैशिष्ट्ये*• मंदिर 50 फूट उंच किल्ल्यासारख्या भिंतींनी वेढलेले आहे.• चारही बाजूंना चौकटी असून त्यावर मिनारांसारख्या उंच बुरूज आहेत.• मंदिराच्या आवारात नेमके 23 वेगवेगळ्या गणपतींच्या मूर्ती आहेत.• यात्रेकरूंची श्रद्धा अशी आहे की, मोरेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा अपूर्ण राहते.*यात्रा व उत्सव*• गणेशोत्सव व माघ शुद्ध चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते.• देशभरातून भाविक येथे येतात.👉 त्यामुळे मोरेश्वर गणपती हा अष्टविनायक यात्रेचा आरंभ आणि शेवट मानला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची गजसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग … || धृ ||ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा गमऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर गअशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग || २ ||मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गअशी चिक माळ पाहून, गणपती किती हसला ग || ३ ||त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला गचला चला करूया नमन गणरायाला गत्याच्या आशीर्वादाने करू सुरुवातशुभ कार्याला ग || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते. तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते. तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हि-यापेक्षा जनता महत्वाची*एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला,''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''तात्पर्य :- आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/177LMD6K2o/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 238 वा दिवस 🚩 ऐतिहासिक घटना :- • 1303 - अल्लाउद्दीन खिलजींनी चित्तोडगड जिंकला. • 1498 - मायकेल अँजेलो यांनी ‘पिएटा’ शिल्पाकृतीवर कार्य सुरू केले. • 1768 - कॅप्टन जेम्स कुक त्यांच्या पहिल्या प्रवासावर रवाना झाले. • 1791 - जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकन पेटंट मिळाले. • 1883 - इंडोनेशियातील क्राकाटाऊ ज्वालामुख्याचा उद्रेक; सुमारे 36,000 लोकांचा बळी. • 1972 - म्युनिच येथे २० वा ऑलिंपिक स्पर्धांला सुरुवात. 🎂 जन्म :-• 1910 - प्रसिद्ध समाजसेविका ख्रिश्चन धर्मगुरु मदर तेरेसा • 1956 - प्रसिद्ध राजकारणी मनेका गांधी• 1968 - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर🌹 मृत्यू :- • 2012 - वरिष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यसैनिक ए. के. हंगल यांचे निधन. ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधी वंदू तुज मोरया*गणपती बाप्पा मोरया - गणेशोत्सव आता राज्य उत्सव झाला आहे. ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नव्या शालेय अभ्यासक्रमात आरोग्य, स्वच्छतेसोबत शेती, स्वयंपाकघरातील विज्ञानाचेही मिळणार धडे; मुलांना अनुभवात्मक अभ्यास, तर्कशक्ती शिकता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अकरावीकरिता अंतिम फेरी प्रवेश प्रक्रिया होणार 26, 27 ऑगस्टला, गुणवत्ता यादी 29 ला; 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पिंपरी चिंचवड विद्यापीठात दीक्षारंभ समारंभ, कृत्रिम बुद्धिमत्तेसह बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा - कांचन भोंडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे - गणेशोत्सव आता राज्य महोत्सव, सार्वजनिक मंडळांना 7 दिवस ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा; सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकरी संघटनांचा एकजूट, कर्जमाफी आणि हमी भावासाठी 28 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आजच होणार पगार जमा, जीआरही निघाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑनलाइन गेमिंगचे विधेयक आल्यानंतर ड्रीम ११ आणि बीसीसीआय यांच्यातील करार रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नारायण शिंदे, उपक्रमशील शिक्षक, सांगली 👤 मधुकर बोईनवाड, विशेष शिक्षक, देगलूर👤 संदीप आवरे, धर्माबाद 👤 प्रशांत बोनडलवाड 👤 सुमेध भंडारे 👤 प्रशांत इबितवार, धर्माबाद 👤 संदीप सोनकांबळे 👤 दिगंबर खपाटे बन्नाळीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 61*मला डोळे आहेत पण मी पाहू शकत नाही.**सांगा मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मेणबत्ती किंवा पेन्सिल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दयेमुळे दुर्बलांना जग मृदू भासते आणि पराक्रमी माणसांना ते उदात्त वाटते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी खलाशी होता ?२) आझाद हिंद सेनेची घोषणा कोणती होती ?३) जैन साहित्याला काय म्हणतात ?४) 'स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारत व चीन यांच्यातील सीमा किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) पोर्तुगीज २) चलो दिल्ली ३) आगम ४) स्वार्थी ५) ३,९१७ किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीचे आठ प्रसिद्ध व प्राचीन मंदिरांचा समूह. ही मंदिरे प्रामुख्याने पुणे व अहमदनगर जिल्ह्यात आहेत. गणेश भक्तांसाठी ही यात्रा अतिशय पवित्र मानली जाते.अष्टविनायक मंदिरे :1. मोहट्या (मोरेश्वर) गणपती – मोरेगाव, पुणेअष्टविनायक यात्रेतील पहिले स्थान.चांदीच्या नागफणीने सजलेली मूर्ती.गणपतीला "मोरेश्वर" म्हणतात.2. सिद्धिविनायक – सिद्धटेक, अहमदनगरभीमा नदीच्या काठावर.गणपती पार्वतीदेवीच्या इच्छेने येथे प्रकट झाले अशी आख्यायिका आहे.3. बल्लाळविनायक – पाळी, रायगडगणपतीचा प्रिय भक्त "बल्लाळ" याचं नाव याला जोडलेले आहे.गणपतीने बल्लाळाला दर्शन दिल्यामुळे या गणपतीला "बल्लाळविनायक" म्हणतात.4. वरदविनायक – महड, रायगडगणपती इच्छित वरदान देतो, म्हणून "वरदविनायक".मूर्ती तलावात सापडली आणि मंदिरात प्रतिष्ठापित केली गेली.5. चिंतामणि गणपती – थेऊर, पुणेमहर्षी कापिलांचा आश्रम येथे होता.चिंतेपासून मुक्त करणारा गणपती.6. गिरिजात्मज विनायक – लेण्याद्री, जुन्नर, पुणेएकमेव गणपती लेण्यामध्ये (गुहेत).पार्वतीच्या इच्छेने येथे गणेश बालरूपात प्रकट झाला.7. विघ्नहर विनायक – ओझर, पुणेविघ्नांचा नाश करणारा गणपती.या मूर्तीवर सोन्याचा कळस आणि सुंदर दीपमाळ आहे.8. महागणपती – रांजणगाव, पुणेगणेशाने येथे त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे.येथे गणपतीला अष्टभुजा व उग्र रूप आहे.• विशेष माहिती :अष्टविनायक यात्रा नेहमी मोरेगावपासून सुरू करून तेथेच समाप्त केली जाते.या आठही ठिकाणांना भक्त वर्षभर मोठ्या श्रद्धेने भेट देतात, पण गणेशोत्सव व अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष गर्दी असते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्शपुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता… || २ ||नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचेहाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचेसेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते. निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोभाची शिक्षा*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीसतात्पर्य - लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1E71m1Dz68/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 ऐतिहासिक घटना :• १६०९: गॅलिलिओने जगातील पहिली दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले• १८२५: उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला• १९१९: लंडन ते पॅरिस जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली• १९४४: द्वितीय महायुद्धात मित्र राष्ट्रांनी पॅरिसला मोकळं केलं• १९८९: व्हॉयेजर 2 नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचला .• १९८१: व्हॉयेजर 2 शनी ग्रहाच्या जवळ पोहोचला• १९९१: बेलारूसला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले• २०१२: व्हॉयेजर 1 अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली .🎂 जन्म :• १९२३: मराठी साहित्य आणि अर्थतज्ज्ञ गंगाधर गोपाळ गाडगीळ• १९३०: जेम्स बॉंडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेता शॉन कॉनरी• १९४१: संगीतकार अशोक पत्की• १९५२ - दुलीप मेंडिस• १९६२ - डॉ. तस्लीमा नसरीन• १९६५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक संजीव शर्मा• १९६९: क्रिकेटपटू आणि स्पोर्ट्सकास्टर विवेक राजदान• १९७६ - जावेद कादीर• १९९४: भारतीय लेखक-कादंबरीकार काजोल आयकट🌹 मृत्यू :• १२७०: फ्रान्सचा राजा लुई नववा यांचे निधन .• १८१९: संशोधक जेम्स वॅट यांच्या निधनाचा वर्षदिवस .• १८२२: खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन .• १८६७: शास्त्रज्ञ मायकेल फॅराडे यांचे निधन .• २०१२: चंद्रावर पाऊल टाकणारे पहिले मानव, नील आर्मस्ट्रॉंग यांचे निधन .••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकट काळात मन प्रसन्न ठेवा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे दीड लाख मोदकांचे वाटप, यावर्षी ही संस्थानच्या वतीने जय्यत तयारी, पोलिस प्रशासनही सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्ली - भारत जर्मनीकडून 70 हजार कोटी रुपयांत 6 पाणबुड्या खरेदी करणार, सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र देखील खरेदी करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ही शेवटची लढाई, प्रत्येकाने मुंबईला या, राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका - मनोज जरांगे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गगनयानची तयारी- क्रू मॉड्यूलची एअर ड्रॉप टेस्ट, चिनूकने 4 किमी उंचीवरून सोडले; ISRO-DRDO, एअरफोर्स, कोस्टगार्डचे जॉइंट ऑपरेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सातनवरी बनले देशातील पहिले स्मार्ट गाव, राज्यातील 3500 गावांमध्ये राबवणार स्मार्ट व्हिलेज प्रकल्प; 18 आधुनिक सेवा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ उद्योजक, 'मॉडर्न ऑप्टिशियन'चे संचालक अनिल गानू यांचे निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे होते उपाध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा केला दारुण पराभव मात्र द. आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश चौधरी, साहित्यिक तथा सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी, नांदेड 👤 आसावरी टाक👤 नयन पेडगावकर 👤 गंगाधर जारीकोटकर, धर्माबाद 👤 आदी रामचंद्र, म्युजिक डायरेक्टर👤 प्रमोद गुरुपवार, बिलोली *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 60*मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ढोल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सज्जनतेचा बुरखा पांघरून मनाची दुष्टता जात नाही मनाच्या दुष्टतेचे मूळच नष्ट केले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वनराई' या संस्थेचे संस्थापक कोण ?२) सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो ?३) 'भारताचा नेपोलियन' असे कोणाला म्हटले जाते ?४) 'स्वतः श्रम न करता खाणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. मोहन धारिया २) भूमध्य समुद्र व लाल समुद्र ३) समुद्रगुप्त ४) ऐतखाऊ ५) फलोत्पादन व मध*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙 *************************रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत. उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष. उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवराशुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||प्रसन्न होऊनी विघ्न हरावेनम्र कलेचे सार्थक व्हावेतुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||वंदन करुनी तुजला देवारसिक जनाची करितो सेवाकौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुराहे शिवशंकर गिरीजा तनया || २ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की, मला पुनर्जन्म मिळाला आहे. कदाचित हे विचार योग्य असू शकतात.पण, माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने त्याच दिवशी होतो ज्या वेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती, पुन्हा एकदा मोठ्या हिंमतीने जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पीत होऊन जगत असते. आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते. म्हणून माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. शेवटी फुलांवरून चालायला अनेकजण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावे लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनाची एकाग्रता*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लघुकथा Link - http://kathamaala.blogspot.com/2024/01/paisa-samrat.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📌 महत्वाच्या घटना :- • १८३३ : इंग्लंडमध्ये गुलामगिरी प्रथा बंद करणारा कायदा पारित झाला.• १९१४ : पहिल्या महायुद्धात जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.• १९६६ : नासाने "लुना ऑर्बिटर १" या उपग्रहाच्या मदतीने चंद्राचे छायाचित्र पृथ्वीवर पाठवले.• १९७६ : चीनमध्ये भूकंपामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला.• २००५ : इराकमध्ये नवीन घटनाला मान्यता मिळाली.📌 जन्म :-• १८७२ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – प्रख्यात गणितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत.• १९१९ : प्रभाकर पाध्ये – मराठी कथाकार, कादंबरीकार व समीक्षक.• १९३१ : व्ही. एस. नायपॉल – भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.• १९७८ : कोबे ब्रायंट – अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.📌 मृत्यू :-• १९२६ : रघुनाथ काशिनाथ फडके – भारतीय शिल्पकार.• १९८८ : एम. के. त्यागी – स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक.📌 जागतिक दिन / विशेष दिन :-🌍 गुलामगिरी स्मृती दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - पैसा-सम्राट*लक्ष्मीकांत हा एक करोडपती, त्याला पैश्याची काही कमी नव्हती. तरी तो सुखी व समाधानी होता का ? त्याला कौटुंबिक सुख मिळाले का ? अंत्यसंस्काराला त्याची दोन्ही मुलं नव्हती, तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का ? ..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे 5200 कोटी रुपयाच्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील अ, ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून 'निवडणूक' कामाला वेग*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन; पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ SIT प्रमुख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंढरपूरवरील महापुराचे संकट टळलं; उजनी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग, मात्र कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सगळे खड्डे बुजणार, मुख्यमंत्र्यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ओबीसीत 29 नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली, राज्य मागासवर्ग आयोगाकडून शिफारशींचा प्रस्ताव, केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-11 ने देखील घेतला मोठा निर्णय, पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन बोरसे, नांदेड ( सध्या जर्मनी )👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 रामदास पेंडपवार, निझामाबाद 👤 डॉ. सुनील भेंडे, वसमत 👤 प्रा. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, लेखिका, नांदेड 👤 यादव ढोणे 👤 भारत सर्वे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 59*असे काय आहे, ज्याला मारताना लोकांना खूप मज्जा येते ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुबळ्याच्या रस्त्यातील अडसर बनलेला पाषाण हा बलवानांच्या मार्गातील यशाचा एक टप्पा पायरी ठरतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक कोणत्या धातूचे असते ?२) भारतीय टी - ट्वेंटी क्रिकेट संघाचा कप्तान कोण आहे ?३) कोणत्या उपकरणाच्या मदतीने ध्वनीचे मापन केले जाते ?४) 'स्वर्गातील इंद्राची बाग' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) चांदी २) सूर्यकुमार यादव ३) सोनोमीटर ४) नंदनवन ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈 ************************पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते.इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे. स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो. इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश वाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ॐ कार प्रधान रूप गणेशाचेहे तिन्ही देवांचे जन्मस्थान ….. || धृ ||अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णूमकार महेश जाणियेला || १ ||ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्नतो हा गजानन मायबाप ….. || २ ||तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणीपहावी पुराणी व्यासाचीया ….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही. अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते. ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महिलेचा निर्भीडपणा*एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला,'' जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले,'' नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले. त्या महिलेला याचे कारण विचारले असताती म्हणाली,''तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही यावरून असे स्पष्ट होते की तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Fy9n7S7X3/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏛️ महत्वाच्या घटना :- • १६३९ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वडीलदारांच्या मदतीने मद्रास (चेन्नई) येथे वसाहत स्थापन केली.• १९०२ – कै. बाळ गंगाधर टिळक यांच्यावर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला दाखल केला.• १९०७ – भारताचे राष्ट्रगीत “वंदे मातरम्” प्रथमच जपानमध्ये गायले गेले.• १९७९ – केबुल शहरात सौरऊर्जेवर चालणारे पहिले वीज केंद्र सुरू झाले.🎂 जन्मदिवस :-• १७६२ – जॉर्ज चौथा, ब्रिटनचा राजा.• १८६२ – क्लॉड डेब्युसी, फ्रेंच संगीतकार.• १९०२ – पॉल डिरॅक, नोबेल पारितोषिक विजेते इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ.• १९२० – रे ब्रॅडबरी, अमेरिकन विज्ञानकथा लेखक.• १९३२ – शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचे जनक व पहिले राष्ट्रपती.• १९६७ – गणेश आचार्य, प्रसिद्ध बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक.🕯️ पुण्यतिथी :-• १९२२ – मायकेल कॉलिन्स, आयर्लंडचा क्रांतिकारक नेता.• १९८० – जयप्रकाश नारायण, समाजवादी नेता.• १९८० – रमेश बेंद्रे, मराठी साहित्यिक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बैलाचा सण : पोळा*शेतीकामासाठी वा अन्य कामासाठी लोकांना उपयोगी पडणारा प्राणी म्हणजे बैल. बळीराजासाठी तो वर्षभर राबराब राबतो, त्याचे ऋण फेडण्यासाठी श्रावण अमावस्याच्या दिवशी जो सण साजरा केला जातो तो म्हणजे बैलपोळा...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपराष्ट्रपती निवडणूक; राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी फडणवीसांचा शरद पवार-उद्धव ठाकरे यांना फोन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारकडून शासन निर्णय : 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व नागरिकांना प्रगत एआय टूल्सचे चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड मोफत सबस्क्रिप्शन द्यावे; संसदेत राघव चढ्ढा यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, एकूण 21 बैठका, ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा, जगदीप धनखड यांचा राजीनामा, बिहार SIR वरून गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा, 22 महिन्यांत 2.36 लाख प्रमाणपत्रे वितरित; 2.21 कोटी अभिलेखांची तपासणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन सुरू, देशभरातील 12 संस्थांचा सहभाग, विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शार्दूल ठाकूर मुंबई संघाचा नवा कर्णधार, अजिंक्य रहाणे पायउतार होताच MCA चा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हमंद, केंद्रप्रमुख बिलोली 👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद 👤 आशिष देशपांडे, कुंडलवाडी 👤 शिवा गैनवार, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 58*दोन वाट्या त्यात दोन गारगोट्या**ओळखा पाहू काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - भेंडी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खऱ्याला मरण नसते आणि खरे जरी क्षणभर मागे पडल्यासारखे वाटले तरी परिणामी त्याचाच जय होतो. हे शाश्वत सत्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वप्रथम परीक्षेत ओपन बुक प्रणाली कोठे व कोणत्या वर्षी सुरु झाली ?२) आगामी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे ?३) भारत व नेपाळ यांच्यातील सीमा किती किमी आहे ?४) 'सुखाच्या मागे लागलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्रात रेल्वे कोच कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) हाँगकाँग ( १९५३ ) २) भारत व श्रीलंका ३) १,७५२ किमी ४) सुखलोलुप ५) लातूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का ?* 📙एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या पेशीतील गुणसूत्रांवरच अवलंबून असते. मातापित्यांकडून मुलाला ही गुणसूत्रे मिळत असतात. त्यामुळेच मुलाचे डोळे आई वा वडिलांसारखे असतात. ते कोणासारखे तरी (आई, वडील, मामा, काका इ.) दिसते. हे होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नाते असणाऱ्या लोकांमधील गुणसूत्रात साम्य असते. हे साम्य ते एकाच वा सारखी गुणसूत्रे असणाऱ्या पूर्वजांचे वंशज असतात म्हणून असते. मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणधर्मासाठी, जसे हिरवे डोळे, गुणसूत्रांचा संच असतो. त्यात सर्वस्व गाजवणारे (Dominant) व दबावाला बळी पडणारे (recessive) असे दोन प्रकार असतात. दोन वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची गाठ पडली, तर तिसराच गुण तयार होतो. एक वर्चस्व गाजवणारे व दुसरे दबावाला बळी पडणारे गुणसूत्र आले, तर वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची सरशी होते व त्याप्रमाणे बालकात गुणात दिसून येतात. वेगवेगळ्या समाजातील लोक एक एकत्र आल्यास त्यांच्यात असणारी गुणसूत्रे विविध प्रकारची असतात. साहजिकच त्यांच्यातील वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांचाच संकर होऊन निरोगी समाज जन्माला येतो.एकाच समाजात वारंवार लग्न होत गेल्याने त्या समाजातील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचा संकर होऊन कमी प्रतीचे गुणधर्म मुलाबाळांत येतात. रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी लग्न केले तर गुणसुत्रांमधील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचे गुण मुलाबाळांत येतात. वेडसरपणा, कोड, रक्ताचे विकार, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार असे अनेक रोग, अशाप्रकारे लग्न केलेल्या व्यक्तींच्या मुलांना होऊ शकतात. त्यामुळे काका पुतणी, मामा भाची, बहीण भाऊ अशी लग्ने होऊ देऊ नयेत; हेच बरे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कविता - गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आला आला पोळा*( तीन शब्दाची कविता )आला आला पोळा लोकं झाली गोळा पोळ्याचा हा दिन बैलाचा आहे सण चिखलाचा बैल करू यथासांग पूजा करू सजवू त्याची शिंगे लावू कपाळाला भिंगे पैंजण बांधू पायावरझूल घालू अंगावर बैलासंगे आपणही मिरवू सायंकाळी गावात फिरवू पुरणपोळीचा नैवेद्य देऊसणासुदीचा आनंद घेऊ - नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्याकडे सर्वच काही आहे. त्यांना मानसन्मान देणे वाईट नाही. पण ज्यांच्याकडे काहीच नाही अशांचे वास्तव जगणे आणि परिस्थिती व त्यांच्यात असलेलं प्रामाणिकपणा बघून त्यांची मदत जर कोणी करत असेल तर याला माणुसकी धर्म म्हणता येईल. अशा एका मदतीने किंवा त्यांची कदर केल्याने माणुसकी जिवंत राहते आणि इतरांना त्यातून बोध मिळत असतो आणि ज्या माणसाला अशा एका मदतीने जगण्याला आधार मिळतो त्याच आधाराची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्मनियंत्रणाचे महत्व*एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,' 'मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, ''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 विशेष दिन :- • जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन• इंटरनेट दिन🚩 महत्त्वाच्या घडामोडी :- • १८२१ – पेरू देश स्वतंत्र झाला.• १९११ – लिओनार्डो दा विंचीचे सुप्रसिद्ध चित्र मोनालिसा पॅरिसच्या लुव्हर संग्रहालयातून चोरीस गेले.• १९४७ – भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेपाळने भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.• १९८३ – फिलिपाईन्सचे नेते बेनिग्नो अक्विनो यांची मनिलामध्ये हत्या झाली.🔹 जन्म :- • १८७९ – भारताचे सहावे सरन्यायाधीश मीर्ज़ा हामिदुल्ला बेग.• १९०४ – कॉमेडियन अभिनेते केशवराव कोळे.• १९०४ – कवी, लेखक, समीक्षक शंकर पाटील.• १९३१ – नोबेल पारितोषिक विजेते लेखिका टोनी मॉरिसन.🔹 मृत्यू :- • १९४० – प्रसिद्ध रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की.• १९६४ – प्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर.• २००२ – ज्येष्ठ नाटककार व अभिनेते जयवंत दळवी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन - गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे *शालेय परिपाठ* व्यवस्थितपणे राबविण्यासाठी परिश्रम घेत आहे. तेव्हा आपण देखील या whatsapp समूहात जरूर join व्हावे. ..... समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून 15631 पदांच्या पोलीस शिपाई भरतीला मान्यता, शासन निर्णय जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, एकही जागा मिळाली नाही, महायुतीला 7 जागा, शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकत मैदान मारलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची पिकं पाण्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर नवी मार्गिका, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करणार, सात दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी; मंत्री आशिष शेलार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या; पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताज्या वनडे क्रमवारीची केली घोषणा, फलंदाजीत शुभमन गिल तर गोलंदाजीत केशव महाराज पहिल्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भीमाशंकर जुजगार, सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक, धर्माबाद 👤 साईनाथ राचेवाड, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 रघुनाथ सोनटक्के, साहित्यिक, तळेगाव दाभाडे, पुणे 👤 भूषण परळकर, नांदेड 👤 संतोष गुम्मलवार, मनपा, नांदेड 👤 दत्ता नरवाडे, शिक्षक, बिलोली 👤 विश्वास बदापूरकर, येताळा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 57*हिरवी पेटी काट्यात पडली**उघडून पाहिली तर मोत्याने भरली**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ट्रॅक्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदाचार, कर्तव्यनिष्ठा हे माणसाचे अलंकार आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) भारतात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत ?३) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या ठिकाणी पहिली कायमस्वरूपी वखार स्थापन केली ?४) 'सिनेमाच्या कथा लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'जागतिक आदिवासी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सी. पी. राधाकृष्णन २) महाराष्ट्र, २९ ३) सुरत ४) पटकथालेखक ५) ९ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात ?* 📙 स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे (अंडी) अनुक्रमे तयार होतात.दुय्यम लैंगिक लक्षणात आवाज फाटणे, कंठ फूटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे ह्यांचा समावेश मुले मुली या दोहोत होतो. मुलींमध्ये स्तनांची वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये दाढी मिशा येऊ लागतात. बिजाची निर्मिती होऊ लागते. मुली मुलांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असल्याने मुलींना दाढी मिशा येत नाहीत. तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात घ्यायला हवे की मुलींमध्ये टेस्टेस्टेरॉन असतो. पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यांमुळे वा विकारांमुळे या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यास मुलींमध्ये दाढी मिशासारखी पुरुषी लक्षणे तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे दिसून येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तहान पाण्याने भागत असते. भूक अन्नाने मिटत असते. एखाद्या व्यक्तीजवळ दु:ख सांगल्याने मन थोडे हलके होते आणि योग्य माणसावर विश्वास केल्याने आपला कधीच विश्वासघात होत नाही. आज अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. म्हणून आधी स्वतःला ओळखावे आणि मगच योग्य व्यक्तीला वाचण्याचा प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आचार्य विनोबा भावे*भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16w1jcKRk9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- *सदभावना दिवस*• १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.• १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.• १९१७ : अमेरिकेतल्या पहिल्या एरोनॉटिकल सोसायटीची स्थापना.• १९७९ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक पटकावले.• १९८८ : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब मिळाला.• २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.📌 जन्मदिवस :- • १९१३ : प्रसिद्ध मराठी साहित्यिक कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर• १९४४ : भारताचे सहावे पंतप्रधान, राजीव गांधी• १९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती• १९४६ : सईद जाफरी, हिंदी व इंग्रजी चित्रपट अभिनेते.📌 स्मृतिदिन :- • १८२८ : फ्रान्सचे प्रसिद्ध लेखक ऑनरे द बल्झॅक • १९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने • १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे • १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल • १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे • १९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा • २०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता • २००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी • २०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा • २०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर • २०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर • २०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार • २०२२: भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू समर बॅनर्जी • २०२२: भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट ऑस्टॅथिओस पॅथ्रोस• २०२२: भारतीय राजकारणी, खासदार सय्यद सिब्ते रझी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लिहिण्याला पर्याय नाही*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, अंतराळात फडकावलेला तिरंगा दिली खास भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यांचा नवा पक्ष - जनशक्ती जनता दल, 2024 मध्ये स्थापना, बासरी चिन्हावर बिहारची निवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन, पुण्यात होणार ऑगस्टमध्ये आयोजन, 12 संस्थांचा सहभाग, मान्यवरांचा पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन, दीवार, धर्मात्मा, मुन्नाभाई MBBS, लगान, 3 इडियट्स यांसारख्या हिंदी चित्रपटांत केलं काम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश कुडलीकर, साहित्यिक, देगलूर👤 हरीश बुटले, संपादक तथा संस्थापक डिपर👤 इरेश्याम झंपलकर, शिक्षक, बिलोली 👤 गणेश येवतीकर, धर्माबाद 👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद 👤 विवेक सारडे👤 दीपक पाटील 👤 जयपाल दावनगीरकर 👤 प्रमोद मुधोळकर 👤 कांतीलाल घोडके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 56*दोन पाय मोठे दोन पाय लहान**शेतात राबतो ताकद महान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - जीभ व दात ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई, वडील आणि गुरुजन व वडीलधारी माणसे यांच्याशी नम्रतेने वागावे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रचिन्हावरती असलेले देवनागरी लिपीतील 'सत्यमेव जयते' कोठून घेतले आहे ?२) पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या बदलामुळे होते ?३) रिझर्व बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत ?४) 'स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर उभारण्यात आला आहे ? *उत्तरे :-* १) मंडूक उपनिषद २) उष्णता ऊर्जा ३) ब्रिटिश भारत सरकार ४) सांगकाम्या ५) सिंधुदुर्ग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कोड म्हणजे काय ?* 📙अंगावर पांढरे चट्टे असलेली व्यक्ती तुम्ही पाहिली असेलच ! तुमच्या घरात कोणत्या तरी नातेवाईकाला किंवा शेजाऱ्या-पाजार्यांमधील कोणाला असा रोग झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. या रोगाला *'पांढरे कोड'* असे म्हणतात. पांढरे कोड का होते याचे संपूर्ण शास्त्रशुद्ध अशी कारणमीमांसा आपल्याला ज्ञात नसली तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे त्वचेखालच्या मेलॅनिन या रंगद्रव्याच्या प्रमाणात घट झाली तर कोड होते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीमधून मेलॅनीन या रंग द्रव्याची निर्मिती होते. या पेशी मेलॅनोसाईट स्टिम्युलेटिंग हार्मोन या अंतःस्रावाच्या प्रभावाखाली कार्य करतात. या सर्व यंत्रणेत कोणत्याही भागात बिघाड झाल्यास कोड होऊ शकते. त्यामुळे त्याला रोग म्हणण्यापेक्षा शारीरिक बिघाड म्हणणे अधिक योग्य.काही प्रकारचे कोड थोड्या प्रमाणात अनुवांशिक आहे. म्हणजे पुढच्या पिढीत ते उतरू शकते. कोडाबद्दल बरेच गैरसमज आहेत. कोड झालेल्या व्यक्तीच्या शेजारी बसल्यास वा तिला स्पर्श केल्यास कोड होईल, असे बऱ्याच जणांना वाटते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोड हा संसर्गजन्य तर नाहीच. त्यामुळे अशा प्रकारे त्याचा प्रसार होणे अशक्य आहे.कोडामुळे बऱ्याचदा विद्रुपता येते. त्यामुळे कोड झालेली व्यक्ती न्यूनगंडाची शिकार होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच समाजात कोडाबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे परिस्थिती जास्तच बिकट बनते. वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या "अमुक तमुक यांचे कोड संपूर्णत: बरे झाले. . ." अशा जाहिरातीकडे या रुग्णांचे लक्ष न गेले तरच नवल ! मग अनेक भोंदू डॉक्टर, वैदू, वैद्य अशा रुग्णाच्या अज्ञानाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतात. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अगत्याचे आहे. ती म्हणजे कोडावर हमखास परिणामकारक ठरेल असे औषध व उपचार अजून तरी सापडलेला नाही. कोडाच्या उपचारावर संशोधन चालू असून त्यात अतिनील किरणे, काही रसायने वापरून पांढरा झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लंबोदर गिरीजा नंदना देवापूर्ण करी मनोकामना देवा || धृ ||हे मन पावन तव पदी सेवनबुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||पायी घागुऱ्या वाजती रुणझुणनाचत यावे गजानन देवा … || २ ||एका जनार्दनी विनवितो तुजविद्या द्यावी गजनना देवा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने वैराग्य धारण केले असते त्याला कशाचीही अपेक्षा नसते. अशा व्यक्तीला व्यर्थ विकार सुद्धा स्पर्श करू शकत नाही. म्हणून ती व्यक्ती, जीवन जगत असताना इतर गोष्टींच्या मागे न धावता कार्य करत असते हीच त्याच्यात असलेली खरी वैराग्यतेची ओळख असते.म्हणून त्याला दु:खी होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आपल्यात असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *साधू आणि यक्ष*एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.तात्पर्य - एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)