✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~नवीन वर्षानिमित्त फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा ......!Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/12/happy-new-year-2025.html •• ┈┉┅━ ◆❍❀🔘❀❍◆ ━┅┉┈••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷*_💐💐नूतन वर्षाभिनंदन_*💐💐 🌼 *_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२: डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गोपाळ ऋषीदास इंगळे -- कवी**१९९१: प्रणव अविनाश कुलकर्णी -- अनुवादक, संपादक**१९९०: नागू वीरकर -- लेखक**१९८९: गणेश प्रल्हादराव आघाव -- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९८१: अशोक गायकवाड --- कवी**१९८१: प्रदीप गुलाबराव ईक्कर -- कवी, लेखक**१९७७: राम वाल्मीक राव सोळंके -- कवी**१९७६: वि. दा. पिंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७६: शेख बिस्मिल्ला शेख कासिम -- कवी**१९७५: सोनाली बेंद्रे -- भारतीय अभिनेत्री**१९७४: आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी, गायक**१९७४: विजय दिगंबर जाधव -- लेखक**१९७४: डॉ. अरविंद बाबाराव पाटील -- कवी**१९७३: प्रा. युवराज तानाजीराव खरात -- कवी, कथाकार, कादंबरीकार**१९७२: भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१: सीमा गजानन भसारकर -- कवयित्री**१९७०: हरिश्चंद्र रामचंद्र धीवार -- कवी**१९७०: शेषराव पिराजी धांडे -- प्रसिद्ध कवी**१९७०: प्रा.डॉ.सुनील रामटेके --- कवी, लेखक* *१९६९: हरिबा रानबा अडसुळे -- मराठी व हिंदी मध्ये लेखन करणारे कवी तथा लेखक**१९६९: डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६८: प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे -- प्रसिद्ध लेखक* *१९६८: राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव) -- कवी* *१९६७: मनोज बोरगावकर -- लेखक**१९६६: प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार -- प्रसिद्ध लेखक**१९६३: आत्माराम शंकरराव कुटे -- कवी**१९६२: संजय आर्वीकर - प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक* *१९६०: अनुरत्न वाघमारे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक**१९६०: प्रा. डॉ. तानाजी राऊ पाटील -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६०: डॉ. सुरेश गोविंदराव सावंत -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९: नंदन नांगरे -- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५९: गंगासानी रामा रेड्डी -- तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते (मृत्यू: १४ एप्रिल २०११)**१९५६: काकासाहेब पांडुरंग देशमुख -- कवी**१९५५: शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील -- शाहीर, लेखक**१९५५: दयानंद नारायण पिसोळकर -- लेखक**१९५३: उद्धव हरिभाऊ कोळपे-जाधव -- लेखक**१९५२: डॉ. देवकर्ण तुलशीराम मदन -- प्रसिद्ध लेखक कवी**१९५२: यशवंत राजाराम निकम -- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१: नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१: शंकर गोविंदराव पांडे -- लेखक (मृत्यू: ९ डिसेंबर २०२४)**१९५२: शाजी नीलकांतन करुण -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०: तुकाराम सीताराम ढिकले -- कवी**१९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०: निर्मला उद्धव भयवाळ -- कवयित्री**१९५०: राहत इंदोरी-राहत कुरेशी -- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी (मृत्यू: ११ऑगस्ट २०२०)**१९४८: नानासाहेब चिमणराव बोरस्ते -- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८: नामदेव चंद्रभान कांबळे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू अहिरे -- कवी* *१९४६: डॉ.निवास पांडुरंग पाटील -- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक, लेखक**१९४५: प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ -- सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा पटकथा आणि संवाद लेखक* *१९४५: मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४५: त्रिंबकराव दगडू बरकले -- प्रसिद्ध कवी**१९४३: संजीवनी खेर -- प्रसिद्ध लेखिका, पत्रकार**१९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण**१९४३: प्रा. डॉ. मधुकर रूपराव वाकोडे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२: उत्तम बंडू तुपे --- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल २०२० )**१९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६: राजा राजवाडे – प्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७ )**१९३५: मोहन चोटी -- भारतीय विनोदी अभिनेता (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९२ )**१९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८ )**१९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३ )**१९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२ )**१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४ )**१८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२ )**१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७० )**१८७८: हसरत मोहानी -- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू: १३ मे १९५१ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर नांदगावकर -- ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक (जन्म: ११ जून १९३९ )**२००९: रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**१९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.(जन्म: ८ ऑक्टोबर १८९१ )**१९५५: डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )**१९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९ )**१८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७ )**_ २०२५ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भिंतीवर कॅलेंडर नाही असे घर शोधून सापडणार नाही. या कॅलेंडरचा वापर आपण कसा करतो ? किंवा करायला हवं ? याविषयी विचार जरूर वाचा 👇🏼*हर कॅलेंडर कुछ कहता है ।*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांकडून इस्रोचं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जानेवारी महिन्यात 4 व 5 तारखेला 11 वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुण्यात; जगभरातील प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांचे लघुपट पहाण्याची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी, सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छ. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 अनिकेत भारती, पोलीस अधिक्षक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका व कवयित्री, लातूर👤 अशोक गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका, धर्माबाद👤 धोंडिबा गंगाराम गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, धर्माबाद👤 डॉ. शैलेश उमाटे, मनोविकारतज्ञ, मुंबई👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 शेख बिस्मिल्ला सोनेशी, साहित्यिक, सिंदखेड👤 दिलीप धामणे, शिक्षक तथा साहित्यिक, हिंगोली👤 मुकुंद जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेंद्र जयस्वाल, कुपटी, माहूर👤 सतिश शिंदे, पत्रकर, धर्माबाद👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दासोपंत - दासोपंत दिगंबर देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात , कारण त्यांच्यात ऐक्य असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *बाल्ड ईगल* या पक्ष्याला *राष्ट्रीय पक्षी* म्हणून घोषित केले आहे ?२) भारतात होणाऱ्या पहिल्या खोखो वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?४) सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले 'बॉर्डर सोलर व्हीलेज' कोणते ?५) भारतात पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ? *उत्तरे :-* १) अमेरिका २) सलमान खान ३) दादाजी भुसे ४) मसाली, जि. बनासकांठा, गुजरात ५) वाराणसी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्‍यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो.साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात.मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम.जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥ ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥ समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥ नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो.पण, अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेनाच्या सड्या एवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते.तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये.कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली. तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले," तू स्वतःला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही." दुसरा संत त्यावर म्हणाला," अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे." राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले. *तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~नवीन वर्षानिमित्त फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा ......!Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/12/happy-new-year-2025.html •• ┈┉┅━ ◆❍❀🔘❀❍◆ ━┅┉┈••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷*_💐💐नूतन वर्षाभिनंदन_*💐💐 🌼 *_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२: डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गोपाळ ऋषीदास इंगळे -- कवी**१९९१: प्रणव अविनाश कुलकर्णी -- अनुवादक, संपादक**१९९०: नागू वीरकर -- लेखक**१९८९: गणेश प्रल्हादराव आघाव -- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९८१: अशोक गायकवाड --- कवी**१९८१: प्रदीप गुलाबराव ईक्कर -- कवी, लेखक**१९७७: राम वाल्मीक राव सोळंके -- कवी**१९७६: वि. दा. पिंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७६: शेख बिस्मिल्ला शेख कासिम -- कवी**१९७५: सोनाली बेंद्रे -- भारतीय अभिनेत्री**१९७४: आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी, गायक**१९७४: विजय दिगंबर जाधव -- लेखक**१९७४: डॉ. अरविंद बाबाराव पाटील -- कवी**१९७३: प्रा. युवराज तानाजीराव खरात -- कवी, कथाकार, कादंबरीकार**१९७२: भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१: सीमा गजानन भसारकर -- कवयित्री**१९७०: हरिश्चंद्र रामचंद्र धीवार -- कवी**१९७०: शेषराव पिराजी धांडे -- प्रसिद्ध कवी**१९७०: प्रा.डॉ.सुनील रामटेके --- कवी, लेखक* *१९६९: हरिबा रानबा अडसुळे -- मराठी व हिंदी मध्ये लेखन करणारे कवी तथा लेखक**१९६९: डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६८: प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे -- प्रसिद्ध लेखक* *१९६८: राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव) -- कवी* *१९६७: मनोज बोरगावकर -- लेखक**१९६६: प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार -- प्रसिद्ध लेखक**१९६३: आत्माराम शंकरराव कुटे -- कवी**१९६२: संजय आर्वीकर - प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक* *१९६०: अनुरत्न वाघमारे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक**१९६०: प्रा. डॉ. तानाजी राऊ पाटील -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६०: डॉ. सुरेश गोविंदराव सावंत -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९: नंदन नांगरे -- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५९: गंगासानी रामा रेड्डी -- तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते (मृत्यू: १४ एप्रिल २०११)**१९५६: काकासाहेब पांडुरंग देशमुख -- कवी**१९५५: शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील -- शाहीर, लेखक**१९५५: दयानंद नारायण पिसोळकर -- लेखक**१९५३: उद्धव हरिभाऊ कोळपे-जाधव -- लेखक**१९५२: डॉ. देवकर्ण तुलशीराम मदन -- प्रसिद्ध लेखक कवी**१९५२: यशवंत राजाराम निकम -- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१: नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१: शंकर गोविंदराव पांडे -- लेखक (मृत्यू: ९ डिसेंबर २०२४)**१९५२: शाजी नीलकांतन करुण -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०: तुकाराम सीताराम ढिकले -- कवी**१९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०: निर्मला उद्धव भयवाळ -- कवयित्री**१९५०: राहत इंदोरी-राहत कुरेशी -- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी (मृत्यू: ११ऑगस्ट २०२०)**१९४८: नानासाहेब चिमणराव बोरस्ते -- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८: नामदेव चंद्रभान कांबळे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू अहिरे -- कवी* *१९४६: डॉ.निवास पांडुरंग पाटील -- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक, लेखक**१९४५: प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ -- सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा पटकथा आणि संवाद लेखक* *१९४५: मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४५: त्रिंबकराव दगडू बरकले -- प्रसिद्ध कवी**१९४३: संजीवनी खेर -- प्रसिद्ध लेखिका, पत्रकार**१९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण**१९४३: प्रा. डॉ. मधुकर रूपराव वाकोडे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२: उत्तम बंडू तुपे --- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल २०२० )**१९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६: राजा राजवाडे – प्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७ )**१९३५: मोहन चोटी -- भारतीय विनोदी अभिनेता (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९२ )**१९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८ )**१९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३ )**१९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२ )**१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४ )**१८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२ )**१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७० )**१८७८: हसरत मोहानी -- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू: १३ मे १९५१ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर नांदगावकर -- ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक (जन्म: ११ जून १९३९ )**२००९: रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**१९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.(जन्म: ८ ऑक्टोबर १८९१ )**१९५५: डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )**१९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९ )**१८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७ )**_ २०२५ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भिंतीवर कॅलेंडर नाही असे घर शोधून सापडणार नाही. या कॅलेंडरचा वापर आपण कसा करतो ? किंवा करायला हवं ? याविषयी विचार जरूर वाचा 👇🏼*हर कॅलेंडर कुछ कहता है ।*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांकडून इस्रोचं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जानेवारी महिन्यात 4 व 5 तारखेला 11 वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुण्यात; जगभरातील प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांचे लघुपट पहाण्याची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी, सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छ. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 अनिकेत भारती, पोलीस अधिक्षक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका व कवयित्री, लातूर👤 अशोक गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका, धर्माबाद👤 धोंडिबा गंगाराम गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, धर्माबाद👤 डॉ. शैलेश उमाटे, मनोविकारतज्ञ, मुंबई👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 शेख बिस्मिल्ला सोनेशी, साहित्यिक, सिंदखेड👤 दिलीप धामणे, शिक्षक तथा साहित्यिक, हिंगोली👤 मुकुंद जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेंद्र जयस्वाल, कुपटी, माहूर👤 सतिश शिंदे, पत्रकर, धर्माबाद👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दासोपंत - दासोपंत दिगंबर देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात , कारण त्यांच्यात ऐक्य असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *बाल्ड ईगल* या पक्ष्याला *राष्ट्रीय पक्षी* म्हणून घोषित केले आहे ?२) भारतात होणाऱ्या पहिल्या खोखो वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?४) सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले 'बॉर्डर सोलर व्हीलेज' कोणते ?५) भारतात पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ? *उत्तरे :-* १) अमेरिका २) सलमान खान ३) दादाजी भुसे ४) मसाली, जि. बनासकांठा, गुजरात ५) वाराणसी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्‍यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो.साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात.मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम.जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥ ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥ समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥ नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो.पण, अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेनाच्या सड्या एवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते.तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये.कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली. तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले," तू स्वतःला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही." दुसरा संत त्यावर म्हणाला," अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे." राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले. *तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15QRYf8jXE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील ३६६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.**१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.**१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.**१९४४: दुसरे महायुद्ध- हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.**१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.**१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३: धनाजी शिवराम माळी -- लेखक**१९६८: डॉ. अनिल शंकरराव पावशेकर -- लेखक**१९६५: लक्ष्मण शिवरामकृष्णन --" शिवा " आणि एलएस म्हणून प्रसिद्ध,माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक**१९६१: सुरेश पाटील -- लेखक* *१९५२: प्राचार्य डॉ. केशव मधुकरराव भांडारकर -- लेखक, शिक्षण तज्ज्ञ* *१९४९: देविदास तुळशीराम खडताळे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२ )**१९४३:सर बेन किंग्सले -- महात्मा गांधीजीची भूमिका अजरामर करणारे इंग्लिश अभिनेता**१९४०: मन्साराम वारलुजी दहिवले -- लेखक**१९२३:अरविंद महेश्वर ताटके -- चरित्रलेखक (मृत्यू: २४ जानेवारी २०१० )**१९१६: बालशंकर देवराव देशपांडे -- साहित्यकार, संपादक**१९१६: मनोहर विनायक गोखले -- लेखक* *१९०८: नरहर (बाबूराव) विष्णु जोशी -- महाराष्ट्रातील एक संगीतज्ञ व प्रसिद्ध विधिज्ञ.(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४ )**१९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्‌मविभूषण (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर -- संगिततज्ञ,लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९०: पुरुषोत्तम रामचंद्र लेले -- रंगभूमीचे व्यासंगी अभ्यासक,लेखक, स्तंभलेखक (मृत्यू: ३१ मे १९६५ )**१८८७: विष्णू केशव पाळेकर -- मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक,त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे (मृत्यू: ९ जुलै १९६७ )**१८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक,बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४ )**१८४५: जनार्दन बाळाजी मोडक --मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक (मृत्यू: १९ मार्च १८९२ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: कादर खान --- हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते (जन्म: १८ डिसेंबर १९३७ )**२०११: वंदना विटणकर -- मराठी कवयित्री, गीतकार,बालसाहित्यकार,नाटककार (जन्म: १९४१ )**२००५: प्रा. दि. य. देशपांडे -- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, प्रसिद्ध लेखक यांच्या मराठी लेखनापैकी पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी जास्त अचूक माहिती देणारे लेखन (जन्म: २४ जुलै १९१७ )* *१९९७: छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे) -- रंगभूमीवरील नामवंत गायक नट (जन्म: १० मार्च १९१८ )**१९८६: राजनारायण –माजी केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: १९१७ )**१९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••31 डिसेंबर अर्थात वर्षातील शेवटचा दिवस त्यानिमित्ताने सर्वचजण पार्टी करण्याच्या मूड मध्ये असतात. अशीच एक लघुकथा*थर्टी फर्स्ट ची पार्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अभिवादन दिनानिमित्त विजयस्तंभ स्थळी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम, विजयस्तंभास फुलांची सजावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *MHT-CET परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, 15 फेब्रुवारी पर्यंत भरता येणार अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकरी संघटना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार - अंबादास हांडे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *श्याम खामकर यांना भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान, भौगोलिक बंधनात न अडकता कवीने व्यक्त होणे गरजेचे - भारत सासणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजपकडून अकोला जिल्हा परिषदेतील 11 नेत्यांना थेट घरचा रस्ता, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र पुंडकर यांचेही निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, रोहितसेना WTC फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मधमाशी चावल्यावर काय होते ?*📙डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BHIM - Bharat Interface for Money*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणूस तो म्हणवला जातो जो आपल्यावर इतरांनी फेकलेल्या दगडापासून पायाबांधणी करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते ?३) भारतीय रिझर्व्ह बँकेचे १५ वे गव्हर्नर कोण होते ?४) भारताचे २२ वे केंद्रीय अर्थमंत्री कोण होते ?५) २००४ ते २०१४ या काळात भारताचे १३ वे पंतप्रधान कोण होते ? *उत्तरे :-* १) डॉ. मनमोहन सिंग २) डॉ. मनमोहन सिंग ३) डॉ. मनमोहन सिंग ( १९८२ ते १९८५ ) ४) डॉ. मनमोहन सिंग ( १९९१ ते १९९६ ) ५) डॉ. मनमोहन सिंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 धनाजी माळी, साहित्यिक👤 शिवाजी बी. खुडे, शिक्षक👤 करण यादव👤 मारोती बोलेवाड👤 रेहान खान👤 निलेश धावडे👤 ताहेर पठाण लतीफ खान👤 किरण अबुलकोड👤 अमोल बुरुंगुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥ तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥ आळवणीच तूं बा वाचे । तेणें छंदें पेंधा नाचे ॥३॥ तूं बा माझा मी दास तुझा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी एक सेंकद सुद्धा लागत नाही.मात्र त्याच व्यक्तीचे कार्य, तळमळ, संघर्ष, प्रयत्न आणि आपुलकी जाणून त्याचा सन्मान करण्यासाठी वेळ मात्र कधीच वेळ मिळत नसतो.नको त्याचा सन्मान होतो, जो सन्मानाला पात्रही नसतो अशा व्यक्तीचा मात्र सन्मान होत असते.असे प्रसंग बघायला मिळत असतात. ही आजची वास्तविकता आहे. एखाद्या व्यक्तीचा अपमान करताना भलेही काही वाटत नसेल पण, त्याने जीवनात स्वतः पेक्षा इतरांच्या भल्यासाठी काय केले आहे ते मोलाचे योगदान जाणून घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महापुरुष*आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसऱ्या दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला.*नवीन वर्षात आपण ही खांबाला धरून राहू नका ........*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CdkdzBiwH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟡 *_ या वर्षातील ३६५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: नांदेड जिल्ह्यात अर्धापूर व नायगाव या तालुक्याची निर्मिती* *१९९१मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली!**१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला**१९३८: मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर मकरणपूर ता. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत जनजागरण परिषद**१९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.**१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.*🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: वैशाली बाबुराव कोटंबे -- कवयित्री**१९६९: रामप्रभू सोमाजी गरमडे -- कवी**१९६०: मीनाक्षी विठ्ठलराव दरणे-वेरुळकर -- लेखिका* *१९५९: तात्याराव धोंडिराम चव्हाण -- लेखक* *१९५१: श्रीरात झिटूजी केदार -- कवी* *१९४८: सुरिंदर अमरनाथ -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९४६: डॉ.श्रीनिवास टोणपे -- प्रसिद्ध मराठी व हिंदी कवी* *१९४१: जयसिंगराव पवार-- प्रसिद्ध इतिहास संशोधक**१९३८: डॉ. स्नेहलता देशमुख -- प्रसिद्ध लेखिका, शल्यविशारद, बालरोगतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु( मृत्यू: २९ जुलै २०२४ )**१९३०: बसंत प्रकाश -- प्रसिद्ध संगीतकार ( मृत्यू: १९ मार्च १९९६ )**१९२६: दीनानाथ लाड -- कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (मृत्यू: १२ ऑगस्ट २०१९ )**१९२२: गोपाळ मोरेश्वर कोलते -- लेखक, कवी (मृत्यू: ४ जानेवारी २००४ )**१९०१: अनंत जनार्दन करंदीकर -- मराठी पत्रकार आणि राजकारण, इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक (मृत्यू: १ नोव्हेंबर १९७७ )**१९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,घटनासमितीचे सदस्य,राज्यसभा खासदार,वैदिक संस्कृत, तिबेटी,चिनी,मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३ )**१८८२: बळीराम जनार्दन आचार्य -- अध्यात्मक पुस्तकाचे कर्ते (मृत्यू: १७ जुलै १९५० )**१८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५० )**१८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१ )**१८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६ )*     🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: भवानी शंकर -- भारतीय पखवाज ड्रम वादक (जन्म: १२ सप्टेंबर १९५६ )**२०१५: मंगेश केशव पाडगांवकर -- मराठी कवी लेखक १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० मार्च१९२९ )**२०१३: लक्ष्मी शंकर शास्त्री -- प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका (जन्म: १६ जून १९२६ )**२००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७ )**१९९२: पिराजीराव रामजी सरनाईक -- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर (जन्म: २८ जुलै १९०९ )**१९८७: दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता – संगीतकार* *१९८२: दत्तात्रय जगन्नाथ धर्माधिकारी उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: २ डिसेंबर १९१३ )**१९८१: डॉ. अप्पासाहेब गणपतराव पवार -- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: ५ मे १९१७ )**१९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते* *१९७१: डॉ.विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९ )**१९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६ )**१६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रविवार माझ्या आवडीचा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला देवस्वारी आणि पालखीने प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तरप्रदेश सरकार कडून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना महाकुंभमेळाचे आमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दक्षिण कोरियात विमान लँडिंग करताना मोठा अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रभागा स्वच्छतेसाठी महिन्याकाठी 10 लाखाचा ठेका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पालघरच्या बोईसर-तारापूर MIDC अग्नितांडव ! युके अरोमॅटिकसह इतर दोन कंपनीत भीषण आग, परिसरात धुराचे लांबच लांब लोळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुन्या ई वाहनांच्या खरेदी विक्रीवर 18 टक्के जीएसटी लागू, विक्रेते, खरेदीदारांमध्ये नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦷 *आपल्याला दोनदा दात का येतात ?*🦷याचं अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं तर असं म्हणता येईल, की आपली पुरी बत्तिशी बसवण्याइतका लहान मुलाचा जबडा मोठा नसतो. तो मोठा झाल्याशिवाय मग सारे दात त्यात बसवावेच कसे? तसे ते दाटीवाटीनं कसेबसे बसवले तर त्यांना आपलं काम करणंच अशक्य होईल. तोंडात आलेल्या अन्नाच्या घासावर तुटून पडण्याऐवजी ते एकमेकांवरच आपली धार चालवतील. त्यात त्यांचं नुकसान होऊन अन्नाचे व्यवस्थित तुकडे करून त्याच्या पचनाला मदत कशी करू शकतील ते? बरं, जबड्याचा आकार हवा तेवढा मोठा होईपर्यंत वाट पाहायची तर मग सुरुवातीची बारा-तेरा वर्षं तोंडाचं बोळकं घेऊन वावरावं लागेल. घन पदार्थांचा अन्नात समावेशच करता येणार नाही. नुसतं गिळता येईल असं द्रवरूपातलं किंवा लापशीसारखं अन्नच घेता येईल. उलट, वाढ होत असताना जितक्या लवकर घन अन्न म्हणजेच सॉलिड देता येईल तितकं बरं असतं. म्हणूनच मूल साधारण सात-आठ महिन्यांचं झालं की त्याला असं अर्धवट घन अर्धवट द्रव अन्न द्यायला सुरुवात करता येते. सहा-सात महिन्यांतच एक-दोन तरी दात यायला लागतात. पुढच्या वर्षा-दोन वर्षांत मुलाचं तोंड दातांनी भरून जातं; पण त्या वेळी जास्तीत जास्त वीसच दात तोंडात असतात. जबड्याचा आकार ध्यानात घेता तेवढेच बसवता येतात. त्यांच्या अधेमधे आणखी बारा दातांची बसवणूक करण्यासाठी फटीच नसतात. आता जबडा वाढताना जर दातांदातांमधलं अंतर वाढत गेलं तरी अतिरिक्त दात बसवता येतील. मग मधल्या काळात दातांमधल्या फटीच वरचढ होऊन सारं आरोग्यच बिघडून जाईल. म्हणूनच निसर्गानं ही तात्पुरत्या म्हणजेच दुधाच्या दातांची सोय केली आहे. त्यानंतरच्या काळात ज्यांची आयुष्यभराची साथ व्हायची, म्हणजे त्यांच्याशी काही खिलवाड केली नाही तर, त्या कायमस्वरूपी बत्तिशीची वाढ वास्तविक दुधाचे दात बाहेर पडल्याक्षणीच सुरू होते. दुधाच्या दातांच्या वरच्या हिरड्यांमध्ये ते वाढू लागतात. त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत जबड्याचा आकारही कमाल मर्यादा धारण करतो. हे कायमस्वरूपी दात परिपक्व झाले की दुधाच्या दाताच्या मुळावर घाव घालतात. ते मूळ कापून काढतात. आधारच असा तुटला, की ते दुधाचे दात गळून पडतात. कायमस्वरूपी दातांसाठी आपली जागा खाली करून देतात आणि आपला निरोप घेतात. त्यांची रिकामी झालेली जागा मग ते कायमचे दात घेतात. तरीही काही दाढा उशिराच येतात. अक्कलदाढही त्यातलीच एक. काही जणांना तर ती कधीच येत नाही की काय, अशीही शंका येते; पण ती एक वेगळीच गोष्ट आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ICICI - Industrial Credit and Investment Corporation of India*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सांचीच्या स्तूपाची प्रतिमा भारतीय चलनाच्या किती रुपयाच्या नोटावर आहे ?२) सांचीचा स्तूप कोणत्या राज्यात आहे ?३) सांचीचा स्तूप कोणी बांधला ?४) सांचीच्या स्तूपात कोणाच्या अस्थि आहेत ?५) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सांची स्तूपला केव्हा मान्यता दिली ? *उत्तरे :-* १) २०० ₹ २) मध्यप्रदेश ३) मौर्य सम्राट अशोक ४) गौतम बुद्ध ५) सन १९८९*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किरण रणभीरकर, साधनव्यक्ती, धर्माबाद👤 साहेबराव कांबळे, शिक्षक, नांदेड👤 मारोती राचप्पा छपरे, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी दरेबोईनवाड👤 आनंद यडपलवार, शिक्षक व कवी, धर्माबाद👤 राजेश्वर रामपुरे👤 निवृत्ती लोखंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥ थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥ सर्वांभूतांमाजीं समत्वें दिससी । नामा म्हणे ऐसी दावी लीला ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनातील आचार विचार किंवा शब्द जेव्हा कागदावर लिहिण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो. तसंच कुठेही न बघता तेच शब्द थोडं बोलण्याचा ही प्रयत्न करून बघावा. भलेही ते शब्द बोलताना जरी दर्जेदार निघत नसले तरी शेवटी ते आपलेच शब्द व विचार असतात. आणि ते अंतर्मनातून आलेले असतात. त्यातूनच आपल्याला खरा समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासाला तडा*एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला, "मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का," रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला," अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले." यावर राम शांतपणे शामला म्हणाला," मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे"*तात्पर्य :- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 डिसेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/184dgNUG5N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ३६३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अहिंसेच्या मार्गाने जगात शांतता प्रस्थापित करण्याचे असामान्य कार्य केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना सहस्त्रक शांतता पुरस्कार जाहीर**१९०३: मोटार चालविण्यासाठी चालक परवाना इंग्लंडमध्ये आवश्यक ठरविण्यात आला त्यानंतर इतर देशांनी ही पद्धत अवलंबली* *१८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.**१८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना**१८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.**१८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: संजय ज. गावंडे -- कवी**१९८२: कुंदा बच्छाव -शिंदे -- लेखिका* *१९८२: वैभव दिलीप धनावडे -- कवी, लेखक**१९७९: प्रशांत मंगरु भंडारे -- कवी* *१९७५: राजेश लक्ष्मण व-हाडे -- लेखक* *१९६९: लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स -- ख्यातनाम संगणक अभियंते**१९६२: प्रशांत असनारे -- प्रसिद्ध कवी* *१९६०: दयानंद घोटकर -- पाश्वगायक, संगीतकार, लेखक, कवी दिग्दर्शक अभिनेता* *१९६०: प्राचार्य दीपा क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, संपादिका* *१९५२: अरुण जेटली – माजी केंद्रीय मंत्री व वकील (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१९ )**१९४८: वि. ग. सातपुते -- भावकवी, व्याख्याते, लेखक* *१९४८: डॉ. चंद्रशेखर चिंगरे -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार, अनुवादक**१९४६: गोरख शर्मा -- भारतीय गिटार वादक (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१ )**१९३७: रतन नवल टाटा -- भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष (मृत्यू: ९ ऑक्टोबर २०२४ )**१९३६: प्रा. वामन सदाशिव पात्रीकर -- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३ )**१९३४: बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले -- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: ३० जुलै २०१२ )**१९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२ )**१९३१: देवीदास तुकाराम बागूल -- लेखक, छायाचित्रकार, कथाकार**१९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२ )**१९१८: पंडित निखिल ज्योती घोष -- भारतीय संगीतकार, शिक्षक आणि लेखक (मृत्यू: ३ मार्च १९९५ )**१९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक (मृत्यू: १६ मे १९९४ )**१९०३: पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर -- ख्यातनाम मराठी शाहीर व महाराष्ट्रातील शाहिरीकलेचा इतिहास लिहिणारे इतिहासकार.(मृत्यू: मार्च १९८८ )**१८९९: उधम सिंग-- भारतीय क्रांतिकारक (मृत्यू: ३१ जुलै १९४० )**१८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६ )**१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे -- संत वाड्:मयाचे अभ्यासक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४ )**१८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४ )*🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: फ़ारुक शेख़ -- भारतीय अभिनेता (जन्म: २५ मार्च १९४८ )**२००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३ )**२००३: चिंतामण गणेश काशीकर -- वेदशास्त्र अभ्यासक, लेखक (जन्म: १७ ऑगस्ट १९१० )**२०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे.पुं.रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: १९०९)**१९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९०० )**१९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: १८६० )**१६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चुलीच्या धुराड्यातून मुक्ती अशी उज्वला योजना*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 100 दिवसाचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे सर्व मंत्र्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर मध्ये कमांडो फोर्सची बोगस भरती, तरुणांची फसवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर स्मार्ट सिटीच्या उपाययोजनानंतर गुन्हेगारी दरात 14 टक्के घट, आयआयएम बंगलोरने सादर केला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीए परीक्षेत हेरंब माहेश्वरी आणि ऋषभ ओस्तवाल यांनी केले देशात टॉप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, आज शासकीय इतमामात होणार अंतीमसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भार सहन करावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावा तर भारताचे 5 गडी बाद 164 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मिलिपीड* 📙****************** श्रावणाच्या सुमारास थोडेसे ऊन पडले की, लाल तपकिरी रंगाचे असंख्य पायांचे किडे बागेत, मोकळ्यावर एकगठ्ठा वळवळताना दिसतात. वर्षभर त्यांचा तसा पत्ता नसतो. पण थोडी पावसाची उघडीप, थोडे ऊन असा श्रावण मात्र त्यांना वाढीला पोषक ठरतो व हे हवा खाण्यासाठी मोकळ्यावर येतात. अन्यथा उरलेले दिवस त्यांचा मुक्काम जमिनीखाली असतोच. जमिनीतील नको असलेल्या गोष्टी, नाशवंत गोष्टी म्हणजे सडकी, कुजकी पाने, साली, फुले, फळे नष्ट करणे व जमीन भुसभुशीत ठेवणे हेच त्यांचे काम. गांडुळे हे काम फक्त जमिनीखालीच करतात; पण मिलिपीड्स जमिनीलगतसुद्धा काम करतात.मिलिपीड्सच्या असंख्य जाती जगभर आहेत. महाराष्ट्रात ज्याला आपण पैसाकिडे या नावाने ओळखतो. कारण जरा कोणाचा स्पर्श झाला की हे किडे गोलाकार करून अंग मुडपून स्तब्ध पडून राहतात. या पैशांची लांबी जेमतेम इंचभर असली, तरी पायांच्या जोड्या मात्र मोजता येणार नाहीत, एवढ्या असतात. पुढे दोन लांब नाग्या व मधल्या जबड्यात लहान काटेरी दात असतातच. असंख्य गोलाकार तुकड्यांनी यांचे शरीर बनते व प्रत्येक तुकड्याला पायांच्या दोन जोड्या असतात. सेंटीपीड वेगाने नागमोडी वळणे घेत हालचाल करतात, तर मिलीपीड सावकाश पण सरळ जात राहतात. सेंटीपीडना खायला प्राणिज् व वनस्पतीज दोन्ही पदार्थ चालतात. मिलिपीड शक्यतो वनस्पतीज अन्नावर जगतात. त्यांचा एकूण जीवनकाळही कमी म्हणजे जेमतेम वर्ष दोन वर्षांचाच असतो. पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचे प्रजनन व पुनरुत्पादन होते. म्हणूनही या काळात त्यांची संख्या वाढल्याने वावर जमिनीवर होत असावा. या काळात अनेकदा हे पैसे जोडीजोडीने एकमेकांना पाठीवर घेऊन हिंडतानाही दिसतात. असंख्य पायांचा उपयोग मुख्यत: जमीन उकरताना, बिले करताना, ती भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. मिलिपीड हे निरुपद्रवी, पण उपयोगी प्राणी असून संधिपाद या संघात मोडतात. मिलिपीडचा शब्दश: अर्थ हजार पायांचा प्राणी, तर सेंटिपीड म्हणजे शंभर पायांचा. प्रत्यक्षात मात्र या दोहोंना खूपच कमी पाय आढळतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*SP - Superintendent of Police*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःला लपविण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे हे होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचा खंड कोणता ?२) युरोप खंडातील सर्वात लहान देश कोणता ?३) युरोप खंडातील एकूण देश किती आहेत ?४) युरोप खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?५) युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ? *उत्तरे :-* १) युरोप २) व्हॅटिकन सिटी ३) ५० देश ४) व्होल्गा नदी ( ३,५३१ किमी ) ५) माउंट एल्ब्रस ( ५,६४२ मी. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 वृषाली वानखडे, साहित्यिक, अमरावती👤 नंदकिशोर सोवनी, साहित्यिक, पुणे👤 साई पाटील, धर्माबाद👤 ओमसाई गंगाधर सितावार👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 योगेश ईबीतवार, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥ वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥ ऐकिली म्यां कानीं कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणें ॥३॥ अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंत खूण सांगसी तूं ॥४॥ नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडें दाखवा नेटें पाटें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या माणसाचे जसे विचार असतात त्याच प्रकारचा स्वभाव सुद्धा बरेचदा आढळून येतो. म्हणूनच म्हणतात की, स्वभावाला औषध नसते.त्या स्वभावाला कोणीही बदलवू शकत नाही मात्र ज्या माणसाचे नकारात्मक विचार असतील तर त्या माणसात सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न केल्याने थोडेतरी परिवर्तन येऊ शकते.कारण बरेचदा असे होते की, काही माणसं परिस्थितीमुळे चिंतेत राहून त्या प्रकारे वागत असतात तर काहींच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात म्हणून एकदा तरी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासाला तडा*एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला,"मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का," रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला," अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले." यावर राम शांतपणे शामला म्हणाला," मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे"*तात्पर्य :- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 डिसेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1HDXe7T8Vu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील ३६२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर* *१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.**१९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.**१९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.*🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: खेमचंद गणेश पाटील -- लेखक, संपादक**१९८७: गिरिजा ओक -- मराठी अभिनेत्री**१९७९: देवा गोपिनाथ झिंजाड -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९७९: हबीब भंडारे -- प्रसिद्ध लेखक व कवी**१९६९: आश्लेषा महाजन -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६७: संध्या विजय दानव -- लेखिका**१९६६: किरण अग्रवाल -- अकोला लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक**१९६५: प्रा. सुभाष भिकाजी मगर -- कवी**१९६५: सलमान खान -- प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता* *१९५४: जगदीश छोटू देवपूरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४६: रामचंद्र विष्णू खाकुर्डीकर -- लेखक**१९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७ )**१९३८: आशा भालचंद्र पांडे -- मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू भाषेत लेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका, महाराष्ट्रतील पहिली गझलकार, अध्यक्षा साहित्य विहार संस्था , नागपूर**१९३६: सुधीर देव -- कवी, माझा ग्रंथसंग्रह’ योजना (माग्रस) या नावाच्या वाचक चळवळीचे संस्थापक (मृत्यू:२३ ऑक्टोबर २०२० )**१९२८: निर्मला गोपाळ किराणे -- जुन्या पिढीतील लेखिका (मृत्यू: २३ सप्टेंबर २०२२ )**१९२७: सुमती देवस्थळे -- चरित्रकार (मृत्यू: २२ जानेवारी १९८२ )**१९२७: बाळ गंगाधर देव -- लेखक* *१९२३: श्री. पु. भागवत -- संपादक आणि प्रकाशक (मृत्यू: २१ ऑगष्ट २००७ )**१९१७: निर्मला वसंत देशपांडे -- कवयित्री, कादंबरीकार (मृत्यु: १ मे २००८ )**१९०४: वसंत शांताराम देसाई -- नाटककार, समीक्षक, कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यु: २३ जून १९९४ )**१८९२: रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन -- ज्योतिष्याभ्यासक, ग्रंथकार (मृत्यू: १९ डिसेंबर १९६८ )* *_१८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षण प्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(मृत्यू: १० एप्रिल १९६५ )_**१८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५ )**१७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९ )**१६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५ )**१५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३० )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: विकास सबनीस -- प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार (जन्म: १२ जुलै १९५० )**२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३ )**१९९७: मालती पद्माकर बर्वे -- सुगम संगीत क्षेत्रात कीर्ती मिळविणाऱ्या ज्येष्ठ गायिका (जन्म:१९ एप्रिल १९३० )**१९७२:लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२३ एप्रिल १८९७)**१९६५: देवदत्त नारायण टिळक -- मराठी लेखक( जन्म: १८९१ )**१९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *Email : chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवनात कुटुंबाचे महत्व सांगणारा लेख ..... *आयुष्याची संध्याकाळ* ......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमरावतीच्या करीना थापा सह देशभरातील 17 बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात 'मीट द प्रेस' कार्यक्रमात व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेस उत्साहात सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागते, मुख्य प्राप्तिकर आयुक्त सतीश शर्मा यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या, यात चार खेळाडूंचे अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *संमोहन* 📙 जादूगाराचे प्रयोग कधी पाहिले असतील, तर संमोहनाबद्दल प्राथमिक माहिती नक्कीच कायमची डोक्यात असेल. स्टेजवर बोलावलेल्या माणसाला किंवा जादूगाराच्या मदतनिसाला संमोहित केल्यानंतर ज्या काही आश्चर्यकारक गोष्टी घडू लागतात, त्या विसरणे कोणाही सामान्य माणसाला शक्य होत नाही. ठराविक आज्ञांचे बिनचूक पालन करणे, ज्या गोष्टी तो माणूस एरवी करायला धजावणार सुद्धा नाही अशा गोष्टी बेधडकपणे कसलीही भीती न बाळगता करणे, ज्या बाबींबद्दल कधी ऐकलेही नाही त्यांची संगतवार माहिती देणे वगैरे कामे संमोहित माणसाकडून जादुगार करून घेतो. त्या क्षणी खरे म्हणजे जादूगार जादूगार नसून संमोहित केलेल्या माणसाच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेला ताबेदारच असतो.जागृतावस्था व निद्रावस्था या दोन अवस्था कोणीही पाहू शकतो किंवा स्वतः अनुभव शकतो. यांमधील मुद्दाम निर्माण केलेली कोणाच्या तरी आदेशातून उद्भवलेली, अर्धवट जागृत व अर्धवट निद्रावस्था म्हणजे हिप्नाॅसिस. एखाद्या अधिकारी व तज्ज्ञ व्यक्तीने समोरच्याला स्वतःच्या कृतीतून, नजरेतून, बोलण्यातून दिलेल्या संदेशांमुळे समोरची व्यक्ती या अर्धवट निद्रिस्तावस्थेत जाते. या अवस्थेत त्यांचा शारीरिक व मानसिक संवेदनांवर जवळपास पूर्ण नियंत्रण या तज्ज्ञ व्यक्तीचे असते. जशा आज्ञा दिल्या जातील, तशी संमोहित व्यक्ती वागत असते. उदारणार्थ, संमोहित व्यक्तीला जर तज्ज्ञाने आज्ञा केली की आता तू एखाद्या गायकाची तंतोतंत नक्कल करणार आहेस, तर गाणे कधीही न म्हटलेली संमोहित व्यक्ती जमेल तसे गाणे म्हणू लागते. आज फार थंडी पडली आहे, असे सांगितल्यावर अक्षरश: कुडकुडू लागते. अशा विविध आज्ञापालनातून जादूगार संमोहित व्यक्तीकडून मजेमजेच्या गोष्टी करवुन घेत असतो. या अर्धवट निद्रावस्थेतुन योग्य आज्ञा दिल्यावर संमोहित व्यक्ती पुन्हा जागी होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे झालेल्या गोष्टींबद्दल म्हणजेच अर्धवट निद्रावस्थेत स्वतः केलेल्या कृतीबद्दल तिला काहीही आठवत नसते.हिप्नाॅटिझमचा वापर इंग्लिश सर्जन जेम्स ब्रेड यांनी एकोणीसाव्या शतकात केला. याआधी १७६० साली फ्रान्स मेस्मेर या ऑस्ट्रियन डॉक्टरने मंत्रमुग्धविद्या किंवा मेस्मेरिझमचा वापर केला होता. यातूनच हिप्नाॅसिसचा उगम झाला असे मानले जाते. जीन मार्टिन चारकॉट व सिग्मंड फ्रॉइड यांनी याचा वापर मुख्यतः हिस्टेरिया या मनोविकारांवर उपचार म्हणून सुरू केला. गुंगी, त्यानंतर शरीरात एक ताठरपणा व त्यानंतर झोपेत चालणे व अन्य हालचाली या तीन टप्प्यांतून हिप्नाॅसिसची अवस्था जाते असे मानले जाते. मात्र काही काळानंतर फ्राॅइडनी हा वापर थांबवला.भारतात पण हिप्नाॅसिस किंवा संमोहनविद्या ही फार पुरातनकाळापासून ज्ञात आहे. हिचा वापर मुख्यत: ज्या व्यक्ती दुसऱ्यावर पूर्ण विश्वास टाकतात, सहजगत्या आज्ञापालनाला तयार होतात, भोळ्याभाबडय़ा समजुतीने एखाद्याचे म्हणणे ज्यांना सहज खरे वाटू लागते, त्यांच्यावर पटकन होतो. हे लक्षात घेतले, तर संमोहन करणाऱ्याच्या अधीन होण्याची किमान मानसिक तयारी नसलेली व्यक्ती संमोहित करणे जवळपास अशक्य होते. अशांची संख्या एकूण समाजात जेमतेम २० टक्के सुद्धा नसते. संमोहन किंवा हिप्नाॅसिस ही एक मानवी मनाची अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, असे म्हणायला हरकत नाही. या प्रक्रियेला शास्त्र म्हणून मान्यता द्यायला अनेक तज्ज्ञांचा ठाम विरोध असतो; तर याउलट हिप्नाॅटिझमचे प्रयोग असतील तर जादूगाराची किमया समाजाने मनोमन मान्य केलेली असते. ही सारी गुंतागुंत काय आहे ? अशा प्रकाराला 'संमोहनावस्था' असेही म्हणतात.संमोहन हे एक मान्यता नसलेले शास्त्र आहे. त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण देता येणे अजून जमलेले नाही. पण ज्याला संमोहित करून घेण्याची इच्छा आहे, ज्याची तशी मानसिकता आहे तो जरूर सम्मोहित होऊ शकतो. शास्त्र म्हणजे एका पद्धतीचा परिणाम सर्व लोकांवर दिसणे आवश्यक ठरते. तो इथे दिसत नाही. ज्याला स्वतःच्या मनावर दुसऱ्याचा काबू वा अंमल येऊच द्यायचा नसतो, तो संमोहित झाला आहे, असे फारच क्वचित.याचे व्यावहारिक उपयोग काही वेळा केले जातात. गुन्हेगार, मनोरूग्ण, खोटे बोलणारी निर्ढावलेली व्यक्ती यांना मनोविकारतज्ज्ञ काही औषधांच्या सहाय्याने अशीच अर्धवट सुप्त निद्रावस्था आणतात. नार्कोलेप्सी या अवस्थेत त्यांच्याशी संवादही साधला जातो. पण हे सारे औषधाच्या अमलाखाली असते. त्याचे प्रमाणीकरण अनेक चाचण्यांतून सिद्ध झालेले आहे. असे हिप्नाॅसिसबद्दल सांगता येत नसल्याने असेल कदाचित, पण या प्रकाराला वा या उपचारपद्धतीला शास्त्रज्ञांची मान्यता नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BDO - Block Development Officer*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःच्या जिभेपेक्षा सावरून , धरण्यास अवघड अशी गोष्ट नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाचा खंड कोणता ?२) दक्षिण अमेरिका खंडात एकूण किती देश आहेत ?३) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ?५) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती ? *उत्तरे :-* १) दक्षिण अमेरिका २) १४ देश ३) ब्राझील ४) माउंट अकोनकाग्वा ( ६,९६२ मी. ) ५) अमेझॉन नदी ( ६,८०० किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पूजा शिंपी, बागुल, साहित्यिक, नाशिक👤 विठ्ठल भाई श्रीगांधी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥ होसी कालिमाजीं कलिसारिखाची । भोळया भाविकाच्या भक्तिकाजा ॥३॥ नामा म्हणे माळ घातिली स्वहस्तें । करितोसि दंडवत निमित्यासी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारलं कडू ते कडूच. तुपात तळा किंवा साखरेत घोळा शेवटी आपली चव सोडत नाही. असे अनेकदा वाचण्यात किंवा ऐकण्यात येते. त्याच प्रमाणे कितीही त्यांना निरखून बघितले तरी एक ना एक तरी कारली आपली दृष्टी चुकवून जाते. सत्य सुद्धा असेच आहे. आपल्या जवळ किंवा आपल्या समोर असताना सुद्धा त्याला ओळखता येत नाही. याच चुकीमुळे बरेचदा आपल्या जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते.म्हणून शक्य होईल तेवढ्या लवकर सत्य जाणण्याचा प्रयत्न करावा सोबतच सत्याला समर्पित व्हावे.भलेही सत्य कडू असेल तरीही त्याचा कधीच अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मातृभक्ती*त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले.त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहऱ्याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाहीं. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 डिसेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18fnQomyQM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३६१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली.या लाटेने भारत,श्रीलंका,इंडोनेशिया,थायलँड, मलेशिया,मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.**१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार**१९९२: पहिले कोकण मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला**१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.**१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शिवम पाटील -- भारतीय अभिनेता, नर्तक* *१९७२: सुनिता संदीप तांबे -- कवयित्री, लेखिका**१९६१: मिलिंद सुधाकर जोशी -- कवी, व्याख्याते* *१९६०: वृषाली विक्रम पाटील -- कवयित्री, लेखिका**१९५४: सुरेश पाचकवडे -- प्रसिद्ध कवी, कथाकार* *१९५१: प्रा. नीला विनायक कोंडोलीकर -- लेखिका**१९४९: सुरेखा भगत -- कवयित्री* *१९४८: डॉ. प्रकाश आमटे-- प्रसिद्ध समाजसेवक, लेखक, विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९४१: लालन सारंग – मराठी नाट्यअभिनेत्री, लेखिका (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१८ )* *१९३५: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९ )**१९३८: दत्तात्रय दिनकर पुंडे -- मराठीतील ख्यातनाम समीक्षक, भाषाभ्यासक आणि संपादक* *१९३५: रोहन भोलाल कन्हाई -- वेस्टइंडीज चा क्रिकेटपटू**१९२८: मार्टिन कूपर --- अमेरिकन अभियंता, मोबाईल फोनचे जन्मदाते* *१९२५: पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के.जी’ गिंडे – शास्त्रीय गायक,संगीतकार व शिक्षक (मृत्यू: १३ जुलै १९९४ )**१९१७: डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले.(मृत्यू: १७ जून १९९१ )**१९१४: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक, लेखक (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८ )**१९१४: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर,गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू: ३ जानेवारी २००० )**१९१०: पंडितराव नगरकर (गोविंद परशुराम नगरकर) -- मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट.( मृत्यू: २८ जुलै १९७७)**१८९३: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू: ९ सप्टॆंबर १९७६ )**१७९१: चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू: १८ आक्टोबर १८७१ )*🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म: १५ सप्टेंबर १९२१ )**२०००: प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक (जन्म: ११ मार्च १९१२ )* *१९९९: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८ )**१९८९: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक,भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक,पद्मविभूषण (१९७६) (जन्म: ३१ जुलै १९०२ )**१९७२: हॅरी एस.ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ मे १८८४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाचा जन्म झाल्यापासून ते अंतिमसंस्कारपर्यंतचा प्रवास*नामकरण ते अंत्यविधी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त ( 25 डिसेंबर ) त्यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट आणि नाणे केलं जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याशिवाय पर्याय नाही,  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे; पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर, लवकरच निर्णय होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 67 प्रवाशांसह विमान कोसळलं;  25 जणांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मंत्री सरनाईकानी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुगुणी मेथी*मराठीत मेथी, कानडीत मेंथ्या, तमिळ मध्ये वेंथायम आणि तेलगूत मेंथुलू विविध नावांनी ओळखली जाणारी मेथी आणि ह्या भाजीच्या बीया मेथ्या अगदी इडली पासून ते खाकरयापर्यंत विविध खाद्यपदार्थात वापरले जातात. मेथ्यांचा उपयोग काही पाचक औषधांमध्ये केला जातो तर बाळंतीणीला दुध येण्यासाठीही केला जातो. हिरव्या मेथीचा उपयोग परोठया पासून ते भाजी पर्यंत केला जातो.प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. मेथीचे दाणे केसांच्या मुळाला मजबूत करून डॅमेज केसांना पुनर्जीवित करतात. यात प्रोटीन असून मेथीच्या दाण्यांचा जर डाइटमध्ये यांचा समावेश केला तर केस हेल्दी आणि सुंदर होतात. मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. मेथीचे सेवन केल्यामुळे किडनी चांगली रहाते. मूतखडासाठी मेथी हा फायदेशीर उपाय मानला जातो. पिंपल्स आणि ब्लॅकहेड ट्रीडमेंटसाठी मेथीचे दाणे फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यात फाइबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने एक्सट्रा कॅलरी बर्न होतात. मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यानंतर पोट दुखणे आणि जळजळ कमी होते. त्याच बरोबर पचन क्रिया देखील मजबूत होते. मेथी या पालेभाजीची पाने, बिया (मेथ्या), तसेच सुकवलेली मेथी म्हणजेच कसुरी मेथी या सर्वांचा स्वयंपाकात उपयोग केला जातो. मेथी व तिच्या बिया या अत्यंत औषधी समजल्या जातात. मधुमेही लोकांना मेथीचा होणारा उपयोग हा सर्वश्रुत आहेच. मधुमेहींनी गव्हाच्या पिठात मेथ्यापूड घातल्यास रोजच्या पोळ्यांमधून मेथीचा फायदा त्यांना मिळू शकतो. साधारणत: गव्हाच्या ५ किलो पिठात १०० ग्रॅम मेथ्यांची पूड घालावी. हे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवताही येते. वरणासाठी डाळ शिजवतानाही १०-१२मेथ्यांचे दाणे त्यात घालावे. मेथ्या या उत्तम प्रथिनयुक्तु व यकृत संरक्षक आहेत. लिव्हरच्या पेशींना सक्षम करण्यासाठी यांचा उपयोग होतो. मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. संशोधन सांगते, की मेथी ही टाइप-1 व टाइप-2 अशा दोन्ही प्रकारच्या मधुमेहात उपयुक्तस ठरते. मेथीमध्ये इन्सुलिनचे कार्य वाढवण्याचे गुणधर्म आहेत. मेथी ही स्तनांचा व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी करते, असे तज्ज्ञ मानतात. जी मंडळी स्थूल आहेत व ज्यांचे मांसाहार खाणे अधिक आहे अशांनी मेथीसारख्या पालेभाज्या रोजच्या खाण्यात ठेवाव्यात. तोंड येणे, घसा बसणे अशा तक्रारींमध्ये मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम लाभतो. मातांना दूध चांगले येण्यासाठी मेथीची भाजी व बाजरीची भाकरी देण्याची बऱ्याच प्रांतांत पद्धत आहे. मेथी ही क्षार व जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्याने गर्भवती, तसेच बाळंतिणींना ही भाजी अत्यंत हितावह आहे. मेथी सौंदर्यवर्धक देखील आहे. चेहऱ्यावर तारुण्यपीटिका किंवा ब्लॅकहेड्‌स अधिक प्रमाणात येत असल्यास मेथीच्या पानांची पेस्ट चिमूटभर हळद घालून त्याचा चेहऱ्यास पॅक लावावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी दुधात मेथीच्या पानांची पेस्ट एकत्र करून चेहऱ्यास लावावे. केसांचे गळणे कमी करण्यासाठी घरी काढलेले नारळाचे दूध व मेथीच्या पानांची पेस्ट एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा केसांना लावल्यास फायदा मिळतो. आहारामध्ये मेथ्यांचे प्रमाण वाढवल्यास केसांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो. 1 वाटी मेथीच्या सुक्याे भाजीत 58 उष्मांक व 2 ग्रॅम चरबी असते. मेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरुपात वापरली जाते. मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या नावाने ओळखली जाणारी मेथी वाळलेली सुगंधित पाने विविध पदार्थात वापरली जातात. मेथीचे उत्पादन अनेक देशात घेतले जाते. भारतात मुख्यत्वे मेथीचे उत्पादन राजस्थान तेथे सर्वाधिक घेतले जाते. लोणची, रसभाज्यात वापरली जाणारी मसाले यात मुख्यत्वे मेथीचा वापर केला जातो. अनेक भागात मेथीदाणे हे मधुमेहावारचे औषध म्हणून वापरले जाते. प्रसूती नंतरच्या काळात अर्भकाला दुध पाजणार्या स्त्रियांच्या दुधात वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारात मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी औषधी वनस्पती असल्यामुळे ती अक्खी किंवा चूर्ण स्वरुपात वापरली जाते. अनेकदा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव आणण्यासाठी विविध पदार्थात वापरली जाते. मेथी वजन कमी करण्याचे उत्तम साधन आहे. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. कंबर दुखीवर चांगले औषध आहे. थंडीच्या दिवसात डिंकाच्या लाडूमध्ये मेथीचा वापर करतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*DGP - Director General of Police*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड कोणता ?२) उत्तर अमेरिका खंडात एकूण देश किती आहेत ?३) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?५) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ? *उत्तरे :-* १) उत्तर अमेरिका २) २३ देश ३) कॅनडा ४) मिसूरी ( ३,७६७ किमी ) ५) माउंट मॅककिन्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कपिल जोंधळे👤 नागेश्वर राजेश्वर डोमशेर, धर्माबाद👤 आकाश सरकलवाड👤 नरसिंग जिड्डेवार, शिक्षक, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें ॥१॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळाभीतरीम खेळ मांडी ॥२॥ हलाहल शांत करी तत्क्षण । अमृतजीवन नाम तुझें ॥३॥ तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीची चूक झाली असेल तर पुन्हा, पुन्हा त्याच चुकांविषयी त्याला बोलून हिनावून सोडणे किंवा अपमानीत जीवन जगायला लावणे हे,शहाणपणाचे लक्षणे नव्हेत .माणूस म्हटल्यावर प्रत्येकांच्याच हातून चुका होत असतात हे,कधी काळी मान्य सुध्दा करायला शिकले पाहिजे. आणि त्यावर योग्य रितीने मार्गदर्शन करून त्या व्यक्तीला ती चूक लक्षात आणून देण्यासाठी माणुसकीच्या नात्याने ती जबाबदारी पार पाडावी. असे एक महान कार्य केल्याने मनाला विशेष समाधान मिळेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकारी राजाला धडा*एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस- याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वान विचारले, "बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोने-नाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या" पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला, "राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही." पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले," महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस- याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार." एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.*तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~