✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९१:उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९७२:आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.**१९६९:लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.**१९५६:भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.**१९५१:अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळाले.**१९३९:जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.**१९१४:रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.**१९११:पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९७२: राजेंद्र बाबूराव उगले-- कवी,लेखक**१९७०:गणपती कळमकर-- लेखक* *१९६७:मोहन यशवंत सिरसाठ- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४९:अवधूत यशवंत कुडतरकर-- कवी, कथाकार कादंबरीकार* *१९४९:तुळशीराम बोबडे-- कवी,लेखक* *१९४९:पी.ए.संगमा– माजी लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री( मृत्यू:४ मार्च २०१६)**१९४८:प्रा.डॉ.ईश्वर तुकारामजी नंदापुरे-- कवी,लेखक समीक्षक* *१९४७:प्रा.डॉ.विनायक नारायण गंधे-- लेखक, संपादक* *१९४६:पंढरीनाथ तामोरे--लेखक, संशोधक* *१९४४:प्रा. तानसेन जगताप-- लेखक* *१९४४:अनिल वसंत बळेल-- स्तंभलेखक, समीक्षक(मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१९)* *१९४०:यशवंत हरी पाध्ये--ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक(मृत्यू:४आक्टोबर २०१४)* *१९३६:डॉ.वसुधा भिडे-- कवयित्री* *१९३५:दयाराम आत्माराम बारस्कर-- प्रसिद्ध लेखक* *१९३३:सी.अर्जुन-- प्रतिभावान चित्रपट संगीतकार (मृत्यू:३० एप्रिल १९९२)**१९३२:कवळू बळीराम पेंदे-- कवी* *१९३२:नारायण जनार्दन जाईल-- प्रसिद्ध कादंबरीकार कथाकार**१९२३:हबीब तन्वीर-- हिंदी व उर्दू नाटककार,नाट्य दिग्दर्शक,कवी आणि अभिनेते (मृत्यू:८जून २००९)**१९२१:माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज(मृत्यू:२३ मे, २०१४)**१९१५:राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२).(मृत्यू: १९८४)**१९०८:कृष्ण नारायण तथा के.एन.सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)**१८६७:बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर-- कवी, अनुवादक (मृत्यू:४ डिसेंबर १९६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)**१८९३:काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक,न्यायमूर्ती,कायदेपंडीत, समाजसुधारक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२),भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (जन्म:३० ऑगस्ट १८५०)**१७१५ :सलग ७२ वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा १४ वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.(जन्म:५ सप्टेंबर १६३८)**१५८१:गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)**१५७४:गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (जन्म: ५ मे १४७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताटप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू ।।ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ? - कवी श्रीनिवास खारकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यावर दुष्काळाचे सावट, ऑगस्टमध्ये 1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन; 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार; पूनावाला यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोराडी विद्युत प्रकल्पात कोळशाचा वापर नको - आदित्य ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषिमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या मायदेशातील सामन्याचे अधिकार रिलायन्स जिओ आणि वायकॉम 18 कडे, 5966 कोटींची बोली, हॉटस्टारचा पत्ता कट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सातारा* महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या राज्यात फाईव्ह स्टार हॉटेल्स ( पंच तारांकित हॉटेल्स ) सर्वाधिक आहेत ?२) भारतात सर्वाधिक पंच तारांकित हॉटेल्स असलेले पहिले तीन राज्य कोणते ?३) सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?४) आर्थिक विषमता म्हणजे काय ?५) पांढऱ्या छातीचा ढीवर या पक्ष्याचे मुख्य अन्न कोणते ?*उत्तरे :-* १) केरळ ( ४५ हॉटेल्स ) २) केरळ ( ४५ ), महाराष्ट्र ( ३७ ), गोवा ( २७ ) ३) कृष्णा ४) उत्पन्न, संपत्तीचे लोकसंख्येमधील असमान वितरण होय. ५) मासे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 विजय भगत, शिक्षक, वाशीम👤 शिवाजी पाटील येडे👤 प्रल्हाद जाधव, देगलूर👤 कोंडीबा मुत्तलेवाड👤 संभाजी कोंडलवाडे👤 नागनाथ कौडगावे👤 दिनेश सारंगे👤 आर. डी. चिंतलवाड👤 नवनाथ पिसे👤 आर. के. उन्हाळे👤 सुनीता गायकवाड, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" प्रसंगांचे गांभीर्य "*एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट एका बोटीतून प्रवास करत होता.त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलंडुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात बसून राहिलं.डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, "आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि 🐱 आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?".( तात्पर्य ) - तत्त्वचिंतक म्हणाला, दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*१९९१:किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९७१:अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.**१९७०:राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.**१९९६:पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९६२:त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५७:मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४७:भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:आनंदा हिरालाल जाधव-- कवी, लेखक**१९७७:नारायण दादासाहेब गडाख-- कवी, गीतकार, लेखक* *१९७१:मंगेश मधुकर कवटीकवार -- कवी* *१९६९:जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज**१९६७:मुक्ता संजीव कुलकर्णी-- कवयित्री* *१९५६:ज्योती चांदेकर-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री**१९५४:अलकनंदा साने -- कवयित्री, लेखिका**१९५०:पंडित उल्हास यशवंत बापट-- प्रसिद्ध संतूरवादक(मृत्यू:४ जानेवारी २०१८)**१९४४:वामन अच्युत देशपांडे -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक,संत वांड:मयांचे गाढे अभ्यासक* *१९४४:क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४०:शिवाजी सावंत – ख्यातनाम मराठी कादंबरीकार.त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी,कन्नड,गुजराती,मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार मिळाला आहे.(मृत्यू:१८ सप्टेंबर २००२)**१९३१:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (मृत्यू:१० जुलै २००५)**१९१९:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू:३१ आक्टोबर २००५)**१९१३:प्रा.सदाशिव नारायण दीक्षित-- कवी, लेखक**१९०७:रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१७ मार्च १९५७)**१८९३:नारायण धोंडोपंत ताम्हनकर-- मराठीतील कथा लेखक(मृत्यू:५ जानेवारी १९६१)**१८७०:मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात.(मृत्यू:६ मे १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:प्रणव मुखर्जी- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती(जन्म:११ डिसेंबर १९३५)* *२०१२:काशीराम राणा – भाजपाचे माजी लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)**२०००:महावीर शाह-- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता(जन्म:५ एप्रिल १९६०)**१९९५:सरदार बियंत सिंग-‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या(जन्म:१९ फेब्रुवारी १९२२)**१९७६:देविदास गोविंद लांडगे -- इतिहास संशोधक,लेखक (जन्म:१८८९)* *१९७३:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(जन्म:१९ एप्रिल १८९२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *नभं उतरू आलं....*नभं उतरू आलं, चिंब थरथर वलंअंग झिम्माड झालं, हिरव्या बहरातअशा वलंस राती, गळा शपथा येतीसाता जल्मांची प्रीती, सरंल दिनरातवल्या पान्यात पारा, एक गगन धरातसा तुझा उबारा, सोडून रीतभातनगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलूगाठ बांधला शालू, तुझ्याच पदरागायक / गायिका : आशा भोसलेसंगीतकार : हृदयनाथ मंगेशकरगीतकार : ना.धो.महानोरचित्रपट : जैत रे जैतसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ग्लोबल स्टुडंट प्राईजसाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची झाली निवड, त्यामध्ये रविंद्र बिष्णोई पहिल्या 10 जणांच्या यादीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दोन दिवसांनंतर गोंदिया मधील शेतकऱ्याचं आंदोलन स्थगित, चार सप्टेंबरपर्यंत तांदळाचे पैसे मिळणार; आमदार विनोद अग्रवालांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक, हॉटेलबाहेर त्रिस्तरीय सुरक्षा; 280 खोल्या आरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही; अपवादात्मक परिस्थितीचं कारण पुढे करुन ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता.. सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शासकीय भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा, परीक्षेसाठी 100 रुपयांचं शुल्क घ्या; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पालघर जिल्ह्यातील दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार; सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्णधार बाबरचे झंझावती दीडशतक, इफ्तिखारचे वादळी शतक, पाकिस्तानचा नेपाळसमोर 342 धावांचा डोंगर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *सांगली* महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिती कोणतीही असो हार न मानता लढायला शिका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दरवर्षी 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' केव्हा साजरा केला जाणार आहे ?२) चंद्रावर विक्रम लँडर उतरला ती जागा कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे ?३) चंद्रयान - २ कोसळले त्या ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जाईल ?४) भारताने सूर्याच्या अभ्यासासाठी हाती घेतलेल्या पहिल्या मोहिमेत एल - १ कक्षेत कोण भ्रमण करणार आहे ?५) जागतिक महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) २३ ऑगस्ट २) शिवशक्ती पॉईंट ३) तिरंगा ४) आदित्य - एल १ ५) २६ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मा. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि. प. नांदेड👤 रत्नाकर पा. कदम चोळखेकर, धर्माबाद👤 संतोष पाटील साखरे, बिलोली👤 सुभाष जाधव, शिक्षक, देगलूर👤 सचिन वाघ, शिक्षक, बुलढाणा👤 उदय मोहिते, शिक्षक, कोल्हापूर👤 प्रकाश कल्याणकार👤 अशोक मुदलोड, येवती👤 अशोक जायेवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राम कल्पतरु कामधेनु।निधी सार चिंतामणी काय वानूं॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकांची रहाणीमान वेगवेगळी असते. प्रत्येकांचा स्वभाव सुध्दा वेगळा असतो. कारण, हे जग खूप मोठे आहे. आपण त्यांच्यासारखे वागायचे किंवा रहायचे ठरवले तर. .कदाचित ते, जमणार नाही. म्हणून आपण ज्या परिस्थितीत जगत आहात त्याच परिस्थितीला आपलेसे करून समाधानी राहून जगून बघावे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद नक्कीच मिळेल... फक्त, त्या,परिस्थितीला आपलेसे करता आले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी*एका राज्‍यात मूर्ख राजाचे शासन होते. त्‍याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्‍या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्‍या राजाच्‍या राज्‍यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्‍यक्ती आपल्‍यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्‍याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्‍य त्‍या राज्‍यात जात नसत. त्‍यामुळे त्‍या राज्‍यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्‍या राज्‍यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्‍ला दिला की त्‍या ऋषींना आपल्‍या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्‍यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्‍यांचा सत्‍कार करावा म्‍हणजे जनतेचा विश्‍वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्‍कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्‍या मुख्‍य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्‍या झोपड्या पाहून थांबले व त्‍यांनी विचारले,’’ या कुणाच्‍या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्‍या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्‍यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्‍काळ राजाला म्‍हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्‍यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्‍हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्‍य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्‍याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्‍या उपदेशाने राजाचे राज्‍य लयाला गेले. त्‍याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.तात्‍पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्‍ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्‍हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚 --------------------------- शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍ 🌺शब्दटोपली क्र. (१४)🌺' त्र ' असणारे शब्द. चित्र ,छञी,मित्र ,मात्र ,पत्र ,पाञ, यात्रा ,कुत्रा ,जञा, रात्र ,चिञा,चैत्र ,तंत्र ,तंत्रे ,खात्री ,चरित्र ,पत्रा , सत्र ,गोत्र ,सूत्र ,संञी, नेत्र ,विचित्र ,सन्मित्र ,शस्त्र ,पित्र ,पुत्र ,स्तोत्र ,गोमूत्र ,पवित्र ,पात्र ,छत्र ,क्षेत्र ,शास्त्र , माञा, पाञ, सत्र, सञात,पवित्र ,पवित्रा , धरिञी, सन्मिञ,सुमिञा, सचिञ, मैत्री ,मैत्रीण,मंत्री ,मंञ,ञुटी,मांञीक, ञयस्थ,चित्रे ,नेञा, भिञा,पञास ,पञातील,पञावर, पञपेटी,चिञांचा,चिञातील,चिञावरुन,चिञकार,पञकार,वृत्तपत्र,वृत्तपत्रे,वृत्तपत्रांनी ,सूञधार, सर्पमिञ,कवयिञी,ञिवार,ञिवेणी,मंञीमंडळ,ञिकालबाधीत, घोषणापञ, तांत्रिक , तंत्रज्ञान,तंत्रस्नेही,तंत्रज्ञानात्मक,लिळाचरिञ. ---------------------------✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_राष्ट्रीय क्रीडा दिन_* *_ या वर्षातील २४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९७४:चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.**१९४७:डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.**१९१८:लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.**१८३३:युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.**१८३१:मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.**१८२५:पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१४९८:वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:डॉ.मिलिंद भिवाजी कांबळे -- कथा, कादंबरी व समीक्षण करणारे मराठी लेखक**१९७४:नेताजी रामदास सोयाम-- कवी* *१९७०:डॉ.श्रीराम यशवंत गडेकर-- लेखक, समीक्षक* *१९६९:कल्याणी विजय मादेशवार-- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनंत वासुदेव माळवे-- लेखक,कवी* *१९६०:संजय वासुदेव कठाळे-- लेखक* *१९५८:मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक,संगीतकार,निर्माता, अभिनेता (मृत्यू:२५ जून २००९)**१९५७:मकरंद साठे-- मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक**१९५४: शिरीष पुरुषोत्तम मोराणकर -- कवी, लेखक**१९५०:लीना चन्दावरकर- हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री**१९४७:शोभा अनिल भागवत -- बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका संचालिका, गरवारे बालभवन**१९४४:डॉ. मृणालिनी भालचंद्र फडनाईक-- कथाकार,कवयित्री,लेखिका**१९२९:गो.मा. पुरंदरे-- कादंबरीकार* *१९२३:रिचर्ड अ‍ॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते**१९१५:इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू:२९ ऑगस्ट १९८२)**१९०५:मेजर ध्यानचंद – प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू (मृत्यू:३ डिसेंबर १९७९)**१९०१:पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू:२७ एप्रिल १९८०)**१८८०:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे-विदर्भातील सामाजिक,राजकीय, संस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व (मृत्यू:२६ जानेवारी १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)**२००७:बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म:५ नोव्हेंबर १९१७)**२०००:विजया साने -- बालसाहित्यिक, लेखिका (जन्म:५ आक्टोबर १९२३)* *१९८६:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म:१५ जून १८९८)**१९७६:काझी नझरुल इस्लाम –  स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.  (जन्म:२५ मे १८९९)**१९७५:इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष  (जन्म: १४ आक्टोबर १८८२)**१९६९:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म:२० आक्टोबर १९१६)**१९०६:बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक,ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: मे १८३१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *रक्षाबंधन*भाऊ बहिणीचा सणत्याचे नाव रक्षाबंधनओवाळते भाऊरायाबहिणीचे करतो रक्षणधागा नाही हा कच्चात्यात प्रेमाचे आहे बंधनवर्षानुवर्षे टिकविण्यासाठीकरू या ऋणानुबंध मंथनबहीण नाही ज्या भावालाप्रेमासाठी पहा तळमळतोराखी बांधून घेण्यासाठीतो एका बहिणीला शोधतोदेशातल्या आया बहिणीवरपहा अत्याचार किती वाढलेएक भाऊ येईना चालून पुढेबहिणीला जे त्याने वचन दिलेप्रत्येक स्त्री बहिणीसमान मानावेप्रत्येक भाऊला हे कळले पाहिजेतोच दिवस रक्षाबंधनाचा खरा आपण साजरा केला पाहिजे.- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी आज जाहिरात येणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोयना धरणातील पाणी वीज निर्मितीऐवजी पिण्यासह शेतीसाठी वापरा, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बोर्डाच्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाची बाजी; निकालाची टक्केवारी 32.13 टक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास! सात वर्षात सात सुवर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिलीप वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *रायगड* महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात जास्त सोन्याचा साठा कोणत्या देशाजवळ आहे ?२) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते ?३) प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते ?४) राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो ?५) भारतीय हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई चॅम्पियन ट्रॉफी जिंकली ?*उत्तरे :-* १) अमेरिका ( ८१३३ टन ) २) पंतप्रधान ३) राष्ट्रपती ४) सन १९९२ ५) चौथ्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड👤 रामचंद्र गणपत वास्ते, शिक्षक गव्हाणे बागल वस्ती पंढरपूर 👤 रवी शिंदे, साहित्यिक, बिलोली👤 रवींद्र केंचे, साहित्यिक👤 शिवराज पाटील चोळखेकर, धर्माबाद👤 ईश्वर सेठीये👤 विनायक कुंटेवाड, धर्माबाद👤 सचिन बावणे👤 गणेश राऊत👤 अनिरुद्ध खांडरे👤 गणेश येडमे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कल्पना कल्पितां कल्पकोटी। नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥ मनीं कामना राम नाही जयाला। अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल जेव्हा, आपल्याला माहिती मिळते त्यावेळी मात्र आपला आनंद गगणात मावेनासा होतो कारण, तो आनंद विशेष गोष्टीबद्दल असतो. आपल्या कर्तृवाचा असतो. अशा वेळी, आपण स्वतःही आनंदीत रहावे व इतरांना सुद्धा त्या आनंदात सहभागी करून घ्यावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃❝ अहंकार ❞❃* ━━═•●◆●◆●•═━━ उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्‍वराने देवांवर कृपा केली आणि त्‍यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्‍यावर प्रत्‍येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्‍यातील प्रत्‍येक जण विजयाचे श्रेय स्‍वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्‍छ मानत असे. यामुळे देवतांमध्‍ये विनाकारण वाद चालु झाले. त्‍यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्‍वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्‍यातील वैमनस्‍य यांना पराजित करेल. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी ईश्‍वर एक विशाल यक्षाच्‍या रूपात देवतांच्‍या समोर हजर झाले. देवतांनी आश्‍चर्याने त्‍यांना पाहिले आणि त्‍यांचा परिचय करून घेण्‍यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्‍यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्‍वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्‍वी अग्नि आहे. मी ठरवल्‍यास सारी पृथ्‍वी जाळून भस्‍म करून टाकीन.'' यक्षाने त्‍यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्‍यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्‍यासाठी गेले. तेव्‍हाने यक्षाने त्‍यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्‍हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्‍यांना उडवण्‍यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्‍यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्‍वराचा परिचय दिला. आता देवतांना त्‍यांच्‍या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्‍यांचा अहंकार नष्‍ट झाला. *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* अहंकार आणि अहंकार्‍याचे पतन निश्चितच होत असते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास जीवनाचे सार्थक होत असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९०:इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.**१९३७:’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.**१९३१:फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.**१९१६:पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९१६:पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४५:’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७०:आनंदराव रामचंद्र पवार-- लेखक**१९६८: सुधाकर वासुदेव इनामदार-- कवी,गदिमा व गाडगेबाबा यांचे वरील पोवाडे लेखन व सादरीकरण* *१९६५:संजय नारायण चौधरी -- कवी* *१९५७:अनंत जोग--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५२:गौरी सुभाष गाडेकर-- प्रसिद्ध लेखिका* *१९५१:स्वाती शशिकांत सुरंगळीकर -- कवयित्री,लेखिका**१९४८:जयदेव सुब्बराव हट्टंगडी-- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक (मृत्यू:५ डिसेंबर २००८ )**१९४१:डॉ.श्रावण किसनजी उके--लेखक**१९३४:सुजाता मनोहर – सर्वोच्‍च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा**१९२८:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४)**१९१८:राम कदम – संगीतकार (मृत्यू:१९ फेब्रुवारी १९९७)**१९०८:विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार**१९०६:नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू:१९९१)**१९०३:उमाकांत केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे--राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व लेखक (मृत्यू:२६ जुलै १९७२)**१८९६:रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी– ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२)**१८९३:रघुनाथ दामोदर करमरकर--लेखक, व्याख्याते,संशोधक(मृत्यू:२८ नोव्हेंबर १९६५)**१८७१:श्रीधर विष्णू परांजपे -- टीकाकार, चरित्रकार व समीक्षक (मृत्यू:१८ नोव्हेंबर १९५४)**१७४९:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी,लेखक,कलाकार आणि राजकारणी (मृत्यू:२२ मार्च १८३२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ लेखिका (जन्म:१२ मार्च १९३३)* *२०१०:डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर -- कवयित्री,लेखिका,संत साहित्याच्या अभ्यासक(जन्म:१७ फेब्रुवारी १९३२)* *२००१:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – सुप्रसिद्ध लेखक,चित्रकार,पटकथाकार,शिकारी (जन्म:६ जुलै १९२७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *पाऊस गाणे*पाऊस आला, पाऊस आलाआला संगे वारापाऊस येता भारूनी जाईआसमंतही सारागडगड करूनी मेघ सावळानाद अंबरी भरतोसौदामिनीचा प्रकाश पसरूनीअवनीवरती येतोपाऊस येता हर्ष होऊनीरिमझिम गाणे गातोस्वैर होऊनी मयूर कसा हानृत्य काननी करतोतरू-वेलींवर कळय़ा फुलेहीडुलती आनंदातभिजता-भिजता वा-यासंगेपाऊस गाणे गातपाऊस येता भिजलेल्यामातीचा पसरे गंधसुचते मजला नकळत तेव्हागीत असे स्वच्छंदअमेय गुप्ते, दादरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईच्या सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू; पाच जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील अनेक भागात पाण्याची परिस्थिती गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कपसाठी बीसीसीआयचा ऐतिहासिक पुढाकार; अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *परभणी* महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे. *पुणे* महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इन्सुलिनचा वापर कोणत्या आजारात केला जातो ?२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?३) बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे ?४) पंजाब केसरी असे कोणास म्हटले जाते ?५) हवामहल कोठे आहे ?उत्तरे :- १) मधुमेह ( शुगर ) २) स्वामी दयानंद सरस्वती ३) आसाम ४) लाला लजपतराय ५) जयपूर *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय बंटी पाटील, बाळापूर👤 अशोक मामीडवार👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली👤 तिरुपती अंगरोड, धर्माबाद👤 आनंद आवरे, धर्माबाद👤 कवी गणेश घुले, औरंगाबाद👤 कामशेट्टी लक्ष्मण, 👤 साईनाथ गोणारकर, धर्माबाद👤 सुनीता महाडिक, मुंबई👤 विजय दिंडे, धर्माबाद👤 डी. एस. पाटील, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं होइजे धन्य या रामनामे। क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥ उदासीनता तत्त्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले स्वतःचे दु:ख‌ इतरांना सांगत फिरणे व तेच दु:ख स्वतः सहन करणे यात खूप फरक आहे. कारण कधी, कधी असं होतं की, आपण मनमोकळेपणाने आपले दु:ख एखाद्या व्यक्तीला सांगताना त्या,व्यक्तीला पूर्णपणे वाचत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी न सांगता येत असतात. दु:ख कमी होण्या ऐवजी वाढत जातात.शेवटी आपले दु:ख आपल्यालाच सहन करून त्यातून मार्ग काढावे लागते. त्यासाठी इतरांना सांगत फिरण्यापेक्षा जीवनात आलेल्या दु:खाचे स्वागत करावे कारण, दु:खातूनच शेवटी सुखाची प्राप्ती होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *"पवित्र जल"*कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्लामसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

📚वाचन विकास उपक्रम📚 -------------------------विषय - मराठी शब्द वाचूया, शब्द लिहूया✍🌺शब्दटोपली क्र. (१३)🌺बाॕल, काॕल , साॕल, माॕल, डाॕग, डाॕन, जाॕन,जाॕनी, काॕट, हाॕकी, फाॕर्म, लाॕर्ड, बाॕक्स, साॕक्स, नाॕट, डॉल ,टाॕल,शाॕक, शाॕर्ट,साॕस, साॕरी,हाॕर्न,हाॕट, गाॕट ,लाॕन,चाॕक,थाॕट,साॕफ्ट, डाॕट,लाँग,आॕफ,आॕन,फाॕल,टाॕप,लाॕजीक,टॉवर, डॉक्टर ,रॉकेट,लाॕकेट, टॉवेल, सॉकेट, पॉकेट,माॕडेल, शाॕवर,आॕफर, काॕर्नर,काॕलम,काॕपर,टाॕपर, काॕलनी,काॕसली,पाॕवर,पाॕलीश,पाॕईंट,जाॕईंट,माॕर्निंग, लाॕकर,नाॕमिनी,नाॕलेज,काॕलेज,वाॕकर, वाॕटर, वाॕशर,हाॕटेल,बाॕटल,लाॕगीन, वाॕकर, शाॕक, थाॕट, नाॕट, वाॕलपेपर, काॕपर, टाॕपर, काॕर्नर, काॕलर , काॕलरा, काॕटन,पाॕलीस्टर,बाॕलपेन,हाॕटस्पाॕट,चाॕकलेट,लाॕगआऊट,पाॕवरपाॕईंट. ➖➖➖➖➖➖➖✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९१:युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९६६:रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले**१९५०:एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.**१८९१:थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.**१६०८:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७७:नागराज पोपटराव मंजुळे-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते,आणि मराठी कवी**१९७६:हंसराज मधुकर देसाई-- बालकवी* *१९७४:बिपिन सिध्देश्वरराव देशपांडे-- लेखक, पत्रकार* *१९६२:सुरेश मारोतराव चोपणे- लेखक,कवी* *१९५४:सतीश कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते**१९५१:अनुराधा अरुण नेरुरकर-- कवयित्री लेखिका* *१९४७:प्रा.डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर-- प्रसिद्ध कवी,लेखक,शिक्षणतज्ज्ञ,अनुवादक, संपादक* *१९४७:पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक**१९४७:प्रा.डॉ.अनिल नागेश सहस्रबुद्धे-- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९४४:संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू:२४ जून १९९७)**१९३२:रावसाहेब गणपराव जाधव –मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी,माजी संमेलनाध्यक्ष(मृत्यू:२७ मे २०१६)**१९२९:यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)**१९२४:जनार्दन अमृत जोशी-- कवी,लेखक**१९२१:नामदेव लक्ष्मण व्हटकर- प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार**१९१८:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू:२३ फेब्रुवारी २००४)**१९१७:पं. बसवराज राजगुरू-- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक(मृत्यू:२१ जुलै १९९१)**१९०८:शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)**१८८८:बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (मृत्यू:८ मार्च १९५७)**१८८०:बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या शिकलेल्या नसतानाही त्यांच्यापाशी जीवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू:३ डिसेंबर १९५१)**१८७२:साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर –श्रेष्ठ मराठी साहित्यिक,संपादक लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.(मृत्यू:१४ आक्टोबर १९४७)**१८३३:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:प्रभाकर गणपतराव तल्लारवार -- कवी,लेखक(जन्म:२१ नोव्हेंबर१९३५)**२०१९:अरुण जेटली-- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री(जन्म:२८ डिसेंबर १९५२)**२०१८:विजय चव्हाण-- मराठी रंगभूमीवरचे कलाकार(जन्म:२ मे१९५५)**२०१६:अनुराधा शशिकांत वैद्य--कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, ललित लेख, सदर असे लेखनाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले(जन्म:९ जुलै १९४४)**२००६:यज्ञेश्वर माधव कस्तुरे (यज्ञेश्वरशास्त्री)--वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक(जन्म:३ मार्च १९०८)* *२०००:कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)**१९९३:शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)**१९२५:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता - पाऊसढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची ……सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।झिम्मड पाण्याची …….अशोक पत्कीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जुन्या पेन्शनचा संभ्रम दूर करा; केंद्रासारखा जीआर काढा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक शहरात डेंग्यूच्या चाचणीसाठी सहाशे रुपयांचा दर निश्चित केला असून, यापेक्षा अधिकचा दर घेतल्यास रुग्णालये तसेच खासगी लॅबचालकावर कारवाईचा इशारा दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात! ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तलाठी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या गणेश गुसिंगेकडून मोबाईल अटकेपूर्वीच रिसेट, गोपनीय माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारत दौऱ्यावर; G-20 परिषदेत सहभागी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *नंदुरबार* महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?२) कॉफीचे मूळ स्थान कोणते ?३) संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात सापडते ?४) पोक्सो ( POCSO ) कायदा केव्हा लागू झाला ?५) तोंडाने भरलेल्या फुग्यातील हवेत कोणते घटक असतात ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) सौदी अरेबिया ३) राजस्थान ४) १४ नोव्हेंबर २०१२ ५) नायट्रोजन, ऑक्सीजन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 श्रीकांत भुजबळ, तहसीलदार👤 श्याम ठाणेदार, स्तंभलेखक, पुणे👤 गोपाळ ऐनवाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धर्माबाद👤 सावित्री कांबळे, साहित्यिक👤 मारोती बोमले, चिरली👤 भाऊराव शिंदे, धर्माबाद👤 सुनील बावसकर👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद👤 ऋषिकेश शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं। मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसापासून प्रेम मिळते,माणसापासून धोका असते,माणसापासून आधार मिळते तर.. माणसापासूनच जीवनाची राखरांगोळी होते,माणसापासून सन्मान मिळतोआणि माणसाकडून होणारे अपमान,तिरस्कार, छळ सुद्धा सहन करावे लागतात हे, सर्व माणसांकडून होत असते.माणूस एकसारखा दिसते खरा पण, त्याच्याच असलेली वागणूक अनेक प्रकारची बघायला मिळत असते. म्हणून आज कोणत्याही माणसांवर विश्वास करतेवेळी विचार करावा लागतो हि एक प्रकारची चितांजनक बाब आहे म्हणून कोणत्याही माणसाने जीवन जगत असतांना माणसारखेच जगावे व माणसासाठी जगावे कारण, हा जन्म अनेकदा मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📚 ज्ञानवर्धक बोधकथा 📚 "एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला." तात्पर्यः "कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही. " 🌹🌹🌹🌹🌹🌹*नेहमी आनंदी रहा*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~