✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक रेबीज दिन_**_ या वर्षातील २७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर**१९९९:महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९६०:माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९५०:इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९३९:दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९२८:सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा भारतीय**१९८२:रणबीर कपूर – प्रसिद्ध अभिनेता**१९८१:प्रा.डॉ.राजाराम अंकुशराव झोडगे-- लेखक* *१९६०:विनिता पिंपळखरे-- लेखिका,कवयित्री,नाटककार**१९५९:हरिहर जनार्दन कुलकर्णी(आनंदहरी)- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५७:नितीन रमेश तेंडुलकर-- कवी, लेखक* *१९५७:महेश कोठारे--- मराठी चित्रपट-अभिनेते, मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता**१९५२:सुरेशकुमार वैराळकर --जेष्ठ गझलकार व शाहीर**१९४९:प्रा.वैजनाथ महाजन-- जेष्ठ लेखक* *१९४९:अजंना उदय कर्णिक -- कवयित्री, लेखिका* *१९४६:माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट माजी कप्तान**१९४०:प्रा.प्रसन्नकुमार पाटील-- कवी, समीक्षक* *१९३६:आशा मुंडले -- लेखिका* *१९३३:डॉ.गजानन रामचंद्र देशमुख -- लेखक* *_१९२९:लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण(मृत्यू:६ फेब्रुवारी २०२२)* *१९२४:प्रभाकर दिगंबर देशपांडे--लेखक माजी शिक्षणाधिकारी**१९०९:पी.जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)**१९०७:भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)**१८९८:शंकर रामचंद्र दाते(मामाराव दाते)--आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित करणारे मुद्रणतज्ज्ञ(मृत्यू:१८ जानेवारी १९९२)**१८६५:श्रीनिवास नारायण कर्नाटकी-- चरित्रकार,निबंधकार ( मृत्यू:१७ जुलै १९४८)* *१८०३:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(जन्म:२९ सप्टेंबर १९२८)**२०१२:माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)(जन्म:१९२९)* *२००४:डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (जन्म:१२ डिसेंबर १९०५)**१९९३:चंद्रशेखर दुबे( सी.एस. )-- भारतीय अभिनेता(जन्म:४ सप्टेंबर १९२४)**१९८९:फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:११ सप्टेंबर १९१७)**१९५६:विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक(जन्म:१ आक्टोबर १८८१)**१९५३:एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म:२० नोव्हेंबर १८८९)**१८९५:लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म:२७ डिसेंबर १८२२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*गणपतीपुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रगणपतीपुळे हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाद दायक आहे.गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे.रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटांनी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. गणपतीपुळे येथे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालय नव्यानेच चालू झाले आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ईद ए मिलाद ची सुट्टी आजच्या ऐवजी उद्या जाहीर, शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज, मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तटस्थ नवाब मलिक यांच्या जागी अजित पवार गटाने अखेर मुंबई अध्यक्ष निवडला, समीर भुजबळ राष्ट्रवादीचे नवे मुंबई अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी; पंचगंगा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 66 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विषाणू* 📙मानवी आजारातील अनेक आजारांवर आजही औषधे सापडलेली नाहीत. हे आजार वाढून त्यातून अन्य उद्भव वाढू नयेत व रुग्णाला तात्पुरता आराम पडावा, एवढेच उपचार या वेळी शक्य होतात. अशा आजारांतील खूप आजार हे विषाणूंमुळे होतात.ज्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्रांचे स्वरूप प्रगत होत जाऊन अतिप्रगत असे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरात आले, तेव्हा विषाणु हा प्रकार प्रथम ज्ञात होऊन डोळ्यांनी बघता आला. एखाद्या मिलिमीटरच्या लक्ष ते दशलक्षांश भागाएवढा हा विषाणु सहसा दंडगोलाकार वा गोलाकार आकारात असतो. आज घटकेस अगणित विषाणू आपल्या आसपास वावरत असतात, पण त्यातील मोजकेच आजारनिर्मितीला कारणीभूत होतात.विषाणू हा सजीव प्राणी आहे की नाही ? नेमके उत्तर आता माहीत नाही. परोपजीवी वाढीमुळे व परोपजीवी अस्तित्वामुळे शास्त्रज्ञ हे मत व्यक्त करतात. विषाणू जेव्हा एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हाच त्यांची झपाट्याने वाढ सुरू होते व प्रताप सुरू होतात. साधी नेहमी होणारी सर्दी, काही प्रकारचा खोकला, अनेक प्रकारचे जुलाब, पूर्वीची भयानक अशी देवीची साथ, गोवर, कांजण्या हे सारे विषाणूंमुळे होणारे रोग आहेत. या साऱ्यांच्या जोडीला अलीकडे अनेक वेळा ज्या रोगात नक्की कारण सापडत नाही, त्या वेळी डॉक्टर लोक विषाणूंकडे बोट दाखवतात. कॅन्सरकडे या दृष्टीने अलीकडे बघितले जाते.साऱ्या जगभर सध्या चर्चेचा विषय बनलेला आजार एड्स हा विषाणूंमुळेच होतो. विषाणू जंतुनाशके वा प्रतिजैविके यांना अजिबात दाद देत नाहीत. त्यामुळेच प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्सची) प्रचंड फौज मानवी हातात असूनही विषाणूंमुळे झालेल्या आजारांवर ते झाल्यानंतर काडीचाही परिणाम होत नाही. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये प्रतिगोलके (अँटीबॉडीज) तयार करणारी लस टोचणे एवढाच उपाय आपल्या हातात राहतो. या दृष्टीने अनेक आजारांवर प्रतिबंध करणाऱ्या लशी आपण तयारी केलेल्या आहेतच. पण विषाणू मोठे तरबेज असल्याने अनेक लसींना दाद न देणारे नवीन विषाणू पुन्हा तयार होतात.सर्दी पडसे, इन्फ्ल्यूएन्झा यांविरूद्ध लस तयार करण्यात यश मिळूनही नवीन प्रकारचे विषाणू तयार होत गेल्याने या लसींचा वापर निरुपयोगी ठरत गेला आहे. एड्ससारख्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात अद्यापही यश आलेले नाही.विषाणूंमुळे काही वेगवेगळी लक्षणे जरूर दिसतात, पण मुख्य लक्षण राहते, ते म्हणजे ताप. विषाणूंच्या आजाराबाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे दहापैकी नऊ रुग्ण आपोआप ठराविक काळाने बरे होऊ शकतात. गोवर, कांजण्या, कावीळ, गालगुंडे ही त्याचीच उदाहरणे आहेत. सर्दी हे सुद्धा एक चांगले उदाहरण आहे. आठवडाभरात आपोआप नाहीशी होणारी ही दुखणी आहेत, केवळ म्हणूनच प्राणिजगत त्यांना तोंड देऊ शकत आहे.विषाणूंची कृत्रिम पैदास करण्याची पद्धत मोठी कुतूहलजन्य असते. कोंबडीच्या अंड्यातील एम्ब्रिओ वा सूक्ष्म जीवात हे विषाणु टोचून त्यांची पैदास तेथे घडवली जाते. त्यातून लस निर्माण करायला पुरेसे विषाणू मिळवतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले ?२) राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणाच्या शिफारशीच्या ठरावाची गरज असते ?३) आग्रा येथील प्रसिध्द असलेला पदार्थ कोणता ?४) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?५) गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) उमाजी नाईक २) राज्य मंत्रिमंडळ ३) पेठा ४) कुशाण ५) जातक कथा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामप्रसाद वाघ👤 साईनाथ कानगुलवार, येवती👤 सचिन बावणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी राम विश्राम तेथेचि आहे। सदानंद आनंद सेवोनि आहे॥ तयावीण तो शीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाप आणि पुण्य कशाने होते या विषयी आपल्याला पूर्णपणे माहीती असताना सुद्धा आपण नको त्या मार्गाने जाऊन जीवनाची माती करत असतो.निदान या मानवी जीवनाचे खरे महत्व जाणून सुंदर अशा मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण, इतरांचे चांगले केल्याने जरी त्यांना विसर पडत असेल तरी निसर्ग कुठेतरी बघत असतो व नको ते कार्य केल्याने लपवून ठेवल्यानेही ते कधीच लपत नाही असे अनेकदा ऐकण्यात आले आहे. म्हणून व्यर्थ विचार करणे सोडून द्यावे व सत्य काय आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा*गोपाळच्या घरात पाच म्हशी आणि एक गाय होती. तो दिवसभर सर्व म्हशींची काळजी घेत असे. तो दुरून हिरवे गवत कापून त्यांच्यासाठी आणून खायला घालत असे. गोपाळांच्या सेवेने गाई, म्हशी आनंदी होत्या.सकाळ संध्याकाळ इतके दूध आले असते, गोपालच्या कुटुंबाला ते दूध विकायला भाग पाडले असते. संपूर्ण गावात गोपाळच्या घरातून दूध विकायला सुरुवात झाली. आता गोपालला कामात जास्तच मजा येत होती, कारण त्यामुळे त्याची आर्थिक स्थितीही मजबूत होत होती. काही दिवसांपासून गोपाळला काळजी वाटू लागली होती, कारण त्याच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या मांजरीने त्याचे डोळे गोठवले होते. गोपाळ जेव्हा केव्हा किचनमध्ये दूध ठेवायचा तेव्हा तो निवांत होता. मांजर दूध प्यायचे आणि त्यांना खोटेही ठरवायचे. गोपालने मांजराचा अनेकवेळा पाठलाग करून तिला मारण्यासाठी धाव घेतली, पण मांजर पटकन भिंतीवर चढून पळून गेले. एके दिवशी गोपाल अस्वस्थ झाला आणि त्याने मांजरीला धडा शिकवण्याचा विचार केला. तागाच्या पोत्याचे जाळे टाकले होते, ज्यात मांजर सहज अडकले. आता काय, गोपाळला आधी काठीने मारहाण करण्याचा विचार आला. मांजर इतक्या जोरात म्याव करत होती की गोपाल तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता. पण आज धडा शिकवण्यासाठी गोपाळने माचीसची काठी पेटवली आणि गोणीवर फेकली. गोणी पेटू लागताच मांजर सर्व शक्तीनिशी पळू लागली. मांजर जिकडे तिकडे पळत असे, जळणारी पोती पाठीमागून गेली. काही वेळातच मांजर संपूर्ण गावात पळाली. संपूर्ण गावात आगीचा भडका उडाला…………….. आग लागली, विझवा…….या प्रकाराचा आवाज उठू लागला. मांजराने संपूर्ण गाव जाळले. गोपाळचे घरही वाचले नाही.निष्कर्ष - आवेग आणि स्वतःच्या चुकीचे परिणाम एखाद्याला भोगावे लागतात आणि त्याची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 सप्टेंबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक पर्यटन दिन_* *_ या वर्षातील २७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.**१९६१:सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८:मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.**१९४०:दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.**१९२५:डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.**१८२१:मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: प्राजक्ता लालासाहेब शिंदे- कवयित्री* *१९९४:विशाल विकासराव कुलट- कवी,लेखक**१९८१:लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू**१९८१:ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू**१९७९:सचित पाटील--भारतीय अभिनेता,दिग्दर्शक,लेखक आणि नाट्य दिग्दर्शक**१९७६:विभा नरेंद्र विंचूरकर -- कवयित्री* *१९६८:राहुल देव-- भारतीय अभिनेता**१९६३:धनंजय सरदेशपांडे-- लेखक* *१९६२: मनोहर शार्दुल विभांडिक -- लेखक कवी* *१९६०:प्रा.अरुण सांगोळे -- कवी,गीतकार* *१९५९:मुकुल बाळकृष्ण वासनिक-- माजी केंद्रीय मंत्री**१९५७ प्रा.जोतीराम कृष्णराव पवार -- लेखक* *१९४७:प्रा.हेमंत जयवंत घोरपडे-- प्रसिद्ध लेखक* *१९४६:रवी चोप्रा-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक (१२ नोव्हेंबर २०१४)**१९४५:अनिल विष्णुपंत कुलकर्णी-- लेखक* *१९४४:निता प्रभाकरराव पुल्लीवार -- लेखिका* *१९३९:विजय हरी वाडेकर-- कादंबरीकार (मृत्यू:३ मार्च २०१४)**१९३५:डॉ.शंकर नागेश नवलगुंदकर--लेखक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू**१९३२:यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू:२१ आक्टोबर २०१२)**१९०६:सुंदरराव भुजंगराव मानकर-- नाटककार,वृत्तपत्रकार(मृत्यू:१८ एप्रिल १९४६)**१८९९: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,कथाकार (मृत्यू:१२ मार्च १९६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कविता महाजन-- भारतीय लेखिका आणि अनुवादक(जन्म :५ सप्टेंबर १९६७)**२००८:महेन्द्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक (जन्म:९ जानेवारी १९३४ )**२००४:शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म:८ फेब्रुवारी १९२५)**१९९९:डॉ.मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म:२६ डिसेंबर १९३५)**१९९२:अनुताई वाघ – समाजसेविका,शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १७ मार्च १९१०)**१९८७:भीमराव बळवंत कुलकर्णी-- मराठीतील संस्थात्मक कार्याचा ध्यास असलेले साहित्यिक,वक्ते,समीक्षक (जन्म:४ नोव्हेंबर १९३२)**१९७५:तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)**१९७२:एस.आर.रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)**१९२९:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,विद्वान,वक्ते,लेखक,व पत्रकार (जन्म:२७ जून १८६४)**१८३३:राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक,धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक(जन्म:२२ मे १७७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची**पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती*श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.टीप - उद्या अनंत चतुर्दशी अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे. आपल्या माहितीला येथेच पूर्णविराम देत आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं संकट, 5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; शास्त्रज्ञांचा दाव्यामुळे चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, कांदा प्रश्नी अजित पवारांचा बैठकीतूनच मंत्री पियुष गोयलांना फोन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत पावसाची दाणादाण, गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये घुसले पाणी; नागरिकांचे प्रचंड हाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण; घोडेस्वार टीमने 41 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज राजकोट मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👁 *आपल्या डोळ्याचे कार्य नेमके कसे चालते ?* 👁*********************** डोळ्यांनी आपण जग बघतो तर जग आपल्या डोळ्यांतून आपल्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत असते. डोळे मनातील भाव कवचितच लपवू शकतात.पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्यांची रचना बरीचशी सारखी असते. याउलट कीटक जाती, काही जलचर यांचे डोळे त्यांच्या देहाच्या मानाने खूपच मोठे व वेगळ्या प्रकारचे असतात. वेगळेपणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचा डोळा हा 'डोळा' नसून अनेक संवेदनाक्षम मज्जातंतूंची ती एक सलग जाळीच असते. त्यामुळे कीटकांच्या डोळ्यांना 'कंपाऊंड आइज' असेही म्हटले जाते.माणसाला रंगदृष्टी असून रंगज्ञान उत्तम असते. अन्य प्राण्यांच्या बाबतीत याची नक्की कल्पना आपल्याला नाही. रंगांच्या असंख्य छटा तात्काळ ओळखता येणे व जेमतेम एक दशांश मिलिमीटर एवढ्या लहान बिंदूला वेगळे वा सुटे पाहता येणे ही मानवी डोळ्यांची वैशिष्टय़े म्हणता येईल.मानवी डोळ्याच्या शास्त्रीय वर्णनापेक्षा त्याची प्रमुख वैशिष्टे जर बघितली तर डोळ्याला मेंदूखालोखाल संरक्षण दिले आहे, असे लक्षात येते. जोराचा पाऊस, तीव्र ऊन, धुळीचे वादळ या सर्वांपासून अंगभूत संरक्षण डोळा मिळवतो. सतत नकळत होणारी पापण्यांची उघडझाप, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाच्या तिरपीनुसार आपसूक कमी जास्त होणे व डोळ्यांत जाणारी धूळ सतत अश्रूंच्या मदतीने धुतली जाऊन ते स्वच्छ राहणे या क्रिया इतक्या नकळत सहज घडत असतात की, त्या सांगितल्यावरच लक्षात येतात. यावरूनच आपण नेहमी उद्गारतो, 'डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अमुक एक गोष्ट घडली'. काॅर्नियातुन म्हणजे बुबुळावरील पारदर्शक आवरणातून प्रकाशकिरण यातून डोळ्यात प्रवेश करतात. त्यांच्या तीव्रतेनुसार डोळ्याची बाहुली लहान मोठी होऊन मग ते डोळ्याच्या भिंगातून आतील भागात जातात. डोळ्याच्या आतील पोकळीत रंगहीन पारदर्शक तैलद्रव भरलेला असतो. मागील बाजूला असलेला पडदा व दृष्टीपटल यावर भिंगातून आलेल्या किरणांची प्रतिमा पडते. हा पडदा दोन प्रकारच्या पेशींनी बनलेला असतो. सुमारे बारा कोटी रॉड्स व साठ लाख कोन्स यांनी एका डोळ्याचा रेटिना बनतो. डोळ्याच्या आतील किमान ७२ टक्के भाग पडद्याने व्यापलेला असतो व मेंदूशी या भागाचा ऑप्टिक नर्व्हतर्फे संबंध जोडला जातो. राॅड्सवर कमी प्रकाशात करड्या, काळ्या, पांढऱ्या रंगाचा परिणाम होतो; तर कोन्सवर हिरव्या, लाल व निळा रंगछटांचा परिणाम होतो. रॉडसना दंडगोल व कोन्सना शंक्वाकृती पेशी असेही संबोधले जाते. पण डोळ्यांच्या संदर्भात व्यवहारात कॉर्निया, रेटिना, रॉड, कोन व लेन्स हे शब्दच जास्त परिचित आहेत. उदा. कॉर्नियाचे रोपण, रेटिनाची डिटॅचमेंट, डोळ्यांत लेन्स बसवणे इत्यादी.रेटिनाकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश हे 'कोडेड' स्वरूपात जातात. या कोडबद्दल अद्याप पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ते झाल्यास अंध माणसास डोळ्यांशिवाय सुद्धा पाहता येईल, अशी एक शक्यतस शास्त्रज्ञ वर्तवतात. डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांचे वाचन मेंदूतील मागील बाजूच्या भागात होते. डोक्यावर मागील बाजूला जोरात टप्पल मारल्यास प्रथम डोळ्यांसमोर काजवे चमकतात ते यामुळेच.दोन डोळय़ांमुळे लांबचे व जवळचे अंतर वा खोली याचा नेमका अंदाज आपल्याला येतो. ज्यावेळी डोळ्यांच्या भिंगातून रेटिनावर पडणारी प्रतिमा अलीकडे वा पलीकडे पडते, त्यावेळी चष्म्याची जोड देऊन दुरुस्ती करावी लागते. डोळ्याची लेन्स अपारदर्शक झाली, तर त्यालाच 'मोतीबिंदू' असे म्हणतात. यावेळी ही लेन्स काढुन कृत्रिम लेन्स बसवली जाते. बुबुळाच्या पुढचा पारदर्शक पडदा म्हणजे कार्निया 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वा अन्य काही कारणांनी अपारदर्शक बनला, तर नवीन कॉर्नियाचे रोपण करता येते. दृष्टीदान म्हणजे मृत माणसाचा कॉर्निया मृत्यूनंतर लगेच काढून हे रोपण केले जाते.जगाच्या पाठीवरील माणसांचे डोळे वेगवेगळे भासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे रंग. या रंगछटांचे खेळच डोळ्यांकडचे आपले लक्ष खिळवून ठेवतात. घारे, निळे, करडे, तांबूस, काळे, पिंगट असे रंग माणसाच्या नजरेची आठवण देत राहतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रोज सकाळी एकच गोष्ट तुम्हालाप्रेरणा देऊ शकते…. ती म्हणजे तुमचे ध्येय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणता ?२) भारतातील 'अंतरिक्षनगर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) 'रसायनाचा राजा' म्हणून कोणाला संबोधतात ?४) वनस्पतींचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?५) 'युनिव्हर्सल डोनर' ( सर्वयोग्य दाता ) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारतरत्न २) श्रीहरिकोटा ३) सल्फ्युरीक अँसिड ४) मूळ ५) o रक्तगट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रतिभा जाधव, साहित्यिक, नाशिक👤 सद्दाम दावनगीरकर, देगलूर👤 नरेश केशववार, धर्माबाद👤 अनिल आर्य माकने, धर्माबाद👤 अजित कड, साहित्यिक, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी राम विश्राम तेथेचि आहे। सदानंद आनंद सेवोनि आहे॥ तयावीण तो शीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाज म्हटलं की, त्यात श्रीमंत गरीब, श्रेष्ठ, कनिष्ठ या प्रकारची रचना नेहमीच बघायला मिळत असते. श्रीमंत माणसं धनधान्यांने संपन्न असतात तर त्यात काही माणसं गरीब सुद्धा असतात. आपण गरीब आहोत म्हणून स्वतःला कमी लेखू नये व श्रीमंत आहोत म्हणून माजू नये.गरीब माणसं देखील आपल्या गुण कर्तुत्वाने श्रीमंत होवू शकतात .असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी स्वबळावर श्रीमंती गाठलेली आहे. म्हणून स्वतःही दु:खी राहू नये व कोणाला कमी लेखू नये सदैव समाधानी रहावे. कारण समाधान ही सर्वात मोठी गोष्ट आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःचे नुकसान*शहरात एक छोटंसं दुकान, त्यात काही चिप्स, पापड, टॉफी, बिस्किटे वगैरे विकायची. हे दुकान अब्दुल मियाँ यांचे होते. त्यांची अवस्था सर्वांना माहीत होती, म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्या इच्छेविरुद्धही अशा गोष्टी घ्यायचे. जेणेकरून अब्दुल मियाँ काही पैसे कमवू शकतील. दुकानात उंदरांनीही आपला तळ ठोकला होता. दुकानात एकापेक्षा एक खोडकर उंदीर घुसले होते. उंदरांनी टॉफी आणि बिस्किटांचे नुकसान करण्यास सुरुवात केली होती. अब्दुल खूप अस्वस्थ झाला होता, त्याला समजत नव्हते की तो या खोडसाळपणापासून कसा वाचेल. एकदा तर अब्दुल बसला होता आणि तीन-चार उंदीर एकमेकांशी भांडत होते. अब्दुलला राग आला आणि त्याने एक काठी त्या उंदरांकडे फेकली. उंदीर उड्या मारून धावले, पण काठी इतक्या वेगाने उडाली की टॉफी असलेली काचेची भांडी फुटली. असे केल्याने आणखी नुकसान झाले.निष्कर्ष – रागाच्या भरात कोणतेही काम करू नये, ते स्वतःसाठी हानिकारक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८४:युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.**१९७३:ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.**१९६०:फिडेल कॅस्ट्रोने यु.एस.एस.आर.ला पाठिंबा जाहीर केला.**१९५०:इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:सेरेना विल्यम्स –अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९७८:समीर धर्माधिकारी-- मराठी चित्रपट अभिनेते**१९७१:प्रा.डॉ.केशव तुपे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक तथा सहसंचालक उच्च शिक्षण, अमरावती* *१९६२:एकनाथ बडवाईक--कवी**१९६२:चंकी पांडे -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९६१:चंद्रकांत महादेव चितळे--कथाकार, कवी**१९६०:विद्यालंकार विनायक घारपुरे-- लेखक* *१९४८:डॉ.माधवी वैद्य -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३:इयान चॅपेल –ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कप्तान**१९४०:योहाना शाहू गायकवाड-- लेखक* *१९३९:दिवाकर दत्तात्रय गंधे-- मराठी नाट्यसमीक्षक व चित्रपटविषयक लिखाण करणारे लेखक(मृत्यू:१मार्च २०१९)**१९३६: वैजयंती वामन काळे -- प्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार**१९३२:डॉ.मनमोहन सिंग – भारताचे १३ वे माजी पंतप्रधान,अर्थतज्ञ**१९३१:श्याम त्रिंबक फडके --प्रसिद्ध नाटककार**१९३१:विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)**१९२३:देव आनंद – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:३ डिसेंबर २०११)**१९२०:अनंत दामोदर आठवले(स्वामी वरदानंद भारती)--आयुर्वेदतज्ज्ञ, लेखक, ग्रंथकार,कीर्तनकार(मृत्यू:५ सप्टेंबर २००२)**१८९४:आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू:१० डिसेंबर १९५५)**१८८८:टी.एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी,नाटककार,टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ जानेवारी १९६५)**१८५८:मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू:१० आक्टोबर १८९८)**१८४९:इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९३६)**१८२०:इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू:२९ जुलै १८९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:डॉ.रामचंद्र देखणे--लोककला,संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार(जन्म:१२ एप्रिल १९५६)**२००८:पॉल न्यूमन –अभिनेता,दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म:२६ जानेवारी १९२५)**२००२:राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म:२१ आक्टोबर १९१७)**१९९६:विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म:४ जानेवारी १९२४)**१९८९:हेमंतकुमार – गायक,संगीतकार आणि निर्माता (जन्म:१६ जून १९२०)**१९७७:उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)(जन्म:८ डिसेंबर १९००)**१९५६:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक(जन्म:२० जून १८६९)**१९०२:लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म:२६ फेब्रुवारी १८२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*... पालीचा बल्लाळेश्वर ....पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती.पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.पुढील भागात - दगडूशेठ हलवाई गणपती, पुणेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी, भारतीय वायूदलाचा 'नवा योद्धा'; सी-295 विमान वायू दलात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण भागातील जनतेनं सुद्धा करून दाखवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय मी तरी मान्य करणार, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटमध्ये भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेला नमवत गोल्ड मेडल जिंकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, 1 ते 7 नोव्हेंबरला पुण्यात शड्डूचा आवाज घुमणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*११.] *मायाळू* :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. १२.] *तांदुळजा* :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. १३.] *मेथी* :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. १४.] *शेपू* ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. १५.] *शेवगा* ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. १६.] *सॅलड* :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्यांनी नियमित सॅलड खावे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा अभंग कोणी म्हटले आहे ?२) भारताने नुकतेच कोणत्या देशातील नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे ?३) जगात सर्वाधिक तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?४) लोकसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?५) रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती ? *उत्तरे :-* १) संत तुकाराम महाराज २) कॅनडा ३) भारत ४) २५ वर्षे ५) तुळस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड👤 अजय मिसाळे👤 श्री दासरवार👤 सोनाजी बनकर👤 विश्वनाथ होले👤 विक्की खटके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भजा राम विश्राम योगेश्वरांचा। जपू नेमिला नेम गौरीहराचा॥ स्वये नीववी तापसी चंद्रमौळी। तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काजळ आणि काळीज जरी वेगवेगळे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. काजळ जरी काळा रंगाचा दिसत असेल तरी आपले सौदर्य खुलून दिसण्यासाठी मदत करत असते. कारण त्याची आपण मोठ्या काळजाने निवड करत असतो. तसंच एखाद्या व्यक्तीला सुद्धा मदत करण्यासाठी आपले काळीज मोठे असावे लागते. म्हणून त्यांच्या रूपाकडे बघून त्यांना तुच्छ न लेखता त्यांच्यात असलेल्या खऱ्या गुणाची कदर करता आली पाहिजे. त्यासाठीही आपले काळीज मोठे असणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*..... आणि क्रिकेट संघ तयार होतो*राजू उद्यानात उदास बसला होता, आज त्याचे मित्र खेळायला आले नाहीत. राजूकडे बॉल होता, पण ना बॅट ना मित्र. तो एकटाच बॉलशी निराश होऊन खेळत होता. इतर मुलंही उद्यानात क्रिकेट खेळत होती, पण राजू त्यांना ओळखत नव्हता. म्हणूनच तो कधी एकटाच चेंडूशी खेळायचा तर कधी बसून पोरांना खेळताना पाहायचा. काही वेळाने समोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शेजारच्या एका बंद घरात पडला. तेथून चेंडू परत येणे अशक्य होते आणि एकही मूल तो गोळा करायला आत जाऊ शकत नव्हते. आता त्या मुलांनीही खेळणे बंद केले आहे. आता त्यांनाही क्रिकेट खेळता येत नसल्याने ते सर्व दुःखी झाले. त्या मुलांची नजर बॉल असलेल्या राजूवर गेली. मग काय, त्या लोकांनी राजूला खेळायला बोलावलं. राजू खेळण्यात चांगला होता. म्हणूनच तो खूप चांगला शॉर्ट टाकू शकला असता. चेंडू पकडण्यासाठी आणखी मुलांची गरज होती. त्यावर उद्यानात खेळणारी मुलंही त्यांच्यात सामील झाली. आणि काही वेळातच दोन पक्ष तयार झाले.अशा प्रकारे राजूची नवी क्रिकेट टीम तयार झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४१:’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.**१९२९:डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण,प्रवास व लँडींग केले.**१९१९:रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.**१९१५:पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७२:राहुल शर्मा-- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि भारतीय शास्त्रीय संतूर वादक**१९६९:हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू:१ जून २००२)**१९६९:प्रा डॉ.संजय पांडुरंग नगरकर-- मराठी साहित्यिक**१९६८:मंगला शिरीष रामपुरे-- कवयित्री* *१९६६:केदार कृष्णाजी गाडगीळ-- लेखक* *१९६१:सरोज संजय अंदनकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९६०:अमिता खोपकर-- मराठी भाषेतील रंगमंच,चित्रपट आणि टेलिव्हिजनशी संबंधित असलेली एक भारतीय अभिनेत्री**१९५७:उज्ज्वला सदानंद अंधारे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५३:सुरेंद्रपाल सिंग -- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन पात्र अभिनेता**१९४६:सुभाष सुठणकर -- प्रसिद्ध विनोदी कथालेखक**१९४६:बिशन सिंग बेदी – भारतीय फिरकी गोलंदाज**१९३९:फिरोज खान-- भारतीय अभिनेता, चित्रपट संपादक,निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:२७ एप्रिल २००९)* *१९३१:बिंदुमाधव जोशी-- अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक (मृत्यू:१० मे २०१५)**१९२८:माधव गडकरी –पत्रकार (मृत्यू:१ जून २००६)**१९२६:बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक (मृत्यू:३० जून १९९४)**१९२५:रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार(मृत्यू:२० जुलै १९९४)* *१९२२:बॅ.नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू:१७ जानेवारी १९७१)**१९२०:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू:३ जानेवारी २००२)**१९१६:पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ,समाजशास्त्री,इतिहासकार, पत्रकार,राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू:११ फेब्रुवारी १९६८)**१९१५:रघुनाथ विनायक हेरवाडकर--बखर वाङ्मयाचे अभ्यासक**१९०८:नरहर शेषराव पोहनेरकर--कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक(मृत्यू:२ सप्टेंबर १९९०)* *१८९९:नरहर गंगाधर आपटे --ग्रामकोशकार, ग्रामोदार चळवळीचे पुरस्कर्ते,लेखक**१८८१:गोपाळ गंगाधर लिमये-- मराठी कथाकार आणि विनोदकार. ‘ कॅ.गो.गं.लिमये’ ह्या नावाने लेखन.(मृत्यू:१८ नोव्हेंबर १९७१)**१८६४:गोपाळ नारायण अक्षीकर--सामाजिक कार्यकर्ते,संस्थापक(मृत्यू:१६ मार्च १९१७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:एस.पी. बालसुब्रमण्यम तमिळ, तेलुगु, कानडी,मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक कोविड मुळे निधन(जन्म:४ जून १९४६)**२०१७:अरुण साधू-- लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक,ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:१७ जून १९४१)**२०१३:शं.ना.नवरे – लेखक (जन्म:२१ नोव्हेंबर १९२७)**२००४:अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म:१ नोव्हेंबर १९३२)**१९९८:कमलाकर सारंग – रंगकर्मी,निर्माते, दिग्दर्शक व लेखक (जन्म:२९ जून १९३४)**१९२७:कृष्णाजी केशव गोखले--कथाकार, कादंबरीकार(जन्म:१८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*...महाडचा वरद विनायक ...महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते.या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.पुढील भागात - पालीचा बल्लाळेश्वरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2047 पर्यंत भारताचा चेहरा-मोहरा बदलणार, मध्यमवर्गीय लोकसंख्येत होणार मोठी वाढ, बिझनेस टुडे मासिकाच्या अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन, त्यात राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पद गेलं तरी बेहत्तर आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आमदार नरहरी झिरवाळांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बनावट शिधापत्रिका बनावणाऱ्या तिघांना अटक, ठाणे जिल्ह्यात एटीएसची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गंगापूर धरणातून 3408 क्युसेकने विसर्ग; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नाशिकसह जिल्ह्यात पावसाची पुन्हा विश्रांती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरात पुरामुळे अनेक घरं आणि दुकानांचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानाची पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयस-गिलची शतके, भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा 'मॅक्झिम गार्की' असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?२) जगात सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ कोणत्या देशातील लोक घालवतात ?३) संसदेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी लोकसभेने कोणते विधेयक प्रचंड बहुमताने पारित केले ?४) राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?५) नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून अन्न मिळवणाऱ्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) फिलिपाईन्स ( ४ तास ६ मिनिटे ) ३) नारीशक्ती वंदन विधेयक ४) ३० वर्षे ५) विघटक ( Decomposers )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग बासरवाड👤 रामकिशन अंगरोड👤 संघरत्न लोखंडे👤 महेंद्रकुमार कुदाळे👤 सय्यद जाफर👤 कमलकिशोर कांबळे👤 शिवशंकर नर्तावार👤 तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड👤 योगेश धनेवार👤 सुयश पेटेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷कु.पिंगला के.मुंगणकरउर्फ सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक बकरी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला ती बकरी समजली. हे लोक तिच्या मुलाला घेऊन जात आहेत. शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम मुलाला घेऊन खूप दूर गेला. मूलही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती बकरी जीव घेऊन सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि बकरीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन अब्दुल परतला. अब्दुल परत आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याला ज्या बकऱ्या विकायच्या होत्या त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 सप्टेंबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.**१९८३:’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९०८:कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना**१९०५:आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी 'कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.**१८७३:महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.**१८४६:अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:रवींद्र सीताराम कानडजे --लेखक**१९७८: प्रवीण शेषराव वानखेडे-- कवी* *१९७१:अर्जुन तुकाराम ताकाटे -- लेखक* *१९६८:रवींद्र जवादे -- प्रसिद्ध कवी लेखक**१९६७:डॉ.सुजाता शेणई-- लेखिका, संपादिका* *१९६५:अलका कुबल(आठल्ये)-- मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री**१९६४:विठ्ठल रामभाऊ कुलट-- प्रसिद्ध कवी, लेखक,संस्थापक अध्यक्ष,प्रतिभा साहित्य संघ* *१९५७:कूमार सानू– पार्श्वगायक**१९५६:प्रा.डॉ.ईसादास भडके -- कवी, लेखक* *१९५३: मुकुंद वामन कांत -- कवी* *१९५३:विवेक कृष्णाजी घळसासी-- सुप्रसिद्ध विचारवंत,वक्ते,कवी,लेखक,ज्येष्ठ निरुपणकार**१९५२:प्रा.डॉ.रोहिणी केतकर-- लेखिका संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ* *१९५२:अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू**१९५०:डॉ.अभय बंग-- महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व,लेखक**१९४३:तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ,तनुजा - चित्रपट अभिनेत्री**१९४३:रा.सू.बच्चेवार निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महा.रा. (मृत्यू:१७ एप्रिल २०२०)**१९४१:प्राचार्य योगानंद वासुदेव काळे-- प्रसिद्ध लेखक* *१९३५:प्रेम चोप्रा --हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९३५: चित्रा हरी वझे-- लेखिका* *१९३४:चिंतामण शंकर जोशी-- कादंबरीकार कथाकार* *१९३३:रघुनाथ माधव पाटील(कवी आरेम)--कवी, लेखक* *१९२०:प्रा.भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू:६ नोव्हेंबर १९८७)**१९१९:देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)**१९१८:पंढरीनाथ बलवंत रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक(मृत्यू:१९९९)**१९१५:राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी,लेखक आणि चित्रपट गीतकार(मृत्यू:२९ जुलै १९६६)**१९०८:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू:२४ एप्रिल १९७४)**१९०३:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५०)**१९०३:शंकर धोंडो क्षीरसागर(मामा क्षीरसागर)-- संस्थापक,विचारवंत(मृत्यू:६ एप्रिल १९८१)**१८६१:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८कल्पना लाजमी--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता(जन्म:३१ मे १९५४)**२०१४:शंकर वैद्य -- प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक(जन्म:१५ जून १९२८)**२०१२:कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के.लाल – जादूगार (जन्म:१९२४)**२००४:डॉ.राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म:२८ जानेवारी १९२५)**१९८७:राजेंद्र कृष्ण दुग्गल -- राजेंद्र कृष्णन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:६ जून १९१९)**१९६४:भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म:२७ एप्रिल १८८३)**१९३९:सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ,आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म:६ मे १८५६)**१८८२:फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:३१ जुलै १८००)**१८७०:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार,इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)**१८५८:ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*... लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज ...अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज होय. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नांव मिळाले.कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत. त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा, विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *1 ऑक्टोबरला जुन्नरमध्ये भव्य आदिवासी मेळाव्याचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात येत असलेल्या तीन विभागांच्या भरती प्रक्रियेमधून 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कॅनडा -भारतातील संघर्ष शिगेला; अमेरिकेनं बाजू काढली, भारताला विशेष सवलत देणार नसल्याचा घेतला पवित्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी 25 सप्टेंबरला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान; पहिल्या दिवशी 42 लाख रु. दान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वचषकाआधीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गाईच्या दुधाचे महत्व..*दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधारणतः शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दूध किंवा दूध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दूध गाय किंवा म्हैशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दूध पिणं अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.गायीच्या दुधाचे फायदे१) गायीच्या दुधामुळे हृदय, मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरासारखे आजार दूर राहतात.२) गायीचे दूध मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.३) गाईच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे, यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.४) गायीच्या दुधाला गोडपणा आल्याने पित्त आणि वायूचा त्रासही दूर होतो. आणि गायीचं दूध सहज पचते.५) टीबीच्या रूग्णांना दररोज गायीचे दूध पिऊन फायदा होतो.६) मूत्राशयाशी संबंधित आजार असल्यास गायीच्या दुधात गूळ टाकून पिने फायद्याचे आहे.७) कच्च्या गायीच्या दुधाने चेह मसाज केल्याने त्वचा गोरे आणि चमकदार बनते.८) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नेपच्यून ग्रहाचा शोध केव्हा लागला ?२) पंतप्रधान होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) अन्नासाठी वनस्पती व प्राणी या दोघांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?४) पंचायतराज व्यवस्थेत ३३टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते ?५) जगात सर्वात कमी घटस्फोट कोणत्या देशात होतात ? *उत्तरे :-* १) २३ सप्टेंबर १८४५ २) २५ वर्षे ३) मिश्रहारी प्राणी ( Omnivorous ) ४) महाराष्ट्र ५) भारत ( १ टक्के )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश येवतीकर, बँक अधिकारी, MGB औरंगाबाद👤 रवींद्र जवादे, साहित्यिक, अकोला👤 कल्पना बोधने, शिक्षिका, बिलोली👤 संगीता क्षीरसागर, शिक्षिका, नाशिक👤 विशाल मनवर, यवतमाळ👤 विना खानविलकर, पुणे👤 प्रदीप माळगे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो॥ बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असतात तसेच त्यांचे काम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे,की निंदा करणे,लावालावी करणे, कटकारस्थान रचने व आपण मस्त पैकी मज्जा बघत राहणे ... पण, ते, जसे करतात तसे आपण कधीही करू नये. कारण इतरांचे वाईट केल्याने आपले कधीच भले होत नाही व स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करून मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते त्याची किंमत कोणी मोजू शकत नाही म्हणून आपल्यात चांगले विचार ठेवून चांगलेच कार्य करण्याचा प्रयत्न करत रहावे .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेसाठी मुकेशचे चित्र*मुकेश साधारण सहा-सात वर्षांचा असेल. त्याला चित्रकला आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मोकळ्या वेळात तो क्रिकेट खेळायचा आणि रंगरंगोटी करत असे. शाळेत कुठलीही चित्रकला स्पर्धा असली की त्यात तो प्रथम क्रमांक मिळवायचा. मुकेशच्या चित्रकलेचे शाळेतही कौतुक झाले. मुकेश जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा त्याला वाटेत डस्टबिनमधून जावे लागत असे. लोक रुळांवर कचरा टाकायचे आणि भिंतीसमोर लघवीही करायचे, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी येत होती. मुकेशला हे सर्व आवडले नाही. एकेकाळी पंतप्रधान सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास सांगत होते. मुकेशला कल्पना आली, त्याने डस्टबीनजवळ जाऊन भिंतीवर बरीच पेंटिंग्ज काढली. ते पेंटिंग इतके सुंदर होते की तिथून जाणारा माणूस. त्या चित्रकलेचे कौतुक करायचे. हळू हळू लोकांनी तिथून कचरा फेकणे बंद केले आणि भिंतीवर इतके सुंदर पेंटिंग होते की आता तिथे उभे राहून कोणीही लघवी करत नव्हते. काही वेळातच मार्ग मोकळा झाला. मुकेशला आता शाळा आणि घर यांच्यामध्ये कोणतीही घाण दिसली नाही. हे पाहून त्याला खूप आनंद झाला.नैतिक – काहीतरी मोठं करून पार करण्याचं वय नसतं. तुमच्या प्रतिभेने समाजही बदलता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान जाहीर**१९९५:घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय**१९९५:श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.**१९८२:कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.**१९३१:नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.**१८८८:’द नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१६६०:शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.**१४९९:बेसलचा तह – स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:प्रा.डॉ.रवींद्र बैजनाथराव बेम्बरे-- लेखक* *१९७२:प्रा.दीपककुमार खोब्रागडे -- लेखक, कवी,विचारवंत**१९७१:रवी(रवींद्र) जाधव-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता,पटकथा लेखक आणि निर्माता* *१९६७:संजय इंगळे तिगावकर-- प्रसिद्ध कवी**१९६६:राजकुमार (राजू)बांते-- पत्रकार,संघटक* *१९५७: चारुदत्त माधव बागुल-- लेखक* *१९५६:रंजिता'रॉबी' कौर-- भारतीय अभिनेत्री**१९५३:अनंत भाऊदेव काळे --- निवेदक, प्रकाशक,साहित्यिक,संकलक व संग्राहक(मृत्यू ३०मे २०२२)* *१९४०:दीनानाथ मनोहर-- मराठी कादंबरी व कथाकार**१९३३:ताराबाई सावंगीकर-- लेखिका ( मृत्यू:१९ फेब्रुवारी २००६)* *१९२५:ललिता सुधीर फडके -- मराठी भावगीते आणि हिंदी चित्रपटगीते गाणाऱ्या गायिका(मृत्यू:२५ मे २०१०)**१९१९:डॉ विनायक गो. दुर्गे -- कवी लेखक* *१९१५:अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ९ मे १९९५)**१९१४: गोविंद शंकर उपाख्य बाबुराव हरदास-- लेखक,कवी (मृत्यू:२५ जुलै २०१०)* *१९०९:दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)**_१८८७:कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ,बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (मृत्यू:९ मे १९५९)_**१८६९:व्ही.एस.श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (मृत्यू:१७ एप्रिल १९४६)**१७९१:मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:डॉ.भाऊ लोखंडे-- सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,आंबेडकरवादी विचारवंत(जन्म:१५ जून १९४२)**२०११:मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे नबाब (जन्म: ५ जानेवारी १९४१)**१९९४:जी.एन.जोशी – भावगीतगायक व संगीतकार.एच.एम.व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म:६ एप्रिल १९०९)**१९७०:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म:३० मार्च १८९९)**१९९१:दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(जन्म:१४ जानेवारी १९०५)**१९५६:फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज (जन्म: २ सप्टेंबर १८७७)**१५३९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*... ओझरचा विघ्नेश्वर ...अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. सर्व राक्षसानी एका रात्री ओझर गणपतीचे मंदिर बांधले असे बोलले जाते.आख्यायिका - राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घटीची शक्यता; कृषी विभागाचा सरकारला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पिकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणरायाच्या पाठोपाठ सोन्याच्या पावलांनी गौराई आली, आज गौरी पूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरक्षणमिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महिंद्रा ग्रुपचा धक्कादायक निर्णय, कॅनडातील सर्व व्यवसाय बंद केला, शेअर बाजारात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची मोठी झेप, वनडे क्रमवारीत थेट अव्वल स्थान पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *रेल्वे इंजिन* 🚂माणसाच्या पाहण्यातले, रोज दिसू शकणारे, सर्वात अजस्र असे धूड म्हणजे रेल्वे इंजिन. अन्य इंजिने सहसा त्यापेक्षा लहानच असतात. धडाडत जाणाऱ्या गाडीच्या इंजिनाची कर्कश शिट्टी पहाटेच्या थंडीत कित्येक मैल लांब ऐकु जाते, तर इंजिनाच्या दिव्याचा सर्चलाईट अंधार फाडत सहज अर्धा किलोमीटर लांबपर्यंत पोहोचतो. या धुडाची, त्याच्या आकाराची, ताकदीची कल्पना असावी, म्हणून रेल्वेनेच एक चित्र काढले होते. . . मालाने भरलेला, रेल्वेरूळ ओलांडणारा ट्रक व भलेमोठे इंजिना त्याच्या रोखाने येताना - दोन्हींच्या आकारांतील तफावत बघणाऱ्याला सहज जाणवणारी. मथळा होता -'You are no match with me.' जेम्स वॅट, जॉर्ज स्टीव्हन्सन, गर्नी ट्रेव्हिथीक यांचा रेल्वे इंजिन निर्माण करण्यात मोठाच वाटा आहे. रेल्वे इंजिन म्हणजे वाफेचे, हे समीकरण कित्येक वर्षे भारतीयांच्या मनात कायम होते. १९६० सालच्या दशकापर्यंत तर जवळजवळ सर्वच इंजिने वाफेची होती. जेमतेम पाचएकशे किलोमीटरचा विजेचा मार्ग सोडला, तर वाफेच्या इंजिनांचे राज्य त्या काळात अबाधित होते. कोळशाची राख, धूर खर्च यांमुळे त्यांचा वापर थांबवला गेला.ज्या मार्गावर विजेच्या तारा घातल्या होत्या, तेथे इलेक्ट्रिक इंजिने वापरायला सुरुवात झाली. पुणे मुंबई या मार्गाचे विद्युतीकरण १९२७ साली झाले होते. पण आता अन्य काही मोठ्या मार्गांचेही विद्युतीकरण झाले आहे. संपूर्ण मार्गावर डोक्यावरून जाणाऱ्या तारांतून वीजपुरवठा या इंजिनांना केला जातो. हा वीजपुरवठा डी.सी. वा डायरेक्ट करंट प्रकारचा असतो. एका तारेतुन वीज घेतली जाते व रुळातून तिचे सर्किट पूर्ण होते. या इंजिनांची ताकद भरपूर असते, आकार अवाढव्य नसतो. त्यांना इंधन वाहून न्यावे लागत नाही. त्यांना वेगळे इंजिन लागत नाही तर फक्त विजेच्या मोटर्स यामध्ये काम करतात, वेगही भरपूर असतो. पंचाईत फक्त विद्युतीकरणाची. त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असतो.यातुन मध्यममार्ग काढण्यासाठी डिझेल इंजिनांची निर्मिती व वापर सुरू झाला. डिझेल इंजिन लांबीला खूपच लांब असते. मुख्यतः अवजड डिझेल इंजिन व त्यासाठी लागणारा डिझेल तेलाचा मोठा साठा हा त्याचा महत्त्वाचा भाग. डिझेल इंजिनावर जनरेटरमधून वीज निर्माण केली जाते. या विजेचा पुरवठा मागच्या चाकांमध्ये बसवलेल्या विजेच्या मोटारींना केला जाऊन हे इंजिन गाडी खेचते. या इंजिनांची ताकद अफाट असते. त्यांच्या तेलावर होणारा खर्च व पूर्ण ताकद वापरण्यासाठी लांबलचक गाड्या जोडल्या जातात. तसेच या गाड्या शक्यतो दूर अंतरावरच्या, न थांबता पोहोचणाऱ्या असणे आवश्यक धरले जाते. इंजिनाची पूर्ण कार्यक्षमता वापरण्यासाठी ही काळजी घ्यावी लागते.वाफेचे इंजिन पूर्वी आठ डब्यांची गाडी ओढत असे. विजेचे इंजिन बारा डब्यांची गाडी नेते. तर डिझेल इंजिनाला बावीस डबेसुद्धा जोडले जाऊ शकतात. मालगाड्यांत त्याहून जास्त म्हणजे १०० पर्यंत डबे असतात. यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येईल. त्या इंजिनांचा वेगही सहज ताशी एकशेतीस किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. बिनइंजिनांची लोकल गाडी म्हणजे तीन डब्यांचा एक रेक असलेले इलेक्ट्रिक मॅकेनिकल युनिट (EMU) असे म्हटले जाते. या प्रत्येक रेकमध्ये एक विजेचे इंजिन म्हणजे मोटारचा सेट काम करतो. असे तीन रेक एकत्र करून एक लोकलगाडी बनते व सर्व रेकचे नियंत्रण पुढुन केले जाते. या गाड्यांना छोट्या छोट्या अनेक इंजिनांमुळे झटकन वेग घेता येतो वा कमी करता येतो. त्यामुळे वाहतूक झटपट होते, हे महत्त्वाचे. पूर्ण वेगाने स्टेशनमध्ये शिरणारी लोकल दुसऱ्या टोकाला जाऊन थांबू शकते, पण रेल्वे इंजिनाची गाडी पूर्ण वेगात असल्यास थांबायला किमान एक किलोमीटर अंतर लागते. मॅग्नेटिक लेव्हिएशन मोनोरेल हाही एक प्रकार आता वापरात आला आहे.अत्यंत वेगाने धावणारी हायस्पीड इंजिने आपल्या देशात बनत नाहीत, वापरात नाहीत. त्यांना सोयीचे असे रेल्वेरूळ आपल्या इथे घातलेले नाहीत. जगात चीन, फ्रान्स, जपान, स्वीडन या देशात अत्यंत वेगवान गाड्या धावतात. काहींचा वेग साडेतीनशे साडेचारशे किलोमीटरच्या दरम्यान असतो. त्यांच्यासाठी बहुतेक विजेची इंजिनेच वापरली जातात. भुयारी रेल्वेमध्ये विजेची इंजिने वापरतात व त्यांना वीजपुरवठा तिसऱ्या, मध्यभागी टाकलेल्या वेगळ्या रुळांतून करण्याची पद्धत आहे. इंजिनांचे वेग वाढत गेले, तसतसे त्यांचे पारंपरिक आकारही बदलत जाऊन एरोडायनॅमिक आकार अाहेत. वाऱ्याचे कमीत कमी घर्षण कसे होईल, याचा विचार या आकारात केला गेला आहे. भारतातील रेल्वे इंजिने बनवण्याचा एकमेव कारखाना चित्तरंजन येथे आहे.चित्तरंजनच्या कारखान्यात शक्तिशाली असे ५००० अश्वशक्तीचे इंजिन बनवले गेले असून त्याचे नाव 'अशोक' ठेवले गेले आहे. २६ डब्यांची गाडी कमाल १४० किलोमीटर वेगाने हे इंजिन नेऊ शकेल. 'राजधानी एक्स्प्रेस'साठी त्याचा वापर १९९४ सालात सुरू झाला आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मोरेश्वर नावाचा गणपती कोठे आहे ? २) थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?३) सिद्धिविनायक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) दहा हात असलेल्या गणपतीचे नाव काय आहे ?५) अष्टविनायक मध्ये सर्वात श्रीमंत गणपती कोणता ?उत्तरे :- १) मोरगाव २) चिंतामणी ३) अहमदनगर ४) महागणपती ५) ओझरचा विघ्नेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आनंद पा. दुड्डे, चिकनेकर👤 श्याम सुरने, धर्माबाद👤 सुनील फाळके, बिलोली👤 खंडोबा खांडरे, करखेली👤 गंगाधर चिटमलवार, शिक्षक, देगलूर👤 सागर गडमोड, तुळजापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहु नाम या रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे। जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना, काहीतरी तरी लहान, मोठे सुप्त गुण दडलेले असतात काहींच्या सुप्त गुणांना व त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना दिशा मिळत असते तर काही जणांमध्ये कलागुण असताना सुद्धा परिस्थिती, अडचणींमुळे सुप्त गुणांना वाव मिळत नसतो. अशा सुप्त गुणांना व कलागुणांना ओळखून त्यांना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे.जी व्यक्ती इतरांच्या कलागुणांची कदर करून आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन व सहकार्य करते ती व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. म्हणून आपणही इतरांतील कलागुणांची कदर करावे व त्यांना योग्य दिशा दाखवावे.कारण दिशा दाखवणे हा सुद्धा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धैर्याचा परिचय*सुंदर हरणे जंगलात राहत असत. त्यात सुरिली नावाचा डोई होता. त्यांची मुलगी मृगनैनी अवघ्या पाच महिन्यांची होती. मृगनैनी आईसोबत जंगलात फिरत असे. एके दिवशी मृगनैनी तिच्या आईसोबत चालत असताना दोन कोल्हे आले. त्याला मृग्नैनीला मारून खायचे होते. सुरिली दोन्ही कोल्ह्यांना शिंगांनी मारून थांबवत होती. पण कोल्हे मान्य करायला तयार नव्हते. तेवढ्यात तिथे हरणांचा कळप आला. हरिण कोल्हाच्या मागे धावू लागले. कोल्हा प्राण घेऊन तेथून पळून गेला. सुरिली आणि मृगनाईचे प्राण आज तिच्या कुटुंबीयांनी वाचवले.नैतिक – एकत्र राहून सर्वात मोठ्या आव्हानावर मात करता येते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय शांतता दिन_**_जागतिक अल्झायमर जागृता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.**१९८४:ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९८१:’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९७६:सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९७१:बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६८:रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.**१९६५:गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६४:माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९३४:’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून 'प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.**१७९२:अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिव:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८०:करीना कपूर – अभिनेत्री**१९७९:ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू**१९६८:डॉ.सुनिता सुनील चव्हाण -- कवयित्री,लेखिका* *१९५४:डॉ.मंगला रमेश वरखेडे -- लेखिका, संपादिका* *१९५१:अन्थनी लुईस परेरा -- बालकथाकार लेखक* *१९४४:स्नेहल वासुदेव जोशी-- लेखिका**१९४३:डॉ.शरद पांडुरंग हेबाळकर -- इतिहास संशोधक,लेखक* *१९३९:लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,कथाकार, कादंबरीकार**१९३९:सुलभा श्रीराम सरदेसाई-- लेखिका**१९३४:अनंत मिराशी-- मराठी नाट्यअभिनेते (मृत्यू:१३ जून २०२०)**१९३१:सिंगीतम श्रीनिवास राव-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,निर्माता,संगीतकार आणि अभिनेता**१९२९:पं.जितेंद्र अभिषेकी – प्रसिद्ध शास्त्रीय गायक,संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)**१९२६:डॉ.सुरेश डोळके--धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक( मृत्यू:२७ जानेवारी २००८)* *१९२६:’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू:२३ डिसेंबर २०००)**१९२५:गोविंदराव पटवर्धन -- सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक(मृत्यू:३१ जानेवारी १९९६)**१९२१:बाळकृष्ण मोरेश्वर लोणकर-- लेखक**१९१२:केशव हरी बोरगावकर-- लेखक संपादक**१९०८:दादासाहेब पोहनेरकर-- महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक(मृत्यू:२ सप्टेंबर १९९०)**१८६६:एच.जी.वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म:१७ डिसेंबर १९२४)**१९९९:पुरुषोत्तम दारव्हेकर-- सुप्रसिद्ध मराठी नाटककार,लेखक,दिग्दर्शक,कवी (जन्म:१ जून १९२६)**१९९८:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म:२१ डिसेंबर १९५९)**१९९२:ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म:१० मे १९१४)**१९८२:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म:२१ जून १९२३)**१७४३:सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*.... रांजणगावचा महागणपती .....अष्टविनायकांपैकी रांजणगावचा महागणपती हा चौथा गणपती. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.उद्याच्या भागात - ओझरचा विघ्नेश्वरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा, सोनिया गांधी देखील चर्चेत सहभागी, विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार आपली तिजोरी भरत आहे, रोहित पवारांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणार अनावरण, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या बाप्पांना दिला निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एशियन गेम्स 2023 स्पर्धेला दिमाखात सुरुवात, भारताच्या एकूण 655 खेळाडूंना घेतला सहभाग. यात 328 महिला आणि 325 खेळाडूंचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो ?* 📕खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो.खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील.खोकल्याच्या औषधांचे एक्स्पेक्टोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटमीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम हाईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस* केव्हा साजरा केला जातो ?२) राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?४) स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोणाला संबोधले जाते ?५) गणिताचे जनक कोणाला मानले जाते ? *उत्तरे :-* १) २१ सप्टेंबर २) ३५ वर्षे ३) शाकाहारी प्राणी ( Herbivores ) ४) पं. जवाहरलाल नेहरू ५) आर्किमिडीज, युनानी इंजिनियर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निशांत जिंदमवार, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 विष्णू गंभीरे, गणित शिक्षक, आय जी पी धर्माबाद👤 सचिन तोटावाड, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 सौ. स्मिता मिरजकर-वडजे, शिक्षिका, नांदेड👤 आकाश कोलापकर👤 प्रकाश जाधव👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलल्या प्रमाणे दिलेला शब्द पाळला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.दिलेला शब्द जर पाळला गेला नाही तर त्या व्यक्तीने विश्वास गमाविला असा अर्थ गृहीत धरून दुसऱ्यांदा त्या व्यक्तीवर ती व्यक्ती विश्वास करणे होत नाही.म्हणून आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे. नाही तर विश्वास आपोआप उडून जातो. कारण विश्वास अशी एक गोष्ट आहे की, तो फक्त एकदाच करता येते म्हणून कोणालाही शब्द देताना पाळण्याची आठवण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची महत्वाची जबाबदारी आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चिंटू पिंटूचा खोडसाळपणा*चिंटू-पिंटू दोघे भाऊ होते, दोघांचे वय अंदाजे २० वर्षे असेल. दोघेही खूप खोडसाळपणा करायचे. चिंटू जास्तच खोडकर होता. तो पिंटूची सोंड त्याच्या खोडात गुंडाळून ओढायचा आणि कधी ढकलून टाकायचा. एके काळी दोघेही खेळात मारामारी करत होते. चिंटूचा पाय घसरला, तो खड्ड्यात पडला. पिंटू त्याच्या सोंडेने ते वर काढायचा प्रयत्न करायचा. पण त्याचा प्रयत्न फसला. पिंटू धावतच आईला बोलावतो. त्याची आई चिंटूला तिच्या लांब सोंडेत गुंडाळून जमिनीवर आणते. चिंटूच्या खोडसाळपणाने आज त्याच्या अंगावर काटा आणला होता. तो रडत म्हणाला – मी आतापासून खोडसाळपणा करणार नाही. दोन्ही भाऊ खेळू लागले, हे देऊन आईला खूप आनंद झाला.नैतिक – जास्त खोडकरपणा आणि इतरांना त्रास देण्याची सवय नेहमीच आपत्ती बनते.चिंटू खूप प्रयत्न करतो पण तरीही तो बाहेर पडू शकत नाही. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)