✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी : १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले. १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला. १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार. 💥 जन्म :- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान. १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात स्टेजवरच आली भोवळ, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इंडिअन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी केंद्र सरकारने केली नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या पाच राज्यांसाठी निवडणुका पार पडल्या असून निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबरला लागणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अँडलेड येथे होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्‍याच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्‍या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी पाकिस्तानला १२३ धावांनी मात देत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/r1Exkxb Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काही बाही असेच काही* * खालील ब्लॉगवर पहिला भाग वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/06/blog-post_22.html?m=1 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे.आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे.येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे. फडतरे मिसळपाव प्रसिद्ध आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्य जगून समजते ; केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?* ३६ *०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा झाली ?* ०१ मे १९६० *०३) महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ?* ०६ *०४) अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखले जाते ?* विदर्भ *०५) मराठवाडा नावाने कोणता विभाग ओळखला जातो ?* औरंगाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनिल सूत्रावे ● अनिरुद्ध खांडरे ● फारुख अली ● राजेश जळकोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मार्गदर्शक* मार्गदर्शनाच्या अभावाने कोणी भरकटत असतो सुंदर आयुष्यातून कोणी कायमचाच उठत असतो योग्य वेळी प्रत्येकाला मार्गदर्शक मिळाला पाहिजे आयुष्यातील टर्निंग पाॅईंट वेळीच कळाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनात आपल्याला जे काही यश मिळते ते फक्त आपल्या स्वत:च्या प्रयत्नांचे फळ आहे, असे आपण कधीही प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला, पतीच्या किंवा पत्नीच्या मदतीला, मित्रांच्या व* *सहका-यांच्या योगदानाला आपण दिले नाही, तर तो स्वार्थ ठरेल. पण आपल्या यशप्राप्तीत एक अदृश्य हितचिंतक नेहमीच आपली साथ देत असतो आणि तो असतो सर्वसाक्षी परमेश्वर. गरजेच्या वेळी आपल्याला त्याची आठवण येते, पण गरज भागल्यावर त्याचे आभार मानायचे आपण बहुतेकदा विसरून जातो.* *परमेश्वराचे आभार आपण का आणि कशासाठी मानायचे? आपल्याला त्याने जीवन दिले म्हणून. जीवनात आपली सतत प्रगती होत राहिली म्हणून, आपण सुरक्षित, निरोगी राहिलो म्हणून नाही, तर आपल्यासाठी हे सगळे करत असताना परमेश्वर मात्र अदृश्य राहतो आणि तो कशासाठीच स्वत:ला श्रेय घेत नाही म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ♥♥♥♥♥♥♥♥♥ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे, एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही पालकांचा अपसमज असतो की, मी माझ्या मुलांना उच्चशिक्षित केले, म्हणजे मी माझ्या आयुष्यातील सर्व कर्तव्ये पार पाडली. मुले उच्चशिक्षित झाली आणि सुसंस्कारित झाली नाहीत, तर त्या उच्च शिक्षणाचा काय उपयोग ? हे शिक्षण घेऊन पदवीधर मुलांनाही आज स्वतःच्या उपजीविकेसाठी दारोदार भटकावे लागत आहे, तर असे शिक्षण हवे कशाला ? पण हे पालकांना कोण सांगणार ? मुलांनी शिक्षण घेऊन इतर सर्व करावे; परंतु 'साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करावे', असे पालकांना वाटत नाही. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपजीविका - Occupation* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी सेवा* गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले," अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे." यावर शिष्य म्हणाले,"गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन." तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले," हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,"गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?" गुरु म्हणाले," तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे." *तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिवस* *ध्वज दिन* 💥 ठळक घडामोडी : १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार. १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर. 💥 जन्म :- १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १२५४ - पोप इनोसंट चौथा. १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. २०१३ - विनय आपटे, मराठी कलाकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्राच्या मानव संसाधन मंत्रालयाने देशभरातील शाळांना २२ भाषांचा भाषासंगम कार्यक्रम दिला आहे. जो २२ दिवस चालणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *उत्तरखंड- उत्तरकाशीमधील हार्सिल खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *निळवंडे धरणासाठी ५०० कोटी बिनव्याजी घेतल्यानंतर आता सीएम फंडासाठी साईबाबा संस्थाकडून ५० कोटी घेण्यास विधी विभागाची मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोलकाता - भाजपाच्या रथ यात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई हायकोर्टाचा केदारनाथ सिनेमाला हिरवा कंदिल; सिनेमाच्या रिलिजला स्थगिती देण्यास नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाशिक : मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला पदभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या मालिकेत भारताच्या ०९ बाद २५० धावा, चेतेश्वर पुजाराचे शतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/3Nzbkey Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* * खालील ब्लॉगवर पहिला भाग वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विनय आपटे* विनय आपटे हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले. विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. नाटक, गजरा, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.अनेक नवोदित कलावंतांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. मी नथुराम बोलतोय या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या मित्राची गोष्ट अँन्टीगनी या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. मराठी वाहिनीवरून प्रसारित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट व दुर्वा मालिकेत त्यांनी काम केले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) युगोस्लाव्हियात कोणते चलन वापरात आहे ?* दिनार *२) 'दास कॅपिटल' चे लेखक कोण ?* कार्ल मार्क्‍स *३) इंडोनेशियामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर कोणते ?* बांडुंग *४) 'प्रताप' हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत आहे ?* हिंदी *५) देशातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोठे आहे ?* लेह *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भीमाशंकर बच्चेवार ● धनंजय शंकर पाटील ● सुदीप दहिफळे ● साईनाथ जायेवाड ● मनोज मनूरकर ● साईनाथ बुडावार ● बाळासाहेब तांबे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ध्येय* ठेवायचं तर उच्च ध्येय ठेवा ध्येय प्राप्त होतं ते मनात रोवा मनात जे काही सुप्त रहातं एक दिवस नक्की ध्येय प्राप्त होतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाजजीवनात गतिमानता वाढली. उद्योग, व्यवसाय, शिक्षण यानिमित्ताने कुटुंबातील अनेक सदस्य शहराकडे वळले. तसे कुटुंबाचे विभाजन अटळ ठरले. विभाजन फक्त कुटुंबाचे झाले नाही, तर ते घराचेही झाले. घराच्या घरपणाला घरघर लागली. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडलेली मुले नंतर घराकडे परतेनाशी झालीत. मुलं परत येतील, घरात पुन्हा आनंदाला उधाण येईल, या वेड्या आशेवर घराची दारे नेहमी उघडी ठेवून मुलांची वाट पाहिली जाऊ लागली. आई-वडिलांच्या या व्याकूळ भावनेची आंदोलनं टिपताना कवयित्री इंदिरा संत लिहितात..* *'सांज टळली तरीही* *दार लावावे वाटेना* *वळेल का कुणी मागे?* *डोळा वाटुली संपेना..'* *मुलांची वाट बघून थकलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना जाणीव होते की, मुलं आता परत येणार नाहीत. आता एकाकी जीवन जगणं भाग आहे. अशी मनाची समजूत घालून वृद्ध माता-पिता पुन्हा संसाराचा गाडा एकाकीपणे हाकण्यास तयार होतात. त्यांची ही एकाकी धडपड व्यक्त करताना कवयित्री पुढे म्हणतात..* *'संपावया हवी वाट* *लावायला हवा दिवा* *पोटासाटी मुकाट्याने* *हवा टाकायला तवा '* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्म फंद जग फांदिया, जप तप पूजा ध्यान जाहि शब्द ते मुक्ति होये, सो ना परा पहिचान। सारांश सारे जग शाश्वताचे पूजन , संवर्धन करावयाचे सोडून मिथ्या फसव्या गोष्टींच्या नादी लागते. हे जग सुंदर करणं. सत्कर्माच्या माध्यमातून सुंदर जग स्वर्ग तयार करायचा? का दुष्कर्म करून अंधःकार अज्ञानाच्या खाईत नरकातच खितपत पडायचं याचा विचार व्हायला हवा. विश्वात मृत्यू पश्चात स्वर्ग नरकाच्या कल्पना करणं, हे सारं थोतांड आहे. तरीही हे अज्ञानी जीव विश्वातल्या सत्य, सुंदर आणि शिवस्वरूप निसर्गाविष्काराला विसरून नको त्याच अस्तित्वातच नसलेल्या गोष्टीसाठी जप, तप, पूजा, अर्चा , ध्यानादि कर्मकांडे करीत राहातात. वागणं बोलणंच चांगलं नसेल तर जीवनात काय साध्य होणार आहे? धर्माच्या पांघरणाखाली कर्मठ आणि लादलेल्या वचन हट्टासाठी उर्मट वागून स्वर्ग प्राप्ती किवा निर्मिती होत नाही .त्यासाठी सहानुभूतीची कळवळ्याची गरज असते. क्षमावृत्ती अंगी असावी लागते. वाणीतून आपुलकीचे पाझर वाहताना दिसावे लागतात. कर्मामागील वर्मच कळलं नाही तर कसं चालणार बरं ! ज्या शब्दांच्यामुळे बुरसुटलेल्या चाली! रीती, रूढी, रिवाज, व परंपरापासून मुक्ती देण्याचं व मानव कल्याणचं सामर्थ्य ज्या शब्दात आहे. त्या शब्दांचा मंत्रोच्चार केला की नसलेली भीती व भय पार पळून जाईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती आपल्या जीवनात सदैव आपापल्या कामात मग्न असते ती व्यक्ती कधीही आणि कसल्याही सुखाची अपेक्षा करीत नाही.आपल्या कामात जेव्हा मग्न असते तेव्हा ते काम करत असताना आपोआपच दु:ख विसरुन जाते आणि कामातच सुख मानते.परंतु जी व्यक्ती काहीच काम न करता केवळ सुखाची अपेक्षा करते ती व्यक्ती आपल्या जीवनात सुखी तर होऊच शकत नाही उलट दु:खात आपले जीवन टाकून चिंतेत पडते.काम करीत नसल्यामुळे फुकटची चिंता आणि काम करीत नसल्यामुळे जीवनात असमाधान यामुळे तो कधीही सुखी होणारच नाही. म्हणून सदैव माणसाने रिकामे न राहता सदैव आपल्या कामात मग्न राहावे आणि कामातच खरे सुख मानावे.हा सुखी जीवनाचा मूलमंत्र सदैव आचरणात आणावा. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🌸🍃🌹🌸🍃🌹🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपेक्षा - Expect* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्कर्माची गोड फळे.* एका गावात राम नि श्याम असे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब तर श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली मैत्री होती. एके दिवशी राम श्यामला म्हणाला," मी कुठवर तुझ्यावर ओझे बनून राहू?" हे ऐकून श्याम म्हणाला," तू मला माझ्या कामात मदत कर, म्हणजे तुझ्या मनाला दोषी वाटणार नाही." दुसऱ्या दिवसापासून राम श्यामला कामात मदत करू लागला. काही दिवसांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले परंतु श्याम हळूहळू रामकडून जास्त काम करून घेवू लागला आणि त्याचा अपमानही करू लागला. त्याच्या ह्या वर्तनाने राम दु:खी झाला. रामने श्यामचे घर सोडले आणि जंगलात गेला. तेथे त्याची भेट एका साधुशी झाली. त्याची दु:खमय कथा ऐकून त्या साधूला त्याची दया आली, त्याने त्याच्या कुबदावरून मायेचा हात फिरविला आणि काय आश्चर्य ! रामचे कुबड नाहीसे झाले. त्याबरोबरच साधूने रामच्या हातात एक पिशवी दिली व सांगितले," हि पिशवी सत्कर्माची पिशवी आहे, ह्यात सोन्याचा मोहोरा आहेत. तू सत्कर्माने वागला आणि सत्कर्मासाठी जर यातील धन खर्च केले तर ह्या पिशवीतील धन कधीच नष्ट होणार नाही." राम गावी परत आला. त्याने सत्कर्मासाठी म्हणजे लोंकाच्या भल्यासाठी अनेक उत्तम कामे केली. त्यासाठी त्याने जितका पैसा खर्च केला तितका आजवर कोणीच केला नव्हता. हे पाहून श्यामच्या मनात असूया निर्माण झाली. त्याने राम ला हे सर्व कसे झाले हे विचारले. तेंव्हा रामने खरे ते सांगितले. श्याम जंगलात गेला व साधू महाराजांना आपले कुबड दाखवीत म्हणाला माझ्या मित्रासारखे मला नीट करून द्या व मलाही पैश्याची पिशवी द्या. श्यामचा हा स्वार्थी स्वभाव पाहून साधू महाराजांनी त्याला बरे तर केले नाहीच पण त्याला तेथून हाकलून दिले व सांगितले कि सत्कर्म करणाऱ्याला देव सहकार्य करतो.  *तात्पर्य - लोभ, मत्सर बाजूला ठेवून मन सत्कर्मात गुंतविले तर आपला भविष्यकाळ हा अतिशय चांगला असतो. सत्कर्माच्या वाटेने नेहमी चालले पाहिजे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिवस* 💥 ठळक घडामोडी : १९९२ - अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली. 💥 जन्म :- १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा. १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हैदराबाद - तेलंगणामध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, विधानसभेच्या 119 जागांसाठी उद्या शुक्रवार 7 डिसेंबर रोजी होणार मतदान.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक- महापालिका अग्निशमन दलाच्या सात जवानांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा शौर्यपदक राजभवनमध्ये समारंभपूर्वक प्रदान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *रामजन्मभूमी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी, सिनेमाचा ट्रेलर युट्युबवरुन हटविण्याचे आदेश, सेन्सॉरची परवानगी घेऊनच प्रदर्शित करा - कोर्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; जेडी(एस)च्या दोन, काँग्रेसच्या सहा आमदारांना मिळणार मंत्रिपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद : पथकाद्वारे दुष्काळ परिस्थितीचे मुल्यमापन करून अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येईल - केंद्रीय सहसचिव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अ‍ॅडिलेड : आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/9aHepSbKpS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रासंगिक लेख *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही* दैनिक लोकशाही वार्ता मध्ये प्रकाशित लेख http://epaper.lokshahivarta.in/epapermain.aspx आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ नेते, महापुरुषांमध्ये डॉ. आंबेडकरांचा उल्लेख होतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) एनआयडीसीचे विस्तारित रूप काय ?* नॅशनल इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन *२) डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापन वर्ष कोणते ?* १८८० *३) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. राजेंद्रबाबू यांचा कार्यकाल कोणता ?* २ मे २००४ ते ३१ मे २००४ *४) तिसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारताच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होते ?* इंदिरा गांधी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● डी आर भोसके ● राजेश पाटील उमरेकर ● माधव हलकुडे ● बाबासाहेब घागळे ● प्रा. मंगल सांगळे ● कैलास सोनकांबळे ● शंकर बोंबले ● अशोक हिंगणे ● दिलीप।विश्वांभर ● बालाजी गैनवार ● राजेश अम्पलवाड ● नरेश पांचाळ ● देवानंद मुरमुरे ● गोविंद चौरे पाटील ● विवेक क्षीरसागर ● दत्ता कासेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुख की दु:ख* सुख किंवा दुःखाची काळजी आपल्यावर असते काय भेटेल याची चिंता आपण जपल्यावर नसते सुखाची किंवा दुःखाची निवड आपणच करतो सारी सुखं सोडून आपण त्या दुःखालाच धरतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.* *या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह तो घर है प्रेम का, उंचा अधिक ऐकांत सीस काटि पग तर धरै, तब पैठे कोई संत । सारांश : आत्मा जागृत असेल तर चैतन्याचा साक्षात्कार होतो. जीवंत शरीर म्हणजे आत्मालय होय. हे आत्मालय म्हणजे प्रेमालयच नव्हे का ! जिथे सर्वांप्रतीच्या जाणीवा दडलेल्या असतात . सर्वांसाठी प्रेमरसाची निर्मिती होवून ची हळूहळू कृतीतून वाहू लागते. जगातील सर्व घरांपेक्षा हे किमती घर आहे. स्वतःत डोकावून पाहाता याच्याठायी चिंतन व मननासाठी एकांतही आहे. या एकांताचा सदुपयोग करणार्‍याला सर्वांप्रति आपुलकी व प्रेम वाटू लागते. तसेच भव्यता व दिव्यता जिथेजिथे असेल तिथेतिथे नतमस्तक होण्याची वृत्ती अंगी बाणायला लागते. अशा वेळी संयम, शांती, कळवळा, सहानुभाव इ, विविध सद्गुणांच्या आविष्कारानं ते घर सर्वांना आवडू लागतं. त्या घरात वास्तव्य करणार्‍या जीवाचं वर्तनंच साक्षात्कारी ईश्वररूपी वाटू लागतं. तेव्हा कुण्या संतरूपाचा या घरामध्ये प्रवेश झालेला असतो. मनाच्या सर्व भावाभिव्यक्तीत प्रेमभावनेचा आविष्कार सर्वश्रेष्ठ आहे. प्रेमभावनेच्या ठायी वैषयिक विकाराची उत्पत्ती होता कामा नये. विकार वाढले की नैतिक अधःतनाकडे प्रवास सुरू होतो. धडपडताना पडलेल्याला सहज उभं राहाता येतं, परंतु सर्वांच्या नजरेतून पडलेल्याला उभं राहाणं कसं जमणार बरं ! म्हणून पडण्यापेक्षा घडण्यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे. प्रेम निखळ व निरपेक्ष असलं की त्यात शारदी पुनवेच्या चांदण्याचा भास होवू लागतो. निरामय प्रेमभावनेसाठी सर्वाधिक त्यागाची आवश्यकता असते. हे कायम जपलं पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला मोठ्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं असं तुमच्या मुलाला वाटण्याजोगं वातावरण तयार करण्यात जर तुम्हाला यश आलं, तर मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आपोआप होईल,” असे हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाचे पीटर गोर्स्की म्हणतात. “पालक म्हणून आपली भूमिका ही मेंदूतील जटिल प्रकिया घडवून आणण्याची नव्हे तर सुदृढ, समंजस व संवेदनशील मानवांचा विकास घडवून आणण्याकरता पोषक वातावरण निर्माण करण्याची आहे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघात - Betrayal* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघातकी स्वभाव*   जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल ! *तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा* *जागतिक माती दिन* * 💥 ठळक घडामोडी : १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार, ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोलतांना दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *स्टेट बँकेच्या एटीएममधून हवे तेवढे पैसे काढण्याची दिली मुभा मात्र त्यासाठी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची अट.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सरकारकडून शाळांमध्ये राबवल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजन योजनेच्या देखरेखीत चालढकल करणार्‍या सहा राज्यांवर सुप्रीम कोर्टाने दिले दंडात्मक कारवाईचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण द्या, ओरिसाचे मुख्यमंत्री पटनाईक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 डिसेंबरला दुपारी 11 वाजता सरकारनं बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघातील सलामीचा फलंदाज गौतम गंभीरने घेतला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Lxhf0ZN5nS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉक्टर देव की दानव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योगी अरविंद घोष* अरबिंदो ऊर्फ ( अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. ते स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना,इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९0७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. त्यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ह्यपूर्णयोगाची मांडणी त्यांनी केली. माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी केली आहे *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा, कृतघ्न होऊ नका *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारतात कोळशाचे किती टन सुप्त साठे उत्पादनक्षम आहेत ?* ६०००० दशलक्ष टन *२) ओडिशात औष्णिक वद्युत केंद्र कोठे आहे ?* तालचेर *३) दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रावर केलेला खर्च एकूण खर्चाच्या किती टक्के होता ?* २८ *४) कंबोडियात कोणतं चलन वापरात आहे ?* रियाल *५) संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?* धारावी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीहरी अंभोरे, पत्रकार ● राजेश गटलावार ● साईनाथ कल्याणकर ● संतोष रामराव शिंदे ● अशोक चिंचलोड ● सूर्यकांत स्वामी ● राज डाकोरे ● प्रल्हाद गड्डपवार ● अविनाश सुभेदार ● योगेश पडोळे ● राजू अलमोड ● सुनील पांचाळ ● शंकर भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कामापुरता मामा* कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी असते काम होईपर्यंत ती कशात ही राजी असते काम झालं की लगेच राजीची नाराजी होते बोलकी आजी एकदम मुकी बहिरी आजी होते शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *मूल घडवताना....*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आर्थिक विचार, आर्थिक मूल्य, आर्थिक वर्तन आणि आर्थिक दृष्टिकोन ह्या साऱ्या बाबी पाल्य बहुतांशी पालकांकडे बघूनच शिकतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव  मिळेल अशी संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे. एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. कोणत्याही गोष्टींचा आत्मविश्वास हा अनुभवातूनच येत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक बाबीचे अनुभव द्यायला हवे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   कबीर मन मिरतक भया, इंद्री अपने हाथ तो भी कबहु ना किजिये, कनक कामिनि साथ। सारांश महात्मा कबीर सांगतात की तुम्ही इच्छा व आसक्तिवर विजय मिळविलेला असेल. तुमचं मन निर्विकार असेल. विषयभोगी इंद्रियावर पूर्णपणे विजय मिळविला असेल. भौतिक बाबींचा प्रभाव पडून मनाचं विचलन होत नाही . अशी अवस्था जरी तुम्ही धारण केलेली असेल तरी तुम्ही धन आणि नारी संग टाळला पाहिजे. मनाची स्थिर अवस्था किती काळ राहिलं हे निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. जो पर्यंत मनावर संस्कार व सत्संगतीचा प्रभाव आहे. तो पर्यंत मनाचा तोल ढळणार नाही. धनाच्या ठायी चंचलता असते. ते भौतिक सुख व श्रीमंतीची स्वप्न दाखवायला लागतं. नारीच्या संगतीतही विषय विकार उत्पन्न होवू शकतात. मनाचं संतुलन राहील की नाही ? याची खात्री कशी देणार बरं ! म्हणून कबीर धनासोबत स्त्रीसंगही टाळण्याचा सल्ला देतात. संत तुकारामांनीही अभंगातून उपदेश करताना 'स्त्रीयांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणमृत्तिकेच्या । नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरेना ।।' असे म्हटले आहे. महान तपस्व्यांची दीर्घकालीन तपस्या नारी सहवासामुळे क्षणार्धात भंग पावल्याचे दाखले असताना सज्जनानं अशा बाबींची परीक्षा द्यायचा यत्न करण्यात सुद्धा जोखीम आहे. चारित्र्य निर्माण करण्यासाठी जीवनातली कित्येक वर्षे गेलेली असतात. एकदा का चारित्र्यावर शिंतोडे उडाले की ते धुण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संशयाच्या भोवर्‍यातून आणि अफवांच्या लाटेतून सावरू म्हणता सावरता येत नाही. जवळचे, दुरचे सर्व जण उगीच संशयाने बघायला लागतात. म्हणून कनक आणि कामिनीपासून अंतर ठेवून राहिले तर बिघडतं कुठं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा जरी अवगुण असेल तर तोच एखादा गुण त्याच्या जीवनाच्या अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे असे समजावे. पण त्याच व्यक्तीला त्या  अवगुणाला थांबवता आले तर नक्कीच समजावे की, त्याची हळूहळू यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरु आहे. जीवनात अवगुणाला शून्य महत्त्व देऊन त्याला जीवनातून हद्दपार करुन त्या ठिकाणी चांगल्या संस्कारक्षम गुणांची भरती करावी तरच जीवन समृद्ध बनेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धडपड - Trick* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी, मासा आणि युक्ती* एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे पकडायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *भारतीय नौसेना दिन* 💥 ठळक घडामोडी : १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. 💥 जन्म :- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान. १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक. 💥 मृत्यू :- १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका. १९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवसांच्या अबूधाबी दौऱ्यासाठी रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी अटक राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पैशांसाठी खासगी रुग्णालयांकडून सिझेरियन डिलेव्हरी- सर्व्हे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टात याचिका, अॅड. गुणवंत सदावर्तेंच्यावतीने याचिका दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रिलायन्सच्या टीना अंबानी, वित्त मंत्री मुनगंटीवार, पंकजा मुंडे, डॉ. रणजित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कॅन्सर केअर हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चंद्रपूर : सर्वाधिक पासपोर्ट असलेला भारत देश जगात तिसरा. लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल- हंसराज अहिर. चंद्रपूर येथे पासपोर्टचे 238 वे पासपोर्ट केंद्र सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक हॉकी स्पर्धा : स्पेनने फ्रान्सविरुद्ध पुरुष विश्वचषक हॉकीच्या अ गटातील सामना १-१ असा ड्रॉ केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/jRy75Aw Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आर व्यंकटरमण* रामास्वामी व्यंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती होते. ते १९८७ ते ९२ दरम्यान या सर्वोच्च पदावर राहिले. व्यंकटरमण यांचा जन्म तामिळनाडूमधील तंजौरनजीकच्या पट्टकोट्ट या गावात झाला. त्यांचे बहुतांश शिक्षण मद्रास येथे झाले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली केली. वकिली करत असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातही सहभाग घेतला हेाता. भारत छोडो आंदोलनात ते सक्रिय होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची योग्यता पाहून भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोत्कृष्ट वकिलांमध्ये स्थान दिले. विद्यार्थी राजकारणात सक्रिय असल्याने ते लवकरच राजकारणात आले. १९५२ ते ५७ दरम्यान ते देशाच्या पहिल्या संसदेचे सदस्य राहिले. १९५३ ते ५४ दरम्यान त्यांनी काँग्रेसचे सचिव म्हणूनही काम पाहिले. खासदार असूनही त्यांनी लोकसभेचा राजीनामा देऊन तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. १९६७ मध्ये ते योजना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. लोकसभेत तर त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम पाहिले. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांना संरक्षण खाते सोपविण्यात आले. ऑगस्ट १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती झाले आणि २५ जुलै १९८७ रोजी त्यांनी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *१) पेट्रोलियम तेलाचे सुप्त साठे कोणत्या खडकात आढळतात ?* स्तरित खडकात *२) दामोदर खोरे योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हाती घेण्यात आली ?*  पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात *३) रोहा ते मंगलोर दरम्यान रेल्वे कधी सुरू झाली ?* २६ जानेवारी १९९८ *४) ग्रीसमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय शासन पद्धती *५) 'तफसीर-ए-गालिब' चे लेखक कोण ?* ग्यानचंद जैन. *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागनाथ चेटलूरे, कुंडलवाडी ●  उमाकांत शिंदे ●  वैशाली बाळासाहेब भामरे ●  शेख आलीम ●  प्रभू अण्णा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दु:ख* अबोल माणूस जेव्हा कुठं बोलकं होतं व्यक्त झालं म्हणजे दुःख हलकं होतं व्यक्त व्हायला हक्काची जागा असावी लागते दुःखी माणसाला यापेक्षा आणखी काय लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••a *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      शीलवंत सबसे बड़ा, सब रत्नन की खान । तीन लोक की संपदा, रही शील में आन।। सारांश- महात्मा कबीर म्हणतात "शीलवान किवा संतुष्ट व्यक्ती जगात सर्वात श्रेष्ठ आहे. शीलवान माणसे रत्ना-मानकांच्या तुलनेत चांगली मानली जातात. ज्या व्यक्तिंच्या अंतरात शालीनता वास्तव्य करते ती व्यक्ती विश्वात श्रेष्ठत्वाला पात्र ठरते . चंद्राची शितलता ,सुर्याची तेजस्वीता सागराची विशालता सज्जनाने अंगी धारण केलेली असते. सर्वावर ते कैवल्याचं चांदणं शिंपित असतात. प्रसंगी प्रखरपणे शिष्य व सोबत्याला परिणामांची जाणीव करून देत असतात. खळ कितीही वाकडा वागला तरी त्याचं वाकडेपण निघुन जावं . अशीच प्रार्थना विशाल हृदयानं ते विधात्याकडं करीत असतात. शीलवंत सज्जन खरं तर रत्नांच्या म्हणजेच सद्गुणांच्या खाणीच असतात . शील म्हणजे विशुध्दीचामार्ग आत्मशुद्धीकरणाचा मार्ग. या विशुधीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे. अश प्रकारच्या श्रेष्ठ आचरणापुढे कोणतीही भौतिक वस्तू कितीही मोलाची असौ. ती फिकीच वाटायला लागते ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त - Sly* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त कोल्हा* एका शेतकर्‍याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, ''एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का?'' कोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्‍या कोल्हय़ाला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला, ''नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.'' चतुर कोंबड्याने कोल्हय़ाच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला,  '' तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.'' कोल्हय़ाला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्हय़ाला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/12/2018 सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक दिव्यांग दिन* 💥 ठळक घडामोडी : १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशातील दहशतवादाशी संबंधित घटनांचे धागेदोरे हैदराबादपर्यंत पोहोचतात - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शिर्डी : निळवंडे कालव्यासाठी शिर्डी संस्थांनकडून राज्य सरकारला ५०० कोटी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पालघरमध्ये पुन्हा एकदा जाणवले भूकंपाचे धक्के. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काँग्रेस मध्य प्रदेशात 126 ते 132 जागा जिंकेल- काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे मॅरेथॉनच्या मुख्य शर्यतीत इथियोपियाचा एटलाओ डेबिड विजेता, गतविजेता इथिओपियाच्याच गुजशू बेशा याचे उपविजेतेपदावर समाधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/ZQ9GXWR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईल बंदी का ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. कॉंग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९0६ मध्ये कोलकाता येथे आयोजित अधिवेशनात आला होता. औपचारिकरित्या, त्यांनी १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा झाले तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे सर्मपण, धैर्य व दृढ विश्‍वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी असहकार आंदोलन जाहीर होताच आपल्या वकिलीला रामराम ठोकला व स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. राजेंद्रप्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५0 रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. १९५0 ते १९६२ या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) योजना आयोगाची स्थापना कधी झाली ?* १९५० *२) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली ?* ९ डिसेंबर १९४६ *३) नगदी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते ?* नाफेड *४) गंगोत्री नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?* उत्तराखंड *५) हैदराबादमध्ये चारमिनार कोणी बांधले ?* कुली कुतुबशाह *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अनुराधा श्यामसुंदर माडेवार ●  शिवाजी कल्याणकर ●  विलास रोंटे ●  साईप्रसाद पुलकंठवार ●  जयदीप केराई किशन ●  ए समद शेख ●  निहार रेड्डी ●  रघुनाथ टेकुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देव* संकटात वाटते प्रत्येकाला भेव संकट आले की आठवतो देव अडचणीत आठवतो देवाचाच मुद्दा काम झालं की कोणी विचारत नाही सुध्दा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळजी - Care* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कक्षीवानाचे कोडे* एकदा कक्षीवान ऋषी प्रियमेध नावाच्या ऋषीकडे गेला व म्हणाला, ''प्रियमेधा, माझे एक कोडे सोडव पाहू. अशी कोणती वस्तू आहे, की जी पेटविली तरी तिचा प्रकाश पडत नाही ?'' प्रियमेधाने खूप डोके खाजवले पण ह्याचा त्याला उलगडा होईना. कोणतीही वस्तू पेटली, की तिचा थोडा तरी प्रकाश पडणारच. तेव्हा तो म्हणाला, ''हय़ाचे उत्तर मला देत येत नाही. पण माझ्या वंशात पुढे कोणीतरी विद्वान निपजेल आणि तो तुला ह्याचे उत्तर देईल.'' कक्षीवान ऋषीजवळ एक मुंगसाच्या कातड्याची भली मोठी पिशवी होती. त्या पिशवीत प्रियंगू (पिंपळी), तांदूळ आणि अधिकता नावाचे धान्य भरले होते. तीतून एक एक दाणा काढून तो दरवर्षी फेकून देत असे. ते सर्व दाणे संपेपर्यंत त्याला आयुष्य दिलेले होते. पण प्रियमेधाला काही इतके आयुष्य नव्हते. तो मेल्यावर त्याचा मुलगा त्याच्या जागी आला व तोही पुढे म्हातारा होऊन मरण पावला. अशा रीतीने प्रियमेधानंतर नवव्या पिढीत साकमश्‍व जन्मला. पण कक्षीवान मात्र अजूनही आपली पिशवी घेऊन बसलाच होता. तो जवळजवळ ९00 वर्षांचा म्हातारा झाला होता. अजून त्याचे कोडे कोणाला सुटले नव्हते. साकमश्‍वाला ह्या कोड्याचे वेडच लागले. त्याने निश्‍चय केला, की मी हे कोडे जिंकीनच. त्यावेळी त्याला एक 'साम' सुचले. त्याने ते गाणे म्हटल्याबरोबर त्याला ते कोडे सुटले.  तेव्हा मोठय़ा आनंदाने तो तडक कक्षीवानाकडे धावत गेला. कक्षीवानाने त्याला दुरून धावत येताना पाहिले तेव्हा त्याच्या येण्याचे कारण त्याने ताडले. तो म्हणाला, ''अरे, माझी ही पिशवी नदीत बुडून टाका. माझे कोडे सोडवून मला खाली पाहावयास लावणारा माणूस हा पाहा मला दिसतो आहे. आता काय कारायचे मला जगून?'' साकमश्‍व कक्षीवानाजवळ आला व म्हणाला, जो मनुष्य नुसती ऋचा म्हणतो आणि 'साम' म्हणत नाही तो कवी अग्नीसारखा चेततो पण त्याचा प्रकाश पडत नाही. पण जो 'ऋचा' म्हणतो आणि लगेच 'साम' ही गातो तो कवी अग्नीसारखा चेततो आणि त्याचा प्रकाश पडतो. साकमश्‍वाला जेव्हा 'साम' स्फुरले व त्याने ते म्हटले तेव्हा त्याला 'सामा'चे तेज कळून चुकले. संगीताची जोड दिल्याखेरीज नुसते मंत्र पाठ करण्यात अर्थ नाही हे त्याने शोधून काढले. साकमश्‍व पुढे म्हणाला, ''हे तुला माझे उत्तर आहे. माझ्या बापाचेही हेच उत्तर आहे.'' असे म्हणून थेट प्रियमेधापर्यंत सर्व पूर्वजांची त्याने नावे घेतली आणि आपल्या पूर्वजांचा कलंक धुऊन टाकला. तेव्हापासून यज्ञात ऋग्वेदातील ऋचांबरोबर सामवेदांतील सामेही म्हटली जाऊ लागली आणि काव्याला संगीताची जोड मिळाली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

! 🌈 *भाषा संगम* 🌈 """""""""""""""""""""""""""""""""""""""""" *भाषा संगम दिनांक 30/11/2018 उपक्रम कन्नड भाषा* *संवाद* नमस्कारा ! निम्म हेसरु एनु ? नन्न हेसरू लक्ष्मी । नीवु हेगिद्दीरि ? नानु चेन्नागिद्देने । परिपाठामध्ये संवाद घेऊन एक मिनिटाचे video. 〰〰〰〰〰〰〰 प्रमिला सेनकुडे (स.शि.) 🙏🙏🙏🙏🙏