✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-d-gukesh-notable-performance-in-candidates-chess-tournament-amy-95-4340702/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अंतरराष्ट्रीय जॅझ दिवस_* *_ या वर्षातील १२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना:१९२५)**२००७:दिलीप कुमार यांना फाळके रत्न पुरस्कार**१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९९५:ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.**१९७७:९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ,समाजवादी पक्ष,संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.**१९३६:वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.**१७८९:जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.**१६५७:शिवाजी महाराजांनीमोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला केले* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:रोहित शर्मा – प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार**१९७०:सुवर्णा व्यंकट मुळजकर -- कवयित्री**१९६७:जयंत कमलाकर झामरे -- लेखक**१९६४:इयान अँड्र्यू हीली-- ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६१:दिवाकर शेजवळ-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५८:अरुण शेवते-- मराठी भाषेतील साहित्यिक,संपादक व प्रकाशक**१९५५:प्रदीप सरकार -- बॉलीवूडमध्ये काम करणारे भारतीय लेखक आणि दिग्दर्शक(मृत्यू:२४ मार्च २०२३)**१९५०:डॉ.ह.ना.जगताप -- शिक्षणतज्ज्ञ, लेखक* *१९५०:प्रा.अर्जुन बळीराम जाधव-- प्रसिद्ध लेखक**१९४८:डॉ.श्रीराम वसंत गीत-- संशोधक, लेखक**१९२६:श्रीनिवास खळे – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०११)**१९२४:रामचंद्र सोवनी --जीवशास्त्रज्ञ,विज्ञान लेखक (मृत्यू:१ मे २००७)**१९१०:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू:१५ जून १९८३)**१९०९:माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’(मृत्यू:११ आक्टोबर १९६८)**१८७०:धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार,दिग्दर्शक,संकलक, वेशभूषाकार,कलादिग्दर्शक(मृत्यू:१६ फेब्रुवारी १९४४)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर--- मराठी ग्रंथकार आणि संपादक(मृत्यू:१८ जून १९०१)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ(मृत्यू:२३ फेब्रुवारी १८५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: ऋषी कपूर- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते(जन्म:४ सप्टेंबर १९५२)**२०१२:अचला सचदेव--भारतीय चित्रपट अभिनेत्री(जन्म:३ मे १९२०)**२००३:वसंत पोतदार – मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (जन्म:२० नोव्हेंबर १९३९)**२००१:श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक,गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म:२१ ऑगस्ट १९२४)**१९४५:नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म:२० एप्रिल १८८९)**१९१३:मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म:७ नोव्हेंबर १८६८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक लोकसत्ता अग्रलेख *महाराष्ट्र दीन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक निर्णयाची अंमलबजावणी एक मे पासून होणार लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 25 मे रोजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गडचिरोली-गोंदिया पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात पटकावला राज्यात प्रथम क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *२५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर विमानतळ बॉम्बने उडविणार! प्रशासनाला धमकीचा ई-मेल; सुरक्षेत वाढ, प्रवाशांची कसून तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का, सहा टर्म खासदार, केंद्रीय राज्यमंत्रिपदही भूषवलेलं व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - कोलकत्ताने दिल्लीला सात विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 ************************'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे.फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील* यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?२) विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव घेणारी आपल्या राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?३) भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात मोठी आहे ?४) 'उदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.५) तानसेनचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) फायर विंग्स २) हेरवाड, कोल्हापूर ३) गुजरात ४) पोट ५) रामतनू पांडे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. अर्चना नागोराव येवतीकर👤 गजानन काटेवाडे, पीएसआय, नांदेड👤 शिवाजी भटापूरकर👤 श्रीकांत चिनापूरकर👤 रवीकुमार कमलाकर👤 अभिजित नाईनवाड👤 ओम कांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसणारे हे भले मोठे जग दिवसेंदिवस बदलणार आहे. कोणी म्हणतात की, जगाबरोबर आपण बदलले पाहिजे. पण, एवढेही आपण बदलू नये की, ज्यांनी मायेचा स्पर्श देऊन आलेल्या प्रत्येक परिस्थितीत सदैव सोबतीला राहून साथ दिली. जीवनात तर बरेच माणसे येतात आणि जातात पण,मायेचा स्पर्श व ती मिळालेली आपुलकी प्रत्येक माणसात नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पित्याचे ऋण*“बाई, तुमची लाकडं फोडायची आहेत का? घराची कौलं शाकारायचीत का? मला सांगा काम. चार पैसे मिळून जातील.” शाळेत जाणारा हा तेरा वर्षाचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली काम करायचा. शिकण्यापेक्षा त्याला अंगमेहेनतीची जास्त आवड. दुसऱ्यांची गुरं राखणं शेतात कामं करणं आणि एस. टी. स्टँडवर जाऊन हमाली करणे असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायची या मुलांची नेहमीच तयारी असायची. ही कष्टाची कामं करून आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हे त्या मुलाचे स्वप्र. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य. पोटाला पुरेसे खायला नाही. अंगावर घालायला लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. अशा परिस्थितीत अभ्यासात या मुलाचे मन कसे रमावे ? पण आपल्या मुलाने खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडीलांची जिद्द.                या मुलाचे वडील म्हणजे रामजीबाबा संकपाळ. माणूस मोठ्या खटपट्या, धीट प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचा. तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगच्या गुणांनी नाव मिळवलं. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण वाचनाची विलक्षण आवड. कुणी शिकवलं नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा तर आवडीचा विषय. लष्करात सुभेदार म्हणून त्यांना बढती मिळाली, पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. लष्करातले मुख्याध्यापक म्हणूनच ते ओळखले जात. या पार्श्वभूमीवर मुलाने शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंगमेहनत करून चार पैसे मिळवावेत हे त्यांना कसे पटावे? मुलाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते सोडवायचे. त्याला शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे. मुंबईच्या जुन्या चाळीत रामजीबाबांचे बिऱ्हाड. स्वयंपाक, जेवण, अभ्यास, विश्रांती सारे काही एकाच खोलीत. खोलीत एकीकडे लाकडे आणि गोवऱ्या, तर दुसरीकडे भांड्यांची उतरंड, दळणाचं जातं, दुधासाठी बकरी हा सारा सरंजाम.अशा या वातावरणात मुलाचा अभ्यास कसा व्हावा? अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळायचे ते फक्त पहाटे, पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठवायचे, तर घरात गजराचे घड्याळ नाही. मग रामजीबाबा रात्री २ पर्यंत स्वत:ची काही कामं करत जागत बसायचे, आणि मुलाला अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे. मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली. स्वतःच्या तुटपुंज्या मिळकतीत त्याच्या अभ्यासाची पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके हे सारे कसे जमावे? मग रामजीबाबा मुंडासं गुंडाळून थोरल्या मुलीकडे जायचे. तिच्याकडे पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे. तिच्याकडे रोख पैसे नसले तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून घ्यायचे. तो दागिना गहाण टाकून मारवाड्याकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मारवाड्याचे पैसे देऊन दागिना सोडवून आणायचे आणि मुलीला परत करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा ! अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलातही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली. हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता.पित्याचे आपला मुलगा खूप शिकावा हे स्वप्र पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाची एकामागून एक सर्वोच्च शिखरे सर केली. पण मुलाचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला लाभले नाही. अत्युच्य शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या या थोर सुपुत्राचे नाव, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/premier/juna-furniture-movie-review-mahesh-manjrekar-film-entertainment-news-pvk21••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय नृत्य दिन_* *_ या वर्षातील १२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:मध्यप्रदेशमध्ये मलखांबाला राज्य खेळाचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* *१९९१:बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.**१९४५:दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली**१९३३:’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:प्रियदर्शन जाधव-- मराठी अभिनेता, दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक* *१९७९:आशिष नेहरा-- भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज तथा प्रशिक्षक**१९७२:तुषार जोशी-- कवी* *१९७१:आनंद भाटे-- किराणा घराण्याचे भारतीय शास्त्रीय गायक**१९७०:आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू**१९६६:फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज**१९६५:हेमंत मधुकर डांगे -- प्रसिद्ध कवी,गझलकार, लेखक* *१९६३:डॉ.सुधीर राजाराम देवरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,संपादक,अहिराणी भाषा संशोधक**१९५७:दीपक शिर्के-- भारतीय अभिनेता* *१९५२:माधुरी बळवंत पुरंदरे--भाषांतरकार, चरित्रकार,संपादक,नृत्य,नाटक,लेखन,गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान* *१९५०:अनिलकुमार तुळशीरामपंत काटकर-- लेखक**१९४६:अजित जोगी-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,छत्तीसगडचे मुख्यमंत्री (मृत्यू:२९ मे २०२०)* *१९४६:रवींद्र गुर्जर-- जेष्ठ साहित्यिक,मराठी अनुवादक-लेखक* *१९४६:पं.प्रदीप नाटेकर -- ज्येष्ठ गायक**१९४३:चंद्रकांत मेहेंदळे-- नव्या रंगकर्मींना मार्गदर्शन करणारे,अनेक नाट्य स्पर्धांसाठी परीक्षण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी(मृत्यू:३० मे २०२०)**१९३६:झुबिन मेहता – भारतीय संगीतकार**१९२४:पुरुषोत्तम रामचंद्र बेहरे --मराठी लेखक,संपादक**१९१५:सीताराम किसन उके-- भक्ती गीते (मृत्यू:६ जून १९५०)**१९११:अनंत हरी लिमये --लेखक(मृत्यू:२३ जानेवारी १९७४)**१९१०:अरविंद गंगाधर मंगरूळकर--- संपादक,संशोधक,समीक्षक(मृत्यू:२७ मे १९८६)**१९०१:मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (मृत्यू:७ जानेवारी १९८९)**१८६७:डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (मृत्यू:७ एप्रिल १९३५)**१८४८:राजा रविवर्मा – चित्रकार (मृत्यू:२ आक्टोबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इरफान खान-चित्रपट अभिनेता (जन्म:७ जानेवारी १९६७)**२००६:जे.के.गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म:१५ आक्टोबर १९०८)**१९९९:मोहन वसंत गोखले-- मराठी अभिनेते-दिग्दर्शक(जन्म:७ नोव्हेंबर १९५३)**१९८०:श्रीकृष्ण केशव क्षीरसागर – लेखक, विचारवंत,समीक्षक(जन्म:६ नोव्हेंबर १९०१)**१९८०:सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म:१३ ऑगस्ट १८९९)**१९६०:पं.बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी.हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (जन्म:८ डिसेंबर १८९७)**१९४५:हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म:७ आक्टोबर १९००)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भावनाप्रधान, हृदयस्पर्शी कथा; 'जुनं फर्निचर' चित्रपट*महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमने कौटुंबिक व सामाजिक असा उत्तम चित्रपट दिला आहे. ही कथा आहे निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या गोविंद राठोड या ज्येष्ठ नागरिकाची. ..... पूर्ण Review वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी केली आरोपीं विरोधात कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर - सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी भाषेच्या शुध्दीकरणाची प्रक्रीया निश्चित व्हावी - ज्येष्ठ मुर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद; सर्वाधिक 20 रुग्ण धुळ्यातील, नाशिकचे तापमानही उच्चांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत रात्रीच्या पोलीस नाकाबंदीत पैशांचं घबाड सापडलं, गाडीचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आरसीबीच्या विराट विजयात जॅक्स चमकला, गुजरातची धुलाई करत चार षटकं राखून सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रिएन्फोर्समेंट* 📙छपरावर टाकलेला पत्रा पन्हाळीचा का असतो ? स्कूटरच्या पत्र्याला विविध गोलांवर आतून जोड का दिला जातो ? ट्रकचा व मोटारचा पुढचा बंपर इंग्रज सी आकाराचाच का बनवतात ? घराच्या कॉलम व तुळ्यांमध्ये सिमेंट काँक्रिटमध्ये सळ्या का घालतात ? पोलादी गर्डरचा आकार इंग्रजी I प्रमाणे का असतो ?या सर्वाचे उत्तर एकच आहे. ताण सहन करण्यासाठी कमकुवत जागी विशेष आधार म्हणजेच रिएन्फोर्समेंट (reinforcement) द्यायला या गोष्टी केलेल्या असतात. घरावरचा पत्रा सरळ असता, तर त्यावर कोणी पाय दिला तर तो त्या जागी वाकला असता. पन्हाळीच्या आकाराने तो वाकू शकत नाही. तीच गोष्ट स्कूटरच्या पत्र्याची. अन्यथा साधी जोरात बुट्टी मारली, तरी त्याला कोच आला असता. बंपरचा आकार इंग्रजी सीप्रमाणे केल्याने कितीही जोरात धडक बसली तरी तो वाकू शकत नाही. 'आय'चा आकार असलेला पोलादी गर्डर तर कित्येक टनांचे वजन लीलया पेलू शकतो.काँक्रिटच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती आहे. सिमेंट काँक्रीटचा ठोकळा केवळ वरून दाब दिला, तर कित्येक टनांचा दाब सहन करतो. पण समजा, काँक्रिटचा लांबुळका ठोकळा दोन बाजूंनी पकडून ओढायला सुरुवात केली; तर तो तडे जाऊन तुटायला वेळ लागत नाही. याउलट लोखंडाचे आहे. लोखंडावर प्रचंड दाब दिल्यास त्याचा आकार कदाचित बदलेल, पण लोखंड, सळई प्रचंड ताण सहन करू शकते. मग या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ?नेमके तेच बांधकामशास्त्रात रिइन्फोर्स्ड काँक्रिट बनवून तयार केले आहे. सर्व प्रकारचा दाब काँक्रिट सहन करते, तर सर्व प्रकारचा ताण आतील लोखंडी सळ्या सहन करतात. कितीही उंच बांधकाम असो किंवा कितीही लांब अंतराची काँक्रिटची तुळई असो; रिएन्फोर्सड काँक्रिट वापरले असले की, चिंता करायचे कारणच राहत नाही.निसर्गातसुद्धा हे रिइन्फोर्समेंटचे तत्त्व कित्येक ठिकाणी अंमलात आलेले दिसते. फक्त त्यादृष्टीने बघायची नजर मात्र पाहिजे. शंख बघा किंवा शिंपला; जिथे वक्राकृती आकार येतो, तिथे आतील बाजूने बारीक जाड रेषांनी रिइन्फोर्समेंट दिलेली असते.उंच वाढणारे मोठ्या बुंध्याचे कोणतेही झाड बघा, त्याच्या जमिनीपासून दोन तीन फूट उंचीचा बुंधा हा उलट्यासुलट्या दिशेने पन्हाळीप्रमाणे आकार घेऊन मगच जमिनीत शिरलेला दिसतो. म्हणजेच वाऱ्याचा ताण सहन करण्यासाठी या पन्हाळीमुळे बुंध्याला पूर्ण ताकद मिळत जाते.याच रिएन्फोर्समेंटच्या तत्त्वानुसार भरीव लोखंडी कांबीपेक्षा पोकळ लोखंडी कांब वजनाने हलकी असून जास्त ताकदवान असते, हे तुम्ही अनेकदा वाचले असेलच.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संताप हा अग्नीसारखा माणसाला जाळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तुळस ही वनस्पती कशाचे प्रतीक मानले जाते ?२) तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला काय म्हणतात ?३) वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते तुळस ही वनस्पती दिवसात किती तास ऑक्सिजन हवेत सोडते ?४) तुळशीचे प्रकार कोणते ?५) तुळशीला इंग्रजीत काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) मंगलतेचे, पावित्र्याचे २) मंजिरी ३) २० तास ४) काळी तुळस व हिरवी तुळस ५) Holy Basil ( होली बेसिल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नीलम गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका, पुणे👤 राजू गाजरे, अहमदनगर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥धृ॥ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात असते ती व्यक्ती, परिस्थितीला चांगल्याने ओळखत असते व त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्या अश्रूंची भाषा समजत असते ती व्यक्ती,कोणाच्याही डोळ्यातील अश्रू बघून आनंदीत होत नाही. कारण, परिस्थितीचे येणे किंवा जाणे कोणाच्याही हातात नसते. म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये व आनंद घेऊ नये. शक्य झाल्यास माणुसकीच्या नात्याने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुदक्षिणा*फार पूर्वी आश्रमात गुरूजवळ राहून गुरूची आणि गुरू पत्नीची सेवा करून, त्यांचे जीवन जवळून पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करणं हे त्या काळात पाप समजले जाई. असाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आत्रेय गुरुजींचा आश्रम. राजपुत्रांपासून ते सामान्य दासीपुत्र आणि भिल्लकुमारांपर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकून जात. शिक्षण संपवून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वेच्छेने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसाची अशीच ती प्रसन्न सकाळ. गुरुजींचा निरोप घेताना विद्यार्थी गुरूदक्षिणा देत आणि गुरुजी त्यांना तोंडभरून आशीर्वाद देत. असे करता करता गुरुजींचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. एका कोपऱ्यात तो उदासवाणा होऊन गुरुजींकडे पाहात होता… गुरुजींनी त्याला जवळ घेतले आणि विचारले, “काय रे बाळ, तू असा उदास का? कसल्या एवढ्या विचारात गढून गेलास ?” “गुरुजी सगळ्यांनी काही ना काही तरी गुरुदक्षिणा दिली. पण मी इतका सामान्य आहे. गुरूदक्षिणा देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही.” त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच तथ्य होते. तो होता बिंबिसार राजाला राजगणिकेपासून झालेला मुलगा. लहानपणापासूनच रानावनात सोडून दिलेला. पण राजाच्या एका दासीपुत्राने त्याला आश्रय दिला, त्याला लहानाचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला. गुरुजींना हे सारे माहीत होते. विद्यार्थ्याच्या पाठीवरून हात फिरवून ते म्हणाले, “अरे मी तुझी परिस्थिती जाणतो. तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव. हीच माझी गुरुदक्षिणा.” पण तो विद्यार्थी ऐकेना. काहीतरी गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही असे त्याचे म्हणणे. शेवटी गुरुजींनी आज्ञा केली, “ज्याचा जगाला काहीही उपयोग नाही अशा झाडाची चार पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दे.”गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला. गावोगावी, रानावनातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून खूप भटकला. कोणतेही झाड दिसले की या झाडाचा उपयोग काही आहे का? याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस, बेल, कोरफड, कडुनिंब, दुर्वा, नारळ, आंबा अशा वनस्पती झाल्या. निरनिराळ्या प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे झाली. त्याच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो, काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला. हे काम जवळ जवळ तीन वर्षेपर्यंत चालू होते. या तीन वर्षात जमवलेल्या माहितीचे भले मोठे बाड जमा झाले. थकला बिचारा. पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही. निराश मनानं तो गुरुजींकडे आला आणि हताशपणाने झाला प्रकार सांगितला. गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, “अरे जगामध्ये निरुपयोगी असं एकही झाड नाही हे का मला माहीत नव्हतं? माझी आज्ञा तू प्रमाण मानलीस. मला माझी गुरुदक्षिणा मिळाली.” अशी अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक. आयुर्वेदातील तो एक तज्ञ मानला जातो. शल्यचिकित्सेतही तो प्रवीण होता. गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/GWa1vbjp8h2WrxSP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक जलसंपत्ती दिन'_* *_भारतीय पंचायत राज दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण* *१९९३:इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०:डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०:गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८:मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.**१९६७:वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९:इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०:पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००:अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:[वैशाख व. ९, शके १६३९] खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४:भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मेघना सुधीर एरंडे-- भारतीय अभिनेत्री* *१९७८:प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३:सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न**१९७०:डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३:डॉ.सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७:अरुण काकतकर-- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५:दिलीप मुरलीधर देशपांडे-- लेखक, ज्येष्ठ पत्रकार(विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन)**१९४३:पंडित श्रीराम शहापूरकर-- प्रसिद्ध हार्मोनियम वादक(मृत्यू:८ ऑक्टोबर २०१४)**१९४२:बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका,चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९:मीरा कोसंबी-- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१५)* *१९३८:मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू:१० मे २०१०)**१९३६:पद्माकर गोवईकर-- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू:२२ जुलै २००१)**१९३५:डॉ.बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी-- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०:बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)--महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू:८ जानेवारी २०२२)* *१९२९:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू:१२ एप्रिल २००६)**१९२४:प्रल्हाद नरहर जोशी--- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक,कादंबरीकार(मृत्यू:५ जून २००४)**१९१०:राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू:९ फेब्रुवारी १९७९)**१९०४:केशव नारायण काळे-- मराठीतील कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)**१८८९:सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू:२१ एप्रिल १९५२)**१८९६:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.(मृत्यू:४ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म:२३ नोव्हेंबर १९२६)**२००६:गोविंद मोघाजी गारे-- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म:४ मार्च १९३९)**२००४: इंदुमती गंधे-- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म:२० नोव्हेंबर १९२०)**१९९९:सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म:१९२१)**१९९४:शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म:२८ मे १९०३)**१९९२:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म:७ फेब्रुवारी १९२८)**१९७४:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म:२३ सप्टेंबर १९०८)**१९७२:जामिनी रॉय – चित्रकार (जन्म:११ एप्रिल १८८७)**१९६०:लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म:१८६०)**१९४२:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म:२९ डिसेंबर १९००)**१९३५:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी(मृत्यू:२१ ऑगस्ट१८५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सचिन रमेश तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मुकुंद कुलकर्णी यांचा लेख*मास्टर ब्लास्टर भारतरत्न पुत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Lok Sabha Elections 2024: उष्णतेच्या लाटेमुळे मतदान होणार कमी? निवडणूक आयोगाने नेमली टास्क फोर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन व्हेरिएंटचे यशस्वी प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशातील मतदानाची टक्केवारी कमी होणे चिंताजनक काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयाची चोरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईने लखनऊ समोर ठेवले 211 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक वसुंधरा दिवस - २०२४ ची थीम* काय आहे ?२) कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?३) पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहास काय म्हणतात ?४) 'अंगार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?*उत्तरे :-* १) प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक २) अमोनिया ३) दिंडी ४) निखारा ५) तानसा नदी, ठाणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जगदीश पा. नवले, परभणी👤 भूमाजी मामीडवार👤 सौरभ कोटपल्लीवार👤 कवी विशाल मोरे👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार👤 महावीर जैन👤 दत्ता फत्तेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/priya-bhosale-article-on-veteran-actress-lalita-pawar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महाराष्ट्र विधान भवनाचे इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९७५:’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला**१९७१:सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले**१९५६:गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.**१९४८:ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४५:सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१५२६:मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:मारिया शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस खेळाडू**१९७९:रंजना सतीश खेडकर-- कवयित्री* *१९७३:डॉ.अशोक लिंबेकर -- लेखक, समीक्षक**१९७२:सचिन जगताप-- प्रसिद्ध बासरी वादक**१९६८:रूपक कुलकर्णी-- बासरी वादक,पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य**१९६४:प्रा.डॉ.संदीप पांडुरंग ताटेवार-- लेखक* *१९६२:डॉ.आनंद सदाशिव सहस्त्रबुद्धे-- कथा,कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९५७:मुकेश अंबानी – प्रसिद्ध उद्योगपती**१९५५:भिकू नारायण बारस्कर -- प्रसिद्ध कथाकार,चरीत्रकार,संपादक**१९४१:माधव सरपटवार-- लेखक,पत्रकार, संपादक**१९३७:भगवान भटकर-- प्रसिद्ध कवी, विचारवंत* *१९३३:डिकी बर्ड – ख्यातनाम क्रिकेट पंच**१९३०:मालती पांडे-बर्वे-- हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका(मृत्यू:२७ डिसेंबर १९९७)**१९२६:प्रभाकर विष्णू सोवनी-- विज्ञान विषयक लेखन करणारे लेखक,संपादक (मृत्यू:२० नोव्हेंबर २०१५)**१९२५:अनंत रामचंद्र कुलकर्णी-- मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक,संशोधक, इतिहासकार.(मृत्यू:२४ मे २००९)**१९१२:ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२५ फेब्रुवारी १९९९)**१८९५:केशव नारायण वाटवे-- साहित्यविमर्शकार,समीक्षक( मृत्यू:९ मे १९८१)**१८९२:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(मृत्यू:३१ ऑगस्ट १९७३)**१८६८:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (मृत्यू:२७ जानेवारी १९४७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार (जन्म:७ जून १९१३)**२००९:अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (जन्म:८ जुलै १९२२)**२००८:सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका(जन्म:७ जानेवारी १९२०)**१९९४:मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री.पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता,मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे,असे त्यांनी सांगितले,आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.**१९९३:डॉ.उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता**१९७४:आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१४ मे १९०७)**१९५५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ,शिकारी व लेखक (जन्म:२५ जुलै १८७५)**१९१०:अनंत कान्हेरे – क्रांतिकारक (जन्म: १८९१)**१९०६:पिअर क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१५ मे १८५९)**१८८२:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१८८१:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:२१ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामनामध्ये प्रकाशित प्रिया भोसले यांचा प्रासंगिक लेख*ललिता पवार - जन्मदिन विशेष*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज पहिल्या टप्प्यातील मतदान :10 हजार 652 मतदान केंद्रांवर 95 लाख 54 हजार मतदार करणार उमेदवारांचा फैसला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने जप्त केली 97 कोटींची मालमत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी दुर्घटना ! कोयनेच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट बुडाली, तिघे करत होते प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ललित साहित्य म्हणजे सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज:इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गीत रामायणातील 56 गीतांचे होणार सादरीकरण:पुण्यात 'हटके' कार्यक्रम; तब्बल 25 हून अधिक कलाकारांचा असेल समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रेडाई देणार भावी अभियंत्यांना प्रशिक्षण:नवअभियंत्यांना 200 तासांचे कौशल्याधारित मार्गदर्शन; क्रेडाई मेट्रो-VIIT मध्ये सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सने पंजाबला 9 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *उन्हाळी लागणे म्हणजे काय ?* 📕************************बऱ्याचदा उन्हामुळे असा त्रास आपल्याला होत असतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे व मूत्रमार्ग दुखणे. लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर मूत्रनलिकेतील आवरणास इजा होते. त्यामुळे लघवी करताना आग होते. मूत्रनलिकेत आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळे जळजळ होते. मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होत असते. मूत्र तयार होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन राखणे व शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे हा आहे. साहजिकच पाणी कमी प्यायले, तर मूत्राचे प्रमाण कमी होते; परंतु मूत्रातील क्षारांचे व टाकाऊ पदार्थांचे प्रमाण तेवढेच राहते. साहजिकच त्यामुळे लघवी सौम्य न होता जळजळीत होते. अशावेळेस लघवी गडद पिवळी किंवा लालसर दिसते. यामुळे मूत्रनलिकेच्या आवरणाचा दाह होतो. पाणी कमी पिणे, या कारणाशिवाय जंतूसंसर्गामुळे, मूतखड्यामुळे मूत्रनलिकेला दाह होऊन लघवी करतेवेळी जळजळ होते.यावर उपाय म्हणजे नेहमीच विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे. घामाचे प्रमाण लक्षात घेऊन दिवसभरात एक लिटर लघवी होईल इतके पाणी प्यावे. उन्हाळी लागलेली असल्यास लिंबूपाण्यात खाण्याचा सोडा टाकून प्यावे. १०० मिलीलिटर म्हणजे साधारणतः एक कप पाण्यात २.५ ग्रॅम धने भिजत ठेवून ते पाणी साखर टाकून १२-१२ तासांनी प्यायल्याने उतारा पडतो/ जळजळ कमी होण्यास मदत होते.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे' हे उद्गार कोणाचे आहेत ?२) राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?३) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?४) 'आज्ञा' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शाहू महाराज २) राष्ट्रपती ३) सिंधू ४) आदेश, हुकूम ५) सुविधा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 भक्ती जठार👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 मनोज रामोड👤 अझर शेख👤 बालाजी पोरडवार👤 संदीप काटमवाड, बिलोली👤 सचिन कनोजवार👤 कृष्णा राय*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांड्यावर झाकण असते पण, तोंडावर नाही. लाकडाचा तोंड राहिला असता तर केव्हाचाच फुटला असता. या, प्रकारचे शब्द अनेकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत असते. म्हणून ज्यांना ज्या,शब्दात बोलण्याची सवय आहे त्यांना बिनधास्तपणे बोलू द्यावे त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नये. ते आपले काम करतात आपण आपले काम करत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शास्त्राचा उपयोग कोणता ?*प्राचीन भारतात नागार्जुननावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थदिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यातवेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’ तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-parth-bawskar-on-shree-ram-ramnavami/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक वारसा दिन_* *_ या वर्षातील १०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक वारसा दिन_**_आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे,गुहा,लेणी,किल्ले,स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो._*••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण**१९९४:वेस्टइंडीजचा फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमी३७५ धावा**१९८०:झिंबाब्वेचा स्वातंत्र्य दिन**१९७१:एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.**१९५४:गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.**१९५०:आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली**१९३६:पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.**१९३०:क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.**१९३०:आज काहीही बातमी नाही असे बी. बी.सी.या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले**१९२७:पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले**१९२४:सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.**१९१२:’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले**१८९८:जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी**१८५३:मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.**१८३१:’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.**१७२०:शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.**१७०३:औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शेखर गिरी-- कवी,गझलकार* *१९७६:किरण शिवहर डोंगरदिवे-- प्रसिद्ध कवी,समीक्षक आणि ललित लेखक**१९७५:नेहा बाजपेयी--भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७१:गणेश विठ्ठलराव कुंभारे-- कवी,लेखक**१९६७:विद्या बनाफर -- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनिल सूर्या-- कवी,कथाकार**१९६५:प्रा.डॉ.निशा निळकंठ शेंडे -- लेखिका**१९६५:सविता प्रभुणे--- भारतीय अभिनेत्री* *१९५८:माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९९)**१९५६:पूनम धिल्लन – अभिनेत्री**१९५०:अलका चंद्रकांत दराडे-- कवयित्री,लेखिका**१९४७:महेंद्र संधू--भारतीय अभिनेता* *१९२३: मधुसूदन परशुराम पेठे -- संत साहित्याचे अभ्यासक,ग्रंथालयशास्त्र तज्ञ* *१९१७:वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन--कथाकार, कादंबरीकार,नाटककार,प्रवासवर्णनकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०१०)**१९१६:ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९८)**१८५८:महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण,भारतरत्‍न (मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२)**१८९९:काशीनाथ श्रीधर नायक-- कोंकणी कवी,प्रकाशक व मुद्रक**१७७४:सवाई माधवराव पेशवा-- यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म(मृत्यू:२७ आक्टोबर १७९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (जन्म:२२ आक्टोबर १९४२)**१९९५:पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक**१९७२:डॉ.पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, (जन्म:७ मे १८८०)**१९६६:जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली.(जन्म:३० ऑगस्ट १८८३)**१९५५:अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ मार्च १८७९)**१८९८:दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे] (जन्म:२४ जून १८६९)**१८८६:बजाबा रामचंद्र प्रधान-- इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे मराठी कवी(जन्म:१८३८)* *१८५९:१८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. (जन्म:१८१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने दैनिक सामना मध्ये प्रकाशित श्री पार्थ बावसकर यांचा वाचनीय लेख*भारतीय लोकजीवनाचा आदर्श*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिरीष घाटपांडेंना अ. भा. मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार:तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ, प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी स्वामींनी घेतला आढावा; संभाजीनगरातील वाहतूक मार्गात उद्यापासून असणार बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत आरटीई’ अंतर्गत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वाहतूक कोंडीतून होणार मुंबईकरांची सुटका! शीव-पनवेल महामार्गाला जोडणार नवा पूल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - दिल्ली कॅपिटलने गुजरात टायटनचा केला 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙 एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ आहे तर घाम गाळा नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भाजीपाला मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ?२) देशातील ज्या भागांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असते, अशा भागांना काय म्हणतात ?३) कोणत्या देशाची टोपण नावे Lion City, Garden City, Red Dot अशी आहेत ?४) 'आस' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतातील पहिला विमानतळ कोणता ? *उत्तरे :-* १) भाजीमंडई २) केंद्रशासित प्रदेश ३) सिंगापूर ४) इच्छा, मनीषा ५) जुहू विमानतळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गझलकार शेखर गिरी👤 मनोज खुटे👤 देवराव पाटील कदम👤 योगेश मरकंटी👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनारे👤 बालाजी गादगे, शिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो किंवा मोठे शेवटी काम ते कामच असते. असे, अनेकदा ऐकण्यात तसेच वाचण्यात आले आहे. .हाती घेतलेले काम पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व स्वतः वर विश्वास ठेवून केल्यावर आपल्याला जो, समाधान मिळते तोच समाधान जगावेगळा असते. म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नये व मिळालेल्या यशाला गर्वाच्या भोवऱ्यात अडकवून ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरा शिष्य कोण ?*एकदा दोन तरुण स्वामीविवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींनासांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले– पण एकजन स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई, “तुमच्यात माणुसकी नाहीतुम्ही कठोर आहात” वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचेशिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई. एक दिवस नदीलापूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा -स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोषदेणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे तीन दिवस चालले. चौथ्यादिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणूनस्वीकारले. ते म्हणाले, “शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठाहवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल.”तात्पर्यः कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QTphTzLxRqraanB1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'जागतिक आवाज दिन (World Voice Day)'* *_ या वर्षातील १०७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी**१९९५:देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान**१९७२:केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ’अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले**१९४८:राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना**१९२२:मुळशी सत्याग्रह सुरू झाला.**१८५३:भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:सिद्धार्थ शंकर महादेवन-- गायक* *१९८२:स्वप्ना पाटकर --भारतीय लेखिका, गीतकार,आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता* *१९७८:कविता मोरणकर -- कवयित्री, लेखिका* *१९७८:लारा दत्ता – मॉडेल,हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती,मिस युनिव्हर्स (२०००)**१९७८:प्रा.डॉ विनायक पवार-- कवी,चित्रपट कथा लेखक**१९६३:सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६०:प्रा.डॉ.संपदा सुधीर कुल्लरवार-- कवयित्री,लेखिका**१९५६:सलीम आबालाल शेख -- लेखक**१९५३:ज्योत्स्ना श्रीकांत शिंत्रे -- लेखिका* *१९४८:ज.मो.अभ्यंकर- लेखक,अध्यक्ष,राज्य अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग**१९४४:सुहासिनी कीर्तीकर-- लेखिका* *१९४०:बनवारीलाल पुरोहित-- पंजाब राज्याचे राज्यपाल**१९३४:रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – माजी केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री,माजी राज्यपाल तथा लेखक**१९२६:श्यामराव कांबळे -- संगीत संयोजक (मृत्यू:१७ आक्टोबर २०१८)**१९२२:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(मृत्यू:१५ मार्च २०१६)**१८८९:चार्ली चॅपलिन – अभिनेता,दिग्दर्शक आणि संगीतकार.त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट,घट्ट कोट ढगळ पँट,चौकोनी मिशा,बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (मृत्यू:२५ डिसेंबर १९७७)**१८६७:विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू:३० मे १९१२)**१८४८:कंदुकुरी वीरेसालिंगम-- मद्रास प्रेसिडेन्सी,ब्रिटिश भारतातील एक समाजसुधारक आणि लेखक(मृत्यू:२७ मे १९१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(जन्म:१५ एप्रिल १९३५)**२०१९:गोपाळ मारुतीराव पवार(गो.मा) --महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार (जन्म:१३ मे १९३२)* *२०००:दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू,शाहू महाराजांचे चरित्रकार (जन्म:१९३०)**१९९५:रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध**१९८२:अच्युत महादेव बर्वे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:३ फेब्रुवारी १९२७)**१९६६:नंदलाल बोस--जगविख्यात चित्रकार (जन्म:३ डिसेंबर १८८२)**१९२८:महादेव मल्हार जोशी-- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(जन्म:२ जानेवारी १८७३)**१८५०:मेरी तूसाँ –’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका(जन्म:१ डिसेंबर १७६१)**१७५६:जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म:८ फेब्रुवारी १६७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंघोळ किंवा स्नान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टेक्नोसॅव्ही निवडणूक आयोग, 9 अ‌ॅपद्वारे जाणून घेता येणार उमेदवार ते मतमोजणीचा प्रवास, दाद मागण्याचीही सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरला, शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राजू शेट्टींचे हातकणंगल्यातून अर्ज दाखल करताना विराट शक्तीप्रदर्शन; म्हणाले, खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मी फक्त अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 106 टक्के पाऊस होण्याचा हवामान विभागाचा मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्रसाठी आशादायी परिस्थिती *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हैद्राबादने बंगळुरू समोर ठेवले 288 धावाचे विशाल लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बाळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे ?२) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?३) 'ग्रीन हाऊस इफेक्ट' कशाशी संबंधित आहे ?४) 'आपत्ती' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशांदरम्यानच्या सीमारेषेला कोणते नाव आहे ? *उत्तरे :-* १) बिल्कीस मीर २) ब्राझील ३) वातावरणातील बदल ४) संकट ५) Parallel line*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बाबू जिंकलोड👤 स्वप्नील भंडारे👤 माधव गायकवाड👤 अनिरुद्ध वंगरवार👤 नितीन अंबेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण,पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?”  त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BX8EgxHfZigDuFSk/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक कला दिवस_* *_ या वर्षातील १०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.**१९९४:भारताची गॅट करारावर स्वाक्षरी**१९५०:आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पंचमपल्ली येथून भूदान चळवळीस प्रारंभ केला**१९४०:दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.**१८९२:जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली**१६७३:मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.**१८६५:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन. अॅडयु जॅक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:हेमंत दिनकर सावळे--लेखक**१९७६:प्रा.डॉ.संजय वाघोजी जगताप -- लेखक* *१९७३:अरुण झगडकर-- कवी,लेखक**१९७२:मंदिरा बेदी-- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१:प्रा.डॉ.मिलिंद भाऊरावजी साठे-- लेखक* *१९६९:दिलीप तुळशिरामजी काळे -- कवी**१९६३:मनोज प्रभाकर-- भारतीय क्रिकेटपटूआणि प्रशिक्षक**१९६३:नरेंद्र प्रभू -- लेखक**१९६०:अशोक भैय्याजी लेकुरवाळे-- लेखक* *१९५९:विष्णु गुराबसिंह सोळंके-- प्रसिद्ध ज्येष्ठ कवी,गझलकार‎,लेखक**१९५५:डॉ.राजा दांडेकर-- लेखक**१९५२:मधुकर आरकडे--ज्येष्ठ कवी-गीतकार (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९४४:लक्ष्मीनारायण बोल्ली-- मराठी लेखक, अनुवादक व संशोधक,यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन.(मृत्यू:२३ फेब्रुवारी २०१८)**१९३५:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(मृत्यू:१६ एप्रिल २०२३)**१९३२:सुरेश भट – लोकप्रिय गझलकार, कवी (मृत्यू:१४ मार्च २००३)**१९२२:हसरत जयपुरी – गीतकार (मृत्यू:१७ सप्टेंबर १९९९)**१९१२:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू:१३ जानेवारी १९९७)**१८९४:भालचंद्र लक्ष्मण पाटणकर-- संपादक, समीक्षक (मृत्यू:१४ सप्टेंबर १९७३)**१८९३:नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू:२१ डिसेंबर १९७९)**१८९२:पांडुरंग जीवाजी सबनीस-- वैचारिक निबंधलेखक,नाटककार (मृत्यू:२३ जून १९६९)**१८७४:त्र्यंबक सीताराम कारखानीस--मराठी नाट्यदिग्दर्शक(मृत्यू:८ जानेवारी १९५६)**१७०७:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१८ सप्टेंबर १७८३)**१४६९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू:२२ सप्टेंबर १५३९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:विलास गोविंद सारंग--कवी, कथाकार,कादंबरीकार,समीक्षक (जन्म:११ जून १९४२)**२०१३:वि.रा.करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म:२७ ऑगस्ट १९१९)**१९९५:पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री**१९९०:ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९८०:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२१ जून १९०५)**१९१२:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म:२७ जानेवारी १८५०)**१८६५:अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१७९४:मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी(जन्म:१७२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने प्रासंगिक लेख.... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सांगलीत उरूसातील बैलगाडा थेट गर्दीत घुसला, तरुण चाकाखाली अन् अनर्थ, गावात हळहळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मान्सूनपूर्व नियोजन : अमरावती जिल्ह्यात धोकादायक पुलांची पाहणी सुरु, अहवाल मागवला सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खंडणीखोर वैभव देवरेने जमवली कोट्यावधींची 'माया', नाशिकमधील खासगी सावकाराचं पितळ पडलं उघडं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, अज्ञातांकडून चार राऊंड फायर, घटनेवेळी 'भाईजान' घरातच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनौ सुपरजायंट्सचा सलग दुसरा पराभव, आठ गडी राखून कोलकाता नाइट रायडर्सचा विजय तर चेन्नईने मुंबईला 20 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेनिसिलिन म्हणजे काय ? पेनिसिलीनचा शोध कसा लागला ?* 📙अलेक्झांडर फ्लेमिंगना अचानकपणे पेनिसिलीनचा शोध लागला व एक मोठीच क्रांती घडून आली. पेनिसिलियम नोटेटम या प्रकारच्या बुरशीच्या आसपासचे जंतू नष्ट झालेले अपघातानेच त्यांना आढळले, म्हणून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले व त्यातूनच पेनिसिलिनची निर्मिती झाली.पेनिसिलीननंतर अनेक प्रतिजैविके निर्माण झाली आहेत; पण आजही त्यालाच 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स' असे म्हटले जाते. साठ वर्षांनंतरही या अँटीबायोटिकची उपयुक्तता सर्व डॉक्टरांना मान्य आहे. याचा शोध लागण्याआधी विविध स्वरूपाचे जीवघेणे आजार झाल्यावर रुग्ण वाचला, तर त्याचे नशीब बलवत्तर, असेच समजले जाई. न्युमोनिया, अंगावरील गळवे, मेंदूतील आवरणांचे मेनिंजायटीससारखे गंभीर आजार यांतून रुग्ण निश्चित बरा होईल, अशी खात्री पेनिसिलीनच्या वापरानंतरच वाटू लागली. याचा वापर १९६० सालच्या दशकात प्रचंड प्रमाणात सुरू झाला. पण याच सुमाराला त्याचे काही दुष्परिणामही लक्षात आले.पेनिसिलीन या औषधाला येणारी तीव्र अॅलर्जीची प्रतिक्रिया हीच मुळी जीवघेणी ठरू शकते, हे पूर्वीही ज्ञात होतेच. पण मोठ्या प्रमाणात याचा वापर सुरू झाल्यावर या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले. इंजेक्शन, गोळ्या, लहान मुलांचे औषध यांपैकी कोणत्याही प्रकारात हा त्रास हजारात एखाद्याला जाणवू शकतो. सध्या हे औषध वापरताना पूर्णत: काळजी घेऊनच वापरले जाते. १९७० सालच्या दशकात पेनिसिलीनचे कृत्रिमरीत्या उत्पादन करण्याची पद्धत विकसित होऊ लागली. आज पेनिसिलिन ग्रुप या नावाने यातील अनेक औषधे उपलब्ध आहेत. अँपिसिलिन, अॅमॉक्सिलीन, एरिथ्रोमायसिन अशा नावाच्या औषधांमध्ये त्या मानाने दुष्परिणामांचे स्वरूप खूपच कमी आहे.पेनिसिलीनचा खरा उपयोग आजही दोन प्रकारच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरतो. त्याला आजही फारसा पर्याय उपलब्ध नाही. लहान मुलांना सांधेदुखी व ताप यातून उद्भवणाऱ्या (Rheumatic Fever) आजारातून पुढे मागे हृदयाच्या झडपांवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पेनिसिलीनच्या प्रतिबंधाखाली ठेवले तर मात्र हा उपद्रव होत नाही. कित्येक वेळा १० ते १५ वर्षे हा वापर महिन्यातून एक इंजेक्शन देऊन केला जातो. दुसऱ्या प्रकारचा आजार म्हणजे सिफीलिसचा. गुप्तरोगांपैकी या आजारावरचे आजही सर्वात प्रभावी औषध म्हणून पेनिसिलीनचाच वापर करावा लागतो.किंमत, उपयुक्तता, देण्याची पद्धत व आजारावर होणाऱ्या परिणामांचा कालावधी या सर्वांचा विचार करता पेनिसिलिन नि:संशय 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स'च म्हणावे लागेल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शेणापासून कोणता गॅस मिळतो ?२) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?३) गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?४) 'आश्चर्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते ?*उत्तरे :-* १) मिथेन २) पुणे ३) प्रयागराज ४) नवल, अचंबा ५) राजकुमारी अमृत कौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. श्रीराम गव्हाणे, संपादक, नांदेड👤 शिवाजी अंबुलगेकर, साहित्यिक, मुखेड👤 सुधीर गुट्टे, ADEI, नांदेड👤 इमरान शेख👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 अंकुश दांडेवाड, उमरी👤 बबन साखरे, नांदेड👤 योगेश बलकेवाड, येवती👤 दत्ताहारी पाटील कदम, धर्माबाद👤 सुनील पलांडे, शिक्षक, पुणे👤 मुकुंद एडके, धर्माबाद👤 संदीप पारणे, धर्माबाद👤 रामकिशोर झंवर, व्यापारी, धर्माबाद👤 सारिका बलचिम, पुणे👤 संतोष लक्ष्मण पाटील, येवती👤 कालिदास बोगेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गालात हास्य ठेवून नेहमीच आनंदीत दिसणारी व्यक्ती, सुखात असेलच असेही नाही. सुख, आणि दु:ख या दोघांनाही ती पूर्णपणे परिचित असते. फरक एवढेच की,ती आपले दु:ख कोणालाही सांगत नाही कारण, त्या दु:खाशी त्याचे विशेष नाते जुळलेले असते. म्हणून आपणही आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत मुखाने करावे. या प्रकारचे जगणे बघून दु:ख सुद्धा नतमस्तक होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निरीक्षण*वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, “या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटीत बोट बुडवूनचाखले. पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.प्राध्यापक म्हणाले, “किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्मनिरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात.”‘मी करतो तसे तुम्ही करायचेहोते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही, मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच.’विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले.  म्हणाले , ‘या पाण्यात अपायकारक काहीच नाही !’ आता विद्यार्थी खुष झाले. तात्पर्यः प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमनपटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~