✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1C7UfZaw8K/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 182 वा दिवस 🏛️ इतिहासातील घटना : • १८७९: इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विद्युत प्रकाश वापरून रस्त्यावर दिवे लावण्यात आले.• १९६३: अमेरिकन पोस्टल सर्व्हिसने ‘झिप कोड’ प्रणाली लागू केली.👤 जन्म :• १८८२: बिडी महाजन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १८८२: डॉ. बिधान चंद्र रॉय – भारताचे प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री.• १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोज गार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री• १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.• १९४७ - शरद यादव खासदार• १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते• १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर• १९६१: डायना स्पेन्सर – वेल्सची राजकुमारी, समाजसेविका आणि जागतिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व.⚰️ मृत्यू :-• १९७२: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – मराठी नाटककार व विनोदी लेखक.• १९९९: माधवराव सिंधिया – भारतीय राजकारणी व केंद्रीय मंत्री.🌍 जागतिक/राष्ट्रीय दिन• महाराष्ट्र कृषी दिन • राष्ट्रीय डॉक्टर दिन• जागतिक युएफओ दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सलग दुसऱ्या वर्षी अमूल बनले भारतातील नंबर 1 फूड ब्रँड तर मदर डेअरीला दुसरे स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, केंद्रीय निरीक्षकांकडे भरला अर्ज, आज होणार घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एसटी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सूट मिळणार, परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, भाजपकडून संविधानाची गळचेपी, समृद्धी महामार्गावरून नदी वाहते आहे, टाळ कुटत विरोधक सरकारविरोधात आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोलीत आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प, ​​​​​​​समायोजनाच्या मागणीसाठी आरोग्य अभियानाच्या ५५० कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'शब्दांचीच शस्त्रे' पुस्तकाचे प्रकाशन, महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये सामाजिक सुधारणावादाची बीजे - डॉ. राजन हर्षे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *​​​​​​​पाऊले चालती पंढरीची वाट, हरी नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; मंत्री गोरेंनी धर्मपुरीत केले स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती प्रमिला सेनकुडे, उपक्रमशिल शिक्षिका, हदगाव 👤 चंद्रकांत कदम, शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड 👤 बाबासाहेब डोळे 👤 अशोक कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक धर्माबाद 👤 व्यंकटेश बत्तूलवार, शिक्षक धर्माबाद 👤 गजानन कवळे, शिक्षक, उमरी 👤 विजय निलंगेकर, पत्रकार नांदेड 👤 सय्यद इलियास जुक्कलकर 👤 मधुसूदन पांचाळ, शिक्षक, धर्माबाद 👤 संजीव वाठोरे, शिक्षक, हदगांव 👤 हणमंतू देसाई, संपादक, धर्माबाद 👤 भाग्यश्री चलाख, साहित्यिक 👤 गणेश गोंटलेवार 👤 मोरेश्वर गायधने, शिक्षक, भंडारा 👤 बालाजी डाके पाटील 👤 नागोराव रायखोड 👤 श्रीकांत चरलेवार, मुख्याध्यापक धर्माबाद 👤 लक्ष्मण पाटील मुपडे, शिक्षक, धर्माबाद 👤 भूमन्ना आबूलकोड, LIC, धर्माबाद 👤 विशाल कान्हेरकर, साहित्यिक 👤 मारोती कांडले, शिक्षक, बिलोली 👤 डॉ. प्रा. हनुमंत भोपाळे, समुपदेशक, नांदेड 👤 तुकाराम मुंगरे, मुख्याध्यापक, नांदेड 👤 मारोती आर भुसेवार 👤 विलास नंदुरकर 👤 दिगंबर नागलवाड 👤 बालाजी भगनुरे, शिक्षक, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 14*मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पेन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचे उद्दिष्ट संवादी व्यक्तिमत्त्वाचे निर्भय स्त्री- पुरुष निर्माण करणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ?२) मधुमेह ( डायबेटीस ) हा कोणत्या कारणामुळे होतो ?३) भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता ?४) 'पाण्यात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते ? *उत्तरे :-* १) स्मृती मानधना २) इन्सुलिनची कमतरता ३) कमाल नफा मिळवणे ( उदा. जर्मनी, जपान, अमेरिका ) ४) जलचर ५) ॲडम स्मिथ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिंका का येतात ?* 📙हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||त्याने उपदेश केला, केला … स्वानंदाचा बोध दिला || १ ||पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुका माणसाच्याच हातून न कळत सुद्धा होत असतात. पण, त्या चुकांविषयी समजावून सांगण्याच्या काही पद्धती असतात. म्हणून कोणालाही का असेना त्याची चूक जर लक्षात आणून द्यायची असेल तर आपणही तेवढेच प्रामाणिक असले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्या विषयी विचार केला जातो.पण, बोलणे वेगळे, वागणे वेगळे आणि विचार वेगळे असतील तर मात्र आपल्याकडे ही बघणारे अनेकजण असतात. म्हणून एकाकी कोणालाही चुकीचे ठरवू नये.बरेचदा असं होतं की एखाद्याला न वाचता चुकीचे ठरविल्याने त्याच्या स्वाभिमानाला किंवा त्याच्या चरित्राला डाग लागत असते. त्या वेळी भलेही तो माणूस बोलत नसेल पण, त्याचे मन जेव्हा दुखते तेच दुखावलेले मन अनेक पिढ्यांना सुखाने जगू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वेळेचे महत्व*एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/197XC49VmY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 181 वा दिवस 📜 इतिहासातील घटना:• १८५९ – फ्रेंच अकादमीने पहिल्यांदाच चार्ल्स डार्विनच्या 'ऑरिजिन ऑफ स्पिशिज' या ग्रंथाचा स्वीकार केला.• १९०५ – अल्बर्ट आइन्स्टाईनने ‘स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ (सापेक्षतावाद सिद्धांत) याचा पहिला संशोधन निबंध प्रसिद्ध केला.• १९०८ – तुंगुस्का स्फोट (रशिया) – सायबेरियामध्ये उल्कापाताने मोठा स्फोट झाला, २००० चौरस किमी परिसरातील झाडे नष्ट.• १९९७ – हाँगकाँग या ब्रिटिश वसाहतीचा चीनकडे अधिकृत ताबा सोपवण्यात आला.🎉 महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती / पुण्यतिथी:• १९१७ – सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व्ही. शांताराम यांचा जन्मदिवस.• १९३६ – मराठी लेखक आणि समीक्षक शं. ना. नवरे यांचा जन्म.• २००३ – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दादा मुनि – अशोक कुमार यांचे निधन.🌍 जागतिक / राष्ट्रीय दिवस:🌐 आंतरराष्ट्रीय लिपा दिन (International Asteroid Day)→ हा दिवस तुंगुस्का स्फोटाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.→ यामागील हेतू: मानवजातीस धोका असणाऱ्या उल्का आणि अंतराळातील वस्तूंबद्दल जनजागृती करणे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लॉकडाऊन नंतरचे जीवन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारकडून हिंदीचा GR रद्द, ठाकरे बंधूंचाही मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अहिल्यानगर, जळगावात बनावट नोटांचे रॅकेट उघड:दोन्ही घटनांत सुमारे 67 लाखांच्या बनावट नोटा जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार, घरांची यादी केली जाईल; राज्यांना सूचना- 31 डिसेंबर 2025 पर्यंत सीमांकन पूर्ण करा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गडचिरोलीतील 1000 शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय, रत्ननिधी ट्रस्टकडून 50 हजार पुस्तकांचे योगदान, 1 लाख विद्यार्थी होणार लाभार्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते भूमिपूजन; 500 कोटींच्या इमारतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव तिप्पलवाड, साहित्यिक, बरबडा👤 शिवाजी नाईकवाडे, विस्तार अधिकारी, नांदेड 👤 विष्णू सोरते, मुख्याध्यापक, नांदेड 👤 स्नेहल आयरे, शिक्षिका, मुंबई 👤 विठ्ठल जाधव, शिक्षक तथा साहित्यिक, बीड 👤 सतिश गादेवार, शिक्षक, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*दोन अक्षरी नाव आहे, नेहमी सर्दी असते नाकावर, कागद माझा रुमाल आहे, माझे नाव काय आहे ते सांगा…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तोंड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रगती व्हायला हवी असेल तर मिळणाऱ्या अनुभवातून योग्य शहाणपण घेतच पुढे जात राहिले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिल्या संविधान उद्देशिका ( प्रास्ताविका ) पार्क कोठे उभारण्यात आला आहे ?२) आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणती पदवी प्रदान करण्यात आली ?३) पुरी येथील रथयात्रेत कोणत्या तीन देवी - देवतेचे रथ सजविले जातात ?४) 'पाण्याखालून चालणारी बोट' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सिंधू नदीचा उगम कोठे होतो ? *उत्तरे :-* १) नागपूर २) धम्मचक्रवर्ती ३) श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा ४) पाणबुडी ५) मानसरोवर जवळ, कैलास पर्वतरांग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 आपण झोपतो म्हणजे काय ? 📙 झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही आहे अनुभवले असेल. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलक्या येतात, कधी कधी चक्कर येते यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र पाच ते सहा तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये.नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे हे तुम्हाला माहित आहे. झोपेचे इलेक्ट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की या काळात मेंदूच्या येणाऱ्या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणाऱ्या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी चार ते पाच चक्र त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. झोप ही जीवनासाठी आवश्यक असते कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्य मंदावते. अशी ही झोप जास्त झाली तर मात्र झोपाळूपणाचा आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ ||माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचेघुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी कायातुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपळ करत असतो आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते. पण ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सकारात्मक दृष्टिकोन**एक बेडूक डोंगराच्या टोकावर चढण्याचा विचार करतो आणि पुढे सरकतो, तेंव्हा इतर सर्व बेडूक जोरजोरात ओरडायला लागतात, "हे अशक्य अाहे.... आजपर्यंत कोणीच चढू शकला नाही... हे संभव नाही....नाही चढू शकणार"*मात्र, कोणाचेही न ऐकता शेवटी तो बेडूक डोंगराच्या टोकावर पोहचतोच.... *तुम्हाला माहिती आहे याचे कारण काय आहे ते??**कारण, तो बेडूक "'बहिरा"' होता... आणि सर्व बेडकांना ओरडताना पाहून त्याला वाटत होते की, ते माझा उत्साह वाढवत आहेत.**म्हणूनच जर तुम्हाला तुमचे "'ध्येय"' गाठायचे असेल तर, नकारात्मक लोकांच्या प्रति "'बहिरे" व्हा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठा. ..!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/165bv8yyKZ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-• १९४० - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.• १९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.• 2005 -कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा💥 जन्म :-• १९२१ - माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव• १९२६ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.• १९३० - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-• १९१३ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.• १९१४ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.• १९१४ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन - शिक्षण अंकात प्रसिद्ध झालेला लेख *पालक नव्हे मित्र बना*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यभरातील 51 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : 61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ठाकरे बंधूंच्या 5 तारखेच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा, जयंत पाटील यांचं ट्विटद्वारे आवाहन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पुणे येथे 'हेजिंग डेस्क' सुरू, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या भावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काटेवाडीत संत तुकारामांची पालखी दाखल, धोतराच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत, डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'काँटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अकरावी प्रवेशाची ऑनलाईन पहिली यादी आता सोमवारी होणार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मार्तंड भुताळे, सेवानिवृत्त अधिकारी, देगलूर👤 प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार, नायगाव👤 दीपक ईबीतवार👤 रामदास कदम👤 शुभम पाटील👤 अभिषेक लकडे👤 सय्यद खदीर पटेल👤 रवी जयंते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 12*आटंगण पटंगण, लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळांना एकच पान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पोपट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची दारे सर्वत्र आहेत प्रयत्नाने प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय कोण ?२) पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे ?३) शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे ?४) 'पाहण्यासाठी आलेले लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) ३३ टक्के ३) पहिले ४) प्रेक्षक ५) ३१ मार्च २०२६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस का घोरतो ?* 📙नातेवाईक, मित्र, शेजारी यांना आपल्या घोरण्याने त्रस्त करणारी व्यक्ती स्वतः मात्र सुखाने घोरत झोपलेली असते आणि अशा व्यक्तींचा आपण घोरतच नाही, असा पक्का विश्वास असतो.घोरण्याची अनेक कारणे आहेत. घोरण्याची सवय प्रौढ पुरुषांमध्ये अधिक आढळते. त्यातही लठ्ठ व्यक्ती जास्त घोरतात. झोपल्यावर स्वरयंत्रामधील आणि घशातील स्नायू शिथिल झाल्याने श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो आणि अशा अडथळ्यामुळे व्यक्ती घोरावयास लागते.वरील कारणांशिवाय घशातील टाॅन्सील, लहान मुलातील नाकाच्या मागच्या बाजूचे टॉन्सिल (अॅडेनॉइड्स) वाढलेले असणे, पडजीभ मोठी होणे, घशातील स्वरयंत्रातील ट्यूमर, नाकातील हाड वाकडे असणे; यांमुळेही माणूस घोरतो. तसेच काही झोपेची औषधे, झटक्यांवरची औषधे यांच्यामुळेही माणूस घोरू शकतो. खूप दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्येही घोरण्याची सवय आढळून येते. अशा या घोरण्यावर उपाय करता येतो. नाकाच्या, घशाच्या व्याधी असतील तर त्यावर उपचार करणे; दारूचे व्यसन बंद करणे, लठ्ठपणा कमी करणे, ज्या औषधांमुळे घोरतो ती औषधे बंद करणे; असे उपाय केले जातात. तसेच गरज पडल्यास औषधे दिली जातात. घोरण्यावर उपाय करून घेणे चांगले ; कारण घोरण्यामुळे फुप्फुसाचे, हृदयाचे आजार होऊ शकतात. काही घोरणाऱ्या व्यक्तींना झोपेत श्वास बंद होण्याची सवय असते. यामुळेही हृदयावर घातक परिणाम होतो. म्हणून घोरणे जसे दुसऱ्याला त्रासदायक ठरते तसे घोरणाऱ्या व्यक्तीलाही हानी पोहोचवू शकते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दत्त दर्शनाला जायचं जायचंआनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेटया या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहरया या नजरेस आणि काही येईना || २ ||रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंगया भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळखेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्राप्त परिस्थितीत समाधान मानने.*एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'*तात्पर्य :- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16ZEi27xdj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-• १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.• १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला.💥 जन्म :-• १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.• १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.• १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.• १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.• १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री.💥 मृत्यू :-• १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.• २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टी तशी सृष्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Axiom 4 : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर अंतराळवीरांसहा स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जोडलं गेलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै दरम्यान, हिंदी सक्ती, शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर वादळी ठरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी; विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला निघणार मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहच्या जागी अर्शदीप सिंगला भारताच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुशील कापसे👤 अनुपमा जाधव👤 हिरालाल पगडाल, एस बी सी नेते, पुणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 11*पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तरी तोंड कसं रंगलं …?*ओळखा पाहू मी कोण ?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सावली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन आशावादी हवे, बरेचदा काम केले तरी यश मिळत नाही तरीही तुम्ही काम सोडू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अँक्झीऑम - ४ मोहिमेअंतर्गत कोणत्या भारतीय अंतराळवीराने अंतराळात झेप घेतली आहे ?२) १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी कोणत्या देशाच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता ?३) रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंद केले ?४) 'पायात जोडे न घातलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) रशिया ३) उमाजी नाईक ४) अनवाणी ५) छत्रपती संभाजी नगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे.पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे.त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे.तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निघालो घेवून दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||रत्नाची आरास साज मखमलीचीत्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||सात जन्माचि हो लाभली पुण्याईम्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||वात वळणाची जवालागे ओढीदिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे वाईट करत नाही किंवा त्यांच्याविषयी चुकीचे विचार करत नाही त्यावेळी आपले वाईट होईल ह्या प्रकारची भीती आपल्याला वाटत नसते. म्हणून कोणाविषयी का असेना त्यांच्याप्रती आपल्या मनात आदराचीच भावना असायला पाहिजे. भीती मुळात वाटणार नाही. जरी त्यावेळी कोणी आपला मुद्दामहून जरी अनादर करत असतील तरी तो आपला अपमान होत नाही कदाचित त्यांच्यात असलेल्या विचाराचा व वागणुकीचा अपमान होत असतो. फरक एवढेच की त्याविषयी त्यांना वेळेत, कळत नाही. म्हणून या प्रकारची वागणूक किंवा विचार आपल्यात नसायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जंगलचा राजा*एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'*तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19VPhMPCpW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन• सामाजिक न्याय दिन💥 ठळक घडामोडी :-• १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला.• १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.• १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य. • १९९९-नांदेड तालुक्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका तयार करण्यात आला. 💥 जन्म :-• १८७४ - राजर्षी शाहू महाराज• १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.• १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.💥 मृत्यू :-• १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.• २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.• २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराजांचे महाराज*आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *CBSE चा मोठा निर्णय, 2026 पासून दहावीच्या परीक्षा दोन वेळा, नव्या नियमांना मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Axiom-4 मिशन - शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांनी मारली बाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येत्या एक जुलैपासून रेल्वेकडून प्रवाशांना एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक सेवा देण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी, 3626 कोटींच्या खर्चाला मान्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवी दिल्ली :- आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवकडेच राहणार भारताचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश इटलोड, शिक्षक नेते, नांदेड 👤 नारायण ईबीतवार👤 राजेश पाटील उमरेकर👤 संतोष रेड्डी बोमीनवाड👤 सुरेश यादव👤 अनिल पाटील भुसारे👤 गणेश आरटवार👤 कैलास स्वामी👤 शेख बाशू👤 मनीष अग्रवाल👤 कृष्णा भोरे👤 बालाजी सावंत👤 लक्ष्मण नोमुलवार बाभळीकर👤 अंकुश कामगोंडे👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोडs*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 10*रंगाने काळी आहे, ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही, मला सांगा की ते काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरम मसाला ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची तळमळ असणाराच वेगळे कार्य करून समाजधर्म पाळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ मधील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब कोणी पटकावला ?२) पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला ?३) ज्योतिबांना सावित्री कोणत्या नावाने हाक मारीत असे ?४) 'खूप मोठा विस्तार असलेले' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिले बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) डेमी मूर, अमेरिकन हॉलीवुड अभिनेत्री, वय ६२ वर्षे २) पहिले बाजीराव पेशवा ( सन १७३६ ) ३) शेठजी ४) विस्तीर्ण, ऐसपैस ५) विसाजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••😴 *आपण केव्हा घोरतो ?* 😴 तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं.माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो.घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्‍याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही.जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं.बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून 👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला $...$..$..$..$अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवाकस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आपल्या डोक्यावर असलेल्या केसांमध्ये किती मळ आहे ते, आपल्याला माहीत नसते त्यासाठी आधी ते केस धुतल्यावरच कळत असते. तसेच दुसऱ्याच्या मनात काय सुरु आहे या विषयी सुद्धा आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून जसे आपण, आपले केस धुत असतो तसंच दुसऱ्याला ओळखण्यासाठी आपले विचार सुद्धा तेवढेच सकारात्मक असणे आवश्यक आहे. कारण बरेचदा असं होतं की, चांगले माणसं आपण ओळखू शकत नाही अन् चुकीचे माणसं जवळ करताना आनंद मिळत असतो पण,तोच मिळणारा आनंद एक दिवस आपल्या आयुष्याची वाट लावत असते म्हणून आपण थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे*एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले.*तात्पर्य :- गुरूचे कार्य महान असते. गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CqZJ9v6V1/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक कोड त्वचारोग दिन*💥 ठळक घडामोडी :-• १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली• १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता💥 जन्म :-१९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय.१९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान.१९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-१९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक.२००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री.२००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभ्यासाशिवाय पर्याय नाही*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात, त्रिभाषा सूत्राला विरोध करणाऱ्यांशी दादा भुसे चर्चा करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; तीन लाख शेतकऱ्यांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा विजय, विरोधी उमेदवाराचा सुपडा साफ, दादांना 101 पैकी 91 मते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आंध्रप्रदेशातील डांगेती जान्हवी नासाचे प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली भारतीय, 2029 मध्ये अंतराळ प्रवास करणार; स्कूबा डायव्हिंग, चित्रकला यांचा छंद, चंद्रावर जाण्याचे स्वप्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाच जेष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 5 विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रल्हाद कापावार, स.शि. विद्यानिकेतन प्रा. विद्यालय, बिलोली👤 योगेश कात्रे👤 सुभाष लाखे👤 प्रल्हाद कापावार👤 ओम पालकृतवार👤 सुरेश कात्रे👤 रुपेश पांचाळ👤 श्रेयश इंगळे👤 संदेश कोडगिरे👤 नागेश पाटील👤 आदर्श गव्हाणे👤 राजेश अलगुंडे👤 रमाकांत गोणे👤 नादयाप्पा स्वामी👤 अशोक तनमुदले👤 दीपक जायवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 09*अशी कोणती वस्तू आहे, जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तहान ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या वनस्पतीला 'फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट / फ्लेम ऑफ दि ट्री / जंगलाची ज्योत' असे संबोधले जाते ?२) धाबेपवनीचे 'जिम कार्बेट' असे कोणाला म्हणतात ?३) कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज कोण ?४) 'पाऊस मुळीच न पडणे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची गरज असते ? *उत्तरे :-* १) पळस २) माधवराव डोंगरवार पाटील ३) ऋषभ पंत ४) अवर्षण, अनावृष्टी ५) लोह*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात.वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे.तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कानडा राजा पंढरीचावेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रगटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा … || १ ||परब्रह्म हे भक्तांसाठीउभे थकले भिमेसाठीउभा राहिला भाव सांवयवजणू कि पुंडलिकाचा … || २ ||हा नाम्याची खीर चाखतोचोखोबाची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपड करत असतो. आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते.पण, ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ*नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1QgLd6g8JK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासातील घटना:• १८५९ – सोल्फेरिनोची लढाई झाली. या लढाईनंतर रेड क्रॉस स्थापनेची प्रेरणा मिळाली.• १९०१ – पहिले संगणकीय संगणक आकडेमोडीचे पेटंट मिळाले.• १९८७ – लीबियन हवाई दलाने अमेरिकन सैन्याविरोधात मिसाइल हल्ला केला.• २०१० – विंबलडन टेनिस स्पर्धेतील सर्वात लांब चाललेला सामना (११ तास ५ मिनिटे) अमेरिकन जॉन इस्नर आणि फ्रान्सचा निकोला महूत यांच्यात झाला.🎂 जन्म:• १३०० – इब्न बतूता, प्रसिद्ध अरब प्रवासी आणि भूगोलज्ञ.• १९११ – जुआन मॅन्युएल फॅन्गिओ, अर्जेन्टिनाचा सुप्रसिद्ध फॉर्म्युला १ रेसिंग ड्रायव्हर.• १९२७ – मार्टिन विंटरकोर्न, जर्मन उद्योगपती.• १९८७ – लिओ मेसी, अर्जेन्टिनाचा जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू.🕯️ मृत्यू:• १९०८ – ग्रोव्हर क्लीव्हलँड, अमेरिकेचे २२वे व २४वे राष्ट्राध्यक्ष.• १९९७ – ब्रायन किट्सन, प्रसिद्ध इंग्लिश शिक्षणतज्ज्ञ.• २००० – नवाजिश लाहोटी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक.📅 विशेष दिन:• सैनिक दिन (पेरू)• इंटरनॅशनल फेरी डे (काही देशांमध्ये)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेच्या इराणवरील हल्यानंतर संयुक्त राष्ट्रात आपत्कालीन बैठक, गुटेरेस यांचे शांततेचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विठू नामाच्या गजरात संत जनाबाई यांची पालखी वारीसाठी मार्गस्थ, गंगाखेडहून पंढरपूरकडे रवाना *•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय, राजकीय आणि सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार, शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकशाही ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ST महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, दरवर्षी 5000 नव्या बस; महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडसमोर 371 धावाचे लक्ष्य, ऋषभ पंत व के. एल. राहुल यांची शतकीय खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन रेनगुंटवार👤 कल्पना डेव्हिड बनसोड👤 कवी अनिल रेड्डी👤 सदानंद कोडगळे👤 लक्ष्मण सुरकार👤 संदीप शंभरकर👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी👤 रवी गंगाधर भोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 08*अशी कोणती गोष्ट आहे, जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विद्यार्थी हा विद्येवर चरणारा राजहंस आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'पाखरं म्हणजे अरण्याचा उडता आत्मा' असे कोण म्हणाले होते ?२) नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारतीय संस्कृतीत मोराला कशाचे प्रतीक मानले जाते ?४) 'नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) प्राचीन भारतातील पहिला कीटकशास्त्रज्ञ कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) पद्मश्री मारुती चितमपल्ली २) माधवराव डोंगरवार पाटील ३) वैभव व पवित्रता ४) नट, अभिनेता ५) मांडव्य ऋषी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आधुनिक मानवाचा उदय केव्हा झाला ?* 📙वैज्ञानिक भाषेत आधुनिक मानवाचं नाव होमो सेपियन्स असं आहे. पण हा आधुनिक मानव एकाएकी अकस्मात जन्माला आला नाही. डार्विननं सांगितल्याप्रमाणे वानर प्रजातींपासून हळूहळू उत्क्रांती होत होत त्याचा उदय झाला. म्हणून होमो या प्रजातीच्याही काही जाती आधुनिक मानवाच्या आधी उदयाला येऊन अस्ताला गेल्या. त्यांचेही पूर्वसुरी होमिनिड या नावानं आणि त्यांचेही पूर्वज होमोनाॅइड या नावाने ओळखले जातात.आफ्रिकेच्या जंगलात राहणारे होमिनाॅईड प्रजातीचे वानर साधारण ५० ते ८० लाख वर्षांपूर्वी वावरत होते. त्या कालखंडात पडलेल्या दुष्काळापोटी तिथल्या वनराजीला ग्रहण लागलं. त्यामुळे झाडांवर राहणाऱ्या या वानरांना आपलं बस्तान दुसरीकडे तर हलवावं लागलंच, पण अन्नाच्या शोधासाठी तसंच वास्तव्यासाठीही झाडांचा आश्रय सोडून जमिनीवर उतरावं लागलं. आफ्रिकेतल्याच सॅव्हॅन्ना या गवताळ जंगलांमध्ये ज्यांनी आश्रय घेतला, त्या वानरांचे वंश टिकून राहिले. ही वानरं दिवसा जमिनीवर उतरून अन्नाचा शोध घेत, पण रात्र झाली की परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामी परतत.जमिनीवरचं मिळालेलं अन्न परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामस्थळी हलवायचं तर ते पुढच्या दोन पायांमध्ये म्हणजेच हातांमध्ये धरून आणावं लागे. ते करण्याची क्षमता ज्यांनी मिळवली त्या जातींना तगून राहण्यास मदत झाली. त्यातूनच हळूहळू दोन पायांवर उभे राहणारे नवीन होमिनिड प्राणी उदयाला आले. हे मानवसदृश असले तरी त्यांनी वानरजातीचे गुणधर्म संपूर्णपणे त्यागलेले नव्हते. झाडांचा आश्रय त्यांनी संपूर्ण सोडलेला नव्हता. या प्रजातीतही उत्क्रांती होत गेली. आणि त्यातूनच पहिले होमो प्रजातीतले प्राणी उदयाला आले. यांना होमो हॅबिलिस म्हणतात. पुढचे दोन पाय म्हणजेच हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा अधिकाधिक उपयोग करायला हे प्राणी शिकले होते. ते काही आयुधं आणि अस्त्रं बनवून त्यांचा वापर शिकारीसाठी किंवा घरटं खोदण्यासाठी करायला शिकले होते. पण अजूनही ते संपूर्णपणे दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. थोडे डगमगत होते. शिवाय त्यांचा मेंदूचाही फारसा विकास झालेला नव्हता. ही झाली १५ ते ३० लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर उदयाला आले ते होमो इरेक्ट्स. हे दोन पायांवर ताठ उभे राहू शकत होते. त्यांच्या मेंदूचीही चांगलीच वाढ झाली होती. परंतु ते अजूनही वन्य प्राण्यांप्रमाणे गुहांमध्ये राहून गोळा करून आणलेल्या कंदमुळांवर व शिकार करून आणलेल्या मांसावर गुजराण करत होते. अग्नीचा शोधही त्यांनी लावला होता. त्यांची आयुधंही जास्त प्रभावी होती.त्यांचीच उत्क्रांती होत होमो सेपियन्स म्हणजे बुद्धिमान होमोचा किंवा आधुनिक मानवाचा उदय झाला. त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास झाला होता. बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळे शेती किंवा सांस्कृतिक विकास यांचाही प्रवाह सुरू झाला होता. होमो सेपियन्सचा उदय साधारण ३५००० ते १०००० वर्षांपूर्वी झाला यावर सर्वांचंच एकमत आहे.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वार्थीवृत्ती*एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.फक्त स्वतःचाच फायदा पाहतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AscTrdpp6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 इतिहासातील घटना:• १७५७ – प्लासीची लढाई झाली. इंग्रजांनी सिराज-उद-दौला याला पराभूत करून बंगालमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हा लढा भारताच्या इतिहासात निर्णायक ठरला.• १९८० – भारतात संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले.• १९८५ – एअर इंडिया फ्लाइट 182 ही विमानसेवा आयरिश समुद्रात कोसळली. यात ३२९ लोक मृत्युमुखी पडले. हे भारताच्या नागरी उड्डाण इतिहासातील एक मोठे अपघात होते.🔹 जन्मदिवस:• १८९४ – एडवर्ड VIII, इंग्लंडचा राजा (राजीनामा दिल्यामुळे कधीच प्रत्यक्ष राजा म्हणून राज्य करत नाही).• १९१२ – अलन ट्यूरिंग, संगणकशास्त्राचा जनक व गणितज्ञ.• १९३७ – राज बब्बर, हिंदी चित्रपट अभिनेते व राजकारणी.🔹 स्मृतिदिन:• १९८० – संजय गांधी, भारतीय राजकारणी व इंदिरा गांधींचे सुपुत्र.• २००६ – अरुणा आसफ अली, स्वातंत्र्यसैनिक व समाजसेविका.🔹 महत्त्वाचे दिवस:संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन (United Nations Public Service Day)– प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सेवा सुधारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गृहपाठ आणि मुले*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी साधला संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, फडणवीसांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल, पण शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत - कृषिमंत्री कोकाटे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एअर इंडियाचा परवाना रद्द करण्याचा DGCAचा इशारा, म्हणाले- ऑपरेशन नियमांकडे सतत दुर्लक्ष केले जातेय; काल एअरलाइनच्या 3 अधिकाऱ्यांना काढून टाकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोव्यातून 2000 वारकऱ्याची पंढरपूर वारी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा जनता दरबार, जनतेच्या समस्या थेट ऐकल्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, वायव्य भारतात आणि ईशान्य भारतात 22 ते 26 जूनदरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंड चांगल्या स्थितीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोपाळ कौरवार, नांदेड 👤 संजय कदम, शिक्षक, नांदेड 👤 पोषट्टी कोषकेवार, शिक्षक, कुंडलवाडी 👤 प्रभाकर माळगे👤 विजय पाटील डांगे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 गंगाधर साळवे, शिक्षक, नांदेड 👤 देवेंद्र शिरूरकर, साहित्यिक, पुणे 👤 राजेश भिसे, शिक्षक, लातूर 👤 संदीप नजारे, पक्षीमित्र, सांगली *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 07*वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही, सांगा माझे नाव.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चप्पल••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस डायमंड लीग २०२५ चा किताब कोणी जिंकला ?२) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली ?३) इराण व इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबविले ?४) 'पहाटेपूर्वीची वेळ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ! असे कोणते संत म्हणाले ? *उत्तरे :-* १) नीरज चोप्रा, भारत, ८८.१६ मी. भालाफेक २) विशाखापट्टणम ३) ऑपरेशन सिंधू ४) उषःकाल ५) संत सावता माळी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अवयव दान कोण करू शकतो ?* 📙 ************************खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दुसराच एक प्रश्न विचारायला हवा. हे दान केव्हा करायचं आहे ? जिवंतपणी की मृत्यूनंतर ? मृत्यूनंतर करायचं असेल तर कोणीही असं दान करू शकतो. तसंच कोणताही अवयव दान करू शकतो. तो जर योग्य त्या अवस्थेत असेल आणि कोणा गरजूला त्याचा उपयोग होणार असेल तर डॉक्टर अशा दानाचा स्वीकार करू शकतात. एवढेच काय विंदा करंदीकरसारख्या ज्ञानपीठ विजेत्या कवीनं तर मरणोत्तर आपल्या देहाचं मेडिकल कॉलेजला दान केलं होतं. तेव्हा अशा प्रकारच्या दानाची कोणालाही मुभा असते. मात्र ते स्वेच्छेने केलं जायला हवं. त्यासाठी कोणाचंही किंवा कशाचंही दडपण असत कामा नये. शिवाय अशा दानाची इच्छा व्यक्तीनं जिवंतपणी धडधाकट असताना नोंदवलेली असणं आवश्यक आहे. आपल्या शरीरातले कित्येक अवयव एकांडे आहेत. आपल्याला एकच हृदय असतं, यकृत, स्वादूपिंड, प्लीहा हेही अवयव एकेकच असतात. त्यामुळे त्यांचं दान करणं कोणालाही शक्य नसतं. नाही म्हणायला यकृताचा एक तुकडा दान करता येतो. कारण त्यामुळे झालेली झीज भरून येण्याची शक्यता असते. अर्थात घेता आणि दाता दोघांनाही त्याचा फायदा होतो. तरीही या दोघांच्या शरीरातील पेशी वर असलेले, त्यांची निर्विवाद ओळख पटवणारे आणि रेणूंचे गट व्यवस्थित जुळणे आवश्यक असतं. अशी जुळणी सहसा आई वडील, मुलं, भावंडं किंवा त्यांच्यासारख्या जवळच्या नातेवाईकांमध्ये शक्य असते. इतरांच्या बाबतीत अशी जुळणी होण्याची शक्यता फार कमी असते. पण काही अवयवांच्या जोड्या शरीरात वास करून असतात. दोन मूत्रपिंड असतात, फुफ्फुसंही दोन असतात. स्त्रियांच्या शरीरात बीजकोशही दोन दोन असतात. त्यांच्यापैकी एकाचं दान केलं तरी उरलेल्या एकाच अवयवाला साऱ्या शरीराचा भार पेलणं अशक्य नसतं. अशा वेळी जिवंतपणीच जोडीपैकी एकाचं दान करणं शक्य असतं. त्यासाठीही पेशीगटांची तंतोतंत जुळणी होणं गरजेचं असतंच. तसं पाहिलं तर कान, डोळे, हात, पाय या बाह्यांगावरच्या अवयवांच्याही जोड्या असतात; पण यापैकी एकाचं दान आपण करू शकत नाही. अपघातामुळे एक डोळा गमवावा लागल्यावर एकाच डोळ्यावर व्यक्ती आपला कारभार चालवू शकते. पण काही बाबतीत तिला अडचणींचा सामना करावा लागतोच. कारण दोन डोळ्यांमुळे आपल्याला समोरच्या दृश्यातल्या खोलीची जाणीव होते. एकच डोळा असेल तर त्यात काही प्रमाणात तरी अडचण उद्भवते. तीच बाब इतर अवयवांनाही लागू पडते. शिवाय यामुळे जी विद्रुपता येते तिचा सामना करणंही सोपं नसतं.परंतु एक अवयव असा आहे की ज्याचं दान आपण निःशंक करू शकतो. तो अवयव आहे रक्त. रक्तदान आज आपण जिवंतपणी करू शकतो. एकदा नाही तर अनेकदा. अर्थात त्याचेही काही निकष आहेत; आणि त्यांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. म्हणूनच रक्तदानापुर्वी डॉक्टर आपली तपासणी करून, आपण ते निकष पूर्ण करू शकतो की नाही, याचा अंदाज घेतात. त्यानंतरच आपल्या रक्ताचं दान स्वीकारलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड टाळ चीपल्याचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आईआ आ आ लेकरांची सेवाकस पांग फेडू आता कस उतराईतुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाईजन्मभरी पूजा तुझ्या पाउलाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २ ||पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा, कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्राप्त परिस्थितीत समाधान मानने.एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'तात्पर्य :- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16V3HpGQaH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌹 महत्त्वाच्या घटना :• १९४८ – सी. राजगोपालाचारी भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल झाले (ब्रिटीश नसल्यानं हा मान मिळवणारे ते एकमेव भारतीय).• १९८५ – ग्रीनलँडमध्ये जून सॉल्स्टिस (उन्हाळ्यातील सर्वांत मोठा दिवस) साजरा करण्यास सुरुवात.• २००६ – प्लूटो हा ग्रह नाही, असे अधिकृतपणे मान्य करण्याच्या हालचाली सुरू.🎉 विशेष दिन / जागतिक दिवस :🌞 आंतरराष्ट्रीय योग दिन⮕ संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेने २०१५ पासून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला होता.⮕ २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने योगासाठी महत्त्वाचा मानला जातो.🌍 जागतिक संगीत दिन⮕ १९८२ पासून फ्रान्समध्ये सुरू झालेला हा दिवस जगभर साजरा केला जातो.👶 जन्मदिवस :• १७३२ – जोसेफ हायडन, ऑस्ट्रियन संगीतकार.• १९२५ – जीन पॉल सार्त्र, प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ.• १९५३ – बेनाझीर भुट्टो, पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान⚰️ मृत्यू :• १५२७ – निकोला मॅकियावेली, इटालियन राजकारणतज्ज्ञ व लेखक.• १९७० – सुब्रतो मुखर्जी, भारतीय वायुसेनेचे पहिले प्रमुख.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सहशालेय उपक्रम आणि योग*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विशाखापट्टनम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 11 व्या अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेत पुण्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं पहिल्या दहामध्ये मिळवलं स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत तुकारामांची पालखी पुण्यात दाखल, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही लवकरच पोहोचणार; वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईला २३ व २४ जूनला होणार संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेडच्या व्यापाऱ्याला स्वस्त सोन्याचा मोह नडला, 15 लाखाच्या बदल्यात दिले एक किलो बनावट सोने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे मेट्रोचे खडकी स्थानक आजपासून होणार सुरु, ज्यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलची शतकीय खेळीनंतर टीम इंडियाच्या 3 गडी बाद 359 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. नांदेड 👤 विरभद्र बसापुरे, शिक्षक नेते, धर्माबाद👤 आनंद पाटील जाधव 👤 राहुल पाटील 👤 हनमंत जगदंबे👤 संजयकुमार मांजरमकर 👤 धाराजी जोगदंड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 06*दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते, एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - दिशा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः निर्माण केलेल्या सृष्टीच्या कानाकोपऱ्यात जाण्यास आपण असमर्थ आहोत हे लक्षात येताच; ईश्वराने वात्सल्याचा सागर असणाऱ्या ' आई ' ला निर्माण केले. - एडिसन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) पद्मश्री अरण्यऋषी पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या गुरुचे नाव काय होते ?३) क्रोएशिया या देशाचा अधिकृतपणे दौरा करणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?४) 'होडी चालवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) एड्स हा रोग कोणत्या व्हायरसने होतो ? *उत्तरे :-* १) २१ जून २) अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरवार, धाबेपवनी, गोंदिया ३) नरेंद्र मोदी ४) नावाडी, नाखवा, नाविक ५) शिव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गॅसेस का होतात ?* 📙खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनरूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावूविठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येतीपंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या विषयी सर्व काही माहीत असताना सुद्धा नको त्या शब्दात बोलणे तसेच त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्ती विषयी माहिती नसताना किंवा त्याला न वाचता जसं तोडांला आलं त्याच शब्दात बोलून मोकळे होणे या दोघांमध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळेच अशा या आपल्या विचारामुळे त्या व्यक्तीला दु:ख तर होतोच पण, समोर असलेल्या काही व्यक्ती समोर आपल्या विषयी किंवा आपल्या विचारांचा आदर असेलच असेही नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून गेलेली असते त्यामुळे माणसं ओळखण्याची कुठेतरी त्यांना दिव्यदृष्टी असतेच म्हणून कोणालाही न वाचता किंवा त्याच्याविषयी माहीती नसताना स्वतः च्या मनाचे समाधान करण्यासाठी कोणत्याही शब्दात बोलू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकार स्मरावे*अज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ? चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.*तात्पर्य :- उपकाराची जाण ठेवावी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1An9yVxvnA/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्त्वाच्या घटना :• १९४८ – "सीनिफ" (CINEF) या भारतीय चित्रपट समाजाची स्थापना झाली.• १९७७ – तेलगू देशम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते एन. टी. रामाराव यांनी अंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.• १९९१ – जर्मनीची राजधानी बर्लिन घोषित करण्यात आली.• २०१२ – जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुलतान कोसेन (टर्की) यांचा विक्रम अधिकृतपणे नोंदवला गेला.🎂 जन्मदिवस :• १९२४ – चेतन आनंद, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक.• १९२८ – रॉबर्ट रोझन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ.• १९६७ – निकोल किडमन, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि ऑस्कर विजेती.• १९७९ – फ्रँक लँपार्ड, इंग्लंडचा फुटबॉलपटू.🕯️ मृत्यू :• १८३७ – विल्यम चतुर्थ, इंग्लंडचा राजा.• १९९६ – सुशील कुमार धरणी, भारतीय सैन्याचे अधिकारी, "परमवीर चक्र" विजेते.🌍 जागतिक/राष्ट्रीय दिन :🌱 जागतिक शरणार्थी दिवस (World Refugee Day)→ संयुक्त राष्ट्रसंघाने शरणार्थ्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २० जून हा दिवस पाळण्याचे ठरवले (२००१ पासून).••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळा प्रवेशोत्सव*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये IIT दिल्ली सर्वोत्तम, IIT मुंबई दुसऱ्या स्थानी, DU चा क्रमांक अबाधित; देशातील 54 विद्यापीठांच्या यादीत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निवडणूक आयोगाचा नवीन नियम ! आता 15 दिवसांत नोंदवले जाणार मतदार यादीत नाव, तसेच पंधरा दिवसांच्या आत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) ही मिळेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रियेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान:पुणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत - इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश मुनेश्वर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, किनवट 👤 भरत सोनवणे, उपक्रमशील शिक्षक, निलंगा, जि. लातूर👤 विनोद गुम्मलवार, नांदेड 👤 शंकर उषापोड, शिक्षक, धर्माबाद 👤 शंकर पाटील कदम, धर्माबाद👤 संभाजी आटोळकर 👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 किरण पाटील बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 भगवान बकवाड, शिक्षक नेते, नांदेड 👤 गणेश येमेवार, धर्माबाद 👤 शादूल चौधरी, शिक्षक, नायगाव 👤 नरसिंग नाईक, शिक्षक, नांदेड 👤 दौलतराव वारले, शिक्षक, धर्माबाद 👤 गणेश अंगरोड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 04*प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - भाग्य / नशीब ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य निसर्गाचा अनुचर आणि नियतीचा दास आहे. - जयशंकर प्रसाद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'संविधानाचा हृदय व आत्मा' असे कोणत्या कलमाला म्हटले जाते ?२) वाघाचा पायाचा ठसा काय दर्शवतो ?३) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्राकृतिक विभाग किती व कोणते ?४) 'नाटक लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) साइप्रस या देशाची राजधानी कोणती ? *उत्तरे :-* १) कलम ३२ २) लिंग, वय, आकार, आरोग्य, जंगलातील हालचाल ३) तीन - कोकण किनारपट्टी, सह्याद्री ( पर्वतरांगा ), महाराष्ट्र पठार ( दख्खन पठार ) ४) नाटककार ५) निकोसिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀ **********************थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते.पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते.जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्‍हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं.खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं.*बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वनमाळी वनमाळी वनमाळीराधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते. निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_बोधकथा :_* शब्द व आश्वासन_हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री,एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"_ _तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे."अब्जाधीश म्हणाला,"थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो"_ _थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील" अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेल._ _सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला.परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता._ _अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली.त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे,स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती.परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"._👉 *_तात्पर्य :_**_जर आपण एखाद्याला दिलेला शब्द,आश्वासन,वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका.त्याला आशेवर ठेऊ नका.दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो....!_*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14FkunXXC3p/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्वपूर्ण घटना -• २०१८: अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.• २००७: अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात - बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.• १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.• १९८९: ई. एस. वेंकटरामय्या - भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.• १९८१: भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.• १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.• १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.• १९६६: शिवसेना - पक्षाची स्थापना.• १९६१: कुवेत - देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.• १९४९: नासकार - चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.• १९१२: अमेरिका - देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.• १९१०: जागतिक वडील दिन पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.• १८६५: अमेरिका - गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.• १८६२: अमेरिका - देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा🚩 जन्म - • १९७६: डेनिस क्रॉवले- फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक• १९७०: खा. राहुल गांधी - भारतीय राजकारणी• १९६४: बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान• १९६२: आशिष विद्यार्थी - भारतीय अभिनते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार• १९५५: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (निधनः ३१ जुलै २०२२)• १९४७: सलमान रश्दी भारतात जन्मलेले ब्रिटिश-अमेरिकन लेखक - बुकर पुरस्कार• १९४७: सलमान रश्दी - एंग्लो-इंडियन लेखक - बुकर पुरस्कार• १९४५: आँगसान सू की - म्यानमारची राजकारणी• १९४१: वाक्लाव क्लाउस - चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष• १९३३: व्हिक्टर पटसायेव - सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (निधनः २९ जून १९७१)• १९०६: अर्स्ट बोरिस चेन जर्मन-आयरिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधनः १२ ऑगस्ट १९७९)• १८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील - पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य🌹 मृत्यू - • २०२०: विद्याबेन शाह भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)• २००८: बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (जन्म: २३ जानेवारी १९३४)• २०००: माणिक कदम - मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री• १९९८: रमेश मंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्मः ६ जानेवारी १९२५)• १९९६: कमलाबाई पाध्ये - समाजसेविका• १९९३: विल्यम गोल्डिंग - इंग्लिश लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)• १९८१: सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९३१)• १९६५: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे ससंशोधक (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)• १९५६ः थॉमस वॉटसन अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)• १९४९: सैयद जफरुल हसन - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)• १९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड - मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक• १९२२: हिताचियाम टॅनियमों - १९वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म: १९ जानेवारी १८७४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .........!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आषाढी एकादशी 2025 - संत तुकाराम महाराज पालखी देहूतून पंढरपूरकडे रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड :- बालसाहित्यिक ‎डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे - संतपीठाचे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; पंढरपूर, आळंदीच्या संतपीठाला मदत करण्याची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार, पक्षाकडून सर्वाधिकार बहाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते त्यांच्या आवडीची कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात' - शिक्षणमंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सचे पुनरामगन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रताप भिसे, शिक्षक 👤 नारायण शिंगारे👤 नागेश कोसकेवार👤 खुशाल बोकडे👤 शंकर बेल्लूरवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *असं काय आहे ? ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते, पण कोणीही ते वाचू शकत नाही ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वाढदिवसाचा केक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य लहान आहे; पण त्याच्याजवळ असणारी माणुसकी मोठी आहे. - बॉर्न*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या साली संविधानात दुरुस्ती करून 'शिक्षण' या विषयाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आला ?२) साइप्रस या देशाचा सर्वोच्च सन्मान कोणता ?३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण किती देशांचे सर्वोच्च सन्मान प्राप्त झाले आहेत ?४) 'नदीतील खोलगट भागातील खोल पाणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) आंतरराष्ट्रीय संपर्क भाषा म्हणून कोणत्या भाषेला ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) सन १९७६ २) ग्रँड क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मंकीरिओस ३) २३ देश ४) डोह ५) इंग्रजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्तीपांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ ||इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्तीनामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || २ ||देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाईसुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या मानसिकतेत आणि विचारात बदल येतो तेव्हा, त्याला चांगले कधीच दिसत नाही. आणि समजून घेण्याची क्षमता नसते.अशा वागणूकीमुळे स्वतः ही तणावात जगणे व,समोरच्या व्यक्तीचेही जगणे कठीण होऊन जाते. म्हणून समोरची व्यक्ती जर काहीतरी चांगले करत असेल तर आधी त्या, व्यक्तीमधील चांगले,वाईट गुण बघण्याचा प्रयत्न करावा. व्यर्थ विचाराने एखाद्या व्यक्तीचा मार्ग अडवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा अजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/195w54qqWj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 इतिहासातील घटना:• १८१५ – वॉटरलूची लढाई झाली. नेपोलियन बोनापार्टचा पराभव झाला व युरोपातील त्याचे वर्चस्व संपुष्टात आले.• १९४० – दुसरे महायुद्ध: ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी "We shall fight on the beaches..." ही प्रसिद्ध भाषणमालिका सुरू केली.• १९४६ – डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ‘गोवा मुक्ती आंदोलनाची’ सुरुवात केली.• १९७२ – ब्रिटिश योजनेनुसार बांगलादेश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनू शकला नाही.🎂 जन्मदिवस / जन्म:• १९४२ – पॉल मॅकार्टनी, प्रसिद्ध इंग्लिश गायक, बीटल्स बँडचे सदस्य.• १९५३ – जॉर्ज गॅल्वे, ब्रिटिश राजकारणी.• १९७६ – ब्लेक शेल्टन, अमेरिकन काउण्ट्री गायक.⚰️ मृत्यू:• १९२८ – रूपलाल बिस्वास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९९९ – डेसमंड ल्लुएलिन, ब्रिटिश अभिनेते (James Bond मालिकेतील Q).🗓️ विशेष दिवस :• सेशेल्स – संविधान दिवस• ऑटिस्टिक प्राईड डे (Autistic Pride Day) – ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या आत्मगौरवाचा आणि विविधतेचा सन्मान करण्याचा दिवस.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांना शाळा प्रवेश देण्यापूर्वी ......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीत घडणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे दर्शन, अत्याधुनिक संग्रहलायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प G-7 परिषद अर्ध्यावर सोडली, इस्त्रायल-इराण संघर्षामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरजवळच्या 18 गावांची महाराष्ट्रात चर्चा! एका निर्णयामुळे राज्य सरकार टेन्शनमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यस्तरीय जाहिरात एजन्सी फेडरेशन कार्यकारिणीची बिनविरोध निवड:अध्यक्षपदी नाशिकचे रवी पवार, सदस्यपदी नगरचे राजेंद्र म्याना‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सून MP-गुजरातेत दाखल, 19 राज्यांत पावसाचा इशारा:UP आणि बिहारसह 4 राज्यांत वीज कोसळून 19 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये पोहोचले, खलिस्तान समर्थकांनी आक्षेपार्ह फोटो दाखवले, घोषणाबाजी केली; भारतीय समर्थक रस्त्यावर उतरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड महिला संघाच्या अनुभवी कर्णधार सोफी डिवाइनने आयसीसी 2025 महिला वनडे वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर हरणे, साहित्यिक व शिक्षक, वसमत 👤 अनंत राजेश्वर उत्तरवार, शिक्षक, माहूर 👤 केदार पाटील ढगे, बिलोली👤 मेहताब शेख 👤 भीमराव रुद्रावाड 👤 गजानन सुरकार👤 जयदीप वाघमारे 👤 व्यंकटराव वारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*असे काय आहे ? ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलनकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तके शस्त्रांचे काम करतात. - सिसरो*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून 'इंग्रजी' हा एक पाठ्यविषय म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) कावीळ ( पिलिया ) हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?४) 'नदीची सुरुवात होते ती जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ? *उत्तरे :-* १) जून २००० २) साइप्रस ३) यकृत ( लिव्हर ) ४) उगम ५) सोनार तंत्रज्ञान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल.पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते.पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धरीला पंढरीचा चोर*धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ४ ||जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही.अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण,खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते.ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"पवित्र जल"कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्ला मसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जून 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bq8ydyuvM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्त्वाच्या घटना:1631 – मुमताज महलचा मृत्यू झाला. तिच्या स्मरणार्थ बादशहा शाहजहानने ताजमहाल बांधले.1885 – 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' अमेरिकेला भेट देण्यासाठी फ्रान्समधून रवाना करण्यात आली.1944 – आइसलँड देशाने डेनमार्कपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.1972 – वॉटरगेट प्रकरणाची सुरुवात: अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात चोरी🎂 जन्मदिवस / जयंती:1867 – बार्बरा मॅकक्लिंटॉक, अमेरिकन जेनेटिसिस्ट व नोबेल पुरस्कार विजेती.1898 – मो. दा. हातकणंगलेकर, मराठी साहित्यिक, चरित्रकार.1936 – के. नारायणन कुरूप, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त.1943 – निवृत्ती इंदुरीकर, मराठी कीर्तनकार व प्रवचनकार.1980 – वीनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू🕯️ मृत्यू:1631 – मुमताज महल, मुघल सम्राज्ञी.1996 – राजेश खन्ना यांची चित्रपट "आनंद" मधील सहकलाकार उत्पल दत्त यांचे निधन.📜 इतर माहिती:हा दिवस आइसलँडचा प्रजासत्ताक दिवस (National Day of Iceland) म्हणून साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेला चाललो आम्ही*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गडचिरोली - आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लातूरमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका घोड्याला दयामरण; प्रशासन सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य बँकेचे सी-सॉक सेंटर देशात अव्वल, नाबार्ड कडून गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विद्यार्थ्यांनी शॉर्टकट न वापरता मेहनतीने जीवन यशस्वी करावे:महात्मा फुले महाविद्यालयात आ. यावलकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय खेळाडू जखमी, BCCI कडून बदली खेळाडूची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आकाश रेड्डी येताळकर, युवा नेते, धर्माबाद👤 धनंजय गुडसुरकर, साहित्यिक, लातूर 👤 गजानन पाटील👤 गणेश गुंडेवार👤 आप्पा यलकटवार👤 दिग्विजय चव्हाण पाटील👤 लालूभाई शंकरोड, धर्माबाद 👤 गणपत कल्हाळे👤 भास्कर भेदेकर चिटमोगरेकर👤 साईबाबा बनसोडे, आरोग्य विभाग, नांदेड 👤 प्रवीण जावळे👤 अक्तर शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 02*असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो ?**सांगा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नकाशा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही करण्याची प्रेरणा होते, तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हवाई सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?२) मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?३) पाकिस्तानपासून बांगलादेशाची निर्मिती कोणत्या भारतीय प्रधानमंत्र्यानी केली ?४) 'धान्य साठवण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कवकांच्या पोषण पद्धतीला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) ४८ वा २) ५२ दात ३) इंदिरा गांधी ४) कोठार ५) मृतोपजीवी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 कच्चे मांस खाल्ल्यास काय होते ?📕आदिमानव शिकार करायचा. सुरुवातीच्या काळात तो कच्चे मांस खायचा. आजही जगात काही भागात अत्यंत मागासलेल्या अशा आदिवासी जमातीमध्ये कच्चे मांस खाण्याची प्रथा आढळून येते. जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार मानव चवीचवीने, विविध प्रकारे शिजवून/भाजून मांस खाऊ लागला. आज तर मांसाचे पदार्थ बहुतांश सर्वच हॉटेलांमध्ये उपलब्ध असतात व खवैय्ये या पदार्थावर हात मारताना दिसतात.कच्चे मांस खाल्ल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे शिजवणे-भाजणे यामुळे अन्न पचायला सोपे होते. मसाल्यांच्या वापरामुळे ते चविष्ट बनते. अर्थात याहून महत्त्वाचे म्हणजे कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला टेपवर्म किंवा टेपकृमींचा संसर्ग होऊ शकतो. टिनिया सोलीयम टिनीया सजायनाटा, ट्रिचिनॅलीस स्पायरॅलीस आणि फॅस्की ओला हेपॅटीका अशी या टेपकृमींची नावे आहेत. याखेरीज कच्चे मांस खाल्ल्याने अँथ्रक्स, अॅक्टीनोमायकोसीस (एक बुरशीजन्य रोग), प्राण्यांचा क्षयरोग तसेच अन्नविषबाधा इ. रोगही आपल्याला होऊ शकतात.आजकाल मुद्दाम तर कच्चे मांस कोणी खाणार नाही. पण हॉटेलमध्ये किंवा खूप लोक एकत्र जेवत असतील तशा ठिकाणी (खानावळ, लग्नाच्या मेजवान्या वगैरे) घाईगर्दीने मांस शिजवले जाण्याची शक्यता असते किंवा मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्यासाठी रोगट जनावरांचे मांस वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मांस खाणाऱ्यांनी त्यांना अशा प्रकारे त्रास होणार नाही याची खात्री करणे आवश्यक ठरते. सर्वात चांगला उपाय म्हणजे एकतर घरीच मांसाहार करणे आणि अनोळखी किंवा खात्री नसेल त्या ठिकाणी मांसाहार टाळणे. अन्यथा आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• माणूस जसा रंग आणि रूपाने वेगळा दिसतो. तसेच त्याचे विचार, राहणीमान , बोलीभाषा , खाद्यपदार्थ हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून एखाद्याच्या रूपाकडे बघून किंवा त्याच्या बोलीभाषेकडे बघून त्याला नाव ठेवू नये. कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. रंग, रूप, राहणीमान जरी वेगळे असतील तरी शेवटी तो एक मानव आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_दुसरी बाजू_*ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत पहाटे समुद्र किनारी फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक व्यक्ती महिलेच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे आणि जवळच एक मदिराची बाटलीसुद्धा ठेवलेली होती. संतांना वाटले की, हे किती पापी मनूष्य आहेत. सकाळीच मदिरा सेवन करून अशा अवस्थेत पडलेले आहेत. यांना एवढेसुद्धा भान नाही की एका सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागावे. विचार करून संत पुढे निघाले. थोड पुढे गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती समुद्रात बुडत असल्याचे दिसले. संतांना त्याची मदत करायची होती पण त्यांना पोहता येत नव्हते. म्हणून हताश होऊन ते किनाऱ्यावरच उभे राहिले. तितक्यात महिलेच्या मांडिवर डोके ठेऊन झोपलेला व्यक्ती उठला आणि समुद्रात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.यावर संत विचारात पडले की आता या व्यक्तीला काय बोलू. याने तर एका माणसाचे प्राण वाचवून खूप मोठे पूण्य केले आहे. संत लगेच त्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याला विचारले की आपण कोण आहात आणि येथे काय करताय?यावर त्या व्यक्तीने सांगितले की, गुरूजी मी एक मच्छीमार आहे. बऱ्याच दिवसांपासून समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलो होतो, आज सकाळीच किनाऱ्यावर परत आलो आहे. महिलेकडे बघून तो म्हणाला की ती माझी *आई* आहे आणि मला घरी नेण्यासाठी आली आहे. घरात भांडी नसल्यामुळे तीने मदिराच्या बाटलीत पानी भरून आणले. लांबच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो म्हणून किनाऱ्यावर *आई* च्या मांडीवर डोके ठेवून झोपलो होतो.हे ऐकून संताच्या डोळ्यात पाणी आले, त्यांना वाटले मी अत्यंत वाईट विचार करत होतो. समोर पाहिले ते सत्य मानून त्यांच्याविषयी वाईट विचार करत होतो. पण वास्तविकता मात्र वेगळीच आहे.*तात्पर्य*कोणतीही गोष्ट आपण बघत असतो ती दिसते तशी नसते, त्याची एक दूसरी बाजू असते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत आपले मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार करावा. *सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत जायला पाहिजे.* नाहीतर आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते....•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1f5m3XXEuj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१६ जून हा वर्षातील १६७ वा दिवस आहे🚩 महत्त्वाच्या घटना - २०१३: उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. या आपत्तीत किमान ६,००० लोकांचा मृत्यू झाला. ही २००४ च्या सुनामीनंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते.१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर लोकमान्य टिळक यांची सुटका झाली.१९०३: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना झाली.१९६३: व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेनं अंतराळात जाणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवला.२०१०: भूतानने तंबाखूवर संपूर्ण बंदी घातली.🚩 जन्म :- १९५०: मिथुन चक्रवर्ती – प्रसिद्ध भारतीय अभिनेते.१९६८: अरविंद केजरीवाल – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक.१९९४: आर्या आंबेकर – गायिका.१९२०: हेमंत कुमार – गायक, संगीतकार व निर्माते.१९३६: अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी.🚩 मृत्यू :-२०१५: चार्ल्स कोरिया – प्रसिद्ध भारतीय आर्किटेक्ट२०२०: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी१९२५: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील कायदे पंडितसंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेच्या व्यथा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इंद्रायणी दुर्घटना - मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एअर इंडियाचा मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात ! अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला देणार प्रत्येकी 25 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए अखेर जुळले; राजकोटमध्ये होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 48 तास महत्त्वाचे; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान; कोकण, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - तेलंगणा सीमेलगत बासर येथे श्री सरस्वती देवस्थान आहे. या ठिकाणी दर्शनाला गेलेल्या 5 भाविकांचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *NEET-UG चा निकाल जाहीर, राजस्थाचा महेश कुमार पहिला तर महाराष्ट्राचा कृष्णाग जोशी तिसरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने हरवून जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पापनवार, मा. शिक्षक, नांदेड 👤 डॉ. मंगेशकुमार आंबीलवादे, छत्रपती संभाजीनगर 👤 अनिल हिस्सल, शिक्षक, जळगाव 👤 गोविंद नलावाड, शिक्षक, देगलूर 👤 विजयकुमार भोले 👤 कार्तिक स्वामी 👤 ज्योती पाटील 👤 गजानन गडपवार 👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे 👤 ज्ञानेश्वर चिखले 👤 दत्तारेड्डी सुरुकुटवार, आरोग्य विभाग, धर्माबाद 👤 माधव गैनवार, धर्माबाद 👤 अशोक चेपटे👤 ऋषिकेश भंडारे येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*अशी कोणती जागा आहे ?**जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही* *जंगल आहे पण झाडी नाही*आणि *शहर आहे पण पाणी नाही*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणाऱ्यास ईश्वर योग्य फळ देतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक कसोटी चॅम्पियन २०२५ चा किताब कोणत्या संघाने पटकावला ?२) आंबट फळातून कोणता व्हिटॅमिन मिळतो ?३) सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करताना मुख्य घटक कोणते ?४) 'दुसऱ्यावर उपकार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'आंबेडकर ए लाइफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) दक्षिण आफ्रिका २) व्हिटॅमिन 'सी' ३) पेशी संरचना, जीवनपद्धती, उत्पादकता ४) परोपकारी ५) शशी थरूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 गुडमार (बेडकीचा पाला) खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही ? (गुडमार ही एक वनस्पती आहे) 📕साखर किंवा पेढा खाऊन नंतर चहा पिऊन पहा. काय म्हणता हा प्रयोग तुम्ही केला आहे ? असे असेल तर नक्कीच तुम्ही तो परत करणार नाही! कारण चहा अगोड लागतो. दुसरी एक गंमत सांगते... काही खेड्यांमध्ये एक प्रथा आढळते. साप चावलेल्या माणसाला मिरची किंवा कडूनिंबाचा पाला खायला देतात. त्या माणसाने जर मिरचीची चव तिखट वा कडूनिंबाची कडू सांगितली, तर तो बरा होणार असे मानतात व जर चव नाही असे तो म्हणाला, तर तो मरणार असे मानतात. ह्याबद्दल आता माहिती घेऊ.जिभेमुळे आपल्याला चव कळते. चव कळण्यासाठी जिभेवर स्वादांकूर असतात. या स्वादांकुरावर एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात जरी ठेवला तरी आपल्याला चव कळते. जिभेच्या कडांना पाठीमागच्या बाजूस व शेंडयाला कडू, तुरट, आंबट, गोड, खारट अशा चवी वेगवेगळ्या प्रमाणात समजतात. स्वादांकुराचे कार्य व्यवस्थित चालले तरच चव समजते.गुडमार ही एक वनस्पती आहे. तिचा पाला खाल्ल्यानंतर मोड चव कळणाऱ्या वादांकुरावर परिणाम होतोच हे स्वादांकूर त्यांचे कार्य करू शकत नाहीत. साहजिकच गुडमार खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाही. विषारी सापाच्या विषाचा स्वादांकुरांतून चवीची संवेदना मेंदूपर्यंत वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम झाल्याने काही विशिष्ट प्रकारचे साप चावल्यास तिखट, कडू चव कळत नाही. म्हणजे वर सांगितलेल्या खेड्यातील प्रथेत हे वैज्ञानिक तथ्य आहे. पण चव कळत नाही म्हणजे माणूस मरणार, असे मानणे योग्य नाही. सापाच्या विषावरील प्रतिद्रव्य दिल्यास व इतर उपचार मिळाल्यास साप चावलेली व्यक्ती वाचू शकते.काही वेळा स्वादांकुरांचे कार्य काही प्रमाणात कमी होते किंवा आपण खाल्लेल्या पदार्थामुळे त्यांच्या जाणिवाबोथट होतात. याचे उदाहरण म्हणजे तिखटाचा दुसरा घास पहिल्या घासापेक्षा कमी तिखट लागतो व साखर खाऊन चहा पिल्यास चहा अगोड लागतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव माझा विठू सावळामाळ त्याची माझिया गळा….. || धृ ||विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ ||साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…. || २ ||भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतोरांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसेंदिवस माणसाचे वय वाढत जाते. तसतसे त्याच्यात बदल आलेला दिसून येतो. पण, वाढत्या वयाबरोबरच किंवा परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ज्यांचे सकारात्मक विचार बदलत नाही हीच खऱ्या अर्थाने त्याच्यांकडे असलेली संपत्ती असते. अशा संपत्तीचा कधीही अंत होत नाही. म्हणून आपल्यासोबत कोणी कसेही वागले तरी चालेल पण,आपण मात्र आपल्यात असलेल्या मौल्यवान संपत्तीला कायमस्वरूपी जपावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कार एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे . तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल . तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे . तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले " हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली . नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला " तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. " तो चपाती घेऊन गेला . तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला " आई , मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे. हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.🙏 *तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेले चांगलं कर्म तुमच्याकडे परत येत.*🙏🌹 तात्पर्य :- *चांगल्या कर्माचा परतावा नेहमी चांगलाच मिळतो* 🙏•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~