✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☢️ *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☢️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☢️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना* ☢️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☢️ •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: निरंजन मुडे -- कवी* *१९७७: डॉ. रमेश तुळशीराम रावळकर -- कवी, लेखक, संपादक* *१९७१: माधुरी मगर-काकडे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: रवींद्र सूर्यभान साळवे -- कवी, लेखक**१९७१: आशिष नंदकिशोर जायस्वाल -- राज्य मंत्री म.राज्य**१९७०: विनोद पितळे -- पत्रकार, लेखक, कवी**१९६७: सुधीर फाकटकर -- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू: १३ ऑगस्ट २००० )**१९६५: लीलाधर सदाशिव महाजन -- कवी, लेखक* *१९६४: श्रीकांत बोजेवार -- प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, चित्रपट पटकथाकार* *१९६२: जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१: डॉ. शंकर किसन बोराडे -- स्तंभलेखक, समीक्षक (मृत्यू: २६ नोव्हेंबर २०२३ )**१९५९: संदीप वासलेकर -- मराठी तत्त्वज्ञ, संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५: हरिहरन अनंत सुब्रमणी -- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१: रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१: डॉ. किशोर रघुनाथ पवार -- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१: बन्सीलाल तुकाराम कदम -- कवी, लेखक**१९५१: अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४८: रमेश नारायण गोळे -- लेखक**१९४१: दत्ता बाळ -- तत्त्वचिंतक, ग्रंथकार (मृत्यू: ३ सप्टेंबर १९८२ )**१९४१: कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे -- मराठी लेखक, संपादक**१९३४: जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९२९: सर्वोत्तम ठाकूर -- प्रसिद्ध लेखक**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू: २७ जून २००८)**१९०४: रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)**१९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८ )**१८९५: कृष्णराव भाऊराव बाबर -- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू: २१ जून १९२८ )*☢️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☢️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: किशोरी आमोणकर --- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म: १० एप्रिल १९३१ )* *१९९८: हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १९०० )**१९९२: उद्धव जयकृष्ण शेळके -- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार (जन्म: ८ ऑक्टोबर १९३१ )**१९८८: डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर -- एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ, संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म: ४ मे १९१९ )* *१९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: १३ मार्च १८९३ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**_१६८०: छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*वेगवेगळ्या कारणामुळे जी व्यक्ती आपल्या घरापासून दूर राहतात. त्यांना प्रत्येक वेळी जेवण करताना प्रामुख्याने आईच्या हातच्या जेवणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणा ओबीसी आरक्षण- संसदेच्या मंजुरीसाठी दिल्लीत निदर्शने, राहुल गांधी उपस्थित राहणार; सीएम रेड्डी यांनी विधानसभेत 42% आरक्षण केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 केले सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात जुनी वाहनं स्वच्छेने स्क्रॅप केल्यास नव्या वाहनावर १५ टक्के कर सवलत देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जुनी पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारणार, माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या सभेत निर्धार, सर्वांना एकत्रही करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 42 दिवसांची रजा:सरकारी डॉक्टरांची परवानगी आवश्यक; अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल ; शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करण्याचे दिले अधिकार, शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भागवत जेटेवाड , केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे 👤 माधव धुप्पे 👤 प्रकाश साखरे , धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबालगोंडे 👤 शिराळे माधव 👤 रंगराव वाकोडे 👤 संभाजीराव गुनाळे 👤 नागभूषणम M बुसा 👤 कामाजी सरोदे 👤 गंगाधर सुगांवकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 32*दळणवळणाचे महत्वाचे साधन**वाहून नेते भारदार वजन**धावते धातूच्या रस्त्यावर**पोहचते नेहमी अचूक वेळेवर**शरीर माझे लांबच फार**शिट्टी वाजवून होते पसार**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - कोकिळा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिबाचे चक्र सतत फिरत असते, म्हणूनच कोणी हरखून जाऊ नये किंवा हतबलही होऊ नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' असे कोणास म्हटले जाते ?2) संविधानाचे कायदे सल्लागार कोण होते ?3) भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले ?4) संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आले ?5) भारतीय प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) बी. एन. राव 3) 26 नोव्हेंबर 1949 4) 26 जानेवारी 1950 5) 26 जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ॲस्पिरिन कशासाठी वापरतात ?* 📙 *************************सध्याच्या काळात अॅस्पिरिनचा उपयोग ठाऊक नसलेला माणूस सापडणे ही बाब परग्रहावर जीवसृष्टी सापडण्याइतकीच कठीण आहे ! पण तरीही या औषधाचा योग्य वापर कसा करायचा, या गोळीचे दुष्परिणाम काय होऊ शकतात; याची शास्त्रशुद्ध माहिती मात्र फारच थोडय़ा जणांना असते.अॅस्पिरिन या औषधातील मूलभूत घटक म्हणजे अॅसेटाइल सॅलिसिलीक अॅसिड. एका गोळीत त्याचे प्रमाण ३०० मिलीग्रॅम इतके असते. अॅस्पिरिनचा वापर डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दातदुखी, कानदुखी, मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, मुक्कामार लागल्यावर, लचक, मुरगळणे इत्यादीसाठी वेदनाशामक म्हणून होतो. या खेरीज ताप कमी होण्यासाठी आणि सूज कमी होण्यासाठीही ॲस्पिरिन वापरतात. ॲस्पिरिन हे एक स्वस्त असे बहुगुणी औषध आहे.परंतु अॅस्पिरीनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. पोटात आम्लता वाढते, जळजळ होते. मळमळ, आंबट ढेकर, उलटी व क्वचित उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. अॅस्पिरीनचे वावडे असणाऱ्यास खाज सुटणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. ॲस्पिरिनमुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. अॅस्पेरीनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोळी रिकाम्या पोटी घेऊ नये. एकतर काहीतरी खाऊन मगच घ्यावी किंवा एक ग्लास पाणी व त्याबरोबर थोडासा खायचा सोडा घेऊन मगच घ्यावी. आम्लपित्ताचा त्रास असेल, जठरात अल्सर असेल, रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल किंवा गरोदरपणात दिवस भरत आले असतील; तर ही गोळी घेऊ नये. अॅस्पिरीनमुळे ताप, सूज, वेदना कमी झाल्या तरी मूळ रोग बरा होत नाही. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करणे जास्त महत्त्वाचे ठरते. दम्याच्या रुग्णांनी ही गोळी घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो न घेतलेलीच बरी.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥ जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गीं जाण ॥३॥ जाणती प्रेमळ कीर्तानासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग ती कोणीही असो, ज्या परिस्थितीतून बाहेर पडते त्या परिस्थितीत असताना तिला जे काही अनुभव आलेले असतात त्याच अनुभवाच्या आधाराने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते एवढेच नाही तर त्या अनुभवाला आपला गुरू मानून आपले संपूर्ण जीवन समर्पित करत असते. म्हणून म्हणतात ना की, प्रत्येकांचा अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणून कोणाला तुच्छ लेखून त्याची टिंगलटवाळी करू नये. कोणाची वेळ कधी बदलेल हे कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते क्झेनथस, इसाप आपल्या आचरणातून क्झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्झेनथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्झेनथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले.'' क्झेनथस निरूत्तर झाला.तात्पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment