✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८: कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२: फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१: मायकेल जॉन क्लार्क -- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९: गणेश भारतराव रासने -- लेखक* *१९७६: अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३: श्याम श्रीराम ठक -- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१: बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९७०: नारायण ऊमाजी खरात -- कवी* *१९६९: अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९६७: सुनील किसनराव गायकवाड- उंब्रजकर -- मराठी व हिंदीमध्ये लेखन करणारे लेखक**१९५९: भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७: प्रा. अविनाश राजाराम कोल्हे -- प्रसिद्ध लेखक**१९५३: रवींद्र दामोदर लाखे -- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२: दीपक पराशर -- भारतीय अभिनेता**१९५२: भारती बाबुराव हेरकर -- कवयित्री, लेखिका**१९५२: प्रा.अशोक नारायणराव आहेर -- सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार* *१९५१: डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका, समीक्षक* *१९५०: मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र) -- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२: किरण नगरकर -- भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१९ )* *१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९७९ )**१९२०: नानासाहेब शिरगोपीकर -- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४ )**१९१०: शंकर दत्तात्रय भोसले -- कवी, लेखक(मृत्यू: १६ जून १९७२ )**१९०७: गजानन जहागीरदार --- मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ ऑगस्ट १९८८ )**१९०२: बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत.(मृत्यू: २५ एप्रिल १९६८ )**१८९८: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू: २३ जून १९९० )**१८८४: विनायक सीताराम सरवटे -- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक (मृत्यू: २६ जानेवारी १९७२ )**१८७५: वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४० )**१८०५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू: ४ ऑगस्ट १८७५ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म: १ सप्टेंबर १९५९ )**२००९: गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म: ८ जून १९१७ )**२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म: १८ मे १९२० )**१९९२: आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८: मनू गंगाधर नातू -- समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १९१९ )**१९३३: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म: १० सप्टेंबर १८७२ )**१८७२: सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा, असे म्हटले जाते. यातूनच मग दोघांचाही विकास होतो. शाळेला प्रत्येक वेळी धनाने म्हणजे आर्थिक साहाय्य करावे असे ही काही नाही. तनाने व मनाने केलेले सहकार्य देखील शाळेच्या विकासात मोलाची भूमिका असू शकते. म्हणूनच लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांनी सरकारी शाळा म्हणजे आपली शाळा समजून त्या शाळेविषयी आत्मीयता जपली पाहिजे, तरच भविष्यात ह्या शाळा टिकू शकतील.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज', जीएसटी कलेक्शनमधून सरकारच्या तिजोरीत 1.96 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : हवामान खात्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह १४ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिपेक्स 2025 मध्ये 400 श्रेष्ठ प्रकल्पांचे प्रदर्शन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात जाता येणार फिरायला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेजुरी गडावरील भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रसरकारने पेन्शनचे नियम बदलले, NPS किंवा UPS पैकी एकाचच घेता येणार लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - लखनऊ मध्ये खेळलेल्या सामन्यात PBKS ने LSG ला 8 विकेटने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव शिरसाठ पाटील, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी , फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत , साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार , शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे , साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 31*आम्रवृक्षावर बसून गातो**पक्षी हा मधुर आवाजात**अंडी कधी उबवत नाही**ठेवतो दुस-यांच्या घरट्यात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - मोर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देठापासून गळलेले फळ परत जोडता येत नाही. तद्वतच तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे ?2) संविधान सभेचे पहिले सत्र केव्हा भरविण्यात आले होते ? 3) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?4) संविधान तयार होण्यासाठी किती कालावधी लागला ?5) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* 1) भारत 2) 9 डिसेंबर 1946 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4) 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. 5) डॉ. राजेंद्र प्रसाद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥ अरे तूं कृपाळु दीनाचा । महा उदार थोरा मनाचा गा विठोबा ॥३॥ भक्तें पुंडलिकें गोविलासी लोभें । प्रेमें प्रीतीच्या वालभें गा विठोबा ॥४॥ युगें अठ्ठावीस भरलीं । धणी अजुनी नाहीं पुरली गा विठोबा ॥५॥ प्राण होती माझे कासाविस । नामा म्हणे कां धरिलें उदास गा विठोबा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment