✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📝 *_जागतिक मुद्रण दिन_* 📝•••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_ या वर्षातील ५५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_महत्त्वाच्या घटना:_* 📝••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.**१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.**१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.**१९४२: ’व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.**१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.**१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.**१९१८: इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले**१८१२: पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली**१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म*📝 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📝••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: आकाश ठोसर -- मराठी चित्रपट अभिनेता**१९८७: धनंजय वसंत पोटे -- लेखक* *१९८१: रामकृष्ण मारखंडी रोगे -- कवी* *१९७४: डॉ. सुवर्णा सुखदेव गुंड -- कवयित्री, लेखिका* *१९७४: रवींद्र विष्णू गोळे -- पत्रकार, संपादक लेखक**१९७०: अरविंद भैय्यालाल कटरे -- लेखक* *१९६८: प्रा. विकास जनार्दन पिल्लेवान -- लेखक* *१९६६: उदयनराजे भोसले -- लोकसभेचे खासदार**१९६३: संजय लीला भन्साळी --- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक* *१९५९: ॲड. विठ्ठल काष्टे -- कवी* *१९५८: समीर अंजान -- भारतीय गीतकार**१९५६: डी. व्ही. कुलकणी -- प्रसिद्ध साहित्यिक* *१९५५: स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (मृत्यू: ५ ऑक्टोबर  २०११)**१९४८: जे. जयललिता – माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेतील अभिनेत्री (मृत्यू: ५ डिसेंबर, २०१६ )**१९४०: सुरेश भार्गव मुळे -- लेखक* *१९३९: शशिकांत दशरथ मालपेकर -- लेखक**१९३९: जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (मृत्यू: ९ मार्च २०१२ )**१९२४: तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता,गझलचे बादशहा (मृत्यू: ९ मे १९९८ )**१९१४: विनायक चिंतामण देवरुखकर -- लेखक* *१९०६: प्राचार्य प्र. रा. दामले -- लेखक* *१६७०: राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती,शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू: २ मार्च १७०० )*📝 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📝 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सरदूल सिकंदर -- पंजाबी भाषेतील लोक आणि पॉप संगीताशी संबंधित भारतीय गायक(जन्म: १५ जानेवारी १९६१ )* *२०१८: श्रीदेवी -- भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: १३ऑगस्ट १९६३ )**२०११: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (जन्म: १७ सप्टेंबर १९२९ )**१९९८: ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या (जन्म: १८ एप्रिल १९१६ )**१९९०: बाळकृष्ण रामचंद्र मोडक --लेखक 'मुलांचे मासिक' कार (जन्म: २१ फेब्रुवारी १८९८ )**१९८६: रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४ )**१९७५: निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (जन्म: ३० मार्च १८९५ )**१९३६: लक्ष्मीबाई टिळक – लेखिका, ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले (जन्म: १ जून १८६८ )**१८१५: रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.(जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ )**१८१०: हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १० ऑक्टोबर  १७३१)**१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.या घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर एकीकरण समितीने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अहिल्यानगरमध्ये महसूल कार्यालयात पहिलं QR कोड वाचनालय सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अकोल्यातील केंद्रीय विद्यालयाला मंत्रिमंडळाची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशाच्या अर्थसंकल्पानंतर राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाकुंभ- जगातील 50% पेक्षा जास्त सनातनींनी स्नान केले, आतापर्यंत 60 कोटी लोकांनी केले स्नान, 73 देशांचे राजदूत आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहिल्यानगर-पुणे, बीड-परळी रेल्वेमार्ग प्रश्नासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना लवकरच भेटू, मंत्री विखे यांची माहिती, जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी - भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्स ने केला पराभव, विराट कोहली बनला सर्वात जलद 14 हजार धावा बनवणारा तिसरा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक👤 साईप्रसाद वंगल👤 मन देविदास तारु👤 अहमद सुतार👤 संस्कृती मसुरे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *दारोदारी लावतात तिला**समजली जाते  खूप पवित्र**औषधी अशी सर्वगुणसंपन्न**आढळते ही भारतात सर्वत्र*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - हिमालय पर्वत••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मॅपल वृक्षांचा देश कोणता ?२) पिकांची आणेवारी ठरविण्याचे अधिकार कोणाला आहेत ?३) दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?४) 'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणत्या झाडाला 'जीवनाचे झाड' म्हणतात ? *उत्तरे :-* १) कॅनडा २) तहसीलदार ३) सुषमा स्वराज ४) रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दिनमणी, सविता, वासरमणी, मित्र, मार्तंड ५) नारळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥ आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥ काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । इहीं निरंतर जाजावलें ॥३॥ बुडतिया अवचटें लाभे पैं सांगडी । ते जीवें न सोडी तैसें जालें ॥४॥ नामा म्हणे केशवा तूं कृपेचा सागर । झणीं माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध करणारे व त्याला अडविणारे हजारो संख्येने जरी जागोजागी साखळी तयार करून उभे राहत असतील तरी समोर नेणारा एकतरी जण जन्माला येत असतो. म्हणून कोणाला अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण समोर नेणाऱ्याचेच गुणगान केल्या जाते व अडविणाऱ्याला एकदिवस  नको त्या  परिस्थितीचा सामना करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो. शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment